आज *कोजागरी पौर्णिमा म्हणजेच चंद्राचे पूजन करण्याचा दिवस*. त्यानिमित्ताने *प्राचीन संस्कृत ग्रंथांतील चंद्रासंबंधी आश्चर्यकारक वैज्ञानिक माहिती आपण वाचू.* चंद्राचा पृथ्वीवरुन न दिसणारा भाग आहे. म्हणजे जो आपण पाहू शकत नाही. चंद्राचा अगदी थोडाच भाग आपण पाहू शकतो ह्याचा उल्लेख हजारो वर्षांपूर्वी महाभारतात आहे त्याचा संदर्भ आता आपण पाहूया.
🚩यथा *हिमवतः पार्श्वे पृष्ठं चन्द्रमसो* तथा |
न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता ||🚩
*मनुष्याला हिमालयाचा दुसरा पार्श्वभाग आणि चंद्राचा दुसरा पृष्ठभाग दिसत नाही परंतु, ह्याचा अर्थ असा होत नाही की हिमालयाला पार्श्वभाग आणि चंद्राला पृष्ठभाग नाही.* अशाप्रकारे आत्मा डोळ्यांनी दिसत जरी नसला तरी त्याचे अस्तित्व आहे.
चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएव्हढाच असल्याने चंद्राची कायम एक बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. *पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा फक्त ५९% भाग पृथ्वीवरून दिसतो* (पृथ्वीसन्मुख भाग ) असे आधुनिक विज्ञान सांगते. दुसरा भाग (पृथ्वीविन्मुख ) पृथ्वीवरून दिसू शकत नाही. आता असे पहा की *आधुनिक विज्ञानाने सांगितलेलेच तत्त्व महाभारतात महर्षी व्यासांनी सांगितले आहे.* फक्त किती % भाग पृथ्वीवरून दिसतो हे त्यांनी सांगितलेले नाही. *आधुनिक विज्ञानाशी संबंधित इतकी अचूक माहिती ज्यांनी लिहिली त्या वेदव्यास ऋषींच्या चरणी आपण नतमस्तक व्हावयास हवे.*
*महाभारतात चंद्र- पृथ्वी आणि चंद्रावरील डाग ह्यांची खूप छान माहिती मिळते*. ती खालीलप्रमाणे
🚩 पश्यन्नपि यदा लक्ष्म जगत् सोमे न विन्दति
एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ||८|| 🚩
चंद्रावर जो कलंक आहे ते पृथ्वीचे चिह्न आहे परंतु, ते फक्त पृथ्वीचे चिह्न आहे. प्रत्यक्ष पृथ्वी नाही.
त्याप्रमाणे प्रत्येकाला मी आहे ह्या स्वरुपात आत्म्याचे ज्ञान आहे परंतु, संपूर्ण आत्म्याचे यथार्थ ज्ञान नाही.
आपल्याला *चंद्रावर डाग दिसतात ते डाग म्हणजे चंद्रावर संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.* चंद्रावर डाग हा फक्त पृथ्वीचा नकाशा आहे पण प्रत्यक्ष पृथ्वी नाही. याचाच अर्थ प्रत्येकाला स्व चे म्हणजे आत्म्याचे अगदी थोडे ज्ञान असते त्यावरून आत्म्याची कल्पना करता येते. परंतु, संपूर्ण आत्म्याचे ज्ञान होणे खूप कठीण आहे. *चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे.
*बृहस्पती आणि मनू* ह्यांच्यातील संवाद भीष्म पितामह यांनी धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितला* आहे. तो संवाद महर्षी व्यास यांनी महाभारतात लिहून ठेवला आहे आणि त्याचा उल्लेख *अध्याय क्रमांक २०३* मध्ये आहे. त्यावरील विवेचन पाहू.
*महाभारत शांति पर्व, मोक्षधर्म पर्व* अध्याय २०३ मध्ये श्लोक क्र. १५ पासून श्लोक क्र. २३ पर्यंत चंद्र, सूर्य आणि खगोलीय घटनांचा मन, शरीर आणि आत्म्याशी कसा संबंध आहे हे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. त्याचा अर्थ आपण पाहू.
🚩
यथा चन्द्रो ह्यमावस्यामलिङ्गत्वान्न दृश्यते |
न च नाशोsस्य भवति तथा विद्धि शरीरिणम् ||१५||
🚩
अमावास्या तिथीस चंद्र प्रकाशहीन झाल्यामुळे दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही, चंद्र नाश पावत नाही. त्याचप्रमाणे आत्मा अदृश्य रुपात असला (दिसत नसला) तरी त्याचे अस्तित्व असते. हे मान्य करावेच लागेल. *चंद्र त्याच्या कला ह्याची संपूर्ण शास्त्रीय माहिती महाभारतकाळी अवगत होती.*
🚩
क्षीणकोशो ह्यमावस्यां चन्द्रमा न प्रकाशते |
तद्वन्मूर्तिविमुक्तोsसौ शरीरी नोपलभ्यते ||१६||
🚩
अमावास्या तिथीला चंद्र आपल्या प्रकाश्य स्थानापासून दूर जातो, आकाशात दिसत नाही. त्याचप्रमाणे देहधारी आत्मा शरीरापासून दूर गेल्यावर दृष्टिगोचर होत नाही, डोळ्यांना दिसत नाही.
अमावास्येला चंद्र दिसत नाही परंतु, त्याचे अस्तित्व असते हा खगोलशास्त्रीय सिद्धांत आहे. *(अमा - सह, एकत्र आणि वस \ वास - रहाणे ) = अमावास्या.* ह्या तिथीस सूर्य आणि चंद्र यांचे परस्पर सान्निध्य असते त्यामुळे अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. *सूर्याचन्द्रमसोर्यः परः सन्निकर्षः सामावास्या |*. सूर्य आणि चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या असे म्हणावे. हा खगोलीय सिद्धांत महाभारतकाळी आपणास ज्ञात होता.
🚩
यथाSSकाशान्तरं प्राप्य चन्द्रमा भ्राजते पुनः |
तद्वल्लिङ्गान्तरं प्राप्य शरीरी भ्राजते पुनः ||१७ ||
🚩
पुन्हा तोच चंद्रमा दुसरीकडे आकाशात प्रगट होतो आणि पुन्हा प्रकाशित होतो. अशाप्रकारे जीवात्मा दुसरे शरीर धारण करून पुन्हा प्रगट होतो.
ह्यात आत्मा अमर, अविनाशी असून एक देह सोडून दुसर्या देहात प्रवेश करतो असे म्हटले अरे. वरकरणी हा तत्त्वज्ञान देणारा श्लोक वाटत असला तरी तयार मोठे खगोलीय सत्य दडलेले आहे. ह्यात असे म्हटले आहे की *चंद्रमा दुसर्या आकाशात प्रगट होतो.* म्हणजेच जेव्हा *भारतात दिवस असतो तेव्हा अमेरीकेत रात्र असते किंवा इतर काही देशांमध्ये रात्रच असते.* वास्तविक चंद्र हा मावळत नाही, उगवत नाही तो आहे तिथेच असतो. परंतु, *पृथ्वीचा परिवरनामुळे (स्वतःभोवती फिरणे ) आपल्या दिवस, रात्र आणि इतर खगोलीय घटना दिसतात*
तसेच तो दुसर्या देशात उगवतो म्हणजे *अमेरिकेसारखी पृथ्वीवरील देश, तिथे तो प्रकाशित असो.* आता मला सांगा की महाभारत हे आपल्या भारतात घडले असल्याने भारताच्या विरुद्ध बाजूकडील देशांच्या भौगोलिक परिस्थितीचेसुद्धा ज्ञान महाभारतकाळी होते त्यामुळेच इथे अचूक आणि योग्य वर्णन ऋषींनी केले होते.
🚩
जन्म वृद्धिः क्षयश्चास्य पारत्यक्षेणोपलभ्यते |
सा तु चान्द्रमसी वृत्तिर्न तु तस्य शरीरिणः ||१८ ||
🚩
आपल्याला चंद्राच्या ज्या विविध कला दिसतात ह्या चंद्रामुळे घडत नाहीत कारण चंद्र हा पूर्णच असतो. चंद्रकोरीपासून पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा आणि उलट क्रिया म्हणजे अमावास्या ह्या पृथ्वीच्या गतीमुळे प्राप्त झाल्या आहेत. *ह्याचाच अर्थ पृथ्वी स्वतःभोवती फिरते (पृथ्वीचे परिवलन ) आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते (पृथ्वीचे परिभ्रमण )महाभारतकाळी ज्ञात होते.* म्हणजेच पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या आधीच आम्हाला हे माहिती होते. #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨सोमवार स्पेशल✨

