*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१५ फेब्रुवारी इ.स.१६६७*
*"प्रतिशिवाजी" अशी ओळख असलेले "सरसेनापती नेताजी पालकर" यांचं औरंजेबने जबरदस्तीने धर्मांतर केले,आणि त्यांचे "महंमद कुली खान" असे नामांतरण केले.
*१५ फेब्रुवारी इ.स.१६८४*
*छत्रपती संभाजीराजेंवर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो वैतागून परत निघून गेला.
*१५ फेब्रुवारी इ.स.१६८९*
*१ फेब्रुवारी १६८९ रोजी "छत्रपती संभाजीराजे" व "कवी कलश" हे मुघल सरदार "मुकर्रबखान" याच्या कैदेत सापडले होते.आज त्यांना औरंगजेब बादशहापुढे हजर करण्यात आले आणि इथूनच संभाजीराजेंवर अमानुष अत्त्याचार सुरू झाले.
*१५ फेब्रुवारी इ.स.१७३८*
*धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले.
दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६५*
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत
१३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६६*
औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६७१*
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली!
होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवून साजरा करीत असत. या वेळची शिकार होती मेहेरुफ-ए-जंजीरा याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज किल्ले रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिरा किल्ल्यातच गुंतले होते. जंजिरा किल्ल्याच्या आजुबाजूचा दंडाराजपुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम सिद्धी याकुत व सिद्धी खैरियत यांनी सुद्धा दंडाराजपुरी मराठ्यांच्या कडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्र मार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला.
*१४ फेब्रुवारी सन १६७९-८०*
चोपड्याहून सुरतेस लिहिलेल्या पत्रातील माहिती अशी " शिवाजीच्या सैन्याने हा प्रदेश लुटून व जाळून फस्त केला आहे ज्या शहराचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात त्या लोकास शिवाजी कोणत्याही प्रकारचा उपसर्ग देत नाही. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ फेब्रुवारी इ.स.१६८९*
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे 7 वर्षाचे होते व राजाराम महाराज हे 18-19 वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय
*१२ फेब्रुवारी इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवराय* अखंड हिंदुस्थानातील पाहिले आरमार निर्माते. *' राजपुरीचे सिद्दी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू '* सिद्दीबरोबर इंग्रज पोर्तुगीज या दगलबाज शत्रूचे आव्हान स्वीकारून आजच्या दिवशी *शिवछत्रपतींनी* कल्याण भिवंडीच्या खाडीत मराठी आरमाराच्या उभारणीस शुभारंभ केला एवढा मोठा दिल्लीचा बादशहा पण तोही समुद्रावर हतबल होता तिथे एक छोट्याश्या मराठा राजाने समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या दिशेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल होते. सुरुवातीच्या काळात या कामात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या मदतीने हे काम चालू केले पोर्तुगीजांना हळूहळू याचा धोका वाटू लागला. तेव्हा त्यांनी मदत करायचे बंद केले पण तोपर्यंत मराठे या जहाँजबांधणी च्या कामात तरबेज झालेले पुढील काळात मराठा आरमार एवढे शक्तिशाली झाले त्यावर युरोपियन डग्लस म्हणतो *' It Was Great Mercy That Shivaji Was Not A Sea-Man ; Otherwise He Might Have Swept The Sea As He Did The Land With The Besom Destruction*
यातून च *#शिवछत्रपतींची* दहशत काय होती ते कळते
*११ फेब्रुवारी इ.स.१६८१*
किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना.
मराठ्यांनी "धरणगाव" लुटले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*९ फेब्रुवारी इ.स.१६६५*
छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहरावर छापा टाकला महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही.
*९ फेब्रुवारी इ.स.१६७०*
"छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*८ फेब्रुवारी इ.स.१६६५*
छत्रपती शिवरायांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम.
छत्रपती शिवरायांची पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बिदनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली. स्वताचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमार स्वारी कर्नाटकमधील बिदनूरवर काढली. या मोहीमेकरता मालवण बंदरातून ८५ जहाँजे ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वता या सागरी सेनेचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.
शिवचरित्रात या बसरूर च्या स्वारीचे मोठे ऐतिहासीक महत्व आहे कारण या स्वारीनंतर महाराजांनी कोणत्याही आरमारी मोहिमेचे स्वतः नेतृत्व केलेले इतिहासात नमूद नाही बसरूर ची ही मोहीम शिवचरित्र्यातील पहिली व शेवटची मोहीम ठरली
प्रसिद्ध शिवचरित्राचकार शेजवलकर या मोहीमेचे महत्व सांगताना लिहितात "महाराजांच्या बसरूर च्या एकमेक आरमारी पर्यटनांनंतर पुनः कोणत्याही मराठी राजाने तरवांतून स्वारी केलेली नमूद नाही एकट्या महाराजांचेच लक्ष हिंदी राजांना अपरिचित अशा नूतन संरक्षण साधनाकडे पहिल्याने वळले व त्याचा यथाशक्य उपयोग करून घेण्याची तयारी त्यांनी चालवली यात त्यांच्या मोठेपणाचा एक पैलू दृष्टीस पडतो शिवचरित्र्यातील अफझलखान वध शाहिस्तेखानावरील छापा यांसारखे महाराजांचे प्रसिद्ध पराक्रम सर्वानाच परिचित आहेत त्या मानाने तेवढेच महत्व असणारा सागरांवरील हा पराक्रम उपेक्षित च राहिला
विशेष म्हणजे आपले लोक बसरूर ची लूट केली असा इतिहास सांगतात आणि बसरूर चे लोक या दिवसाला स्वातंत्रोत्सव साजरा करतात
असे बरेच पराक्रम आहेत जे अजून सामान्य लोकांना माहीत नाहीत आम्ही *#शिवविचार_प्रतिष्ठान* च्या माध्यमातून असे सर्व पराक्रम आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आपले अभिप्राय नक्की कळवा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*६ फेब्रुवारी इ.स.१६८१*
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खान जहान बहादुरने दारूगोळा व् सैन्याची बादशहाकडे मागणी केली. *किल्ले रामसेज घेण्यासाठी.*
*६ फेब्रुवारी इ.स.१९३९*
सामाजिक भान असलेले भारतातील शेवटचे राजे खरा खुरा लोकराजा लोकपाळ सयाजीराजे गायकवाड यांच्या स्मृतिदिनानीमित्त अभिवादन
जय शिवराय ।
जय शंभूराजे।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*५ फेब्रुवारी इ.स.१६६४*
*नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान.*
*६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत मधून वसुली केली बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.*
*लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४.* #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#नरवीर_तानाजी_मालुसरे*
*#_गड आला पण सिंह गेला...🚩*
नरवीर तानाजी मालुसरे
आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!
सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना नरवीर तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,
......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .
ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत
तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्याचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.
रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.
अश्या या शूर नरविराचे अजरामर ठेवून
तानाजीच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.
तसेच यांच्या कार्याची दखल सिने सृष्टीने देखील आपल्या माध्यमातून भारतभर आणि जगभर पोहचवण्याचे कार्य केले आहे ते अश्या प्रकारे..
दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील #सुभेदार मराठी चित्रपट 2023 मध्ये आला
"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, सुभरदारांच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.
यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता.
अश्या या शूर नरवीरास त्रिवार वंदन...🚩_ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३ फेब्रुवारी इ.स.१६६१*
छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून राजगडावरुन कोकणाकडे प्रस्थान केले.
*३ फेब्रुवारी इ.स.१६८९*
मुघल सरदार मुकर्रबखान कोकणातील संगमेश्वरला पोचला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे त्याच्या कैदेत आले.
*३ फेब्रुवारी इ.स.१८३२*
नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा." #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏













