खोटे बोललोच तर
असतेच भय काही !
सत्याने चाललो तर
भय काहीच नाही..
सत्याचा मार्ग सरळ
नसतो वेडा वाकडा !
निर्भय असतो तो
बाकी नसतो लफडा..
भीती नसते मनात
सत्य असता समोर !
निर्मळ कर्माचे फळ
मधुर मिळते तर..
अशीच लागावी शीस्त
सत्य अन् सत्याची !
जीवनाला लागेल वळण
चाकारीबध्द जगण्याची...
#kavita charoli

