#🙏शिवदिनविशेष📜 आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
२८_जून_१६७७
छत्रपती शिवराय देवेनापट्टणच्या दक्षिणेकडे एक
कोसावर पोचले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘मदुरेपर्यंत’ आपले वर्चस्व प्रस्थापित केले, त्यानंतर पळवून लावलेल्या शेरखानच्या ठिकाण्यावर छापा घालून मराठ्यांनी मोठी संपत्ती स्वराज्यात आणली तसेच दक्षिणेतील किल्ले भुवनगिरी वर छत्रपती शिवरायांनी चढाई केली.
याच वेळी मराठा फौजा दक्षिणेतील बेलादपुर,
देवेनापट्टणच्या भागात घुसल्या.
शिवराज्याभिषेक नंतरची छत्रपती शिवाजी महाराजांची ही शेवटची आणि खूप महत्वपूर्ण मोहीम होती.
२८_जून_१६८५
मोहंमद मुअज्जम गोवळकोंड्यात दाखल.
इस १६८२ ते १७०७ अशी तब्बल २५ वर्षे मुघल बादशहा औरंगजेब दख्खनमधे लाखोंचे सैन्यासह झटत होता.
यादरम्यान त्याने मराठ्यांविरूद्धच्या लढाईला काहीसी विश्रांती देत त्याची नजर आदिलशाही व कुतुबशाहीकडे वळवली व १६८६ व १६८७ मधे अनुक्रमे आदिलशाही व कुतुबशाही युद्ध करून जिंकून घेतली. त्याचा दुसर्या क्रमांकाचा मुलगा मोहंमद मुअज्जमला औरंगजेबाने १६८५ मधे कुतुबशाहीवर पाठवले व त्याने गोवळकोंड्याच्या (भागानगर/हैदराबाद) किल्ल्याला वेढाही घातला.
मात्र हा वेढा रेंगाळत चालला.
पुढे दोन वर्षे मुघलांना काही यश आले नाही. याचे कारण म्हणजे मुअज्जम आतुन कुतुबशहाला सामील होता.
औरंगजेबाला ही बातमी मिळाल्यावर तो स्वतः तिथे आला व कपटनितीने व फितुरीने गोवळकोंडा जिंकला व शहा आलम म्हणजेच शहजादा मुअज्जमला शिक्षा म्हणून पुढे ७ वर्षे कैदेत टाकले.
२८_जून_१७३७
गुणजीराव शिंदे हे वसई च्या मोहिमेतील एक नामांकित सरदार होते.
२८ जून १७३७ रोजी ते ४००० फौजे सकट व इतर सरदारांच्या साथीने बहादूर पुऱ्या हुन वसई च्या कोटावर चालून गेले.
परन्तु अपयशी होऊन धारातीर्थी पडले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२६ जून १६६४
सुरतकर इंग्रजांचे कारवारकर इंग्रजांना इशारतीचे पत्र.
या पत्रात कारवारकर इंग्रजांना शिवाजी राजांपासून सावध राहण्याविषयी इशारा दिलेला आहे.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
२६ जुन १६७७
शेरखानाचा सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाथी लागला, तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना शरण गेला व त्यानंतर महाराजांनी ‘मदुरेपर्यंत’ आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
२६ जून १६८०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी
महाराजांनी रायगडचा ताबा मिळवून स्वतः स्वराज्याचा कारभार आपल्या हातात घेतला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
२६ जून १८७४
लोकराजा राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज जयंती
करवीरनगरी व प्रांताचे लोकराजा व सर्वोत्तम राजाधीश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार मुजरा.
राजर्षींनी ज्या पद्धतीने सामाजिक उत्थानाला हात घातला तसा त्याकाळी भारतात कोणाही राजाला करता आले नाही.
त्याबरोबर क्रांतिकारकांना मदतही करायला ते विसरत नव्हते.
राजकीय व सामाजिक आघाडीवरील राजर्षींचे यश पाहिले तर प्रतिशिवाजी ही उपमा त्यांना सार्थपणे लागू होते.
छत्रपती शाहूराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
२५_जून_१६७०
एका पाठोपाठ किल्ले घेण्याचा तडाखा मराठ्यांनी चालूच ठेवला.
शिवछत्रपतींच्या आदेशानुसार किल्ले कर्नाळा आणि रोहिडा स्वराज्यात सामील केल्यानंतर तत्कालिन कोकण प्रांतातील आणि सध्याच्या "पालघर" जिल्ह्यातील "किल्ले कोहोज" मराठ्यांनी स्वराज्यात दाखल करून घेतला.
२५_जून_१६७७
"छत्रपती शिवाजी महाराजांनी " दक्षिण दिग्विजय मोहीमेत भुवनगिरी पट्टन येथे शेरखानचा पराभव केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_जून_१६९३
➡️"किल्ले सिंहगड मोहीम"⬅️
स्वराज्यनिष्ठ "नावजी बलकवडे" व "विठोजी कारके" यांनी निवडक मावळे सोबत घेतले आणि ते लोणावळा जवळच्या "किल्ले राजमाची" वरून निघाले.
पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत "किल्ले सिंहगड" च्या जंगलात येऊन पोचले व गडावरच्या गनिमावर हल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत
५ दिवस दबा धरून बसले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩
२२ जून १६७०
मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला⚔️
छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा
किल्ला स्वराज्यात सामील केला.
पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला व सन १६७० साली मराठ्यांनी
हा किल्ला परत स्वराज्यात आणला....🚩
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला.
सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.
२२ जून १८९७
चाफ़ेकर बंधूंकडून पुण्याच्या गणेशखिंडीत रॅंडचा वध केला. वासुदेव चाफेकर, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी २२ जुन १८९७ साली देशाच्या स्वातंत्र्या साठी इंग्रज अधीकारी रँडला गोळ्या घालून ठार मारले.
मातृभूमीसाठी एकाच कुटूंबातील तीनही बंधू फाशी गेल्याचे हे एकमेव उदाहरण असावे.
चाफेकर बंधू या महान क्रांतीकारकांना मानाचा मुजरा....
वंदे मातरम !
२२ जून १९४१
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमधील सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील, आगामी काळातील सशस्त्र घडामोडींविषयी दोघांमध्ये अनेक महत्वाच्या बाबींवर सखोल चर्चा झाली.
पुढे १९४३ मध्ये सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या 'आझाद हिंद सेने'चे बीजारोपण ह्याच चर्चेदरम्यान झाले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 २० जून १६६० अथणीच्या पेठेवर मराठा सैन्याचा छापा आजच्या दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी अथणीच्या पेठेवर छापा टाकून ते धन स्वराज्यास जोडले. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व घडत होते स्वतः शिवराय पन्हाळगडावर सिद्दी जोहर च्या वेड्यात अडकले असताना. २० जून १६८२ औरंगजेबपुत्र अकबराने शंभूराजाकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या. औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजीविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले. २० जून १७३३ छत्रपती शाहुंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना पुन्हा हस्तगत झाला.. रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूनी ता.२० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे, घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ. शिवाजीमहाराज व आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराम महाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि.फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे.....#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 २० जून १६६० अथणीच्या पेठेवर मराठा सैन्याचा छापा आजच्या दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी अथणीच्या पेठेवर छापा टाकून ते धन स्वराज्यास जोडले. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व घडत होते स्वतः शिवराय पन्हाळगडावर सिद्दी जोहर च्या वेड्यात अडकले असताना. २० जून १६८२ औरंगजेबपुत्र अकबराने शंभूराजाकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या. औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजीविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले. २० जून १७३३ छत्रपती शाहुंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना पुन्हा हस्तगत झाला.. रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूनी ता.२० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे, घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ. शिवाजीमहाराज व आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराम महाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि.फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे.....#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती



