सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १६ ऑगस्ट इ.स.१२७५
श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
दि.१६ आॅगस्ट इ.स.१२७५ रोजी मराठी भाषेतील श्रेष्ठ तत्वज्ञ आणि प्रतिभावंत कवी श्री. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्याकाठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्तघेतले. [१]
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्य रचना करताना बापविठ्ठलसुत, बापरखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावे ही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी: आदिनाथ >मच्छिंद्रनाथ >गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तीनाथ > ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी , भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्वज्ञ होते. भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) अमृतानुभव ,चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्य रचना आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏 प्रेरणादायक बॅनर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/mbSxNflIqPU
📜 १६ ऑगस्ट इ.स.१६६२
१६६१ साली दसरा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विश्रांतीसाठी श्रीवर्धनगडावर गेले.विश्रांतीनंतर नोव्हेंबर महिन्यात ते राजगडावर परत आले.स्वराज्यात धुमाकूळ घालणाऱ्या शाहिस्तेखानाच्या फौजेवर सुपे भागात सरनौबत नेताजी पालकर गनिमी काव्याने हल्ला करत होते.स्वतः शिवाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेलेली कल्याण भिवंडी परत घेण्याचा प्रयत्नात होते.कल्याणला यावेळी नामदारखान हा मोगली सुभेदार होता.महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला पण महाराजाना तिथून मागे फिरावे लागले.महाराजांनी एप्रिल महिन्यात राजगडावर आल्यावर आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत मोरोपंत पिंगळे याना पेशवेपद दिले तर निळोपंतांना मुजुमदारी दिली.तर पावसाळ्याच्या मध्यावर आणखी एक बदल करत अनाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिशी दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १६ ऑगस्ट इ.स.१६६६
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे.औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले.मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करीन. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता.कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सलतनतीस अनपेक्षितच होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १६ ऑगस्ट इ.स.१६८१
इंग्रजांच्या सहकार्याने मुंबई बंदरात आणि उंदेरीवर राहून सिद्दी मराठी मुलखात लूटमार करत असे. नोव्हेंबर १६८० मध्ये संभाजीराजेनी आपल्या वकिलामार्फत इंग्रजांना धमकीचे पत्र दिले होते की त्यांनी सिद्दीला मदत करणे थांबवले नाही तर संभाजीराजे मुंबईवर स्वारी करतील. संभाजीराजेनी दिलेल्या धमकीने घाबरून इंग्रजानी आपले कॅप्टन गॅरी आणि रॉबर्ट थारवीन याना सिद्दीकडे पाठवून त्याला दम दिला. तरीही सिद्दीच्या हालचाली सुरूच होत्या. त्याने मुंबईला जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली होती. सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांच्या आरमारी तुकडीने १८ जुलैला पहाटे उंदेरीवर हल्ला केला. सतत ४ तासांच्या लढाईनंतर सिद्दीने उंदेरीवरील हा हल्ला परतवून लावला. १६८१ च्या पावसाळ्यानंतर मराठी मुलखाला उपद्रव देणारा सिद्दी आश्रय देणाऱ्या इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. 'त्याने इंग्रज दलालाकडून पैशाची मागणी केली व इंग्रजांच्या मुंबई वखारीची नासधूस केली. 'सिद्दीचे हे कारनामे मुंबईकर इंग्रजानी आपल्या सुरतेच्या वखारीला पत्राने कळवली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १६ ऑगस्ट इ.स.१७००
बादशहाचे हाल पाहून मराठ्यांना जास्तच चेव चढला. सभोवार घिरट्या घालून त्यांनी शक्य तितक्या उच्छाद चालवला. हनुमंतराव निंबाळकराने १६ ऑगस्ट रोजी “खटाव” ठाणे काबीज केले व तेथे मोगलांच्या बाजूने असणार्या मराठी अधिकार्याला ठार मारले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १६ ऑगस्ट इ.स.१७८३
शके १७०५ श्रावण व.४ फिरंगी दि.१६ ऑगस्ट इ.स.१७८३ या दिवशी पानिपतच्या संग्रामात धारातीर्थी पडलेले सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई निधन पहिल्या.सवाई माधवराव यांच्या बालपणात यांनीच त्यांची काळजी घेतली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १६ ऑगस्ट इ.स.१७८९
शके १७११ श्रावण व.१० दि. रोजी१६ ऑगस्ट १७८९ रोजी नागपूरकर मुघोजी भोसल्यांचे चिरंजीव खंडोजी उर्फ चिमणाजी भोसले यांचे निधन झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀