#🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३१ जानेवारी इ.स.१६६३* *(फाल्गुन शुद्ध २, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभक्रृत, वार शनिवार)* *वेदमूर्ती नारो पाध्ये यांचे वतन सुरू ठेवले. महाराजांना कल्याणकारी राज्य निर्माण करायचे होते त्यामुळे साधूसंतांना कुठल्याही प्रकारची तोशीस लागता कामा नये यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. वतन मात्र कोणालाही देण्यात येत नसले तरी धार्मिक क्षेत्रातील वतने महाराजांनी पूर्वीप्रमानेच चालू ठेवली. संगमेश्ववरचे वेदमूर्ती नारो पाध्ये बीन अंतो पाध्ये आणि केसो पाध्ये हे महाराज शृंगारपुरी येथे मुक्कामी असताना त्यांना भेटले आणि त्यांच्या वतनाविषयी राजा सत्तेश्वर व तुरुकांच्या कारकिर्दित दिलेले ज्योतिष व देशोपाध्येपणाचे ताम्रपट आणि वतनाचे कागद दाखवून अर्ज सादर केला. त्यांनी महाराजांना धार्मिक बाब म्हणून सदर वतन पूर्वीप्रमाने चालू ठेवावी अशी विनंती केली. महाराजांनिही धार्मिक बाब म्हणून हे वतन चालू ठेवण्यास मान्यता देऊन शामराजपंत पेशव्यांना आदेश देऊन शिक्क्यानिशी वतनाचे पत्र दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३१ जानेवारी इ.स.१७२८* *श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदखानावर चालून येत आहेत. गुजरातेत यथेच्छ लु#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩🚩🚩*शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६७०* *(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार शनिवार)* *मराठ्यांनी किल्ले सुलतानगड सर केला.* *औरांगजेबाच्या धर्माधतेच्या रोज वेगवेगळ्या कहाण्या छत्रपती शिवरायांच्या कानावर येत होत्या. संपूर्ण हिंदुस्तान औरांगजेबाच्या धर्मांधतेच्या विखारी मांडवाखाळून जात असता, मराठी मनगटे शिवशिवली नसती तर नवल होते. महाराजांनी याच सुमारास मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीमच उघडली... याच वेळेस मराठ्यांच्या २० हजार सैन्याने बागलाणात येऊन, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. औरंगजेबास हे चोख प्रत्युत्तर होते. याच वेळी मराठ्यांनी सुलतान गडाला वेढा घालून किल्लेदार फतहुल्लाखान याला ठार मारले आणि गड जिंकून घेतला. मराठी मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबास आला!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६५७* *बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१७८८* *वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह! "वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये ९१ कलमी मैत्रीचा करार होऊन वाडीकर सावंतांने पोर्तुगिजांचे मांडलिकत्व पत्करले."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६५८* *छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.* *ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो :* *"धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शिवाजीची तुलना करायची झाल्यास ती सिझर आणि सिकंदर ह्याच्याशी करावी लागेल. तो नाही अशी एकही जागा नाही तो सबंध आशियाशी युध्द करीत आहे."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६८०* *(माघ शुद्ध ६, षष्ठी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार)* *उंदेरीवर पुन्हा आरमारी युद्ध!* *पहाटे छत्रपती शिवरायांच्या आरमारी तुकडीने पुन्हा उंदेरीसाठी सिद्धी बरोबर तुंबळ युद्ध आरंभले. दौलतखानाच्या नेतृत्वात सुमारे ३० जहाजे व शेकडो सैनिकांनी उंदेरीवर पुन्हा एकदा एल्गार मांडला. या युद्धात सिद्धीचे तसेच म#⛳शिवसंस्कृती #📜इतिहास शिवरायांचा
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१६४५* *आजपासून ३७५ वर्षापूर्वी एक अशी घटना घडली कि पुन्हा कोणाचीही हिम्मत झाली नाही कुठल्याही आई-बहिणीकडे नजर वाकडी करून पाहण्याची ....... पण आज आमच्याकडे आज कुठलीही आई, बहिण, मुलगी, पत्नी हि सुरक्षित नाही. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचू नका, पण त्यांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करा.* *!! २६ जाने १६४५ !!* *!! रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकऱ्याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण छत्रपती शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही छत्रपती शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंगा केला. चौरंगा करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे साऱ्याच मावळ खोऱ्यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या छत्रपती शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर छत्रपती शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. छत्रपती शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळी#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳ *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५६* *महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो - "इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव, गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५८* *मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्ण#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳ *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५६* *महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो - "इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव, गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५८* *मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्ण#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती




