ALM Bharat
#माझी पहिली पोस्ट ✌ 🌧️ पावसाने दडी मारली; सोयाबीन पिके सुकू लागली! 🌱😟
हिमायतनगर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; शेतकरी चिंतेत
हिमायतनगर तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने #sheti #shetkri पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला सध्या पावसाची नितांत गरज असताना पाऊस गायब झाल्याने अनेक ठिकाणी कोवळी पिके सुकू लागली आहेत. 🌾☀️
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, कडक उन्हाचा सोयाबीन पिकांवर मोठा परिणाम होत आहे. महागडी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
👉 आगामी एक-दोन दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास सोयाबीनचे मोठे नुकसान होण्याची भीती!
शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून, प्रशासनाने तातडीने पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
📍 हिमायतनगर | नांदेड
#हिमायतनगर #नांदेड #सोयाबीन #सोयाबीनपीक #शेतकरी #शेतकरीचिंतेत #दुबारपेरणी #पावसानेदडीमारली #पावसाचीगरज #शेतकरीसंकट #कृषीबातमी #ग्रामीणबातमी #शेतकऱ्यांचाआवाज #नांदेडन्यूज #Himayatnagar #Nanded #Soybean #Farmers #Rain #Agriculture #BreakingNews