꧁◉❥❤️SONA PATIL
❤️❥◉꧂
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩८ आँगस्ट १६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहीली लढाई. पुरंदर-सासवड येथे अदिलशाही सरदार हैबतराव यांच्याशी लढताना "बाजी पासलकर" यांना विरमरण आले.*
*🚩८ ऑगस्ट इ.स.१६४८ छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि छत्रपती शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ? पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता. राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.*
*हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती. मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.*
*🚩८ ऑगस्ट इ.स.१६७६ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र. ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, "रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना रहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊद्या. या कामात कसलीही हयगय होऊ देउ नका !! असंच पत्र, याच तारखेचं महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिलंय.*
*🚩८ ऑगस्ट इ.स.१६८३ संभाजीराजांनी ही पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला. चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला.*
*🚩८ ऑगस्ट इ.स.१९४२ भारताला स्वातंत्र्य मिळणे हे केवळ भारतासाठीच नाही तर जगाच्या शांतीसाठी गरजेचे आहे.शके १८६४ आषाढ व.१२ फिरंगी दि.*
*🚩८ ऑगस्ट इ.स.१९४२ या दिवशी रात्री दहा वाजता प्रसिद्ध असा "चले जाव" ठराव पास झाला. 'चले जाव'ची घोषणा केली गेली आणि 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे', असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜