#🙏शिवदिनविशेष📜 आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
७_फेब्रुवारी_१६५८
विजापुरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला.
तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला.
सुधागड म्हणजेच भोरप, भोर संस्थानाचे वैभव.
सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत.
शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले.
स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाआधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता.
नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता. शिवाजींना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला.
मात्र महाराजांनी सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला.
त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता.
रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात
साम्य आहे.
सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो.
हा किल्ला म्हणजे कोकणात उतरणा-या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरीच!
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
७_फेब्रुवारी_१६९८
मुघल सरदार झुल्फिखानच्या ताब्यात जिंजी किल्ला आला.
छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी त्याने जिंजीला
वेढा दिला होता.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष
*५ फेब्रुवारी इ.स.१६६४*
*नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान.*
*६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत मधून वसुली केली बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.*
*लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४.*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩आजचे_शिव_दिनविशेष🚩
*४ फेब्रुवारी इ.स.१६७०*
*सत्तेपायी बेईमान झालेल्या उदयभान राठोडच्या छातीवर बसुन साक्षात मृत्युतांडव करणारे व धगधगता लोळ उरात घेऊन लढणारे सुभेदार तानाजी मालुसरे किल्ले कोंढाणा जिकूंन धारातीर्थी पडले.*
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३१ जानेवारी इ.स.१६६३* *(फाल्गुन शुद्ध २, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभक्रृत, वार शनिवार)* *वेदमूर्ती नारो पाध्ये यांचे वतन सुरू ठेवले. महाराजांना कल्याणकारी राज्य निर्माण करायचे होते त्यामुळे साधूसंतांना कुठल्याही प्रकारची तोशीस लागता कामा नये यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. वतन मात्र कोणालाही देण्यात येत नसले तरी धार्मिक क्षेत्रातील वतने महाराजांनी पूर्वीप्रमानेच चालू ठेवली. संगमेश्ववरचे वेदमूर्ती नारो पाध्ये बीन अंतो पाध्ये आणि केसो पाध्ये हे महाराज शृंगारपुरी येथे मुक्कामी असताना त्यांना भेटले आणि त्यांच्या वतनाविषयी राजा सत्तेश्वर व तुरुकांच्या कारकिर्दित दिलेले ज्योतिष व देशोपाध्येपणाचे ताम्रपट आणि वतनाचे कागद दाखवून अर्ज सादर केला. त्यांनी महाराजांना धार्मिक बाब म्हणून सदर वतन पूर्वीप्रमाने चालू ठेवावी अशी विनंती केली. महाराजांनिही धार्मिक बाब म्हणून हे वतन चालू ठेवण्यास मान्यता देऊन शामराजपंत पेशव्यांना आदेश देऊन शिक्क्यानिशी वतनाचे पत्र दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३१ जानेवारी इ.स.१७२८* *श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदखानावर चालून येत आहेत. गुजरातेत यथेच्छ लु#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩🚩🚩*शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६७०* *(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार शनिवार)* *मराठ्यांनी किल्ले सुलतानगड सर केला.* *औरांगजेबाच्या धर्माधतेच्या रोज वेगवेगळ्या कहाण्या छत्रपती शिवरायांच्या कानावर येत होत्या. संपूर्ण हिंदुस्तान औरांगजेबाच्या धर्मांधतेच्या विखारी मांडवाखाळून जात असता, मराठी मनगटे शिवशिवली नसती तर नवल होते. महाराजांनी याच सुमारास मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीमच उघडली... याच वेळेस मराठ्यांच्या २० हजार सैन्याने बागलाणात येऊन, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. औरंगजेबास हे चोख प्रत्युत्तर होते. याच वेळी मराठ्यांनी सुलतान गडाला वेढा घालून किल्लेदार फतहुल्लाखान याला ठार मारले आणि गड जिंकून घेतला. मराठी मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबास आला!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६५७* *बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१७८८* *वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह! "वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये ९१ कलमी मैत्रीचा करार होऊन वाडीकर सावंतांने पोर्तुगिजांचे मांडलिकत्व पत्करले."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती



