टाकता पाऊल वाटेवर
कळतात खाचखळगे !
येते तेव्हा प्रचिती
मनुष्य होतो जागे..
कठीण असते वाट
मानवी जीवनाची !
पाऊल पडता पुढे
होते जाणीव जगाची..
जग कळते हळूहळू
जाण होते मनाला !
दुःखी होते तनमन
घाव बसतात ह्रदयाला..
पावलं नाही थकत
शोधतात ते नवनवे !
सहज नाही लाभत
त्याला जे जे हवे......
#kavita charoli

