गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२५०९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
पुंडलिक हा भक्तांचा राजा असून त्यांने फार मोठे कार्य साध्य केले आहे. ते म्हणजे असे की वैकुंठात राहणारे परब्रम्ह पंढरीत त्याने आणले आहेत. पांडुरंग बाळमूर्तीत गायी गोपाळांबरोबर होता, तेच परब्रम्ह पुंडलिकाच्या प्रेमा करता आपले दोन्ही चरण विटेवर सारखे ठेवून उभे राहिले आहे. हे पंढरी क्षेत्र म्हणजे वैकुंठा पेक्षा एका अक्षराने अधिक असून भूवैकुंठच आहे. इतरही अनेक स्थाने आहेत की ज्यांना तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते परंतु पंढरी सारखे तीर्थक्षेत्र दुसरे नाहीच. पंढरी क्षेत्राच्या पंचक्रोशीत देखील पाप कधीच येऊ शकत नाही. मग तेथे विधिनिषेधाची वस्ती कशी असेल? पुराण असे सांगते की पंढरीतील माणसे चतुर्भुज आहेत. पंढरी हे क्षेत्र भगवान विष्णूच्या सुदर्शनावर वसलेले क्षेत्र आहे त्यामुळे कल्पाच्या अंती देखील ते कधीच बुडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरी पृथ्वीवरील महाक्षेत्र आहे तिची थोरवी अनुपम्य आहे. मग तेथे जाणारी जे वारकरी आहेत ते धन्य धन्य आहेत.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१०/०७/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #😇भक्तांचा शनिदेव #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝