🆔Official_Sagar 💞💤👑
मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या विरपत्नी द्वारकाबाईसाहेब संताजीराव घोरपडे...🙏🚩
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाईसाहेब दुसर्या द्वारकाबाईसाहेब होय...!
सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहितात की..,
“संताजीरावांच्या निधनानंतर पुढे ५-६ वर्ष राणोजींने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत ते आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होते. त्यावरुन १७०१ ते १७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी अतिशय शौर्याने गाजवली होती. सन १७०२ मध्ये कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदन गढीला मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडर विरूध्दच्या लढाईत राणोजींना बंदुकीची गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले. राणोजींना पुत्र संतती नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांच्याकडे गजेंद्रगड येथे राहत होत्या. त्यांच्या नेमणुकीस बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही गावे लावून दिली होती. राणोजींच्या पत्नी संतूबाई या होत. त्या राणोजींच्या निधनानंतर त्यांना कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून दिले होते. त्या संताजींची द्वितीय पत्नी द्वारकाबाई जवळ राहत होत्या. राणोजींच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडेच्या घराण्यावर आलेलेल्या संकटातून बाहेर काढले ते सरसेनापती संताजींच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी, अशा अवघड प्रसंगी त्यांना साथ दिलीे ती संताजींचे मानसपुत्र नारो महादेव घोरपडे (जोशी) यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजीराज (दुसरे) यांना रणराणी, महाराणी ताराबाई साहेब यांनी गादीवर बसवून स्वतः महाराणी ताराबाई साहेब यांनी राज्यकारभार व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. व सेनापती पद अनुभवी व पराक्रमी धनाजीराव जाधवराव यांना दिले. ते योग्य सुध्दा होते..
( डाॅ. सुवर्णाताई नाईक निंबाळकर ✍🏼) #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त