*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*१६ मार्च १५२७*
फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
*१६ मार्च १६८१*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले तेंव्हा नोव्हेंबर १६८० मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आपला वकील इंग्रजांकडे मुंबईस पाठवला होता शिवाय सिद्दीच्या मुंबईमधील हलचालीवर ही लक्ष ठेवण्याची तरदूत छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती. इंग्रजांनी सिद्दीस मदत करायचे थांबवावे तसे न केल्यास छत्रपती संभाजी महाराज मुंबईवर स्वारी करतील असा निरोप छत्रपती संभाजी महाराजांच्या वकीलाने इंग्रजांना दिला यावेळी सिद्दी आपल्या आरमारासह सूरतेस गेला होता तेंव्हा इंग्रजांना सिद्दीच्या भानगडीतून थोडा दिलासा वाटला होता. पण १६८१ च्या सुमारास सिद्दिने मुंबईस जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली. चौल येथे ३००० सैन्यासह मराठा दाखल होता त्याने गलबतांची रास्त मागणी केली तेंव्हा इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भीतीने ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांकडे पाठवली..
छत्रपती संभाजी महाराजांचा आरमारातील दरारा दर्शवणारी ही घटना झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १६ मार्च १६८१
*१६ मार्च १६८६*
छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे बाटलेल्या लोकांना शुद्ध करून घेतले होते.१६ मार्च १६८६ रोजीचे हे निवाडा पत्र. यात गंगाधर रंगनाथ यांना शुद्ध करून घेतलेले आहे. यास आजच्या भाषेत "घरवापसी" म्हणतात. याहून काही समाजकंटक जाती जाती मध्ये वितुष्ट आणत असतात अश्या महाभागांसाठी या पत्रातील शेवटची ओळ पूरक आहे. सूज्ञास सांगणे न लागे.
श्रीमहालक्ष्म्यैनम: श्रीत्र्यंबकेश्वर
.ll श्रीसकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री देशमुख देशपाडे व ज्योतिषी व उपाध्ये व समस्त वेदमूर्ती, वस्ती कसबे हरसूल, प्रांत अवरंगाबाद व समस्त महाराष्ट्र कोकण देशस्थ विद्वद्वैदिक गृहस्थ गोसावी यांसीः-
पौष्य उपाध्ये व मोरेश्वर पडितराव आशीर्वाद अनुक्रमे नमस्कार उपरि गगाधर रगनाथ कुळकरणी कसबे हरसूल हा ब्राह्मण मोंगलापाशी सेवेसी होता कित्येक दिवस चाकरी करीत असता मोगली यावरी बलात्कार करून बाटविला भ्रष्ट करून यास तीन महिने बदखानी निर्बध ठेविला होता. तेथें यवनासी अन्नोदकससर्ग घडला त्यानंतर यास भाग्य अडीचसेहें मनसब देऊन चाकर करून ठेविला पांच वर्षे चाकरी करीत होता स्नानसंध्यादिक कर्मे करिता नयें, यास्तव राहिले पांचा वर्षांत अन्नोदकसंसर्ग केला नाही. दौलत करीत असतां भाग्याचें सुख टाकून, अत:करणी अनुताप मानून, आपले जातींत यावे यास्तव दौलत संपत्ती सर्व टाकून, अनुतापास्तव राजश्री छत्रपती स्वामीपाशीं रायगडास येऊन, एक वर्ष गंगाधर रंगनाथ दरबारीं आपणास प्रायश्चित्त द्या ह्मणऊन सरकारकून व न्यायाधीश व उपाध्ये व दानाध्यक्ष व भलेभले ब्राह्मण व समस्त आपले ज्ञातीस शरण येऊन, प्रायश्चित्त मागत होता त्याउपरि राजश्री समस्तराजकार्यधुरंधर वर्णाश्रमधर्मप्रतिपालक राजश्री छदोगामात्य स्वामी यास सर्व वर्तमान विदित जालें त्यानंतर त्यांहीं ब्राह्मणाचे कष्ट व अनुताप बहुत देखोनी राजश्री छत्रपती स्वामीस याचा वृत्तांत विदित केला. छत्रपती कृपाळू होऊन प्रायश्चित्त द्यावयासी आज्ञा दिल्ही त्याउपरि आह्मीं राजश्री छंदोगामात्य यांचे सभेसी समस्त विद्वद्वैदिक ब्राह्मणाचे संमतीनें मिताक्षरादि निबंध पाहोन, प्रायश्चित्त निर्वाह करून, गगाधर रंगनाथ यासी प्रायश्चित्त संकल्प सांगोन, श्रीयात्रेस, पाठविला. तेथें श्रीगिरिप्रदक्षिणा तीनशें साठी व यात्रा दोनी इतुके चतुर्विशत्यब्द प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित गंगाधरे केलें यथाशास्त्र प्रायश्चित्त विध्यक्त प्रकारें केलें. श्रीक्षेत्री समस्त धर्माधिकारी आदिकरून ब्राह्मणसगतीने तीर्थविधि करून, ब्राह्मणभोजन करून, अन्नप्रसादपंक्तीस गेतला. शुद्विभोजनें व प्रायश्चित्तप्रदक्षणा यथाविधि केला, ह्मणऊन श्रीक्षेत्रींच्या ब्राह्मणांचीं पत्रें व देशाधिकारी यांचीं पत्रें घेऊन आह्मापाशी आला पत्रें आह्मासी दिली. उपरि यथाविधि प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित निर्गमिले ऐसे वर्तमान राजश्री छंदोगामात्य गोसावी यांसी विदित केलें. त्याहीं पत्रें मनास आणून समस्त कारकून व न्यायाधीश यांच्या अनुमतें आह्मास आज्ञा केली जे गंगाधर रंगनाथ यास आपले पंक्तीस भोजन देऊन शुद्धिपत्र देणें ह्मणऊन. त्यावरून आह्मी आपले पंक्तीस भोजन देऊन यासी शुद्धिपत्र दिलें हा ब्राह्मण शुद्ध जाला, संव्यवहार्य जाहाला याउपरि यासी तुह्मी अन्नोदकादि व्यवहार यथापूर्व करीत जाणें जो कोण्ही याचा ब्राह्मण्याविषयी सदेह मानील तो देवब्राह्मणद्रोही महापातकी जाणिजे शके १६०८ सोळा शतें आठ, क्षय सवत्सर, चैत्र शुद्ध द्वितीया, भौमवार हे विज्ञप्ती मोर्तब.
*१६ मार्च १६८६*
औरंगजेबाने कपटाने कुतुबशाहिच्या माद्दंना व आकान्नाचा खून करवला.
*१६ मार्च १६९३*
शुर सुभेदार मल्हारराव होळकर जयंती
(मृत्यू २० मे १७६६)
हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.
*१६ मार्च १७१३*
छत्रपती शाहु महाराजांची परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवेपदी नियुक्ती केली.
*१६ मार्च १७७२*
मराठ्यांनी पथ्थरगड जिंकला
इ सन १७६९ नंतर उत्तरेकडील जाट, रोहिले, पठाण हे वरचेवर प्रबल होत होते. त्यानी बळकावलेला प्रदेश पुन्हा मिळवण्यासाठी रामचंद्र गणेश कानडे या मराठा सरदाराच्या हाताखाली उत्तरेकडे मराठा फौज रवाना केली. त्यात विसाजी कृष्ण बिनीवाले यांची करभारी म्हणुन नेमणुक केली. तिकडे शिंदे होळकरांची प्रत्येकी १५००० ची फौज होती. कानडे यांच्या यावेळच्या फौजेत गोविंदरावांचे पथक होते.
झाबेताखान शुक्रतालच्या किल्ल्यावरून पळून पथ्थरगडावर आला, मराठा सैन्य या किल्ल्यास वेढा देऊन बसले या वेढ्यात गोविंदराव बाबर, सुलतानजी बाबर व गंगाजी बाबर यांचे पथक होते. या वेढ्यातील खास चौकी ची महत्वाची जबाबदारी गोविंदराव बाबर यांच्याकडे होती. मराठ्यांनी १६ मार्च १७७२ रोजी पथ्थरगड जिंकला. या समयी मराठा सैन्यानी या गडावरील नजिबाची संपत्ती तर घेतलीच,परंतु पानिपतावरुन शत्रुने पळवुन नेलेल्या मराठ्यांच्या काही बायकांची सुटका केली. यात बाबर घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. या मराठ्यांच्या पराक्रमाच्या खबरा जेंव्हा पुण्यात माधवरावांना मिळाल्या तेंव्हा त्यांनी विसाजी पुण्यात आल्यावर त्यांचा सुवर्णपुष्पे उधळून सन्मान करण्याचा लेखी आदेश दिला.
*१६ मार्च १७७३*
इ.स. १७७३ मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर त्याची व्यवस्था ठरवून टाकली. छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही पेशव्यांनी रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. पेशवे दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩१५ मार्च इ.स.१५९४*
*मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी वेरुळ इथे शहाजी राजे यांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.)*
*🚩१५ मार्च इ.स.१६६१*
*छ.शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या.*
*🚩१५ मार्च इ.स.१६६५*
*मिर्झाराजा जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुण्याहून पुरंदरकडे प्रस्थान केले.*
*🚩१५ मार्च इ.स.१६६९*
*पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले.*
*🚩१५ मार्च इ.स.१६७०*
*छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.*
*🚩१५ मार्च इ.स.१६७०*
*माहुली गडावर मनोहरदासने शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली .*
*🚩१५ मार्च इ.स.१६८०*
*राजाराम महाराजांची जानकीबाईंशी लग्न*
*वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.*
*🚩१५ मार्च इ.स.१६८३*
*मराठ्यांचा सरदार विठोजी हा ४००० घोडेस्वार घेऊन मुघल सैन्यावर तुटून पडला, तसेच "सरसेनापती हंबीरराव मोहीते" २०,००० घोडेस्वार व १०,००० पायदळ घेऊन कोकणात उतरले. यात हंबीरराव जखमी झाले.*
*🚩१५ मार्च इ.स.१७१९*
*छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.*🚩
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩१४ मार्च इ.स.१६४९*
*शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.*
*🚩१४ मार्च इ.स.१६६५.*
*शिवराय भिवगडावर मुक्कामी.*
*औरंगजेबाच्या अत्यंत विश्वासू मोगली मनसबदार स्वराज्यावर चालून आला .तो यावेळी सासवड भागात चढाई साठी तयार होता .स्वराज्यातील गडकोट सिद्ध असल्याचे निरीक्षण करण्यासाठी महाराज भीवगडावर मुक्कामी होते.*
*🚩१४ मार्च इ.स.१७२३*
*खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी युद्ध करून मराठ्यांच्या फौजासह बाजीराव माळव्यात गेले.*
*🚩१४ मार्च इ.स.१७६०*
*पानिपत मोहीमेत अब्दालीच्या सैन्यापेक्षाही पेक्षाही मराठ्यांचा खरा पराभव हा "पाण्याने" केला. दिनांक १४ मार्च सन १७६० रोजी पडदुर येथून निघून सदाशिवराव भाऊसाहेब अत्यंत वेगाने उत्तरेत सरकले.*
*🚩१४ मार्च इ.स.१८१८*
*घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात*
*कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩१३ मार्च इ.स.१६६५*
*मुघल सरदार "मिर्झाराजा जयसिंग" व "दिलेरखान" यांनी "किल्ले पुरंदर" ला वेढा घातला.*
*🚩१३ मार्च इ.स.१६७९*
*छत्रपती शिवरायांनी "दाबोळपूर" जिंकले.*
*छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी सरनौबत हंबीरराव मोहिते यांना पाठवले होते .सेनापती आनंदराव मकाजी यांनी जोरदार हल्ला चढऊन दोबाळपुर जिंकून घेऊन तो भाग स्वराज्यात आणला.*
*🚩१३ मार्च इ.स.१७६०*
*अब्दालीशी तह*
*सुभेदार मल्हारराव होळकर कर्तबगारीने शुन्यातून झंजावात उभे करणारा पुरुष. ज्या काळात स्त्रीयांना गोशाशिवाय शिवाय घराबाहेर पडणे मुश्किल त्या काळात अहिल्यादेवींना शिक्षण-राजनीति-युद्धनीतिचे संस्कार करत त्यांना घडवणारा द्रष्टा पुरुष. संपुर्ण आयुष्य लढाया करण्यात गेले. राजकीय मुत्सद्देगिरी कोणालाही चकीत करणारी. वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही इंग्रजांशीही विजयी झुंज दिली असा हा योद्धा. पानिपत ही एक शोकांतिका. पण १३ मार्च १७६० साली अब्दालीशी तह करुन त्याला परत वाटेला लावण्याचे मुत्सद्दी कार्य त्यांनी केले होते. युद्ध टळत होते.*
*🚩१३ मार्च इ.स.१८००*
*नाना फडणवीस यांचा मृत्यू* *(जन्म १२ फेब्रुवारी १७४२)*
*पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते.* *पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩१२ मार्च इ.स १६७३*
*कोंडाजी फर्जद यांनी जिंकलेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी छञपती शिवराय आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं पन्हाळ्यावर आगमन.*
*🚩१२ मार्च इ.स.१६६४*
*सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे :*
*"...शिवाजीची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात...."*
*या व्यापारार्थ बाहेर पडणाय्रा महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते.*
*शिवरायांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी शिवराय मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर*
*( बसनूर ) वर निघाले*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
११ मार्च १६७७
दक्षिणदिग्विजय मोहिम
दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला.
११ मार्च १६८९
छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन...
औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजींच मस्तक कलम करा". आणि छत्रपति संभाजींच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "छत्रपती संभाजींच" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" छत्रपती संभाजींच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही.
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं... कसं जगावं !!! आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवंल... कसं मरावं !!!... ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........
या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा मुजरा.
!! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩🚩
११ मार्च १७९५
इतिहासातील प्रसिद्ध खर्ड्याची लढाई हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी झालीत, यात निजामाचा पराभव झाला.
११ मार्च १८१८
कोरीगड किल्ला इंग्रजांकडे
११ मार्च इ.स. १८१८ रोजी इंग्रज कर्नल प्राथरने लूट करण्याच्या उद्देशाने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.
११ मार्च १९२४
क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी जन्मदिन
जन्म : ११ मार्च १९२४
(मृत्यू : २१ जानेवारी १९४५)
हेमू कलाणी यांचा जन्म ११ मार्च १९२४ रोजी कलानी कुटुंबात सक्कर येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण टिळक हायस्कूलमधून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दीक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत तरुणांनी स्वराज्य सेना सक्करमध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलाणींकडे होते. आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. २३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेप्रमाणे हेमू व त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाच्या फिश प्लेट्स काढण्याच्या कामास सुरुवात केली. एवढ्यात संरक्षण पथकाचे शिपाई तेथे आले. हेमू कलाणींनी सर्व सहकार्यांना पळण्यास सांगितले. कोणीही पळण्यास तयार नव्हते. तरी हेमू कलाणींनी त्यांना दरडावून पळवून लावले. पण हेमू एकटेच शिपायांच्या हाती सापडले. लष्करी कोर्टापुढे त्यांना आणण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या सहकार्यांची नावे सांगितली नाहीत. हेमू कलाणींनी कोर्टाच्या कामात सहभागी होण्याचे नाकारले. बचावासाठी वकीलही दिला नाही. त्यांनी लष्करी कोर्टाला एकच उत्तर दिले, "गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले त्याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची सैनिक गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे."
लष्करी कोर्टाने हेमू कलाणींना आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली. पण लष्करी कमांडर लॉर्ड रिचर्डसन याने ती बदलून हेमू कलाणींना फाशी देण्याचे फर्मान काढले.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*१० मार्च इ.स.१६१५*
*मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म.*
*🚩१० मार्च इ.स.१६४९*
*स्वराज्य संकल्पक थोरले महाराज साहेब "शहाजीराजे" यांना कैद करून आदीलशाही सरदार* *"अफझलखान" विजापूर मध्ये आला.*
*यावेळी "किल्ले जिंजी" ची अपार लूट एकूण ८६ हत्तींवर लादून त्याने विजापूरात नेली.*
*🚩१० मार्च इ.स.१६५९*
*छत्रपती शिवाजी महाराज जामखेढचा खर्डा किल्ला (शिवपट्टन) ला निघाले.*
*🚩१० मार्च इ.स.१६७३*
*किल्ले रायगडहून किल्ले पन्हाळगडाकडे जाताना वाटेत छत्रपती शिवरायांचा किल्ले प्रतापगडवर मुक्काम.*
*प्रतापगडावर भवानी देवीची महाराजांकडून पूजा.*
*🚩१० मार्च इ.स.१६७७*
*५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩९ मार्च इ.स.१६६८*
*छत्रपती शिवरायांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे औरंगजेबाने शिवरायांना नाईलाजाने "राजा" ही पदवी बहाल केली.*
*🚩९ मार्च इ.स.१६७३*
*"कोंडाजी फर्जद" यांनी जिंकलेला "किल्ले पन्हाळा" पाहण्यासाठी "छत्रपती शिवराय" किल्ले रायगडावरून सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासोबत निघाले.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩८ मार्च इ.स.१५४६*
*पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. 'गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.'*
*ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली.*
*🚩८ मार्च इ.स १६७०*
*पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला.*
*ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.*
*🚩८ मार्च इ.स.१६८९*
*मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला.*
*🚩८ मार्च इ.स.१७३१*
*मराठ्यांनी बाजीरावच्या नेतृत्वाखाली निजामाचा सुरतेजवळ पराभव केला.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩७ मार्च इ.स.१६४७*
*इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली* *शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले* *आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.*
*🚩७ मार्च इ.स.१६४९*
*शहाजीराजे यांचे सेवक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.*
*🚩७ मार्च इ.स.१६६५*
*सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करित बसला होता. त्याने छत्रपती शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंतसिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.*
*🚩७ मार्च इ.स.१६८०*
*१६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते.*
*🚩७ मार्च इ.स.१७७१*
*हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*













