#🙏शिवदिनविशेष📜 आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
७_फेब्रुवारी_१६५८
विजापुरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला.
तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला.
सुधागड म्हणजेच भोरप, भोर संस्थानाचे वैभव.
सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत.
शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले.
स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाआधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता.
नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता. शिवाजींना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला.
मात्र महाराजांनी सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला.
त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता.
रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात
साम्य आहे.
सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो.
हा किल्ला म्हणजे कोकणात उतरणा-या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरीच!
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
७_फेब्रुवारी_१६९८
मुघल सरदार झुल्फिखानच्या ताब्यात जिंजी किल्ला आला.
छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी त्याने जिंजीला
वेढा दिला होता.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती