-Kalpana K
#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश . .. [] ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन []
. ************************
. कर्माचे स्वरूपही समजावून घेतले पाहिजे अकर्माचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे आणि निषिद्ध कर्मही समजावून घेतले पाहिजे कारण कर्माची गती गहन आहे.
*************************************************
. तरी कर्म म्हणजें स्वभावें । जेणें विश्वकारू संभवे l
. ते सम्यक आधी जाणावें । लागे एथ ll
. **************[ अ.४/८९]***************
. .ll अर्थ ll
ज्यांच्या योगाने हे विश्व आपोआप साकार होते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी ते कर्म नीट जाणून घेतले पाहिजे.
ll चिंतन ll
. भगवंत म्हणतात, अर्जुना, कर्माचे स्वरूपही समजावून घेतले पाहिजे अकर्माचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे आणि निषिद्ध कर्मही समजावून घेतले पाहिजे कारण कर्माची गती गहन आहे.
. वेदविहित, वर्णाश्रमविहित ते कर्म होय. जे निषिद्ध ते विकर्म होय आणि ज्यात कर्मबीज नाही. देहाहंकार नाही. जे केवळ लोकसंग्रहार्थ केले आहे ते अकर्म होय. मद्यपान, धूम्रपान, व्यभिचार, हिंसा, चोरी इत्यादी निषिद्ध कर्मे करू नयेत.
. विहित कर्मेच करावीत. मग ती निष्काम होऊन चित्तशुद्धीद्वारा अकर्मात, अनासक्त कर्मयोगात पालटतात. स्वभावतःच सृष्टीची जी निर्मिती होते तिचे व्यापार घडतात. उत्पत्तीला, या प्रक्रियेला कर्म असे म्हणतात. सूक्ष्म बिन्दपासून सर्व विश्व निर्माण झाले आणि ते विविधतेने नटले हे एक कर्मच होय. हे कर्म पुढे वर्णाश्रमाकडून केले जाते त्याला विशेष कर्म असे नाव आहे. शास्त्रानुसार जे कर्म करू नये असा नियम आहे त्याला निषिद्ध कर्म असे म्हणतात.
. कर्माची ही विविध रूपे जाणून पुरुषाने कर्म केले तर तो कर्मबंधनात अडकत नाही. तसे पाहिले तर सर्व जण हे कर्माधीनच आहेत.
. परब्रह्माचे गुणरूपात्मक स्फुरण म्हणजे कर्म होय. ज्ञानोबा म्हणतात, हे कम कोणी केले असे नसून ते झाले एवढेच आपल्याला म्हणता येईल. निराकार, निर्गुण, आदितत्त्वाला करमेना म्हणून ते जगाएवढे बाळ व्याले. सृष्टीची ही स्वाभाविक निर्मिती म्हणजे आद्यकर्मच होय. याच कर्माचे पुढे वर्णाश्रमानुसार विभाग होऊन निष्कर्म म्हणजे विशेष कर्म झाले.
.
ll राम कृष्ण हरी, माऊली ll