Dr Amol Melage
ShareChat
click to see wallet page
@amolmelage
amolmelage
Dr Amol Melage
@amolmelage
🚩🚩🚩क्षत्रियकुलांवतस्🚩🚩🚩
#🙏शिवदिनविशेष📜 आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२१_जानेवारी_१६६२ विजापूर आदिलशाही च्या ताब्यात असलेली कोकण किनारपट्टी स्वराज्यात पुन्हा सामील करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी कोकण मोहिमेस प्रारंभ केला. कोकणचा बराच भाग चिपळूण राजापूर कुडाळ ताब्यात घेऊन राजे व त्यांची फौज मालवणला आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१६७५ शिवाजी महाराजांनी कुतुबखानाचा पराभव केला. शिवरायांनी बुऱ्हाणपूर, धरणगाव ठाण्यावर छापा टाकून रायगडाकडे परतत असताना कुतुब खान महाराजांना रोखण्यासाठी त्यांच्यावर चालून आला पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता. कुतुब खानाचे चारशे सैनिक ठार झाले या वास्तवासोबत कुतुब खान आणि मोघली सैन्य औरंगाबादकडे पळून गेले. प्रचंड धन संपत्ती घेऊन शिवराय रायगडी परतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१७४० स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या गुणांची पुरेपूर जाणीव होती म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त) " राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये "! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१७६१ थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६६३* *औरंगजेबचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६७४* *दीलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला. हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही. यात दीलेरखानाचे १००० सैनिक मारले गेले तर सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत धारातिर्थी पडले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६७५* *(माघ शुद्ध ४, चतुर्थी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार बुधवार)* *महाराजांनी डुमगावची वखार लुटली!* *महाराजांनी डुमगावची वखार पुर्णपणे लुटली. महाराजांबरोबर तह करून वखार वाचवून घ्यावी, असा सल्ला जवळच्या माणसांनी सुचवूनही इंग्रज सेनापतीने तो धुडकावून लावला आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला हे कंपनी सरकारलाही कळले. मात्र महाराजांनी डुमगावच्या वखारीला लुटून इंग्रजांच्या वाढत्या हस्तक्षेपाला चाप लावला हे निश्चित!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६८३* *(पौष शुद्ध ५, पंचमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार रविवार)* *औरंगजेबाचा वकील गोव्यात!* *औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद औरंगजेबाचे पत्र घेऊन गोव्यात आला. या पत्रात औरंगजेबाने अनेक मागण्या केल्या असून अप्रत्यक्षपणे गोव्याच्या विजरईस छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध युद्ध पुकार#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१९ जानेवारी इ.स. १३११* *वारंगळच्या लुटीतच जगप्रसिद्ध कोह-इ-नुर (कोहिनूर) हिरा मलिक काफुरच्या हातात सापडला. तो हिरा मलिक काफूरने जून १३१० मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट केला. वारंगळची लुट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे. म्हणून त्याने कर्नाटकातील द्वारसमुद्र म्हणजे नंतरचे हलेबिंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले. १९ ऑक्टोबर १३१० ला मलिक काफूर दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर तीन महिन्यानंतर त्याची गाठ गुणवडीजवळ करणसिंह गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडली. वाटेत लागतील ती गावे लुटायची, स्रियांचे अपहरण करायचे, लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची हाच क्रुर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्यासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता. पण गुणवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणा-या भुयाराजवळ सुर्यकुल कुलभूषण श्री करणसिंह गावडे यांच्या आणि भीमराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सगर राजपूत आणि काही ब्राम्हण योद्धे असे अकराशे जणांचे एक पथक त्या मलिक काफूरचा प्रतिकार करण्यासाठी जमले होते. १९ जानेवारी ते २० जानेवारी १३११ असे दीड दिवस हे घनघोर युद्ध चालले होते. एका बाजूला मलिक काफूरचे दहा हजार सैन्य तर दुस-या बाजूला फक्त अकराशे योद्धे. शेवटी दीड दिवसांच्या संग्रामानंतर २०जानेवारी १३११ या दिवशी २२ सगर योद्धे या ठिकाणी मारले गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ जानेवारी इ.स.१५९७* *महाराणा प्रताप यांचा स्मृतिदिन* *(जन्म ९ मे १५४०)* *राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यं#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१८ जानेवारी इ.स.१६६५* *इंग्रजांनी पोर्तुगिजांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता. इंग्रजांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगिजांना कठीण गेल्याने त्यांना समेट करावा लागला. इ.स.१६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगिजांच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरीना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला देण्याचे ठरविले. २३, जुन इ.स.१६६१ या दिवशी विवाहाचा करार पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले. शिवाय २० लक्ष पोर्तुगीज "कुझादश्" आणि आफ्रिकेतील "टंजियर" शहरही दीले. वरिल विवाह यशस्वी झाला, त्याचे कारण म्हणजे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा हा प्रॉटेस्टंट तर कॅथरिन ही कॅथलिक होती. परंतु विवाहाच्या कराराप्रमाणे मुंबई बेट इंग्लंडच्या राजास मिळालेच. हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे सागरी महत्त्वाचे ठिकाण पोर्तुगिजांच्या हातचे गेल्यास हिंदुस्थानातील पोर्तुगीज हितसंबंधांवर अनिष्ठ परिणाम होतील, अशा आशयाचे कळकळीचे पत्र, गोव्याचा व्हिसेरेई लुईज द मेंदोंस फुर्ताद याने आपल्या राजास लिहीले होते. इतकेच नव्हे तर गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू मेलू द काश्तू याने मुंबईचे हस्तांतर करण्यासही नकार दिला होता. परंतु राजाची आज्ञा त्याला अखेर मान्य करावी लागली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१८ जानेवारी इ. स.१६६६* *गोव्याच्या गव्हर्नरने पोर्तुगालच्या राजास पाठविलेल्या पत्राची नोंद! छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मोगल साम्राज्यातील हा अग्रगण्य बंदराची लुट केली, तेव्हा पोर्तुगिजांनी थक्क होऊन तोंडात बोटे घातली. औरंगजेबासारख्या आशिया खंडातील बलाढ्य बादशहाची कुरापत काढण्याचे धाडस तोपर्यंत कुणालाच आले नव्हते. ते धाडस महाराजांनी केल्याने त्यांनी महाराजांची तुलना
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१७ जानेवारी इ.स.१६०१* *असीरगड - अर्थात दख्खनचा दरवाजा* *अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले. "यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१७ जानेवारी इ.स.१६४८* *आदीलशहा बादशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दीला की कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा. "नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१७ जानेवारी इ.स.१६६३* *(माघ वद्य ४ चतुर्थी शके १५८४ संवत्सर शुभक्रृत वार शनिवार)* *इंग्रज कैद्यांची सुटका!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६६०* *( माघ शुद्ध चतुर्दशी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार )* *नेतोजी काकांना आदिलशाही जिंकण्याचा आदेश :-* *रुस्तुमेजमानवर प्रचंड विजय मिळवून महाराज पन्हाळ्यावर आले आणि आदिलशाही जिंकण्यासाठी महाराजांनी नवीन मोहीम आखली. नेतोजी काकांच्या नेतृत्वाखाली मराठी फौज पन्हाळगड उतरली आणि विजापूर कडे कूच केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६६६* *( पौष वद्य षष्टी, शके १५७८, संवत्सर विश्वासू, मंगळवार )* *पन्हाळगडावर पराभव :-* *मिरझा बरोबर तहानंतर छत्रपती महाराजांनी पन्हाळा जिंकायचा ठरवले आणि हल्ला केला. मात्र नेतोजी काका वेळेवर मदत न मिळू शकल्याने छत्रपती महाराजांचा पराभव होऊन १००० माणसांची हकनाक कत्तल झाली आणि राजे संतापले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६७८* *ब्रिटिशांचे दक्षिण दिग्विजय मोहीम संदर्भात लिहीतात आपली जगज्जेता म्हणून प्रसिद्धी व्हावी या महत्वाकांक्षा नेत्यांनी प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी कोकणातील अत्यंत दुर्गम किल्ला जो रायरी तेथून निघून २० हजार स्वार व ४० हजार पदाती घेऊन कर्नाटकवर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखलेल्या दक्षिण दिग्विजय स्वारीच्या दैदिप्यमान यशावर संपूर्ण हिंदुस्थानीच नव्हे तर पाश्चात्य व्यापार समूहाची देखील नजर लागून राहीली होती. तसेच या स्वारीच्या यशानंतर हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर फार मोठे फेरफार होऊ शकतात असा कयास फिरंगी व्यापारी लावत होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६८०* *(पौष वद्य १० दशमी शके १६०१ संवत्सर सिद्दार्थी वार शुक्रवार)* *औरंगजेबाने शहजादा अकबरास राजपुतांवर अन् चितोडवर हल्ला करण्यास पाठविले!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:29
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१५ जानेवारी इ.स.१६५६* *(पौष वद्य ४ चतुर्दशी शके १५७७ संवत्सर मन्मथ वार मंगळवार)* *छत्रपती महाराजांनी छापा घालुन जावळी काबीज केली.* *महाराजांच्या बळापुढे चंद्रराव मोरे यांचे बळ अपुरे पडू लागले. चतुर्बेट संभाजी कावजी कोंढालकर यांच्या हाती पडले. जोहोरखोरेही रघुनाथपंतांनी काबीज केले. हणुमंतराव मोरे या धुमश्चक्रीत मारला गेला. तर प्रतापराव मोरे निसटून विजापूरला पळून गेला. सिवथर खोरेही महाराजांनी जिंकले. इथल्या बाबाजीराऊ या मोरे यांचा कारभारी याला कैद करून महाराजांनी त्याचे डोळे काढले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर चंद्ररावास माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. जावळीवर महाराजांचे निशाण लागले तो दिवस होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ जानेवारी इ.स.१६६०* *दौलोजीची कोकणावर चाल - खारेपाटण कोट जिंकला.* *जेव्हा छत्रपती शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो.* *अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१३ जानेवारी इ.स.१६७२* *( पौष वद्य नवमी शके १५९३ संवत्सर विरोधकृत शनिवार )* *दिलेर खानाने पुणे लुटले :-* *पेशवे मोरोपंतांनी दिलेर खानाचा वेढा उठवण्यासाठी १२ हजार मावळे पाठवले. त्यात एक हजारी अधिकारी रामाजी काका पांगेरा होते. मावळ्यांनी गनिमी कावा वापरून खानाला हैराण करून सोडले इतके की खानाने वेढा उठवला. मराठ्यांनी दिलेर खानाचा पाठलाग केला आणि कणेरगड परिसरात खानाची आणि पांगेरा काकांची गाठभेट झाली. काकांनी मावळ्यांना आव्हान केले की, ' आता अखेरचा एल्गार... आपण सोबती असतील ते उभे राहावे ' ७०० मावळे रामाजी काकांबरोबर उभे राहिले. खानाची फौज प्रचंड होती विरुद्ध ७०० मावळे. मराठे घेरले गेले, पण मावळ्यांनी जो प्रतिकार केला तो सुन्न करणारा होता. लाह्या फुटाव्यात अशी मोगलांची सर्रास कत्तल, लांडगेतोड केली. एकेक मावळ्यांच्या शरीरावर तीस चाळीस जखमा, मात्र जखमांची पर्वा न करता मराठे अंगात सैतान शिरल्याप्रमाणे झुंजत होते. पहिल्या प्रहरातच बाराशे हशम, बोकड कपावेत अशा प्रकारे कापून काढले. दिलेर खानाला आठवला तो पुरंदर आणि मुरारबाजी काकांचा पराक्रम! टिकाव लागेल की नाही हे लक्षात येताच खानाने राखीव फौज उतरवून हल्ला केला. आणि अखेर ह्या रणसंग्रामात ७०० मावळे आणि रामाजी काका पांगेरा धारातीर्थी पडले. कोरजाई गावचा सुपुत्र कणेरगड परिसरात धारातीर्थी पडला. रणसंग्रामात झालेली नामुष्की पाहून ह्याचा सूड म्हणून दिलेर खानाने पुणे लुटून निरपराध नागरिकांची हत्या केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ जानेवारी इ.स.१६८०* *(पौष वद्य ७ सप्तमी शके १६०१ संवत्सर सिद्दार्थी वार मंगळवार)* *छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभुराजे यांची पन्हाळा#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:29
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१२ जानेवारी इ.स‌.१५९८* *राजमाता जिजाऊ जन्मोत्सव* *।। जय जिजाऊ ।।* *जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!* *जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!* *जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे…!* *जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…!* *१२ जानेवारी या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड* *राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.* *या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले. स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मि#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:29