#🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #💐संत महंत🙏प्रत्येक जीव या मृत्यू लोकांत जन्म घेतो, तो मुक्त होण्यासाठीच. मुक्ती हे अंतिम ध्येय असते. आपल्या कर्मानुसार जीवाला जन्म मिळतो. आणि हा जन्म जर चुकला, व मुक्तीसाठी जीवाने काही सदकर्म केले नाही तर पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात फिरावे लागते.
यातून पार होण्यासाठी सद्गुरुकृपा मात्र पाहिजे. गुरुकृपा वेगळी व गुरुप्राप्ती वेगळी.
सद्गगुरुच आपल्याला मुक्ती मार्गावर आणू शकतात. अश्या सद्गुरूंचे महात्म्य म्हणजे त्या परब्रम्हाचे महात्म्य होय. ते वर्णन करण्यासाठी आपल्याजवळ शब्द सामर्थ्य हवे.
ईश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून सद्गुरूंची योजना केली. आपण मात्र, प्रापंचिक नजरेने गुरूला व्यक्ती म्हणून पाहतो, त्यामुळे आपल्या मर्यादित बुद्धीने आपण गुरूंच्या कथनाचा अर्थ काढतो. गुरू ही व्यक्ती नसून ते तत्व आहे. हे न समजून आपण आपल्या अज्ञानामुळे ज्या पद्धतीने गुरू सेवा करावी, तसे न करता, आपल्या विचारांची पातळी हीन दर्जाची असल्याने, अज्ञानामुळे, गुरू असूनही, जशी व्हावी तशी भक्ती, सेवा न झाल्याने आपलयाला त्या परब्रम्हाची अनुभूती होत नाही. परिणामी आपण मुक्त होत नाही.
गुरुमंत्राचा जप व गुरुबद्दल भक्तिभाव याने जसा जसा आपला जप वाढेल तसे तसे आपले ज्ञान वाढत जाते, परिणामी, नकळत आपली बुद्धी शुद्ध होत जाते, त्याचा आपल्या आचार व विचारांवर फरक दिसू लागतो. विचारांची चंचलता कमी होते. मन स्थिर होऊ लागते. मनाची एकाग्रता वाढीला लागते.
देहभाव, म्हणजे देहा बद्दलचे ममत्व कमी होते. याचे मुळे गुरुबोध मनामध्ये ठसायला लागतो. आपल्यातील स्व ची भावना कमी झाली, की गुरुच आपल्याला कृपांकित होऊन पुढची वाट दाखवतात. आचरणाने व विचाराने स्वतःला गुरूच्या प्रति शरणागत झाल्याने हा बदल होतो. यामुळे एकरूपता वाढते.
#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*शुक्रवार *दिनांक ०५ जून २०२६*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺
#🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश . .. [] ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन []
. ************************
. जो धारण करतो तो धर्म होय. संतोष, क्षमा, मनाचे दमन चोरी न करणे, अंतर्बाह्य शुचित्व इंद्रियांचा निग्रह, तत्त्वजिज्ञासू बुद्धी. आत्मज्ञान, सत्य व अक्रोध असे दशविध धर्मलक्षण आहे म्हणजेच मानवता व सदाचार हाच धर्माचा गाभा आहे.
*************************************************
. दैत्यांची कुळे नार्शी । साधूचा मानु गिंवशी l
. धर्मासी नितीशी । शेन भरले ll
. **************[ अ.४/५३]***************
. .ll अर्थ ll
दैत्य कुळांचा नाश करतो. साधूंना मान दर्शवितो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो.
. ll चिंतन ll
. भगवंत म्हणतात, जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे रक्षण करणे हा माझा स्वभाव आहे. जेव्हा अधर्म धर्माचा पराभव करतो त्यावेळी अवतार घेऊन मी धर्माचे रक्षण करतो.
. भक्तांच्या कैवारासाठी मी अवतार घेऊन अज्ञान दूर करतो. सज्जनांच्या हातून सुखाची पताका फडकावतो. दैत्य कुळांचा नाश करतो. साधूंचा मान राखतो. धर्म व नीती यांची सांगड घालतो.
. विवेकरूपी दिव्याला आलेली अविचारांची काजळी झाडून तो दिवा प्रज्वलित करतो. मी अवतार घेतो तेव्हा पापांचे डोंगर नाहिसे होतात. पुण्याचा प्रातःकाल होतो. याप्रमाणे प्रत्येक युगात मी अवतार घेतो.
. जो धारण करतो तो धर्म होय. संतोष, क्षमा, मनाचे दमन चोरी न करणे, अंतर्बाह्य शुचित्व इंद्रियांचा निग्रह, तत्त्वजिज्ञासू बुद्धी. आत्मज्ञान, सत्य व अक्रोध असे दशविध धर्मलक्षण आहे म्हणजेच मानवता व सदाचार हाच धर्माचा गाभा आहे.
. नीतीधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म, गुणधर्म, निमित्त धर्म, आपद्धर्म असे धर्माचे विविध प्रकार सांगितले आहेत. धर्मांनी ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक कल्याणाला अधिक महत्त्व दिले आहे. अशा या धर्मात कोणालाही निषेध नाही कोणालाही मज्जाव नाही.
. धर्माचे आपण रक्षण करावे म्हणजे धर्मही आपले रक्षण करतो असे महाभारतात म्हटले आहे. चार पुरुषार्थ, चार वर्ण, चार आश्रम, तीन ऋणे, कर्मविपाक ही सर्व धर्माची अंगे आहेत.
. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की हे दशावतार होत. यापैकी नऊ अवतार झाले असून दहावा अवतार अद्याप व्हावयाचा आहे. काही ठिकाणी शिवाजी महाराज हादेखील अवतार मानतात.
ll राम कृष्ण हरी, माऊली ll
#🙏श्री महालक्ष्मी अधिक जेष्ठ चतुर्दशी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
4/6/26













