#📝कविता / शायरी/ चारोळी
आठवांचे कवडसे जपून ठेव, पापणीत या क्षणाला
ओघळू देऊ नकोस ,अन्यथा होईल बोलबाला..
नितीनियमांच्या चौकटीत नाहीच मावणार स्वप्नझेले
जगरहाटीचे असतात येथे खोटे पुरावे दाखले..
एकच धागा पुरावा असतो, पुरेसा कलंक देण्यागत
लाख चांगुलपणाला लागतो सुरुंग मग क्षणार्धात..
चंदनाचीही होते परिक्षा, कितीही असले जरी शुद्ध
पवित्रतेचे मोजमाप कस लावून करती अवघे जग
नकोच आता स्वप्नातल्या वाटेची सुगंधी चाहूल..
मनातच भावनांची का होतसे दिशाभुल ?
प्राची जयवंत
24-04-2026

