adityakumar.
546 views 1 days ago
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला, "तुम्हाला राज कपूर आणि अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी काय माहिती आहे? "प्लीज टेल मी अबाऊट राज कपूर ॲन्ड अण्णा भाऊ साठे" त्यावेळी नेहरूंनी तत्काळ उत्तर दिलं, "राज कपूर हा मोठा चित्रपट अभिनेता आहे." मात्र अण्णा भाऊंच्या संदर्भात त्यांना काही सांगता आलं नाही. पत्रकार परिषद संपवून पंडितजी निघाले. तेव्हा पुन्हा त्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, "अण्णा भाऊ साठेंविषयी सांगा?" परंतु पंडितजी चलाख होते. त्यांनी त्या पत्रकाराला सांगितले. "अण्णा भाऊ साठे चालत चालत सांगण्याचा विषय आहे का? मी तुम्हाला नंतर सांगेन." ऑफिसमध्ये गेल्यानंतर पंडितजींनी आपले सेक्रेटरी मंडळींना "भारतातील अण्णा भाऊ साठेंच्या संदर्भातील सर्व माहिती काढा" असा आदेश दिला. त्यावेळेला थंडरींग कॉल दिल्ली, मुंबईला करण्यात आले. कुजबुज चर्चा होत असताना दिल्लीच्या एका स्टुडिओमध्ये लता मंगेशकरांनी ही कुजबुज ऐकली आणि "अण्णा भाऊ साठेंना मी ओळखते. त्यांची दोन गाणी मी चित्रपटात गायलेली आहे आणि यापेक्षा जास्त माहिती हवी असेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांना विचारा" असे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या सचिवांनी यशवंतरावांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते चीन व भारत सीमेवर बर्फाळ प्रदेशामध्ये होते. भारतातील पंतप्रधानांच्या सचिवांचा अण्णा भाऊंची चौकशी करण्यासाठी फोन आल्यावर ते लगेच म्हणाले, "अण्णा भाऊंना पकडू नका किंवा मारू नका." त्यावेळी सचिवांनी सांगितले, "पंडितजींना अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये रशियामध्ये माहिती पाहिजे." अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील सदस्य व रस्त्यावर चळवळ करणारे कार्यकर्ते होते. म्हणून चव्हाणांना वाटले आंदोलन करत असतील म्हणून त्यांच्या तोंडून लगेच वाक्य निघाले होते, 'अण्णा भाऊंना अटक करू नका'. सचिवांना त्यांनी सांगितले, पंडितजींशी मी सरळ संपर्क साधतो आणि यशवंतराव तब्बल २० मिनिटे पंडितजींना माहिती देत होते. रात्रीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी पुन्हा पंडितजींना छेडले, "अण्णा भाऊ साठे कोण आहेत." त्यावेळी पंडितजी म्हणाले, "अण्णा भाऊ साठे हे मोठे कलाकार, शाहीर, साहित्यिक आहेत. परंतु या अगोदर मला त्यांच्या संदर्भात माहिती नव्हती." मी जेव्हा भारतात जाईल तेव्हा त्यांची त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेईल. भारतातल्या मराठा वर्तमानपत्रामध्ये, "भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अण्णा भाऊंच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये प्रत्यक्ष भेट देणार आहेत" ही बातमी आली. त्यावेळी मराठा वर्तमानपत्राचे संपादक आचार्य प्र. के. अत्रे होते. उपसंपादक विनायकराव भावे होते. विनायक भावे व नारायण सुर्वे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अण्णा भाऊंच्या घरी गेले. त्यांनी अण्णांना मोठ्याने हाका मारल्या. "अण्णा, तुझ्या घरी पंडित जवाहरलाल नेहरू भेटायला येणार आहेत." त्यावेळी तोंडावरची गोधडी बाजूला सारत अण्णा म्हणाले, "कुणी का असेना माझ्या झोपडीत जर यायचे असेल तर त्याला वाकूनच यावे लागेल." ही बातमीसुद्धा मराठा वर्तमानपत्रामध्ये ठळक अक्षरात प्रसिद्ध झाली आणि पेपरवाल्यांनी पंडितजींना विचारणा केली. "तुम्ही अण्णा भाऊंना भेटायला जाणार आहात, तर ते म्हणतात माझ्या झोपडीत येणाऱ्या माणसाला वाकूनच यावं लागेल." पंडितजी सुद्धा मोठे चलाख राजकारणी होते, मुरलेले होते. ते त्या पत्रकारांना म्हणाले, "अण्णा भाऊ साठेंसारख्या कलाकारापुढे मी एकदाच नव्हे तर सतरा वेळा वाकून जायला तयार आहे." #✍️ विचार #🙂सत्य वचन #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #Anna Bhau Sathe Jayanti
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
6 likes
5 shares

More like this