प्रेरणादायी, आदरणीय, चतुरस्त्र नेतृत्व...
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
जनसामान्यांच्या हिताचा ध्यास घेऊन मुंडे साहेबांनी अविरत कार्य केले.अन्यायाविरूद्ध लढा देत कायम समाजकार्य आणि उपेक्षितांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणाऱ्या या लोकनेत्यास मानाचा सलाम. #लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब पुण्यतिथी💐
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे ३१ मे २०२६ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसंगीत आणि मराठी संगीतविश्वातील एक महत्त्वाचा स्वर कायमचा हरपला आहे.
१९५० च्या दशकात त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. त्या काळात लता मंगेशकर यांचे वर्चस्व असतानाही सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजाचे लतादीदींच्या आवाजाशी साधर्म्य असल्याची चर्चा होत असे, मात्र त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे संगीतविश्वात वेगळे स्थान मिळवले.
मराठी संगीतविश्वातही त्यांचे योगदान मोठे आहे. जिथे सागरा धरणी मिळते, केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात आणि शब्दा शब्द जपेन ठेवून यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. ओमकार प्रधान रूप गणेशाचे या गीताने त्यांना घराघरात पोहोचवले.
त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीची दखल घेत भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. अनेक दशकांपर्यंत आपल्या मधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमन कल्याणपूर आज आपल्यात नसल्या, तरी त्यांची गाणी आणि त्यांचा आवाज संगीतप्रेमींच्या आठवणीत कायम जिवंत राहतील. भारतीय संगीतविश्वातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. 💐🙏🏻 #जेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच निधन💐
मातृ देवो भव... पितृ देवो भव "जागतिक पालक दिन"
जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #जागतिक पालक दिन💐
मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या थोर महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर!! आपल्या कार्यकाळात राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, आणि त्यांचा जीर्णोद्धार ही केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवण्यात त्यांचा मोलाचा हातभार लागला! त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या, तसेच त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सर्वांना समान न्याय या त्यांच्या बाणा मुळे अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरलेली!!
एक महान योद्धा…कुशल राजनीतिज्ञ आणि प्रभावशाली शासक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती💐
आज ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईद. त्याग,समर्पण आणि बलिदानाचा संदेश देणारी आणि मानवतेची शिकवण देणारी ही ईद आपणा सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना.
सर्व बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!
#बकरी ईद शुभेच्छा💐
गावचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा खडतर प्रवास करणारे, मुत्सद्दी नेते, प्रभावी वक्ते, कुशल प्रशासक, हजरजबाबी व निखळ व्यक्तिमत्त्व, स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
जनसेवेसाठी राजकारणाला साधन ठरवून सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारणारे,सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी राजकारणाला समाजसेवेचे एक माध्यम मानूनच आयुष्यभर त्यांनी कार्य केले. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे
आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत लोकनेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. राजकीय परिपक्वता, उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेले त्यांचे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला एक समाजकारणाचे माध्यम बनवून काम करून पाहणाऱ्या प्रत्येकास प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. #महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब जयंती💐
राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तंत्रज्ञान विकासात पुढाकार घेतला. भारतात संगणक क्रांती आणण्याचं आणि पंचायतीराज व्यवस्थेचा पाया रचण्याचं श्रेय त्यांना जातं. यासोबतच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण व विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला. नव्या भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन...! #मा. पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी स्मृतीदिन 💐
इतिहासातीमधील मराठा साम्राज्यातील एक तडफदार पराक्रमी सरदार म्हणजे मल्हारराव होळकर! मराठा साम्राज्य राखण्यात आणि ते वाढवण्यात मल्हाररावांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. पेशव्यांनंतर मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा लाभलेला!
पराक्रमी मल्हारराव निरभिमानी असून धाडसी आणि शूरवीर होते. ते फक्त युद्धकलेतच निष्णात नव्हते, तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार व चाणाक्ष मानले जात! अश्या या महान योद्ध्याला पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!
मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती, इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!#श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यतिथी💐
स्वराज्याच्या रक्षणासाठी अदम्य धैर्य, अपराजित रणनिती आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या बळावर संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्यनिष्ठा अबाधित ठेवली. औरंगजेबाच्या आक्रमणासमोर न झुकता त्यांनी स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि पराक्रमाची परंपरा जपली.तेजस्वी बुद्धिमत्ता, अपराजित रणनिती सह्याद्रीचा लढवय्या धुरंधर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा! #छत्रपती संभाजी महाराज जयंती💐
'व्यापता न येणारं आस्तित्व आणि
मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व'
खरोखरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते,प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय हे आईकडेच जाते.आई शब्दातच तिचा खरा अर्थ दडलेला आहे आ.म्हणजे आत्मा आणि ई.म्हणजे ईश्र्वर आत्मा व ईश्र्वर यांचं एकत्रित रूप म्हणजे आई.
कठीण, मजेदार, दुःखी, आनंदी- प्रत्येक प्रसंगात आपल्याला एका व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती म्हणजे आई!
कोठेही न मागता,भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई...
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान म्हणजे आई...
ममता आणि वात्सल्याची कमान आहेस तु ,
माझ्या अनमोल सदेहाची संचिती आहेस तु ,
तुझ्यासवे या देहाचे रूप माझे जाहिले
तुझ्यामुळे या जीवाणी पहिले पाऊल टाकिले ...
आईची भूमिका साकारणाऱ्या,जगणाऱ्या प्रत्येक आईला "मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!"💐🙏 #मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏













