Marathi Social Media
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांत हलक्या सरी बरसल्या. आता 16 ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, पुणे, सातारा, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या भागांसाठी कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असून, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या इतर भागांत प्रामुख्याने हलका पाऊस राहण्याचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
#महाराष्ट्रपाऊस #हवामानअंदाज #पावसाचा_अलर्ट
#⛈️27 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा⚠️