भारताचे नवे स्वदेशी सामर्थ्य: १००० किलोचा एरियल बॉम्ब आणि १०,००० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे!
'मेक इन इंडिया' मोहिमेतंर्गत भारत आता संरक्षणात्मक क्षेत्रांत आत्मनिर्भर होत असून, शत्रूचे बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेला १००० किलोचा स्वदेशी एरियल बॉम्ब भारतीय हवाई दलात लवकरच सामील होणार आहे. हा शक्तिशाली बॉम्ब सुखोई-३०, राफेल आणि मिराज यांसारख्या लढाऊ विमानांतून डागता येईल, ज्यामुळे शत्रूचे एअरबेस आणि अंडरग्राउंड बंकर्स क्षणात नष्ट होतील. त्यासोबतच, डीआरडीओ (DRDO) १०,००० किमीपेक्षा जास्त पल्ला असलेल्या एका अत्याधुनिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलवर काम करत आहे. या क्षेपणास्त्रात 'स्टेल्थ टेक्नॉलॉजी' असल्याने ते शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते आणि एकाच वेळी १० ते १२ लक्ष्यांना अचूकपणे वेधू शकते. भारताचे हे वाढते सामर्थ्य जगाला एक स्पष्ट संदेश देत आहे की, भारत आता केवळ स्वतःचा बचावच करणार नाही, तर कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.
जय हिंद
🇮🇳🙏🏻
#✍️ विचार
01:34

