#१७.ऑगस्ट.दिनविशेष #१७_आँगस्ट_१६६६🚩💪
आग्र्याहून सुटका
ही ३५२ वर्षांपूर्वीची गोष्ट
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते.
प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते.
पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६.
पण या घटनेस प्रारंभ होतो तो १२ जून १६६५ रोजी.
त्या दिवशी मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
१२ मे रोजी ते आग्र्यात आले.
त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली.
यानंतर महाराजांना कैद करण्यात आले.
त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता.
मे १६६६ रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती.
परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.
महाराजांना त्यांच्या तळावरच कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले.
१४ ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांच्या भोवती चौकी-पहारे कडक केले. त्याना विठ्ठलदासांच्या हवेलीत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला.
ते याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी रामसिंगच्या तळावर गेले, तर रामसिंगने त्यांना भेट नाकारली. थोडा वेळ वाट पाहून महाराज परत गेले.
तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो.
तेव्हाच त्यांनी ओळखले, की आता अनर्थ होणार. त्यांनी आग्र्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि १७ ऑगस्टला त्यांनी पिंजरा फोडला.
(रजपुतांच्या पत्रात ही तारीख १८ ऑगस्ट आहे, तर आलमगीरनामा या औरंगजेबाच्या अधिकृत आणि समकालीन चरित्रात ती २० ऑगस्ट आहे, असे सेतुमाधवराव सांगतात.)
संदर्भ : श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ,
सेतुमाधवराव पगडी, परचुरे प्रकाशन मन्दिर,
१ मे २०११, पृ. १४ ते ३५
🚩
PC Credit - @siddtoons ❤️
🚩
history_maharashtra


