🌺रथसप्तमी (Ratha Saptami 2026)🌺
#रथसप्तमी🌺
🌺|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🌺
भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.
🌺रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन !🌺
‘माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, तो हा दिवस ! भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणार्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे.
🌺 सूर्योपासनेचे महत्त्व आणि इतर माहिती 🌺
सूर्याच्या उपासनेने जिवाला स्वत:मधील सूक्ष्म-तेजतत्त्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जिवाने तेजतत्त्वाच्या `ॐ’ काराची उपासना करणे उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे गायत्रीमंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरश्चरण करणे फलदायी ठरते. सूर्योपासनेने जिवाच्या मनाची एकाग्रता वाढते. नेत्र हे तेजतत्त्वाशी निगडीत असल्याने सूर्योपासनेने (तेजतत्त्वाच्या उपासनेमुळे ) जिवाला दिव्यदृष्टि प्राप्त होते.
🌿१. सूर्योपासनेचे महत्त्वभारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म यांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधःकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. (उपासनेमुळे मूर्ती जागृत होते, तसे हे आहे.)
अ. सूर्योपासनेमुळे जिवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते.
आ. सूर्याच्या उपासनेने सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता ३० टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता २० टक्क्यांनी वाढते.
इ. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले, तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे, हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे.
ई उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते.
उ. पंचतत्त्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे (तेजतत्त्वाची उपासना करणे), हा महत्त्वाचा टप्पा आहे.
ऊ. योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायामप्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान २० वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते. सूर्यनमस्कारामुळे शरिरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ साहाय्य हाते.
🌺 सूर्याचे गुण 🌺
🌿१ नित्योपासना - सूर्याची ऋषींप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते.
🌿२ शिस्त - सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो.
🌿३ त्याग - सूर्य स्वत:च्या जवळील तेज, ऊर्जा आणि चैतन्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते.
🌿४ समष्टिभाव - सूर्य हा त्याच्याकडील तेज आणि ऊर्जा त्याच्या लोकापुरती मर्यादित न ठेवता विविध लोकांतील जिवांनाही प्रक्षेपित करतो. त्यासाठी तो सतत भ्रमण करीत असतो. समष्टि भाव जास्त असल्यामुळे त्याच्यात उच्च देवतांचे २० टक्के गुण आहेत.
🌿५ ज्ञानदान आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे
ज्ञान म्हणजे प्रकाश होय. प्रकाश हे ज्ञानाचे एक रूप आहे. सूर्य ज्ञानासंदर्भातही कार्य करतो. त्यामुळे त्याच्याकडून सूक्ष्म अशा ज्ञानलहरी आणि ज्ञानप्रकाशलहरी प्रक्षेपित होत असतात. या ज्ञानलहरींच्या माध्यमातून तो ३० टक्के इतके ज्ञान देऊ शकतो. कर्णाला सूर्यदेवता रोज दर्शन देत असे आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असे. याचा महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.
🌿६ उत्तम गुरु - सूर्य शास्त्र आणि शस्त्रकला या दोन्हींमध्येही निपुण आहे. या दोन्ही कला अवगत करण्यासाठी रुद्रावतार मारुति सूर्यलोकात गेला होता. तेव्हा त्याला सूर्याने `गुरु’ म्हणून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तो इतरांना ज्ञानप्रकाश देऊन त्यांच्या जीवनातील स्थूल आणि सूक्ष्म अहंकाररूपी तिमिर नष्ट करतो.
🌿७ उत्तम पिता- सूर्याने त्याचे पुत्र आणि पुत्री यांच्यासाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये वेळोवेळी पूर्ण केली. ब्रह्मांडातील सर्व जिवांप्रति तो पित्याच्या दृष्टीनेच पहातो आणि त्यांना मदत करतो.
🌿८ व्यापकत्व - ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज, ऊर्जा आणि चैतन्य देत असतो.
🌿९ समभाव - सूर्य सर्वच जिवांकडे समदृष्टीने पहातो. तो गुणग्राहक आहे. त्यामुळे तो कोणावरही अन्याय करत नाही. याचे उदाहरण म्हणजे मारुतीमध्ये शनीच्या तुलनेत शिष्याचे गुण जास्त प्रमाणात असल्यामुळे सूर्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि ज्ञान आणि विविध विद्या दिल्या.
🌿१० क्षात्रभाव - इंद्र हा सर्व कनिष्ठ देवतांचा प्रमुख आहे. सूर्यदेवता इंद्राच्या अधिपत्याखाली असली, तरीही इंद्राने अयोग्य निर्णय दिल्यावर ती त्याला विरोध करते आणि इंद्राच्या अयोग्य आज्ञेचे पालन करत नाही.
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १०.२.२००५, सकाळी ६.२० ते ९.०९)
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
🔸 गुरु ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक तत्त्व आहे.
गुरु आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात.
संत कबीर म्हणतात -
गुरु बिन ज्ञान न उपजे, गुरु बिन मिले न मोक्ष ।
📖 ‘गुरूंचे महत्त्व’* हा ग्रंथ सांगतो -
✨ ईश्वरप्राप्तीसाठी योग्य साधना कोणती करावी ?
✨ जीवनात शांती आणि आनंद मिळवण्याचा मार्ग कोणता ?
✨ गुरूंविना ईश्वरप्राप्ती अशक्य का आहे ?
✅ गुरूंची महती सांगणारा हा मार्गदर्शक ग्रंथ आजच ऑर्डर करा ! :
https://sanatanshop.com/product/marathi-importance-of-guru/
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏
📞 Call : 9167512161
🌺श्री गणेश जयंती🌺
🪷🪷🪷🪷🪷🪷
|| श्री गणेशाय नमः ||
🌺
#गणेश_जयंती🌿
🌿श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.
🌺माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी हे करा !
१. श्री गणेशाचा नामजप दिवसभर करा.
२. श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करा.
३. श्री गणेशाला लाल फुले आणि दूर्वा वाहा.
४. सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठण करा.
🌺माघी श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी ?🌺
१. श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी पुढील प्रार्थना करावी
🌿अ. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.
आ. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.
🌿२. श्री गणेशाला अनामिकेने गंध, हळद-कुंकू लावावेपूजा करतांना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
🌿३. श्री गणेशाला लाल जास्वंद किंवा लाल रंगाची अन्य फुले वाहावे विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे गणेश-तत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्री गणेशाला फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत.
🌿४. श्री गणेशाला दुर्वा वाहावे
दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा वाहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशाला दूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५, ७, २१ इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात.
🌿५. श्री गणेशाला चंदन / केवडा / चमेली गंधाच्या उदबत्तीने दोन वेळा ओवाळावे
🌿६. श्री गणेशाला हीना गंधाचे अत्तर अर्पण करावे
🌿७. श्री गणेशाची आरती करावीश्री गणेशाची पूजा झाल्यावर ‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ ही आरती म्हणावी. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.
🌿८. श्री गणेशाला आठ किंवा आठच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
🚩 🚩 राष्ट्र और धर्म के लिए दान ही सर्वोत्तम दान है!
- हिंदू राष्ट्र की स्थापना
- समाजहित
- धर्महित
- राष्ट्रहित
🙏 समाज, राष्ट्र और धर्म के लिए कार्यरत ‘हिंदू जनजागृति समिति’ के कार्य हेतु धन अर्पित करें!
📲 ‘ऑनलाइन’ धन अर्पण के लिए
Donate.HinduJagruti.org
⛳ हिंदू जनजागृति समिति
📱 ७७३८२३३३३३
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏
🌿'संस्कार वही'🌺
🪷🌷🪷🌷🪷🌷🪷
#Spiritualhealing🌺
#Hindurastra🚩
🌸'संस्कार वही' म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी तयार केलेली एक विशेष वही आहे, ज्यात भारतीय संस्कृती, धर्मशिक्षण आणि आदर्श जीवनासाठी आवश्यक असणारे लिखाण व चित्रे असतात, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांनाही प्रेरणा मिळते.
🌸सनातन संस्थाची 'संस्कार वही सामान्य वह्यांपेक्षा वेगळे आहे, कारण यात सिने-खेळाडूंच्या जागी नैतिक मूल्ये आणि अध्यात्मिक मार्गदर्शन असते
🌸संस्कार वहीची प्रमुख वैशिष्ट्ये:
🌿नैतिक मूल्ये: विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, सदाचार यांसारख्या मूल्यांची शिकवण मिळते.
🌿धर्मशिक्षण: भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचे महत्त्व पटवून दिले जाते.
🌿राष्ट्रप्रेम: देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना वाढवणारी माहिती असते.
🌿 आदर्श जीवन: हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून, पालक आणि शिक्षकांनाही आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते.
🌺 सनातन संस्थेची संस्कार वही ही एक शैक्षणिक आणि आध्यात्मिक साधन आहे, जी भावी पिढीला सुसंस्कारी आणि धर्माभिमानी बनवण्याच्या उद्देशाने तयार केली आहे.
📲 आजच मागणी नोंदवा : ९३२१७९०४९१
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏
#मकरसंक्रांत🌿🌺
🪷🪷🪷🪷🪷🪷
🌺मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.
हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव.
🌺मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान द्या !🌺
मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.
🌸वाण देणे
आजकाल अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो.
🌺मकर संक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे🌺
मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्यास महापुण्य लाभते.
🌸तीळगुळ वाटणे
तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून रहाते. समाेरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते.
🌸सुगड
मकर संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदी-कुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.
🌸बोरन्हाण करावे
मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.
प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदी-कुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
*Institute of Driving Training and Research (IDTR), Pune येथे वाहनचालकांसाठी सनातन संस्थेकडून ‘तणावमुक्त आनंदी जीवना’विषयी मार्गदर्शन !* 🌸✨
Sanatan.org
🔸 शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारी सनातन संस्था
7038713883
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏
शाकंभरी पौर्णिमेचा इतिहास तसेच उत्सव साजरा करण्याची पद्धत (३.१.२०२६)🌺
#शाकंभरीपौर्णिमा🌿
प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुकादेवी हिची रथयात्रा काढली जाते. या उत्सवामागील इतिहास आणि महत्त्व लेखातून जाणून घेऊया.
१. तिथी🌿
‘पौष पौर्णिमा या तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते.
२. इतिहास आणि उद्देश🌿
एकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता. अनेक वर्षे पाऊसच पडला नाही. तेव्हा प्रजेचे रक्षण करण्याकरता श्री शाकंभरीदेवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केले आणि प्रजेला वाचवले. त्याप्रीत्यर्थ श्री शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा करतात.
३. उत्सव साजरा करण्याची पद्धत🌿
पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम ६० आणि जास्तीतजास्त १०८ भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात.’
४. महत्त्व🌿
या दिवशी आदिशक्तीरूपी धारणेचे तारक रूपातील लयकारी तत्त्व ब्रह्मांडात भ्रमण करत असते. हे तत्त्व जिवातील मनःशक्तीरूपी धारणा जागृत करून त्याला जीवनातील विशिष्ट आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण करून देते. ही पौर्णिमा प्राणशक्तीदायिनी असल्याने अनेक गंभीर व्याधींना या दिवशी तिलांजली दिली जाते; कारण या दिवशी लयकारी भावातील तारक शक्तीरूपी तत्त्व हे देहातील मूळ रज-तमात्मक धारणेला नष्ट करते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स
🌺मकरसंक्रांतीला सात्त्विक वाण देण्यामागे महत्त्व🌺
#मकरसंक्रांत #MakarSankranti2026 #SpiritualHealing
🌸मकरसंक्रांतीला सात्विक वाण देण्यामागे ईश्वरी कृपा मिळवणे, साधनेला चालना देणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे हे मुख्य उद्देश आहेत, कारण हा काळ साधनेसाठी पोषक असतो. त्यामुळे साबण, प्लास्टिकऐवजी सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने (जसे की हळद-कुंकू, वाळलेली फुले) किंवा उपयुक्त वस्तू देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून देहबुद्धीचा त्याग होऊन दुसऱ्या जिवातील देवत्वाला शरण जाता येते व सकारात्मक चैतन्याची देवाणघेवाण होते.
🌺मकरसंक्रांतीला सात्त्विक वाण देण्यामागे महत्त्व🌺
🌿साधनेला पोषक काळ
मकरसंक्रांतीचा काळ साधनेसाठी अत्यंत अनुकूल असतो. या काळात सात्त्विक वस्तूंचे वाण दिल्याने ईश्वराची कृपा लवकर मिळते आणि साधकाला इच्छित फळ प्राप्त होते.
🌿देवत्वाला शरण जाणे
वाण देणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीतील देवत्वाला तन, मन आणि धन यांसह शरण जाणे. पदराच्या टोकाचा आधार देऊन वाण देणे म्हणजे वासना आणि देहबुद्धीचा त्याग करून आत्मिक उन्नती साधणे.
🌿सकारात्मक चैतन्याची देवाणघेवाण
सात्त्विक वाणामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाते आणि वाण देणाऱ्या-घेणाऱ्या दोघांनाही सकारात्मक चैतन्य मिळते. हा एक प्रकारचा धर्मप्रसारच आहे.
🌿अधार्मिक प्रथेला विरोध
साबण, प्लास्टिकच्या वस्तूंसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा सध्या रूढ झाली आहे.
धर्माचा प्रसार: या काळात ग्रंथ आणि उत्पादने वाण म्हणून दिल्यास धर्मप्रसाराचे कार्य होते, ज्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा होते.
मकरसंक्रांतीला सात्त्विक वाण देणे म्हणजे केवळ वस्तूंची देवाणघेवाण नसून, आध्यात्मिक उन्नती साधणे, ईश्वराशी जोडले जाणे आणि धर्माचे पालन करणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🌹देवी देवता🙏 #🌻आध्यात्म 🙏






![🎭Whatsapp status - सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय धरावे ते पाय म्हणे ऐसें आंधळे हें जन आधी त्याचे गेलें विसरून खऱ्या देवा Il जगद्गुरु तुकाराम महाराज Sqx सापनेच्या प्रवासातील अनिवार्यता जाणून घ्या गरूची गुरूच महत्त्व परात्पर गुरु সন 0 शिष्य 9158$$ +1]=01- [ a सच्चिदानंद परवहा डॉ॰ जयंत याळाजी आठवले सकलक आणि पू॰ संदीप गजानन आळशी साधक सनातनचे ऑगस्ट २०२४ पर्यंत ३६६ ग्रथांच्या १३ भाषांत ९७ लाख ३३ सहस् प्रती जिज्ञासूंचे साधकांत, साधकांचे शिष्यांत आणि शिष्यांचे गुरूंमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी मार्गदर्शक ग्रंथ T&C apply Books available in Enslish Gujarati Hindi Marathi Buy Online : SanatanShop com 9167512161 सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय धरावे ते पाय म्हणे ऐसें आंधळे हें जन आधी त्याचे गेलें विसरून खऱ्या देवा Il जगद्गुरु तुकाराम महाराज Sqx सापनेच्या प्रवासातील अनिवार्यता जाणून घ्या गरूची गुरूच महत्त्व परात्पर गुरु সন 0 शिष्य 9158$$ +1]=01- [ a सच्चिदानंद परवहा डॉ॰ जयंत याळाजी आठवले सकलक आणि पू॰ संदीप गजानन आळशी साधक सनातनचे ऑगस्ट २०२४ पर्यंत ३६६ ग्रथांच्या १३ भाषांत ९७ लाख ३३ सहस् प्रती जिज्ञासूंचे साधकांत, साधकांचे शिष्यांत आणि शिष्यांचे गुरूंमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी मार्गदर्शक ग्रंथ T&C apply Books available in Enslish Gujarati Hindi Marathi Buy Online : SanatanShop com 9167512161 - ShareChat 🎭Whatsapp status - सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय धरावे ते पाय म्हणे ऐसें आंधळे हें जन आधी त्याचे गेलें विसरून खऱ्या देवा Il जगद्गुरु तुकाराम महाराज Sqx सापनेच्या प्रवासातील अनिवार्यता जाणून घ्या गरूची गुरूच महत्त्व परात्पर गुरु সন 0 शिष्य 9158$$ +1]=01- [ a सच्चिदानंद परवहा डॉ॰ जयंत याळाजी आठवले सकलक आणि पू॰ संदीप गजानन आळशी साधक सनातनचे ऑगस्ट २०२४ पर्यंत ३६६ ग्रथांच्या १३ भाषांत ९७ लाख ३३ सहस् प्रती जिज्ञासूंचे साधकांत, साधकांचे शिष्यांत आणि शिष्यांचे गुरूंमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी मार्गदर्शक ग्रंथ T&C apply Books available in Enslish Gujarati Hindi Marathi Buy Online : SanatanShop com 9167512161 सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय धरावे ते पाय म्हणे ऐसें आंधळे हें जन आधी त्याचे गेलें विसरून खऱ्या देवा Il जगद्गुरु तुकाराम महाराज Sqx सापनेच्या प्रवासातील अनिवार्यता जाणून घ्या गरूची गुरूच महत्त्व परात्पर गुरु সন 0 शिष्य 9158$$ +1]=01- [ a सच्चिदानंद परवहा डॉ॰ जयंत याळाजी आठवले सकलक आणि पू॰ संदीप गजानन आळशी साधक सनातनचे ऑगस्ट २०२४ पर्यंत ३६६ ग्रथांच्या १३ भाषांत ९७ लाख ३३ सहस् प्रती जिज्ञासूंचे साधकांत, साधकांचे शिष्यांत आणि शिष्यांचे गुरूंमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी मार्गदर्शक ग्रंथ T&C apply Books available in Enslish Gujarati Hindi Marathi Buy Online : SanatanShop com 9167512161 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_243810_39ca6a2b_1769182241253_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=253_sc.jpg)






