#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी #🤩Dear Bestie #🌹प्रेमरंग
🌹🌿🌺नित्यनेम करणे म्हणजे काय ?🌹🌿🌺
नित्यनेम करणे म्हणजे सर्वकाळ नित्यात राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत.
नित्य जो परमात्मा त्याला विसरून, विषय जे अनित्य त्यांत पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात.
आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही; म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे, म्हणजे त्याची सवय होते.
जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंदबुवांनीच.
आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरूआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरू सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला शरण जावे.
रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण, आणि शेवटी गुरूस अनन्यशरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे, आणि हाच त्याचा नित्यनेम होय.
आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे.
केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये; साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे.
साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी.
ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे.
साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेषणा, मान, फार घातक आहेत. मोठमोठे साधकसुद्धा त्यांच्यापायी अधोगतीला जातात. तसेच, पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात.
भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो.
जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सावध असावे.
जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर "हे भगवंताचे देणे आहे" असे मनापासून समजावे.
जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही, आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल.
जाता-येता देवाला नमस्कार करावा, "राम, राम" म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुनः सुटणार नाही.
‼️भगवंताचा पाश हा पाशच खरा. पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो.‼️
#एक like तर बनतोच ना .. 👍
#एक like तर बनतोच ना .. 👍 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी #🤩Dear Bestie
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी #🤩Dear Bestie #🌹प्रेमरंग
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी #🤩Dear Bestie #🌹प्रेमरंग
🌹🌿🌹नामस्मरणापरते दुसरे हित नाही.🌹🌿🌹
एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, "मला देव पहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का ?" मी म्हटले, "पाहिला आहे." त्यांनी विचारले, 'तो मला दिसेल का ?' मी म्हटले, "दिसेल, पण या डोळयांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे." आज आमची विषयाची दृष्टी आहे. ती भगवंताची नाही.
आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय : भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळयांना माझे सांगणे आहे; हे ऐकणे अत्यंत जरूर आहे बरे ! ऐकणे कशासाठी ? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही, ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही; ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा.
आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल.
सगळयांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल, त्याचे राम खरेच कल्याण करील.
आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य मानावे. "या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल." असे गुरूने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग ?
"मला सगुण साक्षात्कार व्हावा" असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सदगुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग ?
आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार ?
सदगुरूने जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे, हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे, म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला ? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो.
अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सदगुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही.
मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो, त्या प्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा. त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा.
‼️गुरूचरणी अत्यंत विश्वास । आणि साधनाचा अखंड सहवास । येथे प्रपंचाचा सुटला फास । हाच परमार्थाचा मार्ग आहे खास ॥‼️
#एक like तर बनतोच ना .. 👍







![एक like तर बनतोच ना .. 👍 - खोकला व छातीतील कफ कमी करण्यासाठी मूठभर फुटाणे खावेत. फुटाणे खाल्ल्यानंतर साधारण तासभर पाणी पिऊ नये, त्यामुळे कफ कमी होऊन खोकल्यावर आराम मिळतो. FB] Royal Karbhar खोकला व छातीतील कफ कमी करण्यासाठी मूठभर फुटाणे खावेत. फुटाणे खाल्ल्यानंतर साधारण तासभर पाणी पिऊ नये, त्यामुळे कफ कमी होऊन खोकल्यावर आराम मिळतो. FB] Royal Karbhar - ShareChat एक like तर बनतोच ना .. 👍 - खोकला व छातीतील कफ कमी करण्यासाठी मूठभर फुटाणे खावेत. फुटाणे खाल्ल्यानंतर साधारण तासभर पाणी पिऊ नये, त्यामुळे कफ कमी होऊन खोकल्यावर आराम मिळतो. FB] Royal Karbhar खोकला व छातीतील कफ कमी करण्यासाठी मूठभर फुटाणे खावेत. फुटाणे खाल्ल्यानंतर साधारण तासभर पाणी पिऊ नये, त्यामुळे कफ कमी होऊन खोकल्यावर आराम मिळतो. FB] Royal Karbhar - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_430907_2328fa32_1770490418825_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=825_sc.jpg)



