#🙏भक्तीमय सकाळ🎬
एकदा समर्थ रामदास स्वामी सज्जनगडाच्या कड्यावर उभे असताना अचानक जोराचा वारा सुटला आणि त्यांच्या अंगावरील वस्त्र (छाटी) उडून दूर दरीत जाऊ लागले.तेव्हा समर्थ अचानक उद्गारले, "कल्याणा, छाटी उडाली!"गुरुंचे हे शब्द कानावर पडताच, कल्याण स्वामींनी वस्त्राच्या दिशेने त्या खोल दरीत एका क्षणाचाही विचार न करता थेट उडी मारली. त्यांची गुरुभक्ती आणि आज्ञापालनाची निष्ठा एवढी प्रबळ होती की, त्यांनी हवेतच झेप घेऊन ते वस्त्र (छाटी) अलगद आपल्या हातात झेलले आणि स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता समर्थांचे वस्त्र परत आणले.
कल्याण स्वामींचे हे अद्भूत साहस आणि अटळ गुरुभक्ती पाहून सर्वजण थक्क झाले. या घटनेवरूनच 'कल्याणा छाटी' हा वाक्प्रचार किंवा प्रसंग गुरु-शिष्याच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध झाला. या घटनेच्या आठवणीसाठी आजही सज्जनगडावर 'कल्याण छाटी स्मारक' दाखवले जाते
समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे निष्ठावान शिष्य कल्याण स्वामी (अंबाजी) यांच्या अथांग गुरुभक्तीची प्रेरणादायी कथा आहे.