अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत,जय शिवराय! जय महाराष्ट्र! १९ फेब्रुवारी – शिवजयंती विशेष संदेश 🚩
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे राजा
छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती म्हणजे शौर्य, स्वाभिमान आणि न्यायप्रियतेची प्रेरणादायी आठवण.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी स्त्रीसन्मान, धर्मनिरपेक्षता, शिस्तबद्ध प्रशासन आणि रयतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यामुळेच सामान्य माणसालाही स्वराज्याचा हक्क मिळाला.
शिवरायांचा आदर्श म्हणजे —
धैर्य, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि जनतेसाठी समर्पण.
या शिवजयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करू या.
जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🚩 #शिवाजी