Ambedkar_Thoughts
ShareChat
click to see wallet page
@1019259312
1019259312
Ambedkar_Thoughts
@1019259312
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा जय भीम 💙
२९ एप्रिल १६६१ रोजी, शृंगारपूर स्वराज्यात दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज...🚩 स्वराज्याची धामधूम तळकोकणात सुरु झाली वास्तविक विजापूरकरांच्या मालकीचा हा प्रदेश परंतु जर्जर झालेल्या विजापूर दरबारात एकाही बडा सरदार येथे स्वराज्याविरुद्ध लढण्याच्या तोडीचा नव्हता. अखेर शृंगारपूरच्या सुर्वे या मांडलीकासचं राजांचा बंदोबस्त करण्यास सांगितले महाराज राजापूर मुक्कामी असतना सूर्यरावास आदिलशाहचा हा निरोप मिळाला. याच वेळी संगमेश्‍वरी तान्हाजी मालुसरेंच्या पायदळाला महाराजांनी रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी ठेवलेले होते. या सैन्यावर सूर्याजीरावच्या पायदळाने अकस्मात हल्ला केला सुर्वे यांचे सैन्य तसे बरेचं त्यात आकस्मात हल्ला या गोष्टीमुळे मराठे पहिल्यांदा गोंधळले. त्यातच मराठा सरदार पिलाजी निळकंठराव सरनाईक घाबरून मैदान सोडून पळून जाऊ लागले असता खुद्द तान्हाजी मालुसरेंनी त्यांना पकडून एका दगडाला बांधून ठेवले आणि स्वतः शत्रूवर तुटून पडले, या गोष्टीमुळे इतर मावळ्यांमध्ये सुधा कमालीचा चेव चढला आणि शर्थीने लढाई सुरू झाली.. रात्रभर लढाई सुरूच होती नंतर सूर्याजीरावांचे सैन्य माघार घेऊ लागले आणि अखेर अवसान गळून शत्रूसैन्याने पळ काढला. राजापूरहून माघारी आल्यावर महाराजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी तान्हाजींचा यथोचित सत्कार केला परंतु सुर्यरावाचा हिसाब चुकता करण्याचे राहिलेच. तेव्हा थेट पुढे सूर्यराव सुर्वेवर म्हणजे शृंगारपुरावर स्वारी निघाली... (बाकी माहिती कमेंट मध्ये) #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन ▫️महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती▫️ भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय, संविधानिक लोकशाही, आर्थिक समता आणि मानवी हक्कांच्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण करणे, हा अध्यासन स्थापन करण्यामागील उद्देश आहे. अध्यासनात़ संविधान आणि लोकशाही, सामाजिक समता, आर्थिक लोकशाही आणि पुनर्वितरण धोरणे, श्रमिक हक्क आणि सामाजिक संरक्षण, संघराज्यवाद आणि सार्वजनिक वित्त, समावेशक शासन व्यवस्था आदी विषयांवरील आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. राज्यघटना अध्य़यन, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरण विषयांत प्रगत संशोधन करणे, वार्षिक व्याख्यानमाला, परिसंवाद आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे, लोकशाही आणि समावेशक विकास विषयक शैक्षणिक प्रकाशने आणि संशोधनाला चालना देणे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था संशोधकांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवणे ही अध्यासनाची उद्दिष्ट्ये असणार आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बौध्दिक वारसा असलेल्या विधि, शासन, आंतरराष्ट्रीय विकास, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि पब्लिक पॉलिसी या विषयांतील विद्वान प्राध्यापक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कार्यरत आहेत. पहिल्या दहा वर्षात या अध्यासनासाठी या संस्थेतील विद्यमान प्राध्यापकांतून निवड केली जाईल. त्यानंतर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या निवड प्रक्रियेव्दारे भरती केली जाईल. अध्यासनासाठी तत्वज्ञान, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय विकास, शासन प्रशासन, विधि आणि सामाजिक धोरण असे संभाव्य विभाग असतील. अध्यासन स्थापन करण्यासाठी ३० लाख पौंड ( ३७ कोटी १३ लाख ८२,३०० रुपये) एकरकमी निधी दिला जाणार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲड पॉलिटिकल सायन्स, महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने दहा पीएचडी शिष्यवृत्ती देण्यास मान्यता देण्यात आली. पीएचडीचा कालावधी चार वर्षाचा असेल. पहिली शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून आणि दुसरी शिष्यवृत्ती २०२९-३० मध्ये सुरू करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी प्राप्त अर्जांची छाननी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या समितीव्दारे केली जाईल. राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची इच्छा स्पष्ट नमूद करणे आवश्यक असेल. त्यांचे अर्ज लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमि्क्समधील संबंधित विभागांकडून विचारात घेतले जातील. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आणि त्यांनी निवडलेल्या विभागांची माहिती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला कळविली जाईल. शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जांची छाननी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या समितीव्दारे केली जाईल. पहिल्या दहा शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासन, बार्टी आणि लंडन स्कूल इकॉनॉमिक्स यांच्यादरम्यान ५०:५० प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. २०२७-२८ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक लाख ९१ हजार ३१७ पौंड खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच दोन कोटी ३६ लाख ८३ ९१६ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी निम्मा म्हणजेच १ कोटी १८ लाख ४१ हजार ९५८ रुपये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कडून निधी देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम राबविण्यासाठी बार्टी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲड पॉलिटिकल सायन्स यांच्याबरोबर सामंजस्य करार केला जाईल. हा करार करण्यास, त्यानंतर अंतिम करार करण्यास आणि इतर आवश्यक परवानग्या घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ShareChat
दुर्गराज रायगड: स्वराज्याचे धडधडते हृदय कपाळी चढवून माती या सह्याद्रीच्या कुशीची, गाथा गातो आजही ही शिवबाच्या युगाची... गर्जावे नभ आज पुन्हा, घुमतो अस्मानी नाद, अजरामर या मातीला, रायगडाची आहे साद! जागृत ज्याच्या चिरा-चिरा, तिथे इतिहास बोलतो, शिवरायांच्या पराक्रमाचा, वारसा तो तोलतो... दगडालाही फुटते वाचा, स्मरून तो राज्याभिषेक, अन्यायाचा अंत करणारा, इथेच घडला 'एक'! हृदय साक्षात शिवबांचे हा, गडकोट राजाचा, ज्यात आजही श्वास वाहतो, स्वाभिमानी स्वराज्याचा! #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय
🙏शिवदिनविशेष📜 - [মতুন্ব্ীয: तरायगड हेशिवरायांचं आह.. आणित्या ह्वदयातः स्वराज्य महस्स धडधडतं  [মতুন্ব্ীয: तरायगड हेशिवरायांचं आह.. आणित्या ह्वदयातः स्वराज्य महस्स धडधडतं - ShareChat
मालोजींना शहाजी आणि शरीफजी असे दोन मुलगे होते. शहाजी इ. स. १५९४ व शरीफजी इ. स. १५९७ मध्ये वेरूळ येथे जन्मले. मालोजीराजे इ. स. १६०६ मध्ये निवर्तले. त्यावेळी शहाजीराजे अवघे पाच वर्षांचे होते. शहाजी आणि शरीफजी या आपल्या दोन मुलांचे संगोपन त्यांनी मालोजी भोसले यांचे मेव्हणे वणगोजी नाईक निंबाळकर यांनी नीट केले. मालोजींनी मोठा विजापूरजवळील आपलेपणाचा दौलतखान्याचा मान आपल्या शिरावर घेतला. आणि दौलतीचा सांभाळ चांगल्या रीतीने केला. याचवेळी दक्षिणेत सारा हिंदुस्थान आपल्या ताब्यात आणण्याची आकांक्षा बाळगून बादशाहीची चढाई होत होती. दक्षिणेत इ. स. १५९५ मध्ये अहमदनगरचा बुरहान निजामशहा मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाही दरबारात सतत गटबाजी सुरू होऊन सरदारांमध्ये वैरभाव वाढू लागला. त्यामुळे मोगलांना ही वृत्ते अकबर बादशहाला समजली. तेव्हा या गोंधळाचा फायदा घेण्याचे ठरवून अकबर बादशहाने दक्षिणेत अहमदनगरवर फौज पाठविली. त्यावेळी निजामशाहीच्या मुख्य कारभारात चांदबिबी यांच्याकडे मालोजींना कडवा प्रतिकार केला व निजामशाहीचे रक्षण केले. त्यावेळी शहाजी राजे व मालोजी अहमदनगरजवळील खेड येथे दाखल झाले आणि ते राजधानीत राहिले. इ. स. १६०० ऑगस्ट १६ ला मोगलांनी अहमदनगर जिंकले. [बेंद्रे, मालोजी आणि शहाजी महाराज, पृ. १११.] राजधानीचे ठिकाण हातातून गेले तरी वजीर मलिक अंबर निराश झाला नाही. त्याने मुरतजा निजामशहा दुसरा याच्या नावाने परंडा किल्ल्यावरून हाती फिरवून व निजामशाहीचा कारभार चालू केला. इ. स. १६१० मध्ये मलिक अंबरने खडकी [औरंगाबाद] येथे नवी राजधानी स्थापली. पुढील वर्षी मलिक अंबरने राजधानी तेथेच आणली. इ. स. १६१६ मध्ये मोगल सरदारांनी खडकी शहरावर स्वारी केली तेव्हा मलिक अंबरने रणांगणात टिकाव धरला व समेट करून आणला. मराठ्यांचा उदय झाला तो मलिक अंबरच्या काळात. मलिक अंबरने मोगलांना लढा देण्यासाठी इ. स. १६१८ मध्ये केली. मोगलांची झुंज देण्यासाठी गनिमी काव्याने लढणाऱ्या मराठ्यांचे लष्कर उभारण्यात माळोजी भोसले यांचा वाटा मोठा होता. इ. स. १६२४ ते १६२६ या काळात मलिक अंबरच्या पदरी असलेले जाधव, भोसले, शहाजी भोसले, खराटे, चव्हाण इत्यादी सरदारांनी अनुभव मिळवून त्यांचा उदय झाला. शहाजीराजे यांचे लग्न लखुजी जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई हिच्याशी इ. स. १६११ च्या सुमारास झाले. [शिवभारतात/४४ वे पृ.] © 𝗚𝗼𝗹𝗱𝗲𝗻 𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗢𝗳 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗮𝘀 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🙏शिवदिनविशेष📜 - शहाजी राजे भोसले शहाजी राजे भोसले - ShareChat
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भिमाई म्हणतात.. का बरं म्हणत असतील? पुरुष कुठे आई होतो का? बाबासाहेबांचे हृदय हे , मातृ हृदय होतं फार संवेदनशील होते बाबासाहेब.. #प्रसंग:🇮🇳✒📓🎓✊💙 कामगार नेते व मजूर मंत्री असताना धनबाद येथील कोळसा खाणीत गेले तेव्हा त्यांना एक तरुण व गर्भवती महिला कोळशाच्या खाणीतून वर येताना दिसली.. त्या महिलेला बाबासाहेबांनी विचारले साडेसात महिन्याची गर्भवती असताना काम का? करत आहेस. त्या महिलेचे उत्तर होतं साहेब पोट आग आहे ! काय करणार काम नाही केलं तर पोट कसं भरणार . बाबासाहेबांनी स्वतः चारशे फूट आत गेले.. बाबासाहेब जस जसे खाली जात होते तसं तसा ऑक्सिजन कमी होत होता.. बाबासाहेब वर आल्यानंतर शांतपणे प्रशासनाला विचारतात आम्ही जेव्हा खाली जाऊ लागलो तेव्हा ऑक्सिजन कमी होत होता.. जवा ती साडेसात महिन्याची गर्भवती महिला या खदानीत काम करते त्यावेळेस सुद्धा ऑक्सिजन कमी होत असेल ना? बाबासाहेब म्हणाले ऑक्सिजन कमी झाला तर त्या बाईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला ऑक्सिजन कमी पडला तर तो अपंग जन्माला आला किंवा आतच मेला तर याला जबाबदार कोण? सर्व प्रशासन शांत बसलं होतं तेवढ्यात बाबासाहेबांनी एक फाईल घेतली फाईलवर ऑर्डर काढली तिथल्या तिथेच... बाईला बाळातपणाआधी सहा आठवडे अगोदर रजा आणि बाळंतपणाच्या नंतर दहा आठवडे रजा मिळेल,ही रजा पूर्ण पगारी असेल.. या काळात त्यांना पगार घरपोच देण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. #गर्भवती महिला दहा आठवड्यानंतर जेव्हा कामावर येईल तेव्हा त्या बाळाला सांभाळण्यासाठी एक वयस्कर बाई ठेवा. (तेव्हा पाळणाघर वगैरे नव्हते) आईची आणि बाळाची किमान सहा ते आठ वेळेस भेट झाली पाहिजे याची व्यवस्था करावी.. यावरून हे फक्त बाबासाहेबाच करू शकतात. हे बाबासाहेबांचे मातृहृदय होते.. टिप: ( #वक्ते : डॉ. प्रल्हाद लुलेकर ह्यांच्या लाइव्ह सेशन मधून हा प्रसंग मी माझ्या शब्दात मांडला आहे..) हा फोटो, 400 फुट मध्ये जाऊन वर आल्यानंतरच आहे.. #ThanksAmbedkar #महामानव #ambedkar #jaibhim #jaybhim #जयभीम #सही #love #care #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम
🙏महामानव डॉ. आंबेडकर - ShareChat
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मातंग समाजाबद्दल प्रेम... परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सात कोटी अस्पृश्य मानलेल्या जनतेचे अनभिषिक्त राजे होते. त्यांना या सात कोटी जनतेबद्दल अत्यंत जिव्हाळा-आपुलकी, प्रेम होते. सात कोटी समाज म्हणजे एक विशिष्ट जमात नसून महार, मांग, चांभार, भंगी, कोर वगैरे जमातींचा एकजिनसी समाज होय. अस्पृश्य समाज भारतात अल्पसंख्य असल्यामुळे, अल्पसंख्य जमातीवर होणारा अन्याय-जुलूम यांची स्वानुभावाने मनस्वी चीड होती. म्हणूनच डॉ. बाबासाहेब हे अस्पृश्यांतील अल्पसंख्य मातंग जातीबद्दल, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दाखवित, अशा मातंग जातीवर अन्याय होऊं नये म्हणून अत्यंत तळमळीने त्यांना आपले समजून त्यांच्या उत्कर्षाची काळजी वाहात. इ.स. १९३७ सालचीच गोष्ट, मुंबई असेंब्लीच्या निवडणुकीसाठी, -अस्पृश्यांतील अल्पसंख्यक मातंग जातीतील लोकांचे अर्ज मागितले व श्री. के. एम. काळोखे, मांग यांना मुंबईतून उमेदवार म्हणून उभे केले. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या व्यासपिठावरून जाहीर केले की, मांग लोकांच्या कल्याणासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन एवढेच नव्हे तर मांग लोकांवर कोणी अत्याचार केला तर मी माझे सर्व प्रयत्न मांग जातीवरील अन्याय दूर करण्यासाठीच करीत राहीन. त्या नंतर १९३८ साली मुंबई इलाखा मातंग परिषद भरविण्याचा प्रयत्न मी, माझे स्नेही करीत असता डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला बोलावणे केले. त्या प्रमाणे भाऊसाहेब रोकडे, शंकरराव शिंदे, पवार, श्री. के. एम. काळोखे व मी राजगृहावर मुंबईस गेलो, तेथे त्यांनी आम्हास परिषदेबद्दल मार्गदर्शन केले, व या परिषदेस मी हजर राहीन असें वचन दिले. शिवाय आम्हाला सांगितले की, मांग जातीवर स्पृश्य अस्पृश्य यांनी जर अन्याय, जुलूम, केला तर मी मांग जातीस संरक्षण देईन व मांग जातीच्या उद्धारासाठी झटेनं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मजूरमंत्री होते; त्यावेळी उच्च शिक्षणासाठी परराष्ट्रांत मागासलेल्या वर्गातील जी मुले गेली होती, त्यामध्ये मांग समाजाचे श्री. आवळे हे होते. पुढे १९४६ साली श्री. फत्तुजी गांगुर्डे यांस आणि १९५२ साली मला (खंडाळे) मुंबई असेंब्ली निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले. इ.स.१९५१ साली औरंगाबाद येथे शे.का.फे. च्या मेळाव्यापुढे डॉ. बाबासाहेब यांनी सांगितले कों, शे.का.फे. मध्ये या अल्पसंख्य जाती आहेत त्यांना मी प्रथम संधी देईन. ज्या ज्या वेळेस मी डॉ. बाबासाहेबांना भेटलो, त्या त्या वेळी मातंग समाजाच्या उद्धाराकरितां जिव्हाळ्याने ते विचारपूस करीत. त्यामुळे मातंग समाजास डॉ. बाबासाहेब आशास्थान वाटे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी आपल्या पांच लाख अनुयायांसह बौद्ध धम्मदीक्षा घेतली. अर्थात मी त्या पवित्र सोहोळ्यांत सामील होतो. दीक्षा समारंभ संपला. नागपूरच्या शाम हॉटेलमध्ये डॉ. बाबासाहेबांना भेटण्यासाठी पूज्य दादासाहेब गायकवाड, बॅ. खोब्रागडे, बी. सी. कांबळे, आर.डी. भंडारे, कु. शांताबाई दाणी, रुपवते वकील, अॅ. शंकरराव खरात, श्री. तळींकर, श्री. कवाडे, श्री. मेश्राम, श्री. आवळे वगैरे नागपूर-मुंबई महाराष्ट्रातील आम्ही बरेच कार्यकर्ते भेटण्यास गेलो. डॉ. बाबासाहेब यांनी सर्वांची विचारपूस केल्यावर डॉ. बाबासाहेब मला म्हणाले काय रे खंडाळे "मांग लोक काय करतात." त्यावर मी म्हणालो, बाबा आपल्या पक्षाचे काम करतात. लगेच बाबा म्हणाले आता पुढे काय करणार? त्यावर मी विनयाने, नम्रपणे म्हणालो, आता मांग लोक बौद्ध धर्म प्रचार व स्वीकार करणार अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब नेहमी आस्थेवाईकपणे मातंग समाजाची चौकशी करून मातंग समाजाचा उद्धार व्हावा, अशी नेहमी ते तळमळ करीत असत... संकलन संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक मुक्तीदाता विशेषांक संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर गौरव गाथा लेखक आर.जी. खंडाळे, दाँड. #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम
🙏महामानव डॉ. आंबेडकर - २RRAS< २RRAS< - ShareChat
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ पत्र व मराठी हस्ताक्षर. "हे पत्र बाबासाहेबांनी लंडनहून शिवतरकरांना पाठवलेले असून वाघमारे गुरूजी यशवंतराव व मुकुंदराजांची शिकवणी घेत असत." आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे आपण विशेष लक्ष पुरवावे अशी माझी विनंती आहे. तूर्त रा. वाघमारे यास तीन रुपयावर चालत असल्यास सांगणे. घरी जरा तंगी आहे. मी परत आल्यानंतर त्यांच्या उपकाराची फेड करीन. ते कबूल नसतील तर, आहे तो मुषाहिरा चालू ठेवावा. गडकर्यांची नाटके पाठवण्यास विसरू नये. रा. रा. भातणकर बाळकृष्ण यास नमस्कार सांगणे. आपला स्नेहाळू भीमराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हस्ताक्षर ❤️☘️🌿 कृपया मला जेवढ या पत्रामध्ये हस्ताक्षर समजलं ते मी इथे लिहिला आहे.. #ThanksAmbedkar #महामानव #jaibhim #ambedkar #jaybhim #जयभीम #सही #rarephotos #letter #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
🙏महामानव डॉ. आंबेडकर - 371೬47 ( {710 %} . } 77+27 /9 0 34দদ 149|`` Z8 4 7೬ ~3? 1 41 % ೧_ 31/0 शधnर 4२ m 7 V . 427 4? -7 <~1u2/?` +70~7. ६२ 12/`~57 37( )7 47n 311e27 4a? ~47<2(7 ~27.1` 31, 47೧ ४ त७ %ণ @ }u77?1 72   31/7 ೧ 7177 | 47 4(. ১০$ ^,_24(-7< 7729 u78  u೭' ? 0 1d ఎ11 427 (17 7(07 7ఎ7 416 0 य२ ४२फार -सांग ७७ 0| 34777+17r 0 % २ा त चाचासाहेव आबेडकर हरताध्षर 371೬47 ( {710 %} . } 77+27 /9 0 34দদ 149|`` Z8 4 7೬ ~3? 1 41 % ೧_ 31/0 शधnर 4२ m 7 V . 427 4? -7 <~1u2/?` +70~7. ६२ 12/`~57 37( )7 47n 311e27 4a? ~47<2(7 ~27.1` 31, 47೧ ४ त७ %ণ @ }u77?1 72   31/7 ೧ 7177 | 47 4(. ১০$ ^,_24(-7< 7729 u78  u೭' ? 0 1d ఎ11 427 (17 7(07 7ఎ7 416 0 य२ ४२फार -सांग ७७ 0| 34777+17r 0 % २ा त चाचासाहेव आबेडकर हरताध्षर - ShareChat
#⚛️ तथागत गौतम बुद्ध ☸️ #जय शिवराय #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚛️ तथागत गौतम बुद्ध ☸️ - १ मे महाराष्ट्र दिवस.. १ मे कामगार दिवस.. बौद्ध ulfH १ मे महाराष्ट्र दिवस.. १ मे कामगार दिवस.. बौद्ध ulfH - ShareChat
राजधानी राजगडवरून रायगडला हलवण्यामागे शिवाजी महाराजांची प्रचंड दूरदृष्टी होती. मिर्झा राजा जयसिंह आणि शाइस्तेखान यांच्या मोहिमांमुळे महाराजांना स्पष्ट जाणवले की राजगडाजवळ शत्रू सहज पोहोचू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन, अधिक सुरक्षित आणि सामरिक राजधानीची गरज निर्माण झाली. रायगड निवडण्याची मुख्य कारणे अशी — तो समुद्राजवळ होता, त्यामुळे आरमार, बंदरे आणि कोकणावर नियंत्रण सोपे झाले. रायगडाभोवती मोठा डोंगर नव्हता, त्यामुळे कोणत्याही बाजूने तोफेचा मारा करणे कठीण होते. सुमारे 4000 फूट उंची, दाट जंगल, कठीण घाटमार्ग, काळ–गांधारी नद्यांचा नैसर्गिक वेढा यामुळे रायगड अत्यंत अभेद्य होता. महाडसारखे बंदर जवळ असल्याने रसद, व्यापार आणि सागरी हालचाली अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येत होत्या. तसेच रायगडावरून मोगल, आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सर्वांवर दबाव ठेवणे शक्य होते. राजगड हा स्वराज्याच्या संघर्षकाळाचा दुर्ग होता, पण रायगड हा स्वराज्याच्या सार्वभौम साम्राज्याचा सिंहासनदुर्ग ठरला. #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #मराठा_साम्राज्य #छत्रपती #छत्रपतीप्रेमी #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
"उपवर्गीकरण आणि महार जातीवरील अप्पलपोटेपणाचे निराधार आरोप" बाबासाहेब तितकेच प्रासंगिक, तितकेच समर्पक, कालही ...आजही... उद्याही... "महारेतर जातींना महारांपासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहु नये अशी माझी विनंती आहे. ...मुस्लिमांपासून बचाव व्हावा म्हणून अस्पृश्य निवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे. असे मला वाटते. अश्या स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी कोणाच्याही कच्छपी लागू नये. निराळे रहा परंतु कोणाचे बगलबच्चे होऊ नका एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे..." - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भाषण... बुधवार, ता. २०जुलै १९२७ रोजी सायंकाळी साडे सात वाजता पुण्याच्या "दीनबंधु" पत्राचे संपादक डॉ. नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांची जाहिर सभा भरली होती. सदर सभेला डॉ बाबासाहेब आंबेडकर, के. के .सकट, वायदंडे, आर्यसेवक रा. ओघळे इ. मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हटले... "... मी आज मनमोकळे करुन बोलणार आहे. माझ्या भाषणाचा कोणीही विपर्यास करू नये. मि. सकट आणि मि. वायदंडे यांनी सध्या माझ्यावर विनाकारण टिका सुरु केली आहे. पुढाऱ्यावर नेहमी टिका व्हायचीच हे मी जाणून आहे. मी महार जातीचा आहे . हे आपणास माहितच आहे. महार जात स्वार्थी आहे हे टिकाकारांचे म्हणणे आहे. परंतु अस्पृश्य वर्गाच्या महारेतर जातीतील पुढाऱ्यांनी महारांकरिता निस्वार्थी बुद्धिने काम केले आहे काय ? असा माझा त्यांना उलट स्पष्ट सवाल आहे. त्याचप्रमाणे नाशिक व जळगाव येथे वसतिगृह काढून महार व महारेतर जातींच्या उन्नतिकरिता आम्ही सदोदित झटत आहोत. असे करीत असताना महार जातीविरुद्ध गिल्ला करण्यात काय हाशिल आहे. हे आम्हास समजत नाही. सरकारकडून मिळणाऱ्या सवलती अस्पृश्य जातीत योग्य प्रमाणात वाटल्या न जाता फक्त महार जात अप्पलपोटेपणा करून सर्व सवलती बळकावून बसते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मुंबईत मि. निकाळजे नावाच्या महार जातीतील गृहस्थास मुंबई कारपोरेशनमधे नॉमिनेट केले होते. पण अखिल अस्पृश्य वर्गाची कामे त्यांच्या हातून व्हावी तशी होत नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेंव्हा त्यांची जागा चांभार जातीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मि. बाळू यांना मीच सरकारकडून देवविली. सातारा शहरात महार लोकांची पुष्कळ वस्ती असून सुद्धा येथील म्युनिसिपालटीत सरकार नियुक्त सभासद चांभार जातीतीलच आहे. ह्या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या असता महार जातीवरील अप्पलपोटपणाचा आरोप किती फोल आहे, हे दिसून येण्यासारखे आहे. काही अज्ञानी महार लोक व्यापक दृष्टीचे नसतील. पण एवढ्याच कारणावरुन अखिल महार जातीस दूषण लावणे चांगले नाही. महार जातीतिल पुढारी काय करतात हे अवलोकन करा आणि नंतर दुषणे देण्यास पुढे या असे माझे इतर जातीतिल लोकांना अग्रहाचे सांगणे आहे. मी स्वतः मांग जातीशि रोटी बेटी व्यवहार करण्यास तयार आहे. अशी स्थिती असताना महार मांगाना तेढ का असावी हे समजत नाही. मी स्वतः माझ्या घरी मांगाचा मुलगा पोटच्या पोरा प्रमाणे पाळला होता. अजुन कोणी मला जर एखाद्या मांगाचा मुलगा आणून देईल तर मी त्याचे पालनपोषण करिन. आम्ही नुसते बोलके पुढारी नसून प्रत्येक गोष्ट कृतीत करून दाखवतो. वास्तविक पाहता , महारेतर जातीच शैक्षणिक आणि सांपत्तिकदृष्टया श्रेष्ट आहेत. मुंबईत तर चांभार आणि ढोर जातीतिल काही गृहस्थ इनकमटॅक्स देण्याइतके सधन आहेत. असे असताना त्यांनी महार लोकांच्या उन्नत्तिप्रीत्यर्थ काही प्रयत्न केल्याचे माझ्या एकिवात नाही. उलटपक्षि, आम्ही अनेक उपयुक्त संस्था काढून नुसत्या महार जातीच्याच नव्हे तर अस्पृश्यांच्या सर्व जातीच्या उन्नत्तिकरिता काया वाचा मने झटत आहोत. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करुन अस्पृश्योंन्नतीचे काम आम्ही हाती घेतले आहे. सोलापुरात आम्ही अस्पृश्यांकरिता वसतिगृह काढले आहे. त्यास चांभरांनी मदत दिलेली नाही. तरीपण महार मांग चांभार सर्व जातीतिल मुले त्या गृहात आम्ही घेतली आहेत. "आणखी मांग विद्यार्थी त्या गृहात आपण जरूर पाठवावा." अशी मी मि. सकट यांणा समक्ष विनंती केली आहे. इतकेहि असून जर महारेतर जातींना महारापासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहु नये अशी माझी विनंती आहे. ...मुस्लमानांपासुन बचाव व्हावा म्हणून अस्पृश्य निवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे. असे मला वाटते. अश्या स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी कोणाच्याही कच्छपी लागू नये. निराळे रहा परंतु कोणाचे बगलबच्चे होउ नका एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे..." - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सन्दर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड १८ भाग २ पृ ५७-५८) टीप : महारेतर म्हणजे महार सोडून इतर लोक संकलक : Anand Arkade ------------------------------------------------------------- #DrBabasahebAmbedkar #JayBhim #Ambedkarite #BhimArmy #Samata #SocialJustice #EqualityForAll #ConstitutionOfIndia #WeAreAmbedkarite #JaiBhimArmy #जयभीम #बाबासाहेब #आंबेडकरवादी #समता #संविधान #मानवाधिकार #दलितएकता #बहुजन #जयभीम_ट्रेंडिंग #उपवर्गीकरण #आरक्षण #सामाजिकन्याय #संघर्ष #आंबेडकरीविचार #दलितआवाज #EqualityMatters #CasteFreeIndia #TrendingNow #ViralPost #ShareNow #SupportJustice #VoiceOfPeople #inspirationalquotes #TruthMatters #StandForJustice #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - उपवर्गीकरण आणि महार जातीवरील 66 अप्पलपोटेपणाचे निराधार आरोप 99 उपवर्गीकरणाचा आनंद आरकडे बाबासाहेब विरोध महार  जातीवर तितेकेच प्रासंगिक अप्पलपोटेपणाचे तितकेच समर्पक आरोप मी ज्यासाटी संधर्ष केला, ते आहे समानता न्याय आणि बंधुता ! हेच माझे तत्व , हेच जाविव्यवस्शा भारताचे भबिष्य ! ही अन्यायाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूळ कारणे THE CONSTTIT TION OF मा रविंद्र गायकवाड पुणे INDIA कालही. आजही. उच्याही. त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत , মসনা, নায সাণি নধুনব अन्यायाबिरद्ध आबाज उठबला , समतेचा मार्ग दाखवला. মখণালা নিথা ননান: भारत घडवूया , हेच त्यांना अभिवादन. "जिथे अन्याय आहे, तिथे शांतता नाही, तिथे संघर्ष अपरिहार्य आहे. ' उपवर्गीकरण आणि महार जातीवरील 66 अप्पलपोटेपणाचे निराधार आरोप 99 उपवर्गीकरणाचा आनंद आरकडे बाबासाहेब विरोध महार  जातीवर तितेकेच प्रासंगिक अप्पलपोटेपणाचे तितकेच समर्पक आरोप मी ज्यासाटी संधर्ष केला, ते आहे समानता न्याय आणि बंधुता ! हेच माझे तत्व , हेच जाविव्यवस्शा भारताचे भबिष्य ! ही अन्यायाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूळ कारणे THE CONSTTIT TION OF मा रविंद्र गायकवाड पुणे INDIA कालही. आजही. उच्याही. त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत , মসনা, নায সাণি নধুনব अन्यायाबिरद्ध आबाज उठबला , समतेचा मार्ग दाखवला. মখণালা নিথা ননান: भारत घडवूया , हेच त्यांना अभिवादन. "जिथे अन्याय आहे, तिथे शांतता नाही, तिथे संघर्ष अपरिहार्य आहे. ' - ShareChat