*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२ मार्च इ.स.१६६०*
सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा
सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवराय मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला
*२ मार्च इ.स.१६८७*
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वचनाला जागला होता.
तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२७ फेब्रुवारी इ.स.१६७३*
छत्रपती शिवराय रायगडावरून पन्हाळा गडाकडे.
*२७ फेब्रुवारी इ.स.१६८३*
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई
*२७ फ़ेब्रुवारी इ.स.१६९८*
छत्रपती राजाराम महाराज” जिंजी किल्ल्याहून स्वराज्यात दाखल, व किल्ले विशाळगड येथे मुक्कमी. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२६ फेब्रुवारी इ.स.१६४७*
थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली.
*२६ फेब्रुवारी इ.स.१७३७*
चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले
*२६ फेब्रुवारी इ.स.१७३९*
खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२४ फेब्रुवारी इ.स.१६७४*
*#म्यानातून_उसळे_तलवारीची_पात*
*#वेडात_मराठे_वीर_दौडले_सात*
छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४ बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.*
छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.*
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
*#दगडात_दिसतील_अजुन्बी_तेथल्या_टाचा ,*
*#ओढ्यात_तरंगे_अजुनी_रंग_रक्ताच* #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२३ फेब्रुवारी इ.स.१६२३*
२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस.
राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत....
*२३ फेब्रुवारी इ.स.१६६५*
*छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवुन ती नजराण्याच्या स्वरुपात महाराजांसमोर हजर केली.
*२३फेब्रुवारी इ.स.१७३९*
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.* #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२२ फेब्रुवारी इ.स.१६६५*
छञपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छञपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली.
*२२ फेब्रुवारी इ.स.१६८४*
केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र
केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य
मुंबईपासून तीन मैलांवर असणार्या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ फेब्रुवारी इ.स.१६६२*
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."..
*२१ फेब्रुवारी इ.स.१६६५*
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
*२१ फेब्रुवारी इ.स.१६८७*
मोअज्जमला बादशहाने कैद केले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*१९ फेब्रुवारी..🚩🚩*
*#रयतोत्सव..✨*
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... अवघा दख्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला... दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... अरे माझा राजा जन्मला
*तुमचा पराक्रम आठवता कृष्णेवर आजही शहारे उठती रायगडी सदरेवर आजही राजे लाखो मुजरे झडती युगनिर्माता छत्रपती ऐसा न होई कोणी दुजा शतकांच्या छाताडावर खडा शिवाजी राजा..*
शतकानु शतके हिंदुस्थानावर अमानुष अत्याचार गाजवून सत्ता प्रस्थापित करणाऱ्या परकीय सत्ता केंद्रांच्या सत्ताकेंद्रांना उद्धवस्त हिंदुस्थानची सर्व सत्ता केंद्रे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर एकवटवणाऱ्या हिंदुभुपती अखंडी हिंदुस्थानधिपती महाराज यांची आज जयंती..
त्यानिमित्त आमच्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा..
*#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात..🚩🚩*
*टीम :#शिवविचार_प्रतिष्ठान* #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१८ फेब्रुवारी इ.स.१६५३*
छत्रपती शिवरायांनी गोपाळ भटास वर्षासन चालू केले.
*१८ फेब्रुवारी इ.स.१६६६*
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ फेब्रुवारी इ.स.१६६३*
*छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८९*
*छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜













