
उमेश बहुटे सद्गुरु कृपा
@205275434
सद्गुरु शिवाय या देहाची सुटका नाही
👌
मला जनप्रियत्व आवडते.
इथून जाणार्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमे कांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळयांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरूरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी ? मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा. जो जो कोणी मला भेटला, तो तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो; त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचे असेल ते मारूतीरायाला सांगावे म्हणजे ते मला कळते. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच; पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही. प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मी मात्र वागायचा तसाच वागेन; हे कसे शक्य आहे ? नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याची खात्री बाळगा, आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या.
एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. 'मी नाम घेतो' हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षित्वाने वागा; हवे-नकोपण टाकून द्या; राम कर्ता ही भावना ठेवा; विषय मालकीने भोगा; आपला गुण भगवंताकडे लावा; लहान मूल होऊन देवाकडे जा; रामाला आपले सुखदुःख सांगा; देहभोगाला कंटाळू नका; काळजी 'घ्या' पण काळजी 'करू' नका, आणि निर्भय बना, आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा.
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇
🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रारब्ध भोगत असताना नशिबाचे तीन प्रकार आहेत: मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध वज्र प्रारब्ध.*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
भगवंत म्हणतात की माझ्या नामाचा जप केल्याने मंद प्रारब्ध तुटते, खऱ्या संताच्या सहवासात सत्संग केल्याने मध्यम प्रारब्ध तुटते आणि श्रद्धेने विश्वासाने अनन्य भावाने संताला शरण जाऊन माझी नामस्मरण भक्ती केल्याने खडतर असे तीव्र प्रारब्ध तुटते, पण वज्र प्रारब्ध मात्र भोगावे लागते ते भोगून संपवावे हेच उचित असते.
पण जे श्रद्धावान भक्त श्रद्धेने माझा सतत नामजप करतात, त्यांच्या सोबत राहून मी व्यक्तिश: त्यांचे प्रारब्ध सुलभ करण्यासाठी तत्पर असतो.तसेच त्या वज्र प्रारब्धाचा भोग सौम्य करून त्यांची पूर्तता करून घेतो आणि भक्तांना त्या उपरोक्त दुःखाची तीव्रता जाणवू देत नाही.तसे प्रारब्ध आधी निर्माण झाले आणि शरीर नंतर निर्माण झाले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्या संबंधित एक गोष्ट आहे,
एक गुरुजी होते जे नेहमी देवाचे नामस्मरण करत असत.ते खूप म्हातारे झाले होते आणि त्यांचे काही शिष्य त्यांच्यासोबत जवळच्या खोलीत राहत होते.
जेव्हा जेव्हा गुरुजींना शौचास, आंघोळ वगैरेसाठी जायचे असे तेव्हा ते शिष्यांना बोलावून घेत असत आणि शिष्य त्यांना घेऊन जात असत.हळूहळू काही दिवसांनी दोन-तीन वेळा आवाज देऊन शिष्य यायचे, कधी कधी नंतरही उशिरा यायचे....
एके दिवशी रात्री गुरुजींनी निवृत्त होण्यासाठी शिष्यांना बोलावले होते.पण तेवढ्यात एक अनोळखी तरुण लगेच हाकेसर्शी आले आणि अतिशय हळुवार कोमल सुखद स्पर्शाने गुरुजींना निवृत्त केले आणि त्यांना पलंगावर झोपवले.आता हा रोजचाच दिनक्रम झाला.
असे दररोज त्या तरुणाची सेवा बघता,
एके दिवशी गुरुजींना शंका येते की, पूर्वी माझे शिष्य जे गुरुसेवा ह्या विषयावर शिष्य व्याख्यान देण्यात पटाईत होते ते तीन-चार वेळा आवाज देऊनही उशीरा यायचे, पण हा तरुण मुलगा अज्ञात असलेला असूनही जेव्हा पाहिजे तेव्हा किंवा मनात मदतीची गरज आहे ही भावना प्रकट होताच जो समोर न बोलवता हजर असतो.आणि न रागावता न कंटाळता माझे प्रातविधीचे कार्य करतो आणि अगदी हळुवारपणे मला जपतो. हा नक्की आहे तरी कोण?हे पाहण्यासाठी तो तरुण नित्य सेवेसाठी आला असता,
एके दिवशी गुरुजींनी त्या मुलाचा हात धरून विचारले
खरे सांग,तू कोण आहेस?अरे माझे शिष्य आहेत ते देखील ज्या सेवेचा आळस धरितात तीच सेवा तू अगदी सहज कशी करत आहेस.नक्की सांग ना मुला तुझ वास्तव रूप काय आहे?
तेव्हा आपले गुप्त रहस्य उघड झाले आहे हे पाहून तो तरुण म्हणाला अहो आचार्य ज्या ईश्वराची उपासना आपण जन्मभर केलीत जी निष्काम भक्ती आपण आचरण करून इतरांना त्या नवविध भक्तिचा छंद लावला त्यांचे अज्ञान दूर करून त्यांना सद्भक्तीला लावले.ते तुमचे निष्काम भक्तीचे ऋण आम्हावर आहे.म्हणून त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष आपले सुहदय म्हणून आपल्या सेवेसाठी ही लीला केली.आपण काही काळजी करू नये.आपण आणि आपल्या भगवद प्राप्तीच्या देहात आता काही क्षण बाकी आहेत. त्यानंतर ह्या सर्व मायिक द्वंद्व दुखपासून आपण कायम मुक्त होऊन माझ्या स्वरुपी एक व्हाल.
तो तरुण स्वतः स्वरूपाने देवच होता, त्यांनी गुरुजींना त्यांचे खरे रूप दाखवले.
गुरुजी रडतात आणि म्हणतात, हे भगवंता, तू प्रत्यक्ष माझ्या देहादी निवृत्तीचे कार्य करत आहेस, देवा मला किती लाजवशिल अरे अस मी काय पराक्रम केला की एवढी खालची सेवा तुला तुझ्या भक्ताची करावीशी वाटली.भगवंता अरे हे दुःख आमच्याच गतजन्मीची कर्म फळ आहेत जी आता भोग म्हणून पुढे उभी आहेत.अस असतानाही माझ्या साठी एवढे सोसलेस देवा जर तू माझ्यावर एवढा आनंदी आहेस तर मला मुक्ती दे ना.
परमेश्वर म्हणतो की,अरे राजा तुला जे काही त्रास होत आहे ते तुझे प्रारब्ध आहे, तू माझा खरा साधक भक्त आहेस, तू माझ्या नामाचा सतत जप करतोस,एवढेच नाही तर ह्या भक्ती प्रेम रसाचा प्रसाद इतरांनाही प्राप्त व्हावा म्हणून तुझी तळमळ आम्हाला तुझ्यावर प्रेम करायला बाध्य करते.म्हणूनच तुझ्या खर्या निर्मळ भक्ती भावापोटी मला व्यक्तिश: तुझ्या वज्रसमान प्रारब्धात तुझे दुःख सौम्य करण्यासाठी हस्तक्षेप करावेसे वाटले.
गुरुजी म्हणतात, तुझ्या कृपेपेक्षा माझे प्रारब्ध मोठे आहे का? तुझ्या कृपेने माझे नशीब कापता येत नाही का?
भगवंत म्हणतात की माझी कृपा परमशक्तिशाली आहे, ती नक्कीच तुझे प्रारब्ध कापू शकते पण प्रारब्ध कर्म शेष राहिले तर मुक्तीच्या द्वारात आलेल्या तुला ते शेष असलेले कर्मभोग भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागेल.माऊली म्हणतात *,अगा कर्मे जे उरावे l तीही सुख दुखे फळा यावे l आणि तया भोगावया यावे देहा एका ll* पुढच्या जन्मी एखाद्या योनीत येऊन तुला पुन्हा या नशिबाचे भोग भोगावे लागतील, हा कर्माचा नियम आहे, म्हणून तुझे प्रारब्ध स्वतःच्या हाताने तू भोगून कापून घ्यावेसे असे मला वाटते.मात्र त्यानंतर तुला या जन्म-मृत्यूपासून मुक्त करने हे माझे कर्तव्यच आहे.मग ज्या ज्याप्रमाणे बीज भाजले असता ते पुन्हा उगवत नाही तसे कर्मफळ निःशेष नाहीसे झाले की तुझ्यात आणि माझ्यात भेदच उरणार नाही.
*तुका म्हणे गंगा l सागर संगमी l अवघ्या झाल्या उर्मी एकविध ll*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🚩 *ll श्री गुरुदेव दत्त ll* 🚩🙏
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
कर्तेपणाचा अभिमान नसावा.
विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का ? विषय सोडल्याशिवाय 'मी भक्ती करतो' असे म्हणणे चुकीचे आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही, आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पाहावे, आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात 'मी करीन तसे होईल' या भावनेने वागत असतो. परवाच एकजण आले होते, त्यांना त्या वेळी पाहून कोणीही म्हटले असते की, हे थोडयाच दिवसांचे सोबती आहेत. तरीही 'मी अमुक करीन, मी तमुक करीन,' असे ते म्हणतच होते; आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान ! म्हणून सांगतो की, 'मी करतो' ही भावना टाकून देऊन, सर्व काही तोच करीत आहे, आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो, ही भावना ठेवून वागावे. त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. 'मी कर्ता आहे.' ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्य नाही.
कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे, त्यावरून, वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते; आणि पुढे अभिमान जाऊन, मी कर्ता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते. मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआपच अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो, देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे 'देवात अर्थ नाही' असे म्हणतो. पण देवाला फसविणे शक्य आहे का ? तो म्हणतो, 'हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता, आणि आता आठवण करतो आहे!' वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे ? म्हणून देवाला फसवू नये; कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाडकष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरिता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे.
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक
ईश्वर सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे, रक्षणकर्ता आहे, तसेच संहारकर्ताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निःस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निःस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर-प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम, नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये.
एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निःस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा, भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे. उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण, मोरी झाडत बसला! असे आमचे चुकते. थोडक्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळयाला खरे रूप कसे कळणार? म्हणून, ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरिता गुरू-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक असे म्हणतात की, 'विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे.' हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये.
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇
नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे ।
मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत्चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की, अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते. काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे; त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी, नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही; आणि ते घेतल्याने, त्याच्या सहवासाने, त्याचे प्रेम येते.
संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे असे म्हणतो; फरक इतकाच की, माझे म्हणणे अनुमानाचे असते. संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर 'आपण याने निष्पाप होऊ' अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे ! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते.
साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही; साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे; म्हणजे आपल्यावरून त्याला ओळखायचे. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय राहावे असे वाटू लागले, तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्वांभूती भगवद्भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निःस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो, सर्वत्र पाहात नाही, म्हणून द्वैतप्रचीती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेदप्रचीती येते. ते सर्वत्र भगवद्भाव पाहतात, आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते.
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇
संत सांगतील तसे वागावे.
ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व 'माझे, माझे,' म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का ? मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये.
नामात जो राहिला तो सत्संगात राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे; भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. 'मी' साधन करतो हे विसरून जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सासऱ्यांचा मान ठेवते, ते नवऱ्याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण 'त्या काळया बाटलीतले औषध मला का देत नाही ?' असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे 'तुला तो रोग नाही' असे उत्तर देतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ति ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून, ते 'सांगतील' तसे वागावे; ते 'वागतात' तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरूने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता 'पुढे काय आहे ?' हे विचारण्याने काय होणार ?
संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात.
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏
जेथे नाम, तेथे मी आहेच.
मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते; कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात; पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत ? त्याप्रमाणे, तुम्हांला जर कुणी विचारले की, 'तुम्ही नेहमी कुठे असता', तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना ? मग तुमचा गुरू कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना ? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच; जो नामस्मरण करतो त्याच्या मागेपुढे मी उभा आहे.
शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत् मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुध्दी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुध्दी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिककर्माच्या सुरूवातीला "ॐ केशवाय नम:" असे म्हणतात, ते नाम नव्हे काय ? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे; अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे.
#💐संत महंत🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏गुरु महिमा😇
जेथे नाम, तेथे मी आहेच.
मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते; कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात; पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत ? त्याप्रमाणे, तुम्हांला जर कुणी विचारले की, 'तुम्ही नेहमी कुठे असता', तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना ? मग तुमचा गुरू कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना ? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच; जो नामस्मरण करतो त्याच्या मागेपुढे मी उभा आहे.
शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत् मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुध्दी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुध्दी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिककर्माच्या सुरूवातीला "ॐ केशवाय नम:" असे म्हणतात, ते नाम नव्हे काय ? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे; अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे.
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏











