*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१ एप्रिल इ.स.१६७०*
छत्रपती शिवराय सुरतेवर पुन्हा हल्ला करण्याची अफवा पसरली.
त्यांच्या बंदोबस्तासाठी गुजरातचा सुभेदार 'बहादूरशहा' ५००० फोजेसह सुरत मध्ये तळ ठोकून बसला.
*१ एप्रिल इ.स.१६७३*
छत्रपती शिवरायांचे सरसेनापती 'प्रतापराव गुजर' यांना आज्ञापत्र.
"बहलोलखान या गनिमास गर्दीस मिळविल्याविणा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका".
*१ एप्रिल इ.स.१६७३*
मराठ्यांनी परळीचा किल्ला (सज्जनगड) जिंकला.गडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे.
या गावावरूनच या गडाचे नाव परळी पडले, या गावात २ अतिशय जीर्ण मंदीरे आहेत पण औरंगजेबच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झाला. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३१ मार्च इ.स.१६५९*
*विशाळगड*
छञपती शिवरायांनी इ.स.१६५९ मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे 300 मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! पुढे छ. शिवरायांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले म्हणूनच आज आपल्याला विशाळगड हा किल्ला दिसत आहे.
*३१ मार्च इ.स.१६६५*
*"मिर्झाराजे जयसिंग" व "दिलेरखान पठाण" किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी दाखल. त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आणि ऐतिहासिक पुरंदरचा रणसंग्राम चालू झाला. #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३० मार्च इ.स.१६४५*
*नरसप्रभू देशपांडेंना आदिलशाही सुभेदाराचे धमकीवजा पत्र*
*वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली, रोहीडे व वेळवंड खोरे येथील देशपांडे, कुलकर्णी, दादाजी नरसप्रभू हे महाराजांच्या सोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथील सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले, या पत्रात दादाजी चिंतेत आहे हे कळताच राजांनी खालील पत्र पाठवले, " हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा आहे " आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनुसार आहे,
हि धारणा त्यांनी या पत्रातून व्यक्त करून मनोबल वाढवले.
*३० मार्च इ.स.१७२९*
मराठ्यांनी थोरले बाजीरावच्या नेतृत्वाखाली जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२९ मार्च इ.स.१६६७*
छत्रपती शिवरायांनी बांधण्यास सुरूवात केलेला "किल्ले सिंधुदुर्ग" बांधून पूर्ण झाला.जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या सिंधुदुर्गावर रायाजी भोसले यांना किल्लेदार म्हणून नेमणूक केली.
*२९ मार्च इ.स.१६५७*
औरंगजेबाने विजापूरकरांचा बिदरचा किल्ला जिंकला. यामागील हेतू विजापुरकारांचा जास्तीत जास्त मुलुख जिंकून मोगल साम्राज्य वाढवणे. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२७ मार्च इ.स.१६६७*
मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले. जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. छत्रपती शिवरायांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.
१९ जून १६७६ रोजी छत्रपती शिवरायांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२६ मार्च इ.स.१६६७*
*औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.
*२६ मार्च इ.स.१६७५*
*छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून कुडाळकडे रवाना. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२५ मार्च इ.स.१६७०*
छत्रपती शिवरायांची चांदवडवर स्वारी.
*२५ मार्च इ.स.१६७५*
जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली. नोट: जॉन चाईल्ड हा बॉंबे चा राज्यपाल म्हणून इंग्रजांनी पाठवला होता
*२५ मार्च इ.स.१६८९*
मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला.
याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२४ मार्च इ.स.१६७५*
छत्रपती शिवराय वेलवड्यास मुक्कामी.
*२४ मार्च इ.स.१६७४*
रायगडावर छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. इंग्रजांच्या वतीने तहाची बोलणी करायला नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाषा मुंबईहून रायगडाकडे निघाला. २४ मार्च १६७४ रोजी तो न्यायाधीश निराजीपंतांची भेट घेण्यासाठी पाचाडला आला.
*२४ मार्च इ.स.१६७७*
*"दक्षिण दिग्विजय मोहीम"*
२४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्य मल्लिकार्जुन' येथे मुक्काम. भाग्यनगरपासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२२ मार्च इ.स.१६६०*
छत्रपती शिवराय पन्हाळा वेढ्यात असताना याच वेळी केदारजी खोपडे देसाई व ईतर देशमुखांना आदीलशहाने आदीलशाहीस मदत करन्याचे पत्र पाठवले.
*२२ मार्च इ.स.१६८०*
छ.शिवराय ज्वराच्या व्यथेने आजारी पडले
महाराज दक्षिण दिग्विजय प्राप्त करून रायगडी परत आले होते.रामराजांचा व्रतबंध व विवाह पार पडला होता . छ.शंभुराज्यांच्या दिलेरखानाच्या प्रकरणामुळे प्रपंचाची आसक्ती संपली होती .सूर्यग्रहणाचे पर्व आटोपले होते .
दोनच दिवसांनी महाराज रायगडी ज्वराच्या(तापेच्या) व्यथेने आजारी पडले .आजार बळावत चालला होता . #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ मार्च इ.स.१६५७*
छत्रपती शिवरायांनी 'गुंजन मावळ' चे वतनदार 'शिळमकर' यांचा वतनाचा तंटा लाल महाल, पुणे येथे सोडवला.
*२१ मार्च इ.स.१६५७*
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून 'नूरखान बेग' यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फर्मान लाल महाल -पुणे येथून दिले.
*२१ मार्च इ.स.१६६७*
*किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..!*
किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून छत्रपती शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू













