१ एप्रिलपासून नोकरदार वर्गासाठी पगाराचे आणि नोकरीचे नियम पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवीन 'वेज कोड'नुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (बेसिक पगार) एकूण पगाराच्या ५० टक्के ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कापली जाणारी रक्कम वाढणार आहे. परिणामी, दरमहा हातात येणारा पगार (टेक होम पे) काहीसा कमी होणार असला तरी, निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल. नोकरी बदलणाऱ्या किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालाय. आता राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरीवरून कमी केल्यानंतर कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार आणि इतर सर्व देणी केवळ दोन दिवसांत द्यावी लागतील. यापूर्वी हा हिशोब पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागायचे. या नवीन नियमांमुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मनमानीला लगाम बसणार असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होणार आहे. #🤗1 एप्रिल पासून होणार मोठे बदल 👉 #1 एप्रिल दिन विशेष #📄सरकारी योजना #सरकारी नियम #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
467 likes
2 comments 650 shares

More like this