*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१३ मे इ.स१६५६*
छ्त्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर किल्ले प्रबळगड वर हिशोब तपासनीचे काम चालू.
*१३ मे इ.स.१६५९*
छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना हिरडस मावळ मधील किल्ले मोहनगड ची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
*१३ मे इ.स.१६६६*
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांविषयी रामसिंगाकडे कालच्या प्रकरणाविषयी अधिक चर्चा केली.
*१३ मे इ.स.१६६६*
औरंगजेब बादशहाने दरबारात शंभूराजांना सन्मान करुन वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली.
यावेळी औरंगजेबने शंभूराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?"
यावर शंभुराजे बोलले,
हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है.
*१३ मे इ.स.१६७०*
मराठ्यांनी लोणावळा जवळील किल्ले लोहगड व किल्ले विसापुर हे आजच्या एकाच दिवशी जिंकले.
*१३ मे इ.स.१६७७*
छञपती शिवरायांनी कर्नाटकातील दक्षिण दीग्विजय मोहीम दरम्यान जिंजीचा किल्ला जिंकला.
महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी सैन्याची १ तुकडी पाठवली, परंतू किल्लेदार महंम्मदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात किल्ला मराठ्यांना दिला व गडावर भगवे निशान फडकले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ मे इ.स.१६६६*
छत्रपती शिवराय पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले.
औरंगजेबाशी त्यांची पहिली व शेवटची भेट, तेव्हा महाराजांच्या भोवती होते १०० सशस्त्र मावळे.
ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेब बादशहाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवराय किल्ले राजगडहून आग्र्याला जायला निघाले होते.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षांचे बाल शंभूराजे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जद, निराजी रावजी, मदारी मेहत्तर आणि इतर निवडक मावळे होते. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ मे इ.स.१६६६*
#आग्रा_भेट
आग्रा भेटीच्या वेळी "छत्रपती शिवराय" व त्यांसोबत "युवराज शंभुराजे" ११ मे १६६६ रोजी 'मलुकचंद सराय' येथे येवुन पोहचले, येथुन 'आग्रा शहर' जवळच होते.
*११ मे इ.स.१६६६*
छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर.
मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले.
*११ मे इ.स.१६७०*
औरंगजेबने स्वराज्यविरोधात ७० तोफांचे गाडे आणि गोळा बारूद पाठवला.
*११ मे इ.स.१६७८*
दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून छत्रपती शिवराय सातारा-प्रतापगड मार्गे रायगडवर दाखल. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१० मे इ.स.१६३५*
थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.
*१० मे इ.स.१६५५*
जावळीच्या खोऱ्यातील फीतुरी संपविण्यासाठी छत्रपती शिवराय जावळीमध्ये दाखल. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*९ मे इ.स.१५४०*
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म
(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंह यांचे पुत्र.
*९ मे इ.स.१६६०*
शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. छत्रपती शिवराय त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
*९ मे इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी हलवर्ण येथील फौजेस पत्र पाठवले.
*९ मे इ.स.१६७४*
"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवराय चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.
*९ मे इ.स.१६८१*
दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*७ मे इ.स.१६७४*
छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर मुक्कामी.
*७ मे इ.स.१६६०*
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होत
*७ मे इ.स.१६८०*
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.
*७ मे इ.स.१६८०*
छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली. भोसले घराण्यातील हि शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशी हि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते.
राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*६ मे इ.स.१६५६*
रायरी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले.
रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
*६ मे इ.स.१६७५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी "फोंडा किल्ला" जिंकला. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#वीर शिवा काशीद*
वीर शिवा काशीद यांचा जन्म ५ मे रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांनाव्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रमच होता. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच छत्रपती शिवरायांनी त्यांची हेरखात्यात नेमणूक केली होती. शिवा काशीद यांचं दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब छत्रपती शिवरायच दिसत होते.
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता.छत्रपती शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.
शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग प्रामुख्याने विजापूरच्या आदिलशहाच्या अमलातील प्रदेशात चालू होता. शिवराय आणि आदिलशहा यांच्या पहिल्या उघड संघर्षात पुरंदरावर विजापुरी सेना पराभूत झाली. आदिलशाहीच्या सामर्थ्याला न जुमानता शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून जावळी बळकावली. स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच उरात धडकी भरलेल्या आदिलशाहीने प्रचंड फौज फाटा देऊन स्वराज्यावर पाठविलेला अफझलखान शिवरायांनी प्रतापगडाजवळ ससैन्य संपविला. हा प्रचंड पराभव आदिलशहाला अतिशय झोंबला. अफझल वधानंतर स्वराज्याच्या सीमा विजापूरच्या दिशेने वाढवत शिवरायांनी पन्हाळा हा बलाढ्य आणि मोक्याचा किल्ला जिंकला.
आदिलशहाने पुन्हा फौज देऊन सिद्दी जौहर या चिवट लढवय्या सरदारास शिवरायांवर पाठविले. सिद्दीने पन्हाळ्यास वेध घातला. या परिसरातील प्रचंड पावसाळ्यात वेढा चालविणे विजापुरी फौजेला अशक्य होईल हा पन्हाळ्यावर असलेल्या महाराजांचा अंदाज चिवट सिद्दी जौहरने खोटा ठरविला. वेध अधिकच कडेकोट करून सिद्दी गडाखाली ठाण मांडून बसला. मराठ्यांनी वेढ्याबाहेरून केलेल्या हल्ल्यांना मोडून काढीत सिद्दी गडावर मारा करू लागला. वेढ्यात अडकून चार महिने झाले आणि शिवरायांनी यापुढे पन्हाळ्यात रहाणे स्वत:ला आणि राज्याला अपायकारक ठरणार हे ओळखून वेढ्यातून निसटून जायचे ठरवले. तहाची बोलणी चालू करून काही प्रमाणात शिवरायांनी सिद्धीचे सैन्य गाफील बनविले. पन्हाळ्यातून बाहेर पडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला.
निवडक एक हजार मावळे बरोबर घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या अंधारात गुपचूप निसटण्याच्या या योजनेत चाहूल लागून शत्रू पाठीवर आलाच तर त्याला हूल देण्यासाठी शिवा काशीद यांची एक वेगळ्या कामावर योजना करण्यात आली. पन्हाळ्या शेजारच्या नेबापूर गावच्या नाभिक समाजाच्या शिवा काशीद या वीराने महाराजांच्या पेहरावात दुसऱ्या पालखीत बसून नेहमीच्या मार्गाने प्रयाण केले तर महाराज आडवाटेने विशाळगडाकडे निघाले. विजापुरी सैन्याला चकवा देऊन महाराज वेढ्याबाहेर पडले पण सिद्दीच्या गस्ती पथकांना त्यांची चाहूल लागली आणि विजापुरी सैन्य पाठलागावर निघाले. घोड्यावरून पाठलाग करणाऱ्या सिद्दीच्या सेनेच्या तावडीत शिवा काशीद सापडले. महाराज सापडले या आनंदात त्यांना सिद्दीसमोर आणण्यात आले. पण महाराजांना ओळखणाऱ्या फाजलखानाने हे महाराज नाहीत असे सांगताच सिद्दी हाधरला.
ते महाराज नसून शिवा काशिद आहे.
सिध्दीने त्यास विचारले , " मरणाचे भय वाटत नाही का? ".
त्यावर शिवा काशिद म्हणाला, " छत्रपती शिवरायांच्या साठी मी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजी राजे कोणास सापडणार नाहीत ".
हे उत्तर ऐकून रागाने चिडून सिद्दीने भाल्याने भोसकून शिवा काशिदचे शीर कलम केले. पण या सर्व घटनांनी शिवरायांना विशाळगड गाठण्यास लागणारा बहुमोल जादा वेळ मिळवून दिला.
महाराजांचे रूप घेऊन विजापुरी सैन्याला फसविण्याचे पर्यवसान आपल्या मृत्यूमध्ये होणार हि पूर्व कल्पना असूनही मृत्यूला सामोरे जाण्याचे साहस दाखविणारे हे शिवा काशीद .इतिहास ही त्याचा पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न छत्रपती शिवाजीराजे साकार करु शकले. यांना मनाचा मुजरा..........!!!
मृत्यू - १३ जुलै १६६०
समाधीस्थान - पन्हाळा, जि. कोल्हापूर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३ मे इ.स.१६७०*
पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले एका पाठोपाठ परत जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरु केला व त्यात ३ मे रोजी मावळातला "किल्ले लोहगड" मराठ्यांच्या ताब्यात पुन्हा आला.
*३ मे इ.स.१६७७*
छत्रपती शिवराय जिंजीकडे जात असताना मद्रासजवळ पोपोलम येथे मुक्कामी.
*३ मे इ.स.१८१८*
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#महाराष्ट्र दिन*
गौरवशाली इतिहास आणि संस्कृती चा पगडा असलेला महाराष्ट्राची १ मे १९६० रोजी निर्मिती झाली
ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा"
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
"कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र"
"आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा,"
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...
जय महाराष्ट्र #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज













