दिल की बात
ShareChat
click to see wallet page
@186564851
186564851
दिल की बात
@186564851
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*आदर्श जीवन जगण्यासाठी* ☞ (०१) चूक झाली तर मान्य करा. ☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या. ☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. ☞ (०४) आभार मानायला विसरू नका. ☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. ☞ (०६) सतत हसतमुख रहा. ☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. ☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. ☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. ☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. ☞ (११) कृती पुर्व विचार करा. ☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. ☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. ☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. ☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा. ☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. ☞ (१७) विचार करून बोला. ☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. ☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा. ☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,, आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* _मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. *सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻* *हा जन्म पुन्हा नाही...😊* विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏 कृपया वेळ काढून नक्की वाचा. *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की .... 👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात *"हितचिंतकांची"* आणि *"निंदकांची"* आवश्यकता आहे.... आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........ कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. 🐾 👄बोलायच्या आधी….❕ 👂ऐकायला शिका............❗ 🎁खर्च करायच्या आधी….❕ 💰कमवायला शिका.......❗ 📝लिहायच्या आधी ……❕ 😇 विचार करायला शिका....❗ हार मानण्याआधी.....❕ 👉 प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी .....❗ 👉 जगायला शिका......❕ 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका, कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. 🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे..... आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... *" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"* 1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत 2:-"समाज" स्मशाना पर्यंत 3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत फक्त आणी फक्त *"कर्म"* शेवट l पर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,* आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.* यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन...... *नक्की वाचा* *जन्म* : दूस-याने दिला ... *नाव* : दूस-याने ठेवलं ... *शिक्षण* : दूस-यांनी दिलं ... *रोजगार* : दूस-यांनीे दिला ... *इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ... *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... *आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*. *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती विचित्र आहे ना...?? माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा.. मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल. 💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫 🙏🌹🌹🌹 आत्मसात करायला शिका 🌹🌹🌹 #🙏 प्रेरणादायक बॅनर
*माझी (म्हातार्‍याची) फजीती* 👴👴👴👴👴👴👴 रिटायर्ड झालो म्हणजे मी म्हातारा झालो की काय?" 🤔 म्हणजे त त्याचे काय झालं बघा... आज मंडईत भाजी आणायला गेलो. भाजी घेऊन बाहेर पडलो आणि खिसा चाचपला... छातीत धस्स झालं! एक्टिव्हाची चावी खिशात नव्हती.. ! लगेच परत मंडईत शिरलो. जिथं-जिथं गेलो होतो, परत त्या सगळ्या दुकानांत, टोमॅटोंच्या ढिगात, बटाट्यांच्या पोत्यात, सगळी कडे शोधलं… हाती काहीच नाही लागलं. चावी मिळाली नाही.. एकदम मनात वीज चमकली … "अरे ही चावी एक्टिव्हाच्या इग्निशनमध्येच राहून गेली असेल... आणि दुसऱ्यानं सुरू करून नेली तर?" लगेच धावत-धावत पार्किंगकडे गेलो… तर खरंच! एक्टिव्हाची सावलीसुद्धा जागेवर नव्हती! आता पार घाबरलो... पोलिसांना फोन लावला. "साहेब, माझी एक्टिव्हा….. गाडीचा नंबर, कलर, मेक... मॉडेल नंबर… सगळं सांगितलं... आणि कबुलीही दिली, "हो, साहेब, चावी गाडीलाच विसरलो. माझ्या विसरभोळेपणा मुळे ही चोरी झाली." पोलिस म्हणाले, "घाबरू नका, तुमची तक्रार लिहून घेतली.. गाडी शोधून देऊ."... मग केलं सगळ्यात मोठे आणि कठीण काम… म्हणजे बायकोला फोन... सांगताना माझा आवाज कापरा, घसा बसल्यासारखा आणि अंग थरथरत होते... दुसऱ्या बाजूला काही सेकंद एकदम शांतता… आणि मग मोठा भडका ! "अरे देवा! तुम्ही तर पूर्ण वेडे झालात! अरे मीच तुम्हाला एक्टिव्हावरूनच मंडईत सोडलं होतं आणि ब्युटी पार्लरला गेले..! पार सगळं विसरलात????? मी म्हटलं, "अगं, अगं.. साॅरी बाबा... आता बडबड नको... गाडी चोरीला गेली नाही... हे एक बरं झालं... चल, आता येऊन मला इथून घेऊन जा." ती परत भडकली! "तुम्ही कसल्या काय भानगडी करून ठेवल्यात..! आता मी पोलिस ठाण्यात बसलेय! तुमच्या तक्रारीवरून पोलिसांनी मला एक्टिव्हा चोरल्याबद्दल अटक केलीय! तुम्ही लगेच इकडे येऊन यांना सांगा की ही माझी बायको आहे, हिने चोरी केलेली नाही!" मग काय गुपचुप ठाणं गाठलं, पोलिसांची माफी मागून समजावलं, बायकोची सोडवणूक केली अन् सोबत घरी गेलो. 🤗🤗🤗 हम्म आताशा या वयात असे अनुभव यायचेच. तुमचं कस काय बाबांनो, म्हातारपणात अशी "मजा" येतेच! तुमच्याकडेही असेल असच काही गम्मतीचं, तर मग कळवा! आपली ख्याली खुशाली...! #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜
...रामाला वनवास मिळाला... पण असा कुठेच संदर्भ मिळाला नाही की माता कौशल्या कैकयी ला म्हणाली तूझा काय संबंध माझ्या मुलाला वनवासाला जा म्हणायचा? ना सीतेला दोष दिला की तू आमच्या घरात आलीस आणि तुझ्या पाय गुणाने माझ्या मुलाला वनवास मिळाला आणि सीता हि म्हणाली नाही मी माझ्या माहेरी वैभवात होते, तुमच्याशी लग्न केलं आणि माझी वाट लागली... किंवा उर्मिला ही म्हणाली नाही लक्ष्मणाला कि तुम्हाला काय गरज पडले भावाच्या मागे मागे करायची.. ना भरत आणि त्याची बायको म्हणाली चांगला चान्स मिळाला आहे घ्या राज्य आपल्या ताब्यात.... एकंदरीत रामायण बघितले की असे लक्षात येते की प्रत्येकाने केवळ त्याग केला आहे, तो हि विना तक्रार.... कुणालाही दोष न देता. आयुष्य असेच एक रंगमंच आहे. प्रत्येका ने आपला रोल नीट पार पाडावा... दुसऱ्याच्या रोल मध्ये हस्तक्षेप न करता, नाहीतर नाटक पडले म्हणून समजा. जिथे कोणत्याही अपेक्षा न करता *देणे* आले तिथे *रामराज्य* नक्की आहे. आणि जिथे दुसरीकडे अपेक्षा, अहंकार, टीका, टोमणे,तिथे *महाभारत* ठरलेले. 🙏श्री राम 🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर
*मत्सर..!!* ~~~~~~~~~~~~~~~~~ "मत्सर" नेहमी आपले स्वतःचे स्वास्थ्य हरवायला कारण ठरतो. मत्सरामुळे व्देष निर्माण होतो आणि व्देषामुळे वैर निर्माण होते आणि वैर आपल्याला कायम संकटाकडे घेऊन जाते किंवा आपल्याला बेचैन करते. हा मत्सर आपल्यात इर्षेमुळे निर्माण होतो, इर्षा तुलनेमुळे निर्माण होते आणि तुलना स्वतःचे चुकीचे मूल्यांकन केल्यामुळे तयार होते. आपली स्वतःची किंमत ठरविल्याशिवाय आपण दुसऱ्याशी तुलना करूच शकत नाही. येथेच घोटाळा आहे. आपले मूल्य आपल्यालाच समजले नाही. जगात आपली दुसरी प्रतिकृती नाही. आपल्या प्रत्येकाला भगवंताने वैशिष्ट्यपूर्ण निर्माण केलेले आहे. तुमच्या हाताच्या ठशासारखे ठसे जगात दुसऱ्या कोणाचे नाहीत. *दुर्लभो मणुष्यो देहो।* *देहीनाम क्षणभंगुरा:।* *तत्रापि दुर्लभं मन्न।* *वैकुंठ प्रियदर्शनं।।* म्हणून आपण प्रत्येकजण अव्दितीय आहोत, तसेच इतरही आहेत. त्यामुळे कोणालाही कमी समजू नका आणि स्वतःलाही कोणापेक्षा कमी समजू नका. जोपर्यंत आपण बाहेर बघायचे सोडून आत स्वतःत बघत नाही तोपर्यंत आपली स्वतःची खरी किंमत आपल्याला कळत नाही. यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि यालाच स्वस्वरूपाची ओळख म्हणतात. ही ज्याला होते तो कायमचा मत्सर विरहीत होतो. जोपर्यंत आपण दुसऱ्याची नक्कल करायची सोडत नाही तोपर्यंत आपली स्वतःची अक्कल वापरत नाही. *कोणाही जीवाचा न घडो मत्सर।* *वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।* *तुका म्हणे एका देहाचे अवयव।* *सुख दु:ख जीव भोग पावे।।* *श्रीराम समर्थ.*🌹🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर
प्रीपेड मृत्यु Pune के एक बड़े श्मशान घाट में दोपहर के 3 बजे थे। ‘रोहन’ (उम्र 35 वर्ष), जो अमेरिका की एक बड़ी सॉफ्टवेयर कंपनी में वाइस प्रेसिडेंट था, अभी-अभी फ्लाइट से उतरकर सीधे श्मशान घाट पहुँचा था। उसके पिता, ‘सदाशिवराव’ (उम्र 75 वर्ष), कल रात गुजर गए थे। रोहन के हाथ में महंगा लैपटॉप बैग था और आँखों पर रेबैन का चश्मा। उसे पसीना आ रहा था और वह बार-बार घड़ी देख रहा था। वहाँ ‘मोक्ष इवेंट मैनेजमेंट’ (अंतिम संस्कार करने वाली एजेंसी) का कर्मचारी ‘सुमित’ खड़ा था। सुमित ने सारी तैयारी कर रखी थी। लकड़ियाँ सजा दी थीं, पंडित बुला लिया था, और सदाशिवराव के पार्थिव शरीर को स्नान कराकर तैयार रखा था। रोहन आया। उसने पिता के चेहरे की ओर एक नजर डाली। आँखों से एक-दो आँसू निकल आए। उसने सुमित से पूछा: “मिस्टर सुमित, सब तैयार है ना? मुझे 6 बजे की रिटर्न फ्लाइट पकड़नी है। कल मेरी बहुत जरूरी मीटिंग है। प्लीज़ जल्दी कराइए।” सुमित को आश्चर्य हुआ। जिस पिता ने इस बेटे को पाल-पोशकर बड़ा किया, उस पिता की चिता के पास रुकने के लिए इस बेटे के पास तीन घंटे भी नहीं थे। सुमित ने शांत होकर सिर हिलाया। विधि पूरी हुई। रोहन ने मुखाग्नि दी। धुएँ के गुबार आसमान में उठ गए। रोहन ने सुमित को अलग ले जाकर चेकबुक निकाली। “सुमित, धन्यवाद। आपने अच्छी व्यवस्था की। आपका बिल कितना हुआ? 50 हजार? 1 लाख? राशि बताइए, मैं अभी चेक दे देता हूँ। मैं दोबारा नहीं आ पाऊँगा, अस्थि विसर्जन भी आप ही करवा दीजिए।” सुमित ने रोहन की ओर देखा। उसके चेहरे पर एक अजीब-सी मुस्कान थी। उसने जेब से एक पुरानी फाइल निकाली और रोहन के हाथ में दी। “साहब, बिल देने की जरूरत नहीं है। आपका बिल ‘पेड’ है।” रोहन चौंक गया। “पेड? किसने भरा पैसा? क्या मेरे चाचा ने?” सुमित बोला: “नहीं साहब। पाँच साल पहले सदाशिवराव जी (आपके पिता) हमारे ऑफिस आए थे। वे बहुत बीमार थे, ठीक से चल भी नहीं पा रहे थे। उन्होंने मुझसे पूछा था — ‘आपका पैकेज क्या है? मेरे बेटे को तकलीफ न हो, सब इंतज़ाम कर देंगे ना?’ हमने उन्हें पैकेज बताया। उन्होंने उसी दिन 50,000 रुपये एडवांस जमा कर दिए थे। और यह ‘चिट्ठी’ मुझे देकर कहा था — ‘मेरा बेटा आए तो उसे यह दे देना। और अगर वह न आ सके, तो आप ही मेरा अंतिम संस्कार कर देना।’” सुमित ने वह चिट्ठी रोहन को दी। रोहन ने काँपते हाथों से चिट्ठी खोली। उसमें सदाशिवराव के काँपते अक्षरों में लिखा था: “प्रिय रोहन, बेटा, मुझे पता है तुम बहुत व्यस्त हो। अमेरिका में तुम्हें साँस लेने की भी फुर्सत नहीं होती। मुझे मालूम है कि मेरी मृत्यु की खबर सुनकर तुम्हें चिंता होगी। ‘छुट्टी मिलेगी या नहीं? टिकट मिलेगा या नहीं? मीटिंग का क्या होगा?’ ये सवाल तुम्हारे मन में आएँगे। बेटा, तुम्हारा समय और तुम्हारा करियर बहुत महत्वपूर्ण है। मैंने तुम्हें इसलिए पाला है कि तुम दुनिया जीत सको। एक बूढ़े की लाश के लिए तुम अपना नुकसान मत करना। इसलिए मैंने अपनी मृत्यु की व्यवस्था पहले ही कर दी है। एजेंसी को पैसे दे दिए हैं। वे सब कर देंगे। तुम आ सको तो अच्छा है, न आ सको तो भी मुझे कोई शिकायत नहीं। बस एक विनती है — जब मैं तुम्हें बचपन में स्कूल छोड़ने जाता था, तो तुम्हारा हाथ कभी नहीं छोड़ा था। आज जब तुम मुझे अग्नि दो, तो तुम्हारा हाथ काँपना नहीं चाहिए। जल्दी वापस चले जाना। तुम्हारी पत्नी इंतज़ार कर रही होगी। तुम्हारा, पापा।” चिट्ठी पढ़ते ही रोहन के हाथ से चेकबुक कीचड़ में गिर गई। उस श्मशान में, जहाँ लकड़ियों के जलने की आवाज आ रही थी… वहाँ अब रोहन का अहंकार और करियर का घमंड जलकर राख हो चुका था। वह घुटनों के बल बैठ गया। चिल्लाया — “पापा…!! मुझे माफ कर दीजिए!” उसने सुमित के पैर पकड़ लिए। “सुमित, मुझे अमेरिका नहीं जाना। मुझे अपने पापा के साथ रहना है! मैंने करोड़ों रुपये कमाए, पर मैं तो असली भिखारी निकला! मेरे पापा ने मरते समय भी मेरी मीटिंग की चिंता की… और मैं उनके अंतिम दर्शन का भी हिसाब लगा रहा था?” उस दिन रोहन फ्लाइट नहीं पकड़ सका। वह वहीं, जलती चिता के सामने रात भर बैठा रहा। क्योंकि उसे समझ आ गया था — ‘प्री-पेड’ सिर्फ सिम कार्ड हो सकता है, पिता का प्रेम नहीं। पिता का प्रेम ‘अनलिमिटेड’ होता है, और उसकी कीमत दुनिया की कोई भी करंसी नहीं चुका सकती। आप दुनिया में कितने भी बड़े बन जाएँ, कितना भी पैसा कमा लें… लेकिन जिन माता-पिता ने आपका बचपन सँवारा, उनके अंतिम सफर में साथ देने से कभी पीछे मत हटिए। एजेंसी अंतिम संस्कार कर सकती है, लेकिन आँसू एजेंसी के नहीं होते — वे अपने खून के रिश्तों के ही होते हैं। ☝️😳😩😭 Father’s Day केवल एक दिन का नहीं होता… 🙏 जय जय सियाराम 🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर
आपल्याला सवय झालीय. कधी नागरिकत्वाचे पुरावे घेऊन, कधी नोटा बदलायला रांगा लावण्याची आपल्याला सवय झालीय. कधी लसी टोचायची कागद हातात घेऊन, अमक्याला तमका कागद जोडायला रांगेत उभ राहण्याची सवय झालीय. अशी रांगेत उभी राहिलेली बिनचेहऱ्याची , पिचलेली माणस बघण्याची आपल्याला सवय झालीय. फ्रीजमध्ये कसल मांस आहे या संशयावरून माणूस तुडवून मारला जाण्याची आपल्याला सवय झालीय. आणि त्याचा तपास करणारा पोलीसही तसाच मरण्याची आपल्याला सवय झालीय. टीव्हीवाले भाट पोलिसांनी धरले तर अर्ध्या रात्री उघडणारे कोर्टाचे दरवाजे बघायची सवय झालीय. आणि महिनोंमहिने बेकायदेशीर सरकार राजरोस राज्यात चालू देणार कोर्ट बघण्याचीही सवय झालीय. खून, बलात्कार करून गुन्हेगार ठरलेले निवडणुकीच्या काळात पॅरोल वर सुटण्याची आणि पर्यावरणवादी शिक्षक जेलमध्ये खितपत पडत बघण्याची सवय झालीय. ३०० किलो स्फोटक राजरोस येऊन सैनिक मारले जाण्याची आणि अतिरेकी घुसून निष्पाप नागरिक मारले जाण्याची सवय झालीय. राजकीय सूड अथवा खिंडीत गाठून दावणीला बांधायला यंत्रणा बटिक म्हणून वापरल्या जात असल्याची सवय झालीय. आणि सोम्यागोम्याने केलेल्या आरोपावरून महिनोंमहिने माणस कोठडीत अडकून पडल्याच बघण्याचीही सवय झालीय. सरकारच्या मर्जीतल्या कंपन्यांनी माणसांनी नंगानाच घातला तरी झापड बांधून वाळूत तोंड खुपसणाऱ्या यंत्रणा बघण्याची सवय झालीय. आणि विरोधातला आवाज दाबून टाकायला छापे पडण्याचीही सवय झालीय. टीव्हीवर दिवसरात्र द्वेषाचे विषारी मळे पिकवणाऱ्या सापांची सवय झालीय. आणि सत्यासाठी लढणारा शशिकांत कोकणात चिरडून मरण्याचीही सवय झालीय. अन्नदात्या शेतकऱ्यांना चिरडून मारणारे मोकाट फिरत बघण्याची सवय झालीय. मुलींवर बलात्कार करणाऱ्याच्या समर्थनाचे मोर्चे निघण्याची सवय झालीय. सामुहिक बलात्काराचे गुन्हेगार सुटून सत्कार घेताना बघण्याची सवय झालीय. आपल्याच नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालण्याची सवय झालीय. हि सवय नेमकी कधी झाली ? मेणबत्त्या हातात घेऊन, ‘ मै भी अण्णा ‘ च्या टोप्या घालून २०१२-१३ ला रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरलेली तरुणाई आता तिशी पस्तीशी मध्ये असेल ना ? अगदीच म्हातारी झालेली नाहीयेत ती माणस ना ? तरीही त्यांना त्याकाळी खटकणारी गोष्ट आता अक्राळविक्राळ स्वरुपात आलीय तरीही त्याची सवय झालीय ? धर्माची अफू खाऊन गुंगल्यावर सगळ्याना सवय होते. आनंद शितोळे #आपल्या_धडावर_आपलेच_डोके #सीधी_बात #SayNoToHatred #🙏 प्रेरणादायक बॅनर