ऐक ना सखे…
मला सांग ना,
खरं प्रेम कुणाला मिळालं?
राधेला का,
मीरेला का,
की रुक्मिणीला…?
कोण कमी पडलं सखे
जिवापाड कृष्णावर प्रेम करायला?
राधेचं प्रेम न बोलताही
श्वासात श्वास मिसळणारं होतं,
मीराचं प्रेम विष पिऊनही
भजनात हसणारं होतं,
रुक्मिणीचं प्रेम हक्काचं,
नावावरचं, संसाराचं होतं…
पण सखे सांग ना,
त्यातलं कुणी सुखी झालं?
राधा विरहात जळाली,
मीरा लोकांच्या वेड्यात अडकली,
रुक्मिणीही राजवाड्यात
कधी कधी एकटीच रडली…
सखे प्रेम कमी कुणाचंच नव्हतं,
कमी होतं फक्त नशिबाचं वाटप,
कारण कृष्ण एकच होता,
आणि वेदना तिघींच्या पदरात पडल्या…
म्हणूनच सखे,
आजही जे मनापासून प्रेम करतात ना,
त्यांच्या वाट्याला
नेहमीच थोडंसं
दुःख जास्तच येतं…
#ऐकना_सखे
#मराठी_प्रेमकविता
#खरं_प्रेम
#राधा_मीरा_रुक्मिणी
#कृष्णप्रेम
#मराठी_कविता
#MarathiPoetry
#LovePoetry
#IndianLove
#Prem
#दुःख_आणि_प्रेम
#भावनांचा_आवाज
#PoetryLovers
#PoeticSoul
#मराठीलेखन
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून