
किरण जाधव {महाराज}
@58252107
कमेंटमे जयश्री कृष्णाजी जरुर लिखो💞🌹
मैत्री,मस्ती
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🧠 तणावमुक्त आयुष्याची प्रभावी गोष्ट🧘🏻♂️*
🏃🏻🏃🏻♀️आजच्या धावपळीत, प्रत्येकजण काहीतरी साध्य करण्यासाठी झटत असतो. पण हाच संघर्ष अनेकदा तणाव, चिंता आणि मानसिक भार वाढवतो..
😇शहाण्या लोकांशी गहन चर्चा करणे ही गोष्ट महत्त्वाची असते, पण त्यात बराच वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च होते. प्रत्येक चर्चेमध्ये तर्क, विचारसरणी, आणि निर्णय घेण्याची जबाबदारी येते, जी आपल्याला थकवते आणि तणाव वाढवते..
🤗त्याऐवजी, हितोशी मित्रांशी बिनकामाच्या गप्पा मारणे, हसणे, आठवणींचा हळूहळू स्मरण करणे, मन मोकळं करणे – हे खूप सोपे पण प्रभावी उपाय आहेत. मित्रांशी गप्पा फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास देतात..
🗣️जिथे तणाव वाढतो, तिथे वेळ मर्यादित ठेवा. खास मित्रांशी आनंदी, मन मोकळे गप्पा मारा. स्वतःच्या भावना व्यक्त करा, आणि मन हालके करा. जीवनात थोडा हसून आनंद घ्या, मनसोक्त गप्पा अन विश्रांती हिच खरी संपत्ती आहे..
🧘🏻♂️तणावमुक्त आयुष्य म्हणजे फक्त मोठे निर्णय घेणे नाही, तर मन हलके ठेवणे, आनंद शोधणे, आणि साध्या गोष्टींमध्ये समाधान मिळवणे..!
*😊मनुष्याच्या जीवनात आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे सकारात्मक विचाराने व समाधानी मनाने स्वत: आनंदी रहा व इतरांच्या आनंदात सदैव सहभागी व्हा, हेच आयुष्यातील प्रमुख सत्कर्म आहे हाच यशस्वी, आनंदी व समाधानी जीवनाचा खरा गुरु मंत्र आहे..!!✍🏻*
*संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदित मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #गुड मॉर्निंग
*🇮🇳Happy_Repubilc_Day🌹*
*🇮🇳I love my india💞*
*🎊प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!*
*💞गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!✍🏻*
*संस्थापक अध्यक्ष:- श्री किरण निवृत्ती जाधव*
*संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदित मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #26 जानेवारी
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*"चिंती परा ते येई घरा"*
प्रत्येक मनुष्याला मनापासून वाटत असते की, भगवंताने आपल्यास सुख द्यावे किंवा आपण मागीतलेले सर्व संकल्प पूर्ण व्हावेत. ज्ञानेश्वर माऊली सुध्दा देवाजवळ मागणे मागतात-
*"जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात।"*
वास्तविक आपण देवाजवळ लडीवाळपणे मागायचे व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या अशी योजना ईश्वराने आपल्या जीवनात केलेली आहे. परंतु मनुष्यप्राणी हा नेमके हे विसरतो की माणसाला अंतर्मन व बहिर्मन अशी दोन मने आहेत. बहिर्मन हे समुद्राच्या लाटेप्रमाणे असते तर अंतर्मन हे सागरासारखे असते. माणसाच्या बहिर्मनात जे विचार घोळत असतात तेच आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. म्हणून माणसाने जीवनात जगतेवेळी आपण कोणते घ्यावे व कोणते न घ्यावे ते पहिले लक्षात घेतले पाहिजे. *"महत्वाचे सर्वात प्रथम बहिर्मनात चांगले विचार ग्रहण किंवा आत्मसात करण्यास शिकले पाहिजे."*
*_पण माणूस काय करतो नेमका जे ऐकू नये ते ऐकतो अन जे खाऊ नये ते खातो. जे पिऊ नये ते पितो व जीवनाची पूर्ण वाताहात करून घेतो._*
अंतर्मन ही जमीन आहे व बहिर्मन हा शेतकरी आहे. आता शेतीमध्ये कोणते पीक घ्यावयाचे आहे ते शेतकरी ठरवितो, जमीन ठरवत नाही. त्याप्रमाणे जमिनीचे कार्य फक्त तुम्ही जे पेरले त्याचे दाम दुप्पट देणे हे असते, म्हणून बहिर्मनाने जर गाजर गवत पेरायचे ठरवले तर अंतर्मन तेच पीक दुप्पट भरपूर देणार. बहिर्मनाने जर गहू पेरला किंवा ऊस लागवड केली तर तेच पीक भरघोस येणार कारण बहिर्मनामार्फत बाह्य जगातील विचार अंतर्मनात येतात व अंतर्मनात रूजतात परिपक्व होतात व तसेच जीवनात साकार होतात. *"म्हणून माणसाची दृष्टी स्वच्छ असावी."*
जगातील सर्व वस्तू जगास आनंद देतात. सूर्य प्रकाश देतो, वृक्ष छाया देतात, फळे देतात मग मानवाने जगास दुःख का द्यावे, *'चिंती परा ते येई घरा'।* म्हणून नेहमी माणसाने दुसऱ्याच चांगले चिंतण्यास शिकले पाहिजे.
असे म्हणतात-की
*मना त्वाचिरे पूर्व संचित केले।*
*तया सारिखे भोगणे प्राप्त झाले।।*
आपल्या कर्मातून नशिब साकार होते हे पूर्ण कळल्याने तो सावध वागतो. बेसावध वागत नाही. यापुढे तरी मी सत्कर्मेच करीन. दुष्कर्मे करणार नाही असा निश्चय करतो. यामुळे तो माणूस सुखी व शांत होतो व त्याचे जीवन प्रगतीकडे वाटचाल करते.
माणूस दुःख आले की त्याचा संबंध अन्यत्र जोडतो व अंधश्रध्देकडे झुकतो. योग्य डाॅक्टर न मिळाल्याने तो माणूस भरकटतो त्यामुळे मनाने कमजोर बनते व त्यास जास्त हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते.
ज्याला मनावर विजय प्राप्त करावयाचा आहे त्यांनी योग्य सदगुरूंना, गुरुंना, अनन्यभावे शरण गेले पाहिजे. त्यांच्या संगतीत गेल्याने आपले षडविकार कमी होतात. दृश्य जगताबद्दलची आसक्ती कमी होते. आपला अहंकार लयास जातो. भगवंतावर आपले प्रेम कसे दृढ होईल हे सदगुरू शिकवितात. *'नामस्मरणाने जळती अवघ्या पापराशी'* हे गुरूंच्या चरणसेवेत असतानाच साधकाला उमगते. म्हणूनच संतांनी म्हटले आहे. *"संतांचा सांगाती मनोमार्गगती"*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवारी आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.!*
"★🔅🔅*तिळगुळ घ्या, गोड गोड बोला*🔅🔅★"
"या संक्रांतीला, तुमच्या आयुष्यातील जुने हेवेदावे विसरून नवी सुरुवात होऊन, सर्व कटुता तिळासारखी विरघळून जावो आणि गुळासारखा गोडवा कायम राहो,
"तीळ आणि गुळाचा स्नेह जसा, तसाच तुमचा-आमचा स्नेह वाढो..
" तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येवो!"
"मकर संक्रांतीच्या या शुभदिनी, तुमच्या आयुष्यात नव्या आशा, नवे यश घेऊन येणारी ही संक्रांती तुम्हाला आनंद, सुख, समृद्धी आणि आरोग्य मिळावे,
तिळासारखे घट्ट स्नेहबंध आणि गुळासारखा गोडवा तुमच्या नात्यांमध्ये वाढो, तसेच पतंगा प्रमाणे उंच भरारी घेणारे यश तुम्हाला मिळो, हीच सदिच्छा..!!✍🏻
*संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम📿🙏🏻*
#जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभेच्छा
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
🌾मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. यंदा 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांती व षट्तिला एकादशी आहे, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर असते.
🎋भोगीच्या दिवशी विवाहित महिला अभ्यंगस्नान करुन घराती कुलाचार व इंद्रा देवाला स्मरून पूजन करतात. तसेच शेतकरी रब्बी हंगामातील पीकाचे पूजन करून वर्षभर घरात धनधान्याची भराभराट होऊ दे यासाठी प्रार्थना करतात..
🎍भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या भाजीला विशेष महत्त्व असते. त्या भाजीत पावटा, घेवडा, हरभरा, वांगे, कांद्याची पात, शेंगदाणे यांचा वापर करुन सर्व एकत्र भाजी तयार करतात. तसेच विविध धान्यांचे पीठ एकत्र करुन तिळासह भाकरी सुद्धा बनवतात किंवा तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करता. या भाकरीसोबत ती भाजी खाण्याची चव भारीच असते..
*🥙हिरवा हरभरा तरारे..*
*🤭गोड थंडीचे शहारे..*
*🥕गुलाबी गाजर..*
*🫓अन तिळदार भाकरी..*
*🤤भोगीच्या भाजीची चव असते न्यारी..*
*🎊सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी..🥳*
*_भोगीचा सण हा सर्व कुटुंबासोबत साजरा करुन तुमचा आनंद द्विगुणित करो, या तुम्हाला सहपरीवार मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा..!!_✍🏻*
*संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞 जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदित हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🌹भोगी आणि मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*◕जीवनातील माणिकमोती◕*
*🌹१) जिवनात त्रास करून घेणे म्हणजेच सतत जबाबदारी स्वीकारणे, आणि जबाबदारी स्वीकारणे त्रास सहन करणे किंवा काहीतरी नवीन शिकणे.*
*🌹२) मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी. एकाने गरीबीतही स्वतःचा स्वाभिनान सोडला नाही तर दुसऱ्याने धनवान असूनही त्याचा कधी अभिमान केला नाही.*
*🌹३) पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो पण माणूस पैसाला वर घेवून जावू शकत नाही. पैशांचा संग्रह करण्या पेक्षा सहृदयी माणसांचा संग्रह करा. पैशा पेक्षा चांगल्या माणसांचे मोल हे अनमोल आहे.*
*🌹४) माणसाची खरी ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कार्यानेच होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो.*
*🌹५) विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.*
*🌹६) जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.*
*🌹७) सत्य बोलणे जेव्हा वादग्रस्त ठरु लागते, तेव्हा समजावे कि खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे.*
*🌹८) ज्याला संधी मिळते, तो नशिबवान. जो संधी निर्माण करतो, तो बुध्दिवान आणि जो संधीचे सोने करतो, तोच विजेता असतो.*
*🌹९) वयाने मोठ्या झालेल्या माणसाचे सर्वात मोठे दु:ख हेच आहे की त्याला लहानांन सारखे मोकळेपणाने मनसोक्त रडता येत नाही.*
*🌹१०) गुरुची आज्ञापालना सारखा प्रगतीवर चटदिशी पोचवणारा दुसरा मार्ग नाही. जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार नकळत मरतो. शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी गुरुवर आस्ते त्यात त्यांचे अनुभव असतात.*
*🌹११) आपल्याला भगवंताची नड भासत नाही म्हणून प्रेम येत नाही. आपल्याला त्याची जरूरत भासते. नड उत्पन्न होण्याकरता अभ्यास, उपासना, साधना पाहिजे.!*
*🌹१२) देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात.! दोन्ही पण त्याचा फायदा घेणारे नसावे.*
*🌹१३) माणुस काय आहे, हे महत्वाचे नाही. पण माणसात काय आहे, हे खुप महत्वाच आहे.*
*🌹१४) नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.*
*🌹१५) ज्या घराला घडवायला पूर्ण जीवन पणाला लावले आणि त्याच घरात जर तुम्हाला बसायला बोर होत असाल. तर तुम्ही घर बनवू शकलात, पण त्या घराला घरपण नाही देऊ शकलात.*
*🌹१६) रस्त्यात जर एखादे मंदिर दिसले, तर प्रार्थना केली नाही तरी चालेल; पण जर रस्त्याने चालतांना कोणाला आपला त्रास नाही झाला पाहिजे इतकीच काळजी घ्या.*
*🌹१७) अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो. मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो..!!✍🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*_🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदि मंगलमय हो📿🙏🏻_*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #गुड मॉर्निंग
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞 🌹*
*🧠कृष्ण म्हणजे अमर्यादितपणा प्रेमातही आणि युद्धात ही🧘🏻♂️*
🎊कृष्ण हे केवळ एक ऐतिहासिकदृष्ट्या व्यक्तीमत्व नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे अमर्यादित जाणीव आहे. त्यांचे अस्तित्व मोजमापात बसणारे नाही, कारण तो प्रेमात जितका अथांग आहे, तितकाच युद्धातही निर्णायक आहे. कृष्णाला समजून घ्यायचे असेल तर त्याला फक्त परमेश्वर म्हणून नाही, तर जीवनदर्शन म्हणून पाहावे लागते.
💞कृष्णाचे प्रेम हे अटीशर्तींच्या पलीकडचे आहे. राधेवरच त्यांचे प्रेम मालकीचे नाही, तर समर्पणाचे आहे. भेटीत कमी आणि विरहात अधिक गहिरे असलेले हे प्रेम, “माझ” या शब्दात अडकलेले नाही. गोकुळात कृष्ण माखनचोर आहे, गवळ्यांचा सखा आहे, गायींचा गोपाळ आहे. त्यांचे प्रेम सर्वांसाठी समान आहे—राजा असो वा रंक, स्त्री असो वा पुरुष. म्हणूनच कृष्णाचे प्रेम मर्यादित नात्यांमध्ये अडकत नाही, ते आत्म्यापर्यंत पोहोचते.
🏇🏻 जेव्हा पण हाच कृष्ण युद्धभूमीवर उभा राहतो, तेव्हा तो तितकाच कठोर आणि स्पष्ट दिसतो. महाभारतात कृष्ण स्वतः शस्त्र उचलत नाही, पण त्यांचे प्रत्येक शब्द शस्त्रापेक्षा ही तीव्र आहे. अर्जुनाच्या संभ्रमावर तो प्रेमाने हात ठेवतो, पण निर्णयासाठी कठोर सत्य सांगायला मागे हटत नाही. “धर्मासाठी युद्ध टाळणे हा अधर्म आहे,” हे सांगताना तो भावना नाही, तर कर्तव्य महत्त्वाचे ठरवतो.
🧘🏻♂️कृष्णाची अमर्यादितता याच ठिकाणी प्रकर्षाने दिसते. तो कुणाचाच अंध समर्थक नाही; तो सत्याचा साथीदार आहे. जिथे अन्याय आहे, तिथे तो उभा राहतो—मग तो कंसाविरुद्ध असो, की कुरुक्षेत्रात अधर्माविरुद्ध. प्रेमात तो सर्वस्व देतो, आणि युद्धात तो निर्णयाचे ओझे उचलतो. दोन्हीकडे त्याचा हेतू एकच असतो—जीवनाचे संतुलन..
📖कृष्ण शिकवतो की प्रेम हे दुर्बलतेचे लक्षण नाही आणि युद्ध हे क्रौर्याचे प्रतीक नाही. योग्य वेळी प्रेम व्यक्त करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध उभे राहणेही आवश्यक आहे. जीवनात प्रत्येक क्षणी प्रेम असतेच असे नाही, कधी कधी कुरुक्षेत्रही सामोर येते आणि या वेळी दोन्ही ठिकाणी कृष्णासारखी समजूत हवी असते.
*👏🏻म्हणूनच कृष्ण म्हणजे "अमर्यादितपणा" भावनेतही आणि बुद्धीतही, मृदुत्वातही आणि कठोरतेतही. तो शिकवतो की जीवन एकाच रंगाचे नसते; प्रेम आणि युद्ध, दोन्हींच्या समतोलातूनच खरे माणसाचे जीवन घडते..!!✍🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवार आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🙏शुभ सकाळ,धम्म प्रभात, गुड मॉर्निंग, जय भीम 🙏 #महानुभाव पंथ
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*चमत्कार विकत मिळतो..?*
*लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली..*
*ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही..*
*केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.*
*त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली.*
*केमिस्ट तिच्याकडे आला, कौतुकाने व प्रेमाने म्हणाला, काय पाहिजे तुला बेटा..?*
*"मला चमत्कार पाहिजे"*
*केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले... बेटा तुला काय पाहिजे...?*
*ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे..*
*केमिस्ट तिला म्हणाला, बेटा इथे चमत्कार मिळत नाही...*
*ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल..!*
*केमिस्टने विचारले, बेटा तुला हे कोणी सांगितले..?*
*तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..*
*माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत...*
*त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी...?*
*तिने आपली छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते.*
*तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला...*
*बेटा, तु चमत्कार विकत घेतलास...*
*चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..*
*तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन* *"डॉ.जॉर्ज अँडरसन" होता.*
*त्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला..*
*सर्जरी झाल्यानंतर हॉस्पीटल मधुन बाहेर पडताना डॉ. जॉर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला.... बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही..?*
*जरुर मिळतो...जरुर मिळतो..*
*ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती..*
*निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.*
*जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो..*
*हाच आस्थेचा चमत्कार आहे.*
*तुम्हालाही इतरांसाठी समर्पण भावना असेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच..*
*आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.*
*निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे..!!✍🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #श्री चक्रधर स्वामी स्टेटस
*🌹💞📿श्रीदत्त कृपा📿💞🌹*
🎊🥳🌹👁🙏🏻👁🌹🪔📿
*सह्याद्रि शिखरे रम्यं अनसुयात्रिनंदनम्..!!*
*तंवंदे परमानंद श्री दत्तात्रेयं जगदगुरुम..!!*
*'अवतार ऊदंड होती, सवेची मागूती विलया जाती, तैसी नव्हे श्रीदत्तात्रेय मुर्ती, नाश कल्पांती असेना.!!'*
*'पुर्णब्रम्ह मुसावले, ते हे दत्तात्रेय रुप ओतीले, ज्यांचे विलोकनमात्रे तरले, जिव अपार त्रिभूवनी..!'*
*|| जो चहू योगी चा अधिष्ठात्री ||*
*|| अमोघा सिद्धी जयाच्या घरी ||*
*|| तो माता पुरी राज्य करी ||*
*|| तया नमन श्री दत्तात्रया ||*
_*परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव दिना निमित्त आपणा सर्वांना खुप खुप मंगलमय् आनंदी शुभेच्छा..!!✍🏻*_
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🎭Whatsapp status
*_संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻_*
*_🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय हो📿🙏🏻_*
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🧘🏻♂️मनाची सुंदरता — जीवनातील सर्वात मोठी भेट😊*
जगात सुंदर काय आहे, असा प्रश्न आपण अनेकदा स्वतःलाच विचारतो. परंतु त्याचे उत्तर बाहेर नसून आपल्या मनात लपलेले असते. खरी सौंदर्यविधाता चेहऱ्याला नव्हे तर विचारांना, दृष्टिकोनाला आणि मनमोकळेपणाला महत्त्व देतो. ज्या व्यक्तीचा स्वभाव स्वच्छ, विचार सकारात्मक आणि मन निर्मळ असते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने सुंदर असते.
मनमोकळ्या माणसाचे जगणे अगदी मुक्त असते. तो कुणाला खुश करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या सत्यासाठी जगतो. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट न लपवता मनापासून बोलतो, तेव्हा समाजात आपली छाप नैसर्गिकपणे उमटते. मनमोकळेपणा ही एक अशी शक्ती आहे जी माणसाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनवते.
जीवनात कष्ट आणि संकटे येतात तेव्हा आपण घाबरतो. पण खरे तर हाच काळ आपल्याला सर्वात जास्त घडवतो. संकटे म्हणजे फक्त अडथळे नाहीत, ती अनुभव आहेत, शिकवणी आहेत, आणि आपल्याला सबळ बनवणारी पायरी आहेत. जे लोक धैर्याने त्यांना सामोरे जातात, तेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात.
निसर्गाने दिलेल्या सर्वात मोठ्या देणग्यांपैकी एक म्हणजे प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्तींचा सहवास. अशा व्यक्तींची साथ मिळणे म्हणजे आपल्याच गुणांची, आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. चांगली माणस हे भाग्य नसून आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब आहे.
जीवनात नकारात्मकता, वाईट आठवणी, वाईट माणस किंवा वाईट विचार यांना एक-एक करून दूर करू लागलो की चांगल्या गोष्टींसाठी नवीन दरवाजे उघडतात. सकारात्मकता म्हणजे जन्मजात गुण नाही; ती आपण बनवलेली जागा आहे.
स्वतःशीची लढाई हीच सर्वांत मोठी लढाई असते. आपल्यातील चुका, भीती, कमकुवतपणा हे पराजय करणे म्हणजे जगावर नाही, तर स्वतःवर विजय मिळवणे. जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जगात कोणीच हरवू शकत नाही.
आणि शेवटी—
चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्तव्यांनी विणलेले आयुष्य हे इतके मजबूत असते, की कुणाच्याही प्रहाराने ते तुटत नाही. कारण त्या आयुष्याची पायाभरणी सत्य, प्रेम आणि धैर्यावर उभी असते..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 ##गुड🌞मॉर्निंग, 😊सुप्रभात, 🌷शुभ सकाळ,Good🙏 Morning, Good ☕ Morning, शुभेच्छा🎉
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿 🙏🏻*






