
उमेश बहुटे सद्गुरु कृपा
@205275434
सद्गुरु शिवाय या देहाची सुटका नाही
👌
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
आत्मा हा ईश्वराचा अंश आहे. ईश्वरामध्ये ज्या शक्ती आहेत, त्या सर्व शक्ती बीजस्वरूपात मनुष्याच्या आत आधीपासूनच उपलब्ध आहेत. पण त्या शक्ती सुप्त अवस्थेत राहतात. मानसिक पापांचे, विषय-विकारांचे, दोष-दुर्गुणांचे ढीगाखाली दडलेल्या, अज्ञात स्वरूपात पडून राहतात. वाईटातून कधीही चांगले निर्माण होत नाही—ते शेवटी विनाशच घडवते. जशी सावली मनुष्याचा पाठ सोडत नाही, तसेच पाप-कर्मही मागे लागलेले असतात. लोभ, अहंकार क्षणिक सुख देतात, पण शेवटी दुःखच देतात. खरी बुद्धिमत्ता यातच आहे की आपण कुविचार आणि कुकर्मांपासून दूर राहून सत्य व सद्मार्ग स्वीकारावा. लोक समजतात की आपण दीन-हीन, तुच्छ व अशक्त आहोत, पण जे साधक मनोविकारांचे पडदे दूर करून निर्मळ आत्मज्योतीचे दर्शन घेऊ शकतात, ते जाणतात की सर्वशक्तिमान ईश्वरीय ज्योती त्यांच्या आत्म्यात विद्यमान आहे.
🙏 गुरु देवांच्या अमूल्य वचनांमधून साभार 🙏
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
*चिंचेच्या पानावर एक देऊळ रचिले!*
*आधी कळसू मग पाया रे ।!1!!*
*देव पुजू गेलो तव देऊळ उडाले!*
*खेळिया सद्गुरु राया रे ।!2!!*
*पाषाणाची सांगड मृगजळ डोही!*
*वांझेचा पुत्र पोहला रे ।!3!!*
*दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली!*
*मुखाविण पाणी प्याली रे ।!4!!*
*आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले!*
*पांगळ्याने पाठलाग केला रे ।!5!!*
*एकाजनार्दनी एकपणे विनवी!*
*हरिच्या नामे तरलो रे ।।6!!*
अर्थः
चिंचेच्या पानाइतके छोटेसे असे आईचे उदर. त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह, त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना, आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक आणि मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुमच्या आमच्या नरदेहरुपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजेच चिंचेच्या पानावर होते असे एकनाथ महाराज सांगतात.
पुढे ते म्हणतात की, बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते म्हणून तत्पूर्वीच, हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे त्या सद्गुरुला शरण जाऊन देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निसटून जाण्याआधीच, सद्गुरुला शरण जावे.
दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहांचे मिलन. अर्थात लग्न ! ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटलेले आहे आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार, खऱ्या अर्थाने सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते त्याप्रमाणेच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो. या संसाररूपी मृगजळात म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहंकाररुपी वांझेचा पोर पोहून जातो.म्हणजेच संसारात, सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांझेचा पोर म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे म्हणूनच त्याला वांझेचा पोर असे म्हटले आहे आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो आहे असे आपल्याला भासते.
पुढे ते म्हणतात,या मृगजळाच्या डोहात, दोन तोंडांची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच मुखाविण पाणी प्याली रे. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल, तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला, शरीराने भजनात रमत असतानाही, मनाने विषयांची गोडी चाखवतेच.
आंधळ्याने पाहिले. आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस,दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो म्हणजे ज्ञानही डोळस बनते जर सद्गुरुला शरण गेलो तर. बहिऱ्याने ऐकिले बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो.
याबाबतीत पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल.त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान तिला एकांतात बसून सांगितले तेव्हा ते सांगत असताना त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते, याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरु म्हणून ओळखले जातात. आता, मासळीचे शरीर पाहिल्यास त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुहय ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगाचे कान करून एकचित्ताने ते ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते म्हणून बहिऱ्याने ऐकिले. याचाच अर्थ बाकी सगळीकडचे चित्त काढून, सर्वांगाचे कान करून,गुरूंनी दिलेला मंत्र, गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला,तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रीय मिळाला तर बहिराही ऐकू शकतो म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते.पांगळ्याने पाठलाग केला रे. इथे पांगळे आहे ते आमचे मन कारण मनाला पाय हा अवयव नाही.पण तरीही ते आमच्या पायांपेक्षा कितीतरी जलद गतीने,कुठेही, केव्हाही जाऊ शकते म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की, जनार्दन स्वामींच्या कृपेने, जी अनुभूती मला मिळाली, त्यावरून मी सांगतो की, जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे, किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे, अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरून जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरून गेलो म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवित आहे की, एकचिताने सर्वांनी नाम घ्या आणि देऊळ उडण्याआधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या.
कुट अभंग श्री संत सद्गुरु माऊली मोतीराम बाबा आश्रम सावरबन #🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
मला जनप्रियत्व आवडते.
इथून जाणार्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमे कांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळयांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरूरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी ? मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा. जो जो कोणी मला भेटला, तो तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो; त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचे असेल ते मारूतीरायाला सांगावे म्हणजे ते मला कळते. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच; पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही. प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मी मात्र वागायचा तसाच वागेन; हे कसे शक्य आहे ? नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याची खात्री बाळगा, आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या.
एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. 'मी नाम घेतो' हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षित्वाने वागा; हवे-नकोपण टाकून द्या; राम कर्ता ही भावना ठेवा; विषय मालकीने भोगा; आपला गुण भगवंताकडे लावा; लहान मूल होऊन देवाकडे जा; रामाला आपले सुखदुःख सांगा; देहभोगाला कंटाळू नका; काळजी 'घ्या' पण काळजी 'करू' नका, आणि निर्भय बना, आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा.
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇
🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रारब्ध भोगत असताना नशिबाचे तीन प्रकार आहेत: मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध वज्र प्रारब्ध.*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
भगवंत म्हणतात की माझ्या नामाचा जप केल्याने मंद प्रारब्ध तुटते, खऱ्या संताच्या सहवासात सत्संग केल्याने मध्यम प्रारब्ध तुटते आणि श्रद्धेने विश्वासाने अनन्य भावाने संताला शरण जाऊन माझी नामस्मरण भक्ती केल्याने खडतर असे तीव्र प्रारब्ध तुटते, पण वज्र प्रारब्ध मात्र भोगावे लागते ते भोगून संपवावे हेच उचित असते.
पण जे श्रद्धावान भक्त श्रद्धेने माझा सतत नामजप करतात, त्यांच्या सोबत राहून मी व्यक्तिश: त्यांचे प्रारब्ध सुलभ करण्यासाठी तत्पर असतो.तसेच त्या वज्र प्रारब्धाचा भोग सौम्य करून त्यांची पूर्तता करून घेतो आणि भक्तांना त्या उपरोक्त दुःखाची तीव्रता जाणवू देत नाही.तसे प्रारब्ध आधी निर्माण झाले आणि शरीर नंतर निर्माण झाले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्या संबंधित एक गोष्ट आहे,
एक गुरुजी होते जे नेहमी देवाचे नामस्मरण करत असत.ते खूप म्हातारे झाले होते आणि त्यांचे काही शिष्य त्यांच्यासोबत जवळच्या खोलीत राहत होते.
जेव्हा जेव्हा गुरुजींना शौचास, आंघोळ वगैरेसाठी जायचे असे तेव्हा ते शिष्यांना बोलावून घेत असत आणि शिष्य त्यांना घेऊन जात असत.हळूहळू काही दिवसांनी दोन-तीन वेळा आवाज देऊन शिष्य यायचे, कधी कधी नंतरही उशिरा यायचे....
एके दिवशी रात्री गुरुजींनी निवृत्त होण्यासाठी शिष्यांना बोलावले होते.पण तेवढ्यात एक अनोळखी तरुण लगेच हाकेसर्शी आले आणि अतिशय हळुवार कोमल सुखद स्पर्शाने गुरुजींना निवृत्त केले आणि त्यांना पलंगावर झोपवले.आता हा रोजचाच दिनक्रम झाला.
असे दररोज त्या तरुणाची सेवा बघता,
एके दिवशी गुरुजींना शंका येते की, पूर्वी माझे शिष्य जे गुरुसेवा ह्या विषयावर शिष्य व्याख्यान देण्यात पटाईत होते ते तीन-चार वेळा आवाज देऊनही उशीरा यायचे, पण हा तरुण मुलगा अज्ञात असलेला असूनही जेव्हा पाहिजे तेव्हा किंवा मनात मदतीची गरज आहे ही भावना प्रकट होताच जो समोर न बोलवता हजर असतो.आणि न रागावता न कंटाळता माझे प्रातविधीचे कार्य करतो आणि अगदी हळुवारपणे मला जपतो. हा नक्की आहे तरी कोण?हे पाहण्यासाठी तो तरुण नित्य सेवेसाठी आला असता,
एके दिवशी गुरुजींनी त्या मुलाचा हात धरून विचारले
खरे सांग,तू कोण आहेस?अरे माझे शिष्य आहेत ते देखील ज्या सेवेचा आळस धरितात तीच सेवा तू अगदी सहज कशी करत आहेस.नक्की सांग ना मुला तुझ वास्तव रूप काय आहे?
तेव्हा आपले गुप्त रहस्य उघड झाले आहे हे पाहून तो तरुण म्हणाला अहो आचार्य ज्या ईश्वराची उपासना आपण जन्मभर केलीत जी निष्काम भक्ती आपण आचरण करून इतरांना त्या नवविध भक्तिचा छंद लावला त्यांचे अज्ञान दूर करून त्यांना सद्भक्तीला लावले.ते तुमचे निष्काम भक्तीचे ऋण आम्हावर आहे.म्हणून त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष आपले सुहदय म्हणून आपल्या सेवेसाठी ही लीला केली.आपण काही काळजी करू नये.आपण आणि आपल्या भगवद प्राप्तीच्या देहात आता काही क्षण बाकी आहेत. त्यानंतर ह्या सर्व मायिक द्वंद्व दुखपासून आपण कायम मुक्त होऊन माझ्या स्वरुपी एक व्हाल.
तो तरुण स्वतः स्वरूपाने देवच होता, त्यांनी गुरुजींना त्यांचे खरे रूप दाखवले.
गुरुजी रडतात आणि म्हणतात, हे भगवंता, तू प्रत्यक्ष माझ्या देहादी निवृत्तीचे कार्य करत आहेस, देवा मला किती लाजवशिल अरे अस मी काय पराक्रम केला की एवढी खालची सेवा तुला तुझ्या भक्ताची करावीशी वाटली.भगवंता अरे हे दुःख आमच्याच गतजन्मीची कर्म फळ आहेत जी आता भोग म्हणून पुढे उभी आहेत.अस असतानाही माझ्या साठी एवढे सोसलेस देवा जर तू माझ्यावर एवढा आनंदी आहेस तर मला मुक्ती दे ना.
परमेश्वर म्हणतो की,अरे राजा तुला जे काही त्रास होत आहे ते तुझे प्रारब्ध आहे, तू माझा खरा साधक भक्त आहेस, तू माझ्या नामाचा सतत जप करतोस,एवढेच नाही तर ह्या भक्ती प्रेम रसाचा प्रसाद इतरांनाही प्राप्त व्हावा म्हणून तुझी तळमळ आम्हाला तुझ्यावर प्रेम करायला बाध्य करते.म्हणूनच तुझ्या खर्या निर्मळ भक्ती भावापोटी मला व्यक्तिश: तुझ्या वज्रसमान प्रारब्धात तुझे दुःख सौम्य करण्यासाठी हस्तक्षेप करावेसे वाटले.
गुरुजी म्हणतात, तुझ्या कृपेपेक्षा माझे प्रारब्ध मोठे आहे का? तुझ्या कृपेने माझे नशीब कापता येत नाही का?
भगवंत म्हणतात की माझी कृपा परमशक्तिशाली आहे, ती नक्कीच तुझे प्रारब्ध कापू शकते पण प्रारब्ध कर्म शेष राहिले तर मुक्तीच्या द्वारात आलेल्या तुला ते शेष असलेले कर्मभोग भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागेल.माऊली म्हणतात *,अगा कर्मे जे उरावे l तीही सुख दुखे फळा यावे l आणि तया भोगावया यावे देहा एका ll* पुढच्या जन्मी एखाद्या योनीत येऊन तुला पुन्हा या नशिबाचे भोग भोगावे लागतील, हा कर्माचा नियम आहे, म्हणून तुझे प्रारब्ध स्वतःच्या हाताने तू भोगून कापून घ्यावेसे असे मला वाटते.मात्र त्यानंतर तुला या जन्म-मृत्यूपासून मुक्त करने हे माझे कर्तव्यच आहे.मग ज्या ज्याप्रमाणे बीज भाजले असता ते पुन्हा उगवत नाही तसे कर्मफळ निःशेष नाहीसे झाले की तुझ्यात आणि माझ्यात भेदच उरणार नाही.
*तुका म्हणे गंगा l सागर संगमी l अवघ्या झाल्या उर्मी एकविध ll*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🚩 *ll श्री गुरुदेव दत्त ll* 🚩🙏
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇
कर्तेपणाचा अभिमान नसावा.
विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का ? विषय सोडल्याशिवाय 'मी भक्ती करतो' असे म्हणणे चुकीचे आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही, आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पाहावे, आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात 'मी करीन तसे होईल' या भावनेने वागत असतो. परवाच एकजण आले होते, त्यांना त्या वेळी पाहून कोणीही म्हटले असते की, हे थोडयाच दिवसांचे सोबती आहेत. तरीही 'मी अमुक करीन, मी तमुक करीन,' असे ते म्हणतच होते; आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान ! म्हणून सांगतो की, 'मी करतो' ही भावना टाकून देऊन, सर्व काही तोच करीत आहे, आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो, ही भावना ठेवून वागावे. त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. 'मी कर्ता आहे.' ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्य नाही.
कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे, त्यावरून, वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते; आणि पुढे अभिमान जाऊन, मी कर्ता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते. मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआपच अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो, देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे 'देवात अर्थ नाही' असे म्हणतो. पण देवाला फसविणे शक्य आहे का ? तो म्हणतो, 'हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता, आणि आता आठवण करतो आहे!' वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे ? म्हणून देवाला फसवू नये; कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाडकष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरिता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे.
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक
ईश्वर सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे, रक्षणकर्ता आहे, तसेच संहारकर्ताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निःस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निःस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर-प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम, नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये.
एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निःस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा, भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे. उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण, मोरी झाडत बसला! असे आमचे चुकते. थोडक्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळयाला खरे रूप कसे कळणार? म्हणून, ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरिता गुरू-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक असे म्हणतात की, 'विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे.' हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये.
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇










