ShareChat
click to see wallet page
search
पहा वास्तव शेतकरी बांधवांना किती यातायात करावी लागते पीक चांगले येण्यासाठी आणि भयानक महापूर आला आणि होत्या चे नव्हते करून टाकले माझ्या शेता जवळून वाहत आहे नंदिनी नदी किनारी शेती आहे बंधारा जवळपास असल्याने पाण्याचा दाब जास्त होता रस्ता भराव वाहून गेला आहे नुकसान झाले आहे नदी काठावरील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला पाहिजे तरच तो टिकेल शेतकरी बांधवांना सहानुभूती दाखवली पाहिजे सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंज्या अनुदानावर भागवले जाते मागची भर अजून हि भरली नाही तर तोच पुन्हा एकदा पूराणे थैमान घातले आहे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि सतत वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला पाहिजे सानुग्रह अनुदान जास्त दिले पाहिजे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत सरकारने शेतकऱ्यांना भरपाई म्हणून जास्त प्रमाणात रक्कम देण्यात आली पाहिजे तरच तो टिकेल ही माझी व्यथा आहे इतरांचे काय आहे माहिती नाही शेतकरी नुकसान ग्रस्त झालेला आहे त्यामुळे त्यांना सावरणं गरजेचे आहे हे मायबाप सरकारने ध्यानात घेऊन पाऊल उचलले पाहिजे नाहीतर तो मरुन जाईन ? #महापूर
महापूर - ShareChat
01:00