महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!
कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट ⚠️
मुंबई | प्रतिनिधी :
राज्यातील पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🔴 रेड अलर्ट असलेले जिल्हे
पालघर
ठाणे
मुंबई
रायगड
नाशिक घाटमाथा
पुणे घाटमाथा
सातारा घाटमाथा
🟠 ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा तसेच अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
🟡 येलो अलर्ट
जळगाव, अहिल्यानगर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
⚠️ नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, घाटरस्त्यांवर दरड कोसळणे, नद्या-नाले दुथडी भरून वाहणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🌧️ मॉन्सूनची पुढील वाटचाल
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडील सीमा जामनगर, उदयपूर, अजमेर, झुंझुनू, हिसार आणि भटिंडा या भागांतून जात आहे. पुढील चार दिवसांत परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता असून गुजरात, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या आणखी काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
👉 पुढील ७२ तास सतर्क राहा... हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित राहा.
#⛈️पावसाच्या रेड अलर्टमुळे शाळांना आज सुट्टी🎒


