ShareChat
click to see wallet page
search
२ फेब्रुवारी २०२६ *मनाची शुद्धता* जीवन क्षणभंगुर आहे, कधी आणि कसे बोलावणे येईल माहित नाही. जे आहे तिथे आहे तसे सोडून जावे लागते. बरोबर काहीच येत नाही, सर्व मागे राहते. जीवनाचे हे अंतिम सत्य सर्वांना माहीत आहे. तरी सुद्धा कमावण्याची हाव कमी होत नाही. जितकी जास्त कमाई तितका अहंकार वाढतो. हेवेदावे सुरू होतात. नाती तुटतात. माणसे दुरावतात अन् एक दिवस या सगळ्या मधून आपण निघून जातो. काय साध्य करतो अशा जगण्यातून? जीवनाचा आनंद मिळतो का? आनंदाने, सर्वांबरोबर समाधानी जीवन जगतो का आपण? अशा जगण्याने आलो काय गेलो काय, कोणाला फरक पडतो? *आजचा संकल्प* _आपल्या असण्याने आधार किंवा नसण्याने इतरांना उणीव जाणवेल, एक चांगली व्यक्ती म्हणून आठवण येईल अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू व जीवनाचा आनंद घेऊ._ _~ सौ. स्नेहलता स. जगताप._ #RD_Creative