एप्रिल महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना २ कोटी ८४ लाख नुकसान भरपाई मंजूर
GR PDF 🖇️ 👇 👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202606121840546319.pdf
यंदाच्या एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे १,५१०.३२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरूच होते.
त्यानुसार जिल्ह्यातील २,२०४ शेतकरी बांधवांना अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई आज मंजूर झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आपल्या धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी ₹२ कोटी ८४ लक्ष १५ हजार (२८४.१५ लक्ष रुपये) नुकसान भरपाईचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच बाधित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.
#आपले सरकार ऑनलाईन केंद्र #csc जनसेवा केंद्र #CSC digital seva #📄सरकारी योजना #शेतकरी


