*ताण म्हणजे काय ?*
मनावर असणारा ताण दुर करण्यासाठी आपण काय काय करू शकतो ?
स्ट्रेस म्हणजेच तणाव हे शरीराची अशी परिस्थिती असते ज्यामध्ये आपल्या आयुष्यात अचानक बदल होतो आणि ज्यावर आपलं शरीर भावनात्मक आणि शारीरिक प्रतिक्रिया देतं. जेव्हा आपल्या मेंदूला व्यवस्थित आराम मिळत नाही, तेव्हा तो थकतो आणि या थकव्यामुळेच आपल्यावरील तणाव वाढतो.
*उपाय*
१.एकावेळी एकच काम करा.
धावपळीच्या आयुष्यात आपण एकावेळी अनेक काम करण्याच्या प्रयत्नात असतो. ज्यामुळे आपलं टेन्शन वाढत जातं. असं करू नका आणि एकावेळी एकाच कामाला प्राधान्य द्या.
२.थंड पाण्याने आंघोळ करा.
जेव्हा आपल्या शरीरावर थंड पाण्याची धार पडते तेव्हाच आपला तणाव कमी करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते.
३.भरपूर झोप घ्या.
जर तुम्ही रोज 7 ते 8 तास झोप घेतली तर तुमचा स्ट्रेस तुमच्यापासून दूरच राहील.
४.जे चांगलं वाटेल ते करा.
काही वेळा मेंदूऐवजी मनाचं ऐका. जर तुम्हाला संगीत ऐकायला, डान्स करायला किंवा मेकअप करायला आवडत असेल तर जेव्हा जे करायची इच्छा होईल ते जरूर करा.
५.योग्य लाईफस्टाइल फॉलो करा.
जसं योग्य वेळी झोपणं गरजेचं आहे,तसंच सकाळी योग्य वेळी उठणंही आवश्यक आहे. योग्य वेळी जेवण आणि व्यायामसुद्धा गरजेचा आहे.
६.बागकाम करा.
क आपल्या बागकामाच्या आवडीला वेळ देणारे अनेक लोक नेहमी आनंदी आणि निवांत असतात. बागकामामुळे त्यांच्या कुशलतेत वाढ होते.
७.केळाचे सेवन जेवणात करा.
केळं हे आपल्या शरीरातील स्ट्रेस लेव्हल कमी करण्यात मदत करतं. केळ्यांमध्ये टाइप्टोफॉन नावाचं अमिनो अॅसिड असतं, जे तुमचा मूड रिलॅक्स करतं.
८.संगीत ऐका.
जेव्हा तुम्हाला उदास वाटू लागेल तेव्हा ताबडतोब तुमचं आवडतं म्युझिक ऐकायला सुरूवात करा. तुमचा मूड सुधारण्यात हे फारच उपयोगी ठरेल. जर शक्य असेल तर गाणं ऐकऐकता ते गुणगुणायला ही सुरूवात करा.
९.हसण्याने मिळेल आनंद.
मन जर दुःखी असेल तर युट्यूबवरचे फनी व्हिडीओज पाहा. जेव्हा तुम्ही असे फनी व्हिडीओज पाहता तेव्हा तुमचा मूडही बदलतो आणि आत्मविश्वासही वाढतो.
१०.चॉकलेटचा आनंद घ्या.
चॉकलेट हे नेहमीच आनंदी क्षणांना अजूनच द्विगुणीत करतं. चॉकलेटमधील थियोब्रोमाईनमुळे मेंदूत अशी काही क्रिया होते की, तुम्हाला प्रसन्न वाटू लागतं.
११.निसर्गाच्या कुशीत आहे खरा आनंद.
नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला प्रसन्न करतं. यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारांवरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे जर आयुष्यातील तणाव वाढला असल्यास छोटासा ब्रेक घ्या आणि निर्सगाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडा.
१२.साफ-सफाई करा, टेन्शन पळवा.
टेन्शन दूर करण्याचा हाही एक उपाय आहे आणि याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्हाला उदास किंवा दुःखी वाटेल तेव्हा वेळ वाया न घालवता साफसफाई सुरू करा.
१३.वाचाल तर वाचाल.
तुमच्या मनाची दिशा योग्य करण्यासाठी तुम्ही पुस्तकांची मदतही घेऊ शकता. पुस्तक ही माणसाचा सर्वात चांगला मित्र आहेत. प्रत्येक पुस्तक तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगल देतं आणि कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही. पुस्तकांकडे नेहमीच तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतात आणि नवीन दिशा देतात.
१४.तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहा.
तुमच्या मनातील गोष्ट मनातच ठेऊ नका. तुमच्या मनातील चिंता जवळच्या व्यक्तींशी शेअर करा. यामुळे तुमचं दुःख हलकं होई आणि चिंता दूर करण्यातही मदत मिळेल. तसंच त्या गोष्टींचा दुसरा पैलूंही पाहता येईल.
१५.मेडिटेशन करा.
जर तुम्हाला सकारात्मक राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यात मेडिटेशनचा समावेश करा. रोज फक्त पाच मिनिटं मेडिटेशन करा. #सुंदर सकाळच्या गोड शुभेच्छा..... #whatsapp status #Beautiful Wish #गोड शुभेच्छा #आरोग्य

