*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ फेब्रुवारी इ.स.१६६२*
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."..
*२१ फेब्रुवारी इ.स.१६६५*
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
*२१ फेब्रुवारी इ.स.१६८७*
मोअज्जमला बादशहाने कैद केले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*१९ फेब्रुवारी..🚩🚩*
*#रयतोत्सव..✨*
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... अवघा दख्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला... दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... अरे माझा राजा जन्मला
*तुमचा पराक्रम आठवता कृष्णेवर आजही शहारे उठती रायगडी सदरेवर आजही राजे लाखो मुजरे झडती युगनिर्माता छत्रपती ऐसा न होई कोणी दुजा शतकांच्या छाताडावर खडा शिवाजी राजा..*
शतकानु शतके हिंदुस्थानावर अमानुष अत्याचार गाजवून सत्ता प्रस्थापित करणाऱ्या परकीय सत्ता केंद्रांच्या सत्ताकेंद्रांना उद्धवस्त हिंदुस्थानची सर्व सत्ता केंद्रे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर एकवटवणाऱ्या हिंदुभुपती अखंडी हिंदुस्थानधिपती महाराज यांची आज जयंती..
त्यानिमित्त आमच्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा..
*#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात..🚩🚩*
*टीम :#शिवविचार_प्रतिष्ठान* #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१८ फेब्रुवारी इ.स.१६५३*
छत्रपती शिवरायांनी गोपाळ भटास वर्षासन चालू केले.
*१८ फेब्रुवारी इ.स.१६६६*
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ फेब्रुवारी इ.स.१६६३*
*छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८९*
*छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१६ फेब्रुवारी इ.स.१६३५*
*मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०००० ची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला.
*१६ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवरायांनी कोकणातील "चाफळ" जिंकले.
*१६ फेब्रुवारी इ.स.१६८१*
*१६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. राजे सिंहासनाधीश्वर झाले. छत्रपती संभाजी महाराज रणांगनात जितके कठोर होते तितकेच ते स्वराज्यात होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधातही कठोर होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात राजधानी रायगडवरुन त्यांनी कवी कलशाकरवि काही महत्वाचे न्यायनिवाड़े केले. त्यातून त्यांच्यातील न्यायप्रिय राजगुण उठून दिसतो. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१५ फेब्रुवारी इ.स.१६६७*
*"प्रतिशिवाजी" अशी ओळख असलेले "सरसेनापती नेताजी पालकर" यांचं औरंजेबने जबरदस्तीने धर्मांतर केले,आणि त्यांचे "महंमद कुली खान" असे नामांतरण केले.
*१५ फेब्रुवारी इ.स.१६८४*
*छत्रपती संभाजीराजेंवर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो वैतागून परत निघून गेला.
*१५ फेब्रुवारी इ.स.१६८९*
*१ फेब्रुवारी १६८९ रोजी "छत्रपती संभाजीराजे" व "कवी कलश" हे मुघल सरदार "मुकर्रबखान" याच्या कैदेत सापडले होते.आज त्यांना औरंगजेब बादशहापुढे हजर करण्यात आले आणि इथूनच संभाजीराजेंवर अमानुष अत्त्याचार सुरू झाले.
*१५ फेब्रुवारी इ.स.१७३८*
*धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले.
दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६५*
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत
१३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६६*
औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६७१*
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली!
होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवून साजरा करीत असत. या वेळची शिकार होती मेहेरुफ-ए-जंजीरा याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज किल्ले रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिरा किल्ल्यातच गुंतले होते. जंजिरा किल्ल्याच्या आजुबाजूचा दंडाराजपुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम सिद्धी याकुत व सिद्धी खैरियत यांनी सुद्धा दंडाराजपुरी मराठ्यांच्या कडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्र मार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला.
*१४ फेब्रुवारी सन १६७९-८०*
चोपड्याहून सुरतेस लिहिलेल्या पत्रातील माहिती अशी " शिवाजीच्या सैन्याने हा प्रदेश लुटून व जाळून फस्त केला आहे ज्या शहराचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात त्या लोकास शिवाजी कोणत्याही प्रकारचा उपसर्ग देत नाही. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ फेब्रुवारी इ.स.१६८९*
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे 7 वर्षाचे होते व राजाराम महाराज हे 18-19 वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय
*१२ फेब्रुवारी इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवराय* अखंड हिंदुस्थानातील पाहिले आरमार निर्माते. *' राजपुरीचे सिद्दी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू '* सिद्दीबरोबर इंग्रज पोर्तुगीज या दगलबाज शत्रूचे आव्हान स्वीकारून आजच्या दिवशी *शिवछत्रपतींनी* कल्याण भिवंडीच्या खाडीत मराठी आरमाराच्या उभारणीस शुभारंभ केला एवढा मोठा दिल्लीचा बादशहा पण तोही समुद्रावर हतबल होता तिथे एक छोट्याश्या मराठा राजाने समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या दिशेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल होते. सुरुवातीच्या काळात या कामात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या मदतीने हे काम चालू केले पोर्तुगीजांना हळूहळू याचा धोका वाटू लागला. तेव्हा त्यांनी मदत करायचे बंद केले पण तोपर्यंत मराठे या जहाँजबांधणी च्या कामात तरबेज झालेले पुढील काळात मराठा आरमार एवढे शक्तिशाली झाले त्यावर युरोपियन डग्लस म्हणतो *' It Was Great Mercy That Shivaji Was Not A Sea-Man ; Otherwise He Might Have Swept The Sea As He Did The Land With The Besom Destruction*
यातून च *#शिवछत्रपतींची* दहशत काय होती ते कळते
*११ फेब्रुवारी इ.स.१६८१*
किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना.
मराठ्यांनी "धरणगाव" लुटले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*९ फेब्रुवारी इ.स.१६६५*
छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहरावर छापा टाकला महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही.
*९ फेब्रुवारी इ.स.१६७०*
"छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜













