🆔Official_Sagar 💞💤👑
३० जुलै १६८२ रोजी च्या पत्रातून कारवारकर इंग्रज सुरतकरांना लिहितात :
मोगल बादशहा औरंगजेब, संभाजी राजांवर इतका चिडलेला आहे की त्याने आपल्या डोक्यावरची पगडी फेकून दिली आणि शपथ घेतली की त्याला मारल्याशिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी ती पुन्हा डोक्यावर घालणार नाही..
● इतिहासकार सेतुमाधवराव पगडी म्हणतात...,
“मराठ राज्यावरील अतिशय कठीण प्रसंगी संभाजीमहाराज सारखा दमदार नेता राज्याला मिळाला हे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक समजावे लागेल. मराठ्यांचे राज्य लहान, ते अल्पावधीतच बुडवून टाकता येईल अशी औरंगजेबाची धारणा होती. पण छत्रपती संभाजीराजांनी ती धारणा फोल ठरविली, छत्रपती संभाजीराजांनी फितूर लोकांचा कडेकोट बंदोबस्त केला. गडकोटांची मजबुती केली आणि स्वतः चौफेर मोहिमा काढून त्यांनी औरंगजेबाचा बेत धुळीस मिळवला..”
छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंत बागलाण मुलखातील काही किल्ले मोगलांच्या हाती गेले असले तरी भीमा नदीच्या दक्षिणेकडील स्वराज्यातील एकही किल्ला मोगलांच्या हाती गेला नव्हता. माहुली, रायगड, सिंहगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, पुरंदर, सातारा, पन्हाळगड, विशाळगड हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात राहिले होते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा, पद्मदुर्ग, खांदेरीसारख्या जलदुर्गांवर संभाजीराजांची मजबूत पकड होती. मराठ्यांबरोबरच्या या युद्धात औरंगजेबाला यश येत नव्हते. त्याच्या ध्यानात आले की विजापूर घेतल्याशिवाय मराठ राज्याची पूर्वेची बाजू उघडी पडणार नाही. त्यामुळे विजापूर राज्य जिंकून घेण्याकडे त्याने आपले लक्ष वळविले. अल्पावधीतच औरंगजेबाने विजापूरचे व गोवळकोंड्याचे राज्य बुडवून टाकले. संभाजी महाराजांनी मात्र अचाट साहस व बेदरकारपणाच्या जोरावर आपल्या नऊ वर्षांच्या काळात उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिणेत कांजीवरम पर्यंत पाच हजार किलोमीटरच्या टापूत औरंगजेबासहीत आपल्या विरोधकांविरूद्ध एक झंझावती मोहीम काढली. ब्रिटिशांच्या कागदपत्रात छत्रपती संभाजी महाराजांना “War like Prince” म्हणजे सदैव युद्ध सन्मुख युवराज म्हटल्याची नोंद आहे....👌🏼♥️🔥 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त