ShareChatUser
ShareChat
click to see wallet page
@2628525989
2628525989
ShareChatUser
@2628525989
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
विद्यार्थ्यांनी आपल्या अवडी नुसार क्षेञात आपले करिअर घडवावे-पोलीस उपनिरीक्षक-पंकज निळकंठे चाकुरः-सरस्वती माध्यमिक विद्यालय जानवळ येथील एनएमएमएस शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जानवळ येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील एनएमएमएस शिष्यवृत्ती उत्तीर्ण 27 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला . तसेच चाकूर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त सिद्धी वसंत खलंग्रे या विद्यार्थिनीचा पण सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद कपाले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पंकज नीलकंठे, पोलिस कॉन्स्टेबल बालाजी अकनगीरे ,संस्थेचे सहसचिव व्यंकटराव कुसंगे,व निवृत्त मुख्याध्यापक दामोदर पाटील ,दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार साखराप्पा वाघमारे,रेषमा तांदळे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम अध्यक्ष व पाहुण्यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला .त्यानंतर सर्व 27 विद्यार्थ्यांचा व पालकांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गोविंद कपाले यांनी केले व शाळेच्या प्रगतीची गोषवारा सादर केला. त्यानंतर साखराप्पा वाघमारे यांनी पण शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख सादर केला, त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पंकज नीलकंठे यांनी विद्यार्थ्यानी फक्त साक्षर न होता सुशिक्षित व्हावे व शिक्षणाचा जीवनात चांगला उपयोग करून घ्यावा व आवडेल त्या क्षेत्रात आपले करिअर करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून बाबुराव अनारुपे, चंद्रकांत कर्डिले, महालींग स्वामी, अशोक सोळुंके, लक्ष्मण कांबळे, नामदेव कोते , रुपाली पवार, प्रकाश भंडे तसेच मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - सिरस्वती माध्यमिव मूश्यर सिरस्वती माध्यमिव मूश्यर - ShareChat
ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ दान सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांचा डी. बी. ग्रुपच्या 'उत्सव-२०२६'मध्ये प्रभावी संदेश चाकूरः- सर्वश्रेष्ठ दान म्हणून ज्ञानदानाचाच विचार करावा लागेल. कारण ज्ञानदानाने एकाच पिढीचा नव्हे तर अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. या दानातून मिळणारी तृप्ती जन्मभराची असते; म्हणून ज्ञानदान करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.महाळंग्रा येथील डीबी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आयोजित 'उत्सव-२०२६' या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बालाजी वाकुरे हे होते.राधेय प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील उद्योजक प्रवीण ब्रिजवासी, चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बेंबडे, संस्थेच्या सचिव सौ. प्रणिताताई बेंबडे, कार्याध्यक्ष विवेक बेंबडे, विश्वस्त स्नेहाताई बेंबडे तसेच संचालक प्राचार्य डॉ. श्रीकांत ढगे उपस्थित होते. दिनेश बेंबडे यांच्या कार्याची दखल घेत यावेळी सहकार मंत्र्यांनी दिनेश बेंबडे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत सांगितले की, ग्रामीण भागात शिक्षणाची भक्कम पायाभरणी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते आणि ते कार्य दिनेश बेंबडे यांनी ध्यासाने उभे केले आहे. महाळंग्रा सारख्या ग्रामीण भागात एमबीए, बी. फार्मसी, डी. फार्मसी तसेच पब्लिक स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार व व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे केवळ संस्थात्मक काम नसून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारे कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळेच गावोगावी परिवर्तन घडते, असे गौरवोद्गार काढत मंत्र्यांनी बेंबडे यांच्या शिक्षणव्रताची प्रशंसा केली. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - 00 MI 0 CV 4 १ud cti 00 MI 0 CV 4 १ud cti - ShareChat
यशवंत मंगल कार्यालय यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य सौ रंजनाताई चाटे यांचा सत्कार चाकुरः - यशवंत मंगल कार्यालय चाकूर यांच्या वतीने चापोली जिल्हा परिषद सदस्या सौ. रंजनाताई भालचंद्र चाटे यांचा सत्कार यशवंत गार्डन मंगल कार्यालयांचे संचालक आकाश यशवंतराव हिप्पाळे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी चापोली गणातून निवडून आलेले नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गजानन होनराव यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना जि. प. सदस्या सौ. रंजनाताई चाटे म्हणाल्या की, मला मतदारसंघातील मतदारांनी मतदार रुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघातील प्रश्नांच्या संदर्भात जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवण्यासाठी सेवेची संधी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहीन. तसेच मतदार संघातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न करीन. यावेळी चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ.भालचंद्र चाटे ,संजीवनी महाविद्यालय चापोलीचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे या सर्वचा यशवंतराव हिप्पाळे परिवाराकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लातूर रोड चे माजी सरपंच मधुकर मुंडे , सिद्धेश्वर अक्कलकोटे , राजेश्वर डुमणे, प्रा.अशोक गुरमे व डॉ.सिद्धेश्वर शेटकर, सौ. प्रतिभाताई चाटे सौ. शांताबाई शेटकर, सौ. शिवकांता शेटकर उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - -=0 4 813 [ -=0 4 813 [ - ShareChat
चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाची हजेरी यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान ! चाकूरः-चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत तसेच या अवकाळी पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीजही गुल झाली होती.रविवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ही संध्याकाळी उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.तसेच सोमवारी दिंनाक २३ फेब्रुवारीला शहरात आणि परिसरात सांयकाळी साडे चार-पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे व प्रचंड वाऱ्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच वैरणीचेही नुकसान झाले आहे.या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतातील ज्वारी,गहू ,हरभरा सह आंबा,द्राक्षे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कांही शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक काढून ठेवले होते मात्र अवकाळी पावसामुळे गहू भिजला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चाकूर शहरातील विठ्ठल डाके,पंडित मोरे सह इतर शेतकरी यांचे रब्बी हंगामातील पीक पावसामुळे खराब झाले आहे.तसेच डोंगरज ,शेळगाव शेत शिवारात ही वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरणी,गांजुर शेत शिवारातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.घरणी येथील रब्बीची ज्वारी जमीनदोस्त झाली आहे तसेच शिरीष आणि आकाश शिंदे यांच्या सह इतर शेतकऱ्यांचे कापुन ठेवलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गांजुर गावात तसेच शेतशिवारात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतातील रब्बी हंगामातील पिंकाचे मोठे नुकसान झाले आहे.एकंदरीत तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात रब्बी हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - =5 =5 - ShareChat
चाकुर नगरपंचायत सभापतीच्या निवडी जाहीर,सभापतीच्या निवडी बिनविरोध पाणीपुरवठा सभापती मौलाना मुजम्मील सय्यद यांची निवड चाकुर ता.प्रः-चाकुर नगरपंचायत विषय समिती सभापतीपदाची निवड प्रक्रीया पीठासन अधिकारी तथा तहसिलदार नरसिंग जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रतिक लंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीला नगराध्यक्ष करीम गुळवे उपस्थित होते.यामध्ये पाच सभापतीच्या निवडीसाठी चाकुर नगरपंचायत सभागृहात विषय समितीच्या निवडीसाठी चार जागासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे पाणी पुरवठा,महिला व बालकल्याण,स्वच्छता व आरोग्य,नियोजन व विकास या समितीच्या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.सभापती निवडीसाठी एकच अर्ज आल्यामुळे विषय समितीच्या सभापतीच्या निवडी जाहीर करण्यात आले.प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार नरसिग जाधव यांनी करुन सर्व नामनिर्देशन पत्र छाननी अंती वैध असल्याचे सांगितले. यानंतर पिठासीन अधिकारी नरसिंग जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी १२.३० ते १२.४५ पर्यंत वेळ दिला. मुदतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली नाही त्यामुळे आरोग्य व स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती, नियोजन व विकास समिती आणि महिला व बालकल्याण समिती करिता प्रत्येकी एक अर्ज आल्याने सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. प्रत्येकी एकच वैध नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्यामुळे त्या समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे पिठसिन अधिकारी व तहसिलदार नरसिंग जाधव यांनी जाहीर केले.सभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्या. विषय समितीच्या सभापतीची निवड पिठासन अधिकारी तथा तहसिलदार नरसिंग जाधव यांनी घोषित केली. स्थायी समितीच्या सदस्य संख्या ६ आहे. नगर पंचायतीचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने व ५ विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असल्याने स्थायी समितीचे एकूण सदस्य संख्या ६ होते. त्याप्रमाणे स्थायी समितीच्या सदस्याचे नावे खालील प्रमाणे असल्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले.नियोजन व विकास समिती सभापतीचे हिप्पाळे साईप्रसाद शिवराज,सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अभिमन्यु लक्ष्मणराव धोंडगे, स्वच्छता व आरोग्य सामिती सभापती सौ.पाटील गोदावरी राजकुमार ,पाणी पुरवठा समिती सभापती मौलाना मुज्जमिल मुस्तफा,महिला व बालकल्याण समिती सौ.कसबे शुभांगी रामेश्वर,उपसभापती सौ.गंगुबाई नरसिंग गोलावार यांची निवड झाली.सभापती पदाच्या निवडी जाहीर होताच फटाक्यांची अतिषबाजी करुन कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष करीम गुळवे,प्रथम नगराध्यक्ष नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, माजी उपनगराध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर,माजी पाणी पुरवठा सभापती नगरसेवक भागवत फुले,नगरसेवक नितीन रेड्डी,सौ.हिरकनबाई लाटे,सौ.सय्यद शबाना,सौ.कांबळे वैशाली,सौ.ज्योतीताई स्वामी, सौ.सुजाता रेड्डी,माजी नगरसेवक सय्यद इलियास,पपन कांबळे,सजंय पाटील,राम कसबे,सय्यद महंमद,निवडीच्या वेळी उपस्थित होते. *चौकट* *नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी केला नुतन सभापतीचा सत्कार* *नगरपंचात चाकुरच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडी जाहीर झाल्यानंतर चाकुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी सर्वच नुतन सभापतीचा शाल,हार,श्रीफळ,देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथम नगराध्यक्ष मिंलीद महालिंगे उपस्थित होते* #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - नगर पचायत चाकूर नगर पचायत चाकूर - ShareChat
रेनबो नॅशनल स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे चाकूरः-दरवर्षीप्रमाणे रेनबो नॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक किशोर पाटील तसेच उद्घाटक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चाकूर चे अध्यक्ष व्यंकटराव झांबरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक महेश मोरे कलकोटीचे माजी सरपंच प्रभाकर जहागीरदार, ज्ञानेश्वर भोसले, गजेंद्र बेजगमवर, शाळेचे पर्यवेक्षक युवराज झांबरे, शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर झांबरे हे व्यासपीठावर होते. कार्यक्रमाची सुरुवात जोरदार श्री गणेशाच्या गीताने झाली.कार्यक्रमांमध्ये विविध पारंपरिक तसेच देशभक्तीपर गीतावर मुलांनी नृत्य सादर केली यामध्ये आरुष दाडगे, मनस्वी जाधव, श्रेया टमके , आराध्या डावरे, अदिती पवार, अंकित कातळे, नागवंश भालेराव, प्रज्वल किनीकर, अखिलेश शिंदे, व्यंकटेश पाटील, आरोही गायकवाड, सुमित डिगोळे, कपिल शेवाळे, शिवम ततापुरे, वेदांत जाधव आदी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी शाळेचे एसओएफ परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सविता कांबळे, प्रतिक्षा पवार, अर्चना सावळे, सानिया दापकेवल्ले , मुक्ता सूर्यवंशी, तबसूम पठाण, जयश्री येत्तेवाड, इंदुमती वंगाले, वनिता ताकबीडवे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर झांबरे यांनी केले तर सूत्रसंचालनाची धुरा रोहिणी मोरे व पूजा माने यांनी सांभाळली कार्यक्रमाचे आभार राधा जगताप यांनी मांडले. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - rowlai I0n] Chal rowlai I0n] Chal - ShareChat
चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास एसक्यूएएएफ मूल्यांकनात “अ+” दर्जा प्राप्त ---------- सर्वस्तरातून महाविद्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव --------- चाकुरः- चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या एसक्यूएएएफ अंतर्गत “अ+” दर्जा देण्यात आला. या यशाबद्धल महाविद्यालयावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने राज्यातील कनिष्ट महाविद्यालय व माध्यमिक शाळांची तपासणी करण्यासाठी ‘शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा’ (एसक्यूएएएफ) राबवण्यात आला होता. या आराखड्यात शासनाकडून विविध निकष ठेवण्यात आले होते. संस्थेचे मा. सचिव तथा माजी बांधकाम व आरोग्य सभापती, महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित व दक्षिण अमेरिकेतील विद्यापीठाने डी.लिट. ही सन्मानाची पदवी देवून गौरवान्वीत केलेले स्व. डॉ. नारायणराव दौलतराव चाटे दादा यांनी उभारलेल्या संस्थेची आज यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे व संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या काटेकोर नियोजनाने महाविद्यालयाने ही प्रगती साधलेली आहे. संजीवनी महाविद्यालयाने अभ्याक्रम नियोजनाची अंमलबजावणी कशी केली आहे व त्याचे उपयोजन कसे करण्यात आले आहे याचा विचार विद्यार्थी, संस्था, निकास व गुणवत्ता याआधारे केला जातो. त्याबरोबरच अध्ययन, अध्यापनाचेही मूल्यमापन एसक्यूएएएफ करण्यात आले. विद्यार्थी विकास होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, क्रीडास्पर्धा सांकृतिक कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाकडून सातत्याने केले जाते. संजीवनी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात असून ग्रंथालय, क्रिडा विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा अतिशय देखण्या स्वरूपात उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक कार्यक्रम, जलसंवर्धन उपक्रम राबविल्याने महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांत जागृती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने परिसरातील गावे दत्तक घेण्यात येतात, त्या गावात जलसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन,पशुसंवर्धन, महिला सबलीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सर्वांगीण स्वरूपाची जनजागृती व सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्य केले जाते. कोविड काळातही महाविद्यालयाने प्रबोधन व सहकार्य व्यापक स्वरूपात राबविले. सौर उर्जेचा वापर केल्यामुळे होणारी विजेची बचत व दुर्गम भागात विजेबाबत स्वावलंबी होण्याचा एक पर्यायी मार्ग म्हणून त्याची उपयुक्तता आहे. या प्रकल्पाची निर्मिती महाविद्यालयाने केली आहे. आज सर्वच ठिकाणी भेडसावणारी समस्या म्हणजे घनकचरा व्यवस्थापन होय, याबाबतीतही विशेष प्रकल्पाची उभारणी महाविद्यालयाने केली आहे. जलसुरक्षा व पाण्याचा वापर जपून करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या तंत्राबरोबरच बोअर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. महाविद्याल परिसरातील हवा शुद्ध व खेळती राहण्यासाठी ग्रीन अॉडिटची आवश्यकता असते याची उपयुक्तता सद्यस्थितीत अधिक असल्याने महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षांचे संगोपन केले आहे. त्याबरोबर चापोली परिसरातील पालकांनाही संवाद साधण्यासाठी पालकमेळावा आयोजित केला जातो. संजीवनी महाविद्यालयास याअगोदर स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ नांदेड चा ग्रामीण भागातील 'उत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार ही मिळालेला आहे. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक – संजीवनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संघांनी आजपर्यंत जिल्हा स्तरावर खो-खो सर्धेत २० वेळा प्रथम तर कबड्डी संघाने २२ वेळेस प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. विभागीय स्पर्धेत खो-खो स्पर्धेत दोन वेळा प्रथम तर १५ वेळेस द्वितीय क्रमांक पटकावला. तर कबड्डी स्पर्धेत १८ वेळेस प्रथम क्रमांक पटकावला. राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत २ वेळेस द्बितीय क्रमांक तर 5 वेळेस तृतीय क्रमांक मिळवला. भालाफेक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुस्ती स्पर्धेत दोन मल्ल राज्यात प्रथम आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक ही मिळवत संजीवनी महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर झळकले आहे. महाविद्यालयाच्या एसक्यूएएएफ मूल्यांकनासाठी प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे व संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रमेश गुट्टे, प्रा. महेंद्र वळसंगीकर, प्रा. विजयकुमार गुळवे, प्रा. एन.डी. नलवाड, प्रा. डॉ. फुलचंद चाटे, प्रा. माधव कागणे, प्रा. केंद्रे बी. बी. प्रा. अमोल केंद्रे, प्रा. नितीन आवस्कर, प्रा. राचमाळे, प्रा. विजकुमार चव्हाण, प्रा. डोंगरे एस.एन., प्रा. मनोज मुंढे, प्रा. एन.एन. निलापल्ले, प्रा. गोविंद फड, प्रा. आर.एम. कराड, प्रा. जी.टी. मदने, प्रा. सौ. श्रीमंगले एस. एस., प्रा. सौ. एस.जे. कांबळे, प्रा. सौ. एस.बी. बनसोडे, प्रा.सौ. आर.एन. जुल्फे, प्रा. वामनराव कराड, प्रा. ए.के. केंद्रे, प्रा. पी.बी. डीगोळे, प्रा. बी.एस. घुले, प्रा. आर.डी. मोरे, प्रा. याह्या खान, प्रा. सौ जे. मद्दे सह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशाबद्धल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - चापोली  महाविद्यालय  संजीवनी  HLOu  " चापोली  महाविद्यालय  संजीवनी  HLOu - ShareChat
नळेगावात शिवजयंतीनिमित्त २५२ जणांचे विक्रमी रक्तदान अनिल चव्हाण यांचे ६९ वे रक्तदान चाकुरः-नळेगाव येथे शिवजयंती निमित्त अनिल चव्हाण मित्र मंडळ व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २७ वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.या शिबिरात विक्रमी २५२ जणांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. जिल्ह्यात सर्वात मोठे रक्तदान शिबिर नळेगाव येथे साजरे केले जाते.जिल्ह्यात नळेगाव ची ओळख ही रक्तदात्याचे गाव म्हणून ओळखू लागले आहेत. शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक बालाजी भंडे , सरपंच सूर्यकांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शोकात बेग,पोलीस जमादार सिद्धेश्वर जाधव, लातूर जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष अनिल चव्हाण , वि.का.सो. माजी चेअरमन दयानंद मानखेडे ,सूर्यकांत सावंत ,सुभाष शेलार , डिगंबर बिराजदार , शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उमाकांत सावंत, दगडु सावळकर, सतीश पांडे, अश्फाक मुजावर ,राम किशन शिरुरे, शिवजागृतीचे अध्यक्ष बब्रुवान जाधव ,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बिराजदार, तलाठी प्रशांत तेरकर, व्यंकटी फरकांडे,शिवसेना नेते शंकर शेलार, अमजद घोरवाडे, मोहन रेड्डी,गोकुळ पारवे, सुनील भोसले, पत्रकार संजय कांबळे, मुक्तार मुजावर, राजेंद्र सावंत,बालाजी सावंत ,सुनील चव्हाण, राष्ट्रवादीचे गणेश शिंदाळकर, संजय शृंगारे,जनार्धन शृंगारे, विजय शृंगारे, गणेश शृंगारे, पांडुरंग नळेगावकर , माजी ग्राम पंचायत सदस्य जनार्धन सावंत , आझर भाई खुरेशी, दाऊद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात जोखीम विमा पॉलिसी काढण्यात आली. यासाठी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी नळेगाव,मा श्री उमाकांत सावंत मित्र मंडळ, आडत व्यापारी असोसिएशन मार्केट कमिटी , जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब,जीप व टेम्पो चालक मालक संघटना ,संभाजी सेना नळेगाव यांचे सौजन्य लाभले . या शिबिर यशस्वीतेसाठी कैलास चव्हाण, ऋषी बिराजदार पाटील, आदित्य सावंत, राजू शेलार ,महेश बिराजदार, संतोष तेलंगे,बालाजी शेलार ,गणपती धविले, पिंटू खांडेकर, अनिल पांचाळ,बाळासाहेब बरचे , भद्रीनाथ सोनटक्के, ,महेश इरलेवाड,भिवाजी गव्हाणे , अमोल सोमवंशी,शुभम अष्टेकर, अमीर खुरेशी,विजय ढोबळे पाटील, वेकंट माचवे, नवनाथ मानखेडे,अमोल पांचाळ,मोबिन गाडीवान,दीपक जाधव, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन शैलेश रेड्डी यांनी केले तर आभार अनिल चव्हाण यांनी मानले. #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - ShareChat
*स्वागत करूया रमजानचे* चाकुरः-एखाद्याचे आगमन हे सहसहा आनंददायी असते आणि त्याच्या स्वागताची तयारीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता कोण येणार आणि त्याची तयारी कशी करणार हा वेगळा विषय आहे. सध्या आपण रमजानबद्दल बोलत आहोत आणि त्याचे आगमन केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर मुस्लिम समाजाव्यतिरिक्त जगातील प्रत्येकासाठी एक अतिशय चांगली आणि धन्य करणारी बातमी आहे! अरबी कॅलेंडर प्रमाणे बारा महिन्यांच्या यादीत रमजान हा नववा महिना. रमजान महिना म्हणजे कुराण, धर्मपरायणता, संयम, करुणा, दया, प्रेम आणि आपुलकी, परोपकार, मानवजातीची सेवा, अल्लाहच्या मार्गात स्थिरता, एकात्मता आणि एकतेच्या भावनेच्या प्रकटीकरणाचा महिना. अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांचा, अंतहीन गुणगान गाण्याचा महिना. या महिन्याची बरकत प्राप्त करण्यासाठी, काही गुणांची आवश्यकता असते. ते गुण विकसित करण्यासाठी आपणा स्वतःला तयार व्हावे लागेल. आपल्याला माहित आहे की रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले, रोजे अनिवार्य झाले, बदरची लढाई झाली, कदरची रात्र साजरी झाली, मक्का जिंकला गेला, त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. मग या महिन्यात जकात, इनफाक आणि सदखा यांचे मोठ्या प्रमाणावर दान केले जाते. रमजान महिन्यात उपासनेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. या महिन्याचे आपण योग्य सन्मानाने स्वागत करणे महत्त्वाचे आहे. रमजानच्या आगमनापूर्वी, त्यासाठी आपण आंतरिक आणि बाह्यस्व तयार होऊया. रमजान कुरआनच्या अवतरणाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त कुरआनचे पठण करण्याचे नियोजन करावे. केवळ अरबी भाषेत कुरआनचे पठण न करता त्याचा आपल्या मात्रभाषेतील अनुवाद वाचावा, तो समजून घ्यावा, तो आचरणात आणावा व इतरांनाही तो समजून सांगावा. दृढ निश्चय करावे की, खोटे बोलणार नाही, भांडण करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, शिवीगाळ करणार नाही. कोणी भांडायला आला, शिवीगाळ करू लागला तर उत्तरादाखल एवढेच म्हणावे 'बाबारे! माझा रोजा आहे!' कोणाशी हुज्जत घालू नये. शेजाऱ्यांची काळजी घ्यावी. त्यांचे मन दुखवू नये. शेजाऱ्यांना त्रास देऊ नये. इफ्तारच्या वेळी त्यांना विसरू नये. रात्री तरावीहच्या नमाज नंतर विनाकारण बाहेर फिरू नये. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने पहाटे सहरीला जागे होणे कठीण जाते. रात्री वेळेवर झोपण्याचे व पहाटे लवकर जागे होण्याचे नियोजन करावे. त्यामुळे तहाज्जुदची नमाज पठण करणे सुलभ होईल. हा बरकत देणारा महिना आहे. या महिन्यात उपजीविका वाढविली जाते. चला तर मग, रमजानचे स्वागत करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊ या! हाफीज मौलाना अब्दुल मतीन गुळवे चाकुर 9049907291 #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - ShareChat
चाकुरच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत रंगला कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्यांने प्रेक्षक व पालकांची मने जिकंली चाकुरः-शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अविरत अग्रेसर असणारी यशवंतराव चव्हाण प्राथमिक चाकुर या प्रशाळेत प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून १७ फेब्रुवारी रोजी कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीकृत असलेल्या विविध कलागुणांतून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्यांचे सादरीकरण करुन प्रेक्षक, पालक व उपस्थितांची मने जिंकली.. या नेत्रदिपक सांस्कृतिक कार्यक्रमाने चाकुरकर मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमास पालक व प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचे जबरदस्त नृत्य पाहुन प्रेक्षक भारावून चिमुकल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करत होते. तर प्रेक्षकांनी चिमुकल्यावर बक्षीस देऊन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चाकुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांच्या शुभ हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव शेख साहेबअली,डॉ.एन.जी.मिर्झा,अजमआली सय्यद,बाबा गुळवे,जाकीर गुळवे,आखिल गुळवे,सह आदि उपस्थित होते.कार्यक्रमांचे शिवाजी पवार यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी,स्वच्छता,लाईटची सोय करावी व शाळेतील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगिण प्रगती कडे लक्ष द्यावे .नगराध्यक्ष करीम गुळवे म्हणाले शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश वाटप केला जातो.विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यापक शेख एम.बी, शिक्षक शेख टी.व्हि,शेख के, बी,कानडे एस.सी,शेटे जी.वी,पवार एस.एम,पठाण जे.एम,केंद्रे पि,यु,शेख आय.एम,शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सांस्कृतिक विभाग प्रमुख ताहेर शेख यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेतली. सुञसंचलन काशीम शेख यांनी केले.तर आभार जावेद पठाण यांनी मानले. *चौकट* *विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्याविष्कार* *सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदना गिताने करण्यात आली. त्यानंतर विद्याथ्र्यांनी रंगीलो मारो ढोल, शेतकरी गीत, सामी-सामी, लावणीसह जलवा हे देशभक्तीपर गित, नारीशक्ती, शिवाजी महाराज, मल्हार मल्हार, देवीचा गोंधळ, गवळण, चंद्रा लावणी,कोळीगीत, फनी साँग, जन्म बाईचा, झुमकावाली अशा एकाहून एक सरस देशभक्तीपर गिते, लावणी, हिंदी व मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करीत उपस्थित नागरिक व पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप 'वंदे मातरम्' गीताने करण्यात आला* *चौकट* *विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती कडे वैयक्तिक लक्ष-करीम गुळवे नगराध्यक्ष न.पं.चाकुर* *गोर-गरीब मध्यम वर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थीच्या अध्ययन करण्यावर शाळेतील शिक्षकांकडे लक्ष देऊन राहतात.* *गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.शाळेत विविध सामाजिक उपक्रम घेण्यास सुरुवात केली.विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तैयारी करण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून अतरिक्त क्लास घेण्यात येतात.घरोघरी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे म्हणून शाळेत दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.शाळेच्या गुणवत्ता वाढी सोबतच स्पर्धा परीक्षा,सांस्कृतिक कार्यक्रम,असे माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकास करण्यावर लक्ष दिले आहे.येणाऱ्या काळात विविध कार्यक्रम आयोजित करण्यांचा मनोदय नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी व्यक्त केला* #📝मराठवाडा अपडेट्स
📝मराठवाडा अपडेट्स - डॉ. ह्याकीर हुसेन शिक्षण प्रसारक नंडळ दाग़ संचलित  शर + नद्य ४२ २ र+ यशवंनगव चदाण ग्रयमक तधालव चाकूर Tr`ಭn- T ~TTa SA itnu ' ٦٢ ٥٦ डॉ. ह्याकीर हुसेन शिक्षण प्रसारक नंडळ दाग़ संचलित  शर + नद्य ४२ २ र+ यशवंनगव चदाण ग्रयमक तधालव चाकूर Tr`ಭn- T ~TTa SA itnu ' ٦٢ ٥٦ - ShareChat