🆔Official_Sagar 💞💤👑
१५ ऑगस्ट १७९८ क्रांतिकारक वीर संगोळी रायन्ना...🇮🇳
कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक.. तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा.. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर.. मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र..
संगोळी रायन्ना यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी संगोळी या गावी झाला लहानपनापासुनच मर्दांनी खेळांची आवड असल्याने अल्पावधीतच ते कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती बनले वारसा हक्काच्या वादामुळे कित्तूरची राणी चन्नमा आणि इंग्रज यांच्यात युद्धास सुरवात झाली स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले हेच ते कित्तुरचे युद्ध या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः लढल्या तर संगोळळी रायन्ना यांनीही पराक्रमाची शर्त केली परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्मा यांना बेल्लोन्गालच्या किल्ल्यावर पकडण्यात आले मात्र संगोळी रायन्ना यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली त्यांनी गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले त्यांच्या मदतीने त्यांनी सरकारी मालमत्तेवर हल्ले केले ब्रिटिशांचे खजिने लुटले जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकली अशा प्रकारे संगोळी रायन्ना सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले..
रायन्ना यांस पकडण्यासाठी अनेक बक्षिसे आमिषे ब्रीटीशांनी जाहीर केली पण त्याचा काही एक उपयोग झाले नाही. कारण प्रजेची साथ संगोळी रायन्ना यांना होती. रायण्णा यांनी ब्रिटीशांविरुद्ध पुकारलेल्या असहकार आंदोलनास जनतेचा तसेच गावांचा पाठींबा मिळाल्याने ब्रिटीशांची अक्षरश: झोप उडाली होती परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला. २६ जानेवारी १८३१ रोजी नंदगड येथे त्यांना फाशी देण्यात आली. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते..
राष्ट्रप्रथम....🇮🇳 #🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #🫡स्वातंत्र्यसैनिक🇮🇳 #🫡स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳 #🇮🇳आम्ही भारतीय🫡 #🇮🇳स्वातंत्र्य दिन स्टेट्स🫡