#राजकारण भारत मीडिया हाऊसने 22 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्तावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा देत संबंधित वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना प्रबुद्ध भारतचे वृत्त संपादक जीतरत्न पटाईत यांनी आक्रमक भूमिका घेत, “मुख्यमंत्री म्हणत आहेत बातमी खोटी आहे, नोटीस पाठवणार आहेत, तर येऊद्या नोटीस... मग बघू,” अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.


