थोर समाजसुधारक, राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांचे व्यक्तिमत्व साधेपणा, समर्पण आणि सेवेचे प्रतीक आहे. समाजसेवेत असलेली त्यांची रुची राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर अधिक वाढली व नानाजींनी स्थापन केलेल्या दीनदयाळ संशोधन संस्थेने भारताला बळकट करण्यासाठी काम केले. गावातील कृषी क्षेत्र वाढविण्याचे आणि त्यासंबंधीच्या सर्व सुख-सुविधा पुरविण्याचे काम करत, गावात कुटीर उद्योग वाढावेत म्हणून त्यांनी नेहमीच गावकऱ्यांना योग्य ते शिक्षण दिले.
याशिवाय गावाचा सर्वांगीण विकास आणि ग्रामीण आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, पाणी आदी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#नानाजी देशमुख जयंती #💐नानाजी देशमुख जयंती #नानाजी देशमुख #नानाजी देशमुख जयंती विशेष #भारतरत्न नानाजी देशमुख


