mahesh m. shirkar
ShareChat
click to see wallet page
@301598477
301598477
mahesh m. shirkar
@301598477
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२४ एप्रिल इ.स.१६७४* छत्रपती शिवरायांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता दोन महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण त्यांनी तसे केले नाही व जिजाऊ साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले. *२४ एप्रिल सन १७३९* "वसईचा पाठीराखा... जंजिरे धारावी" साष्टीचे उत्तर टोक म्हणजे धारावी. वसई किल्याच्या समोरील खाडीच्या दुसर्‍या तीरावरील लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणजे धारावी. मराठा सरदार धारावीचे लष्करी महत्व किती जाणत होते ते त्यांनी चिमाजीअप्पांना लिहिलेल्या पत्रांतून स्पष्ट होते. पत्रांतील मजकूर पुढीलप्रमाणे - "धारावी समुद्रामुळें व बंदरामुळें दुसरा जंजिराच! शिवाय दाणागल्ला तेथून चांगला लवकर वसईस पोचवितां येतो. शिजले अन्न निवलें नाही तोंच तेथे पोचवितां येतें." "सर्वांच्या विचारें, धारावीस ठाणे बसवून खाडी बंद होते तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील." "धारावीची बंदिस्त म्हणजे बंदोबस्त पाथरवट आणून चहुबुरूजी आधीं सत्वर बांधवावी मग पुढें मोठा कोट बांधवावा तेंव्हाच कार्यास येईल." - शंकराजीपंत फडके. "धारावीवर मोर्चा हजार माणसांचा ठेवून वसईवर इभ्रत पाडावी." - बरवाजी तापकीर मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजीअप्पांच्या फौजेने त्वरीत १७३७ च्या मध्यात "धारावी" हे ठाणे हस्तगत केले. १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर २२ फेब्रुवारी १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर २६ फेब्रुवारी १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला २७ फेब्रुवारी १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला. ३ मार्च १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते. २४ एप्रिल १७३९ रोजी कौल घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करली. पोर्तुगीजांचा एकूण एक सैनिक जखमी झाला होता. मुख्य अधिकार्‍यांपैकी मार्टिन आणि अल्फेरिस एस्तव्हो मार्टिन्स हे दोन अधिकारी ठार झाले. अशा रीतीने धारावी २४ एप्रिल १७३९ काबीज झाली. वसईची चावी हातात आल्यानंतर लगेचच उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांची जणू राजधानी वसई मराठ्यांनी काबीज करून पोर्तुगीज सत्ता उत्तर फिरंगाणातून उखडून काढली. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🗿शिवकालीन पुराणवस्तू - शिवावचार प्रतिष्ठान 0٢٥٧ A RT RS ARBRLYSHDHANAWDE o lomm॰ %० (3ೆ शिवावचार प्रतिष्ठान 0٢٥٧ A RT RS ARBRLYSHDHANAWDE o lomm॰ %० (3ೆ - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२३ एप्रिल १६५७,* रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली *२३ एप्रिल इ. स. १६५७* अहमदनगरचा मुघल सुभेदार "महाफतखान" यास छ्त्रपती शिवरायांनी पत्र रवाना केले. *२३ एप्रिल इ. स.१६६७* *मराठ्यांनी कोकणातील "दाभोळ" व आसपासची ठाणी जिंकली. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - NLIIIFF प्रतिष्ठान NLIIIFF प्रतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२२ एप्रिल १७३७* मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला *२२ एप्रिल १८१८* कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🗿शिवकालीन पुराणवस्तू - -1 @N प्रतिषछव Gl Onso -1 @N प्रतिषछव Gl Onso - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२१ एप्रिल इ.स. १६५६* छत्रपती शिवरायांकडे मुरारबाजी देशपांडे हे रत्न आले. *२१ एप्रिल इ.स.१६६८* छत्रपती शिवरायांनी विठोजी हैबतराव यास अभय दिले. *२१ एप्रिल इ.स.१७००* अजिंक्यतारा गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महिने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल रोजी शरणागती पत्करली. नंतर त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩छत्रपति शिवाजी महाराज - Gोजक्थतार शिवदिचार Rakoa] Gोजक्थतार शिवदिचार Rakoa] - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२० एप्रिल इ.स.१६६३* किल्ले सिंहगड ताब्यात घेण्यासाठी शाहीस्तेखानाने रचलेली चाल छत्रपती शिवरायांना आधीच समजली. यात फीतुरी करण्यामध्ये मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत हे असल्याचे कळल्याने शिवरायांनी या प्रकरणाचा खुलासा करणारे पत्र रवाना केले. *२० एप्रिल इ.स.१६६५* या रात्री छत्रपती शिवरायांनी किल्ले पुरंदरवर रसद पाठवली. यावेळी पुरंदर किल्ला मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. कशी कोणास ठाऊक पण केदार दरवाज्याने ही रसद गडावर पोचली. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - @giRIR (irakaa @giRIR (irakaa - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१९ एप्रिल इ.स.१६७३* छत्रपती शिवरायांची कर्नाटकातील हुबळीवर स्वारी *१९ एप्रिल इ.स.१८१८* दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १९ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतिष्ठान Voryalo शिवविचार प्रतिष्ठान Voryalo - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१८ एप्रिल इ.स. १६७४* छत्रपती शिवरायांनी हंबीरराव मोहिते मामांना सरसेनापती नेमले १८ एप्रिल रोजी ते सैन्यात सरसेनापती म्हणून रुजू झाले *१८ एप्रिल इ.स.१६७७* त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन.. *१८ एप्रिल इ.स.१७०३* महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिथ बराच काळ राहिला. *१८ एप्रिल इ.स.१७७४* गंगाबाईंच्या पोटी पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरावर जन्म. छत्रपती शाहूंनी हा किल्ला पेशव्यांकडे सोपविला होता, काही काळ पेशव्यांचे वास्तव्य पुरंदरावर होते. सवाई माधवराव म्हणजेच माधवराव पेशवे दुसरे, काही काळ मराठा साम्राज्याचे पेशवा पंतप्रधान होते. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - शिवविचार মংভা VICHAR SHIV PRATISTHAN शिवविचार মংভা VICHAR SHIV PRATISTHAN - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१७ एप्रिल इ.स.१६७५* फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला. *१७ एप्रिल इ.स.१६८२* कारवारचे बंदर शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय. *१७ एप्रिल इ.स.१७२०* बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला. *१७ एप्रिल इ.स.१७३९* छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार মংভা VICHAR SHIV PRATISTHAN शिवविचार মংভা VICHAR SHIV PRATISTHAN - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१६ एप्रिल इ.स.१६६८* छत्रपती शिवरायांनी ‘कानंद खोरे’ चे मरळ देशमुख यांना अभय दिले. *१६ एप्रिल इ.स.१६७८* छत्रपती शिवराय राजापूरमार्गे किल्ले पन्हाळा वर आले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 - గిర్రశిాగా' प्रतिष्छन grr থিসবক గిర్రశిాగా' प्रतिष्छन grr থিসবক - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१५ एप्रिल इ.स.१६७३* स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली. प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले. आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची. राजांनी प्रतापराव गुजरांना चांगलेच फ़ैलावर घेतले. "सरसेनापती असूनही हा कोणता न्याय केलात ? हाती आलेल्या गनीमास धर्मवाट दिलीत ? गनीमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका". होय, राजांचे शब्द म्हणजे अंगार होते. एखाद्या निखार्‍याप्रमाणे ते शब्द रावाच्या कानांमध्ये घुसले. प्रतापरावाचा विजयाचा उन्माद क्षणात मावळला आणि बहलोलखानाला पराभूत करण्यास नव्या जोमाने योजना आखू लागले *१५ एप्रिल इ.स.१६८०* कारवार बंदरातील धान्य संभाजी महाराजांनी आणविले *१५ एप्रिल इ.स.१६८०* महाराजांच्या मृत्युनंतर शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले. *१५ एप्रिल इ.स.१६८३* छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - शिवविचार प्रतिष्ठान SHIV_VICHAR PRATISTHAN शिवविचार प्रतिष्ठान SHIV_VICHAR PRATISTHAN - ShareChat