#🙆♂️राज्यात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा
आखाती युद्धाने देशभरात गॅसचा मोठा तुटवडा,
ESMA कायद्याची अंमलबजावणी
मुंबई - आखाती युद्धामुळे जगावरच युद्धाचे ढग घोंगावत आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यात एलपीजी गॅस आणि औद्योगिक कमर्शियल गॅस याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे अनेक उद्योग आणि हॉटेल इंडस्ट्री अडचणीत आली आहे.
साधारण दहा दिवसापासून अमेरिका, इजराइल, आणि इराण या राष्ट्रात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवस-रात्र चालू असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा आणि एलपीजी, क्रूड ऑइल आणि इतर नैसर्गिक वायूंचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे युद्ध जरी आखातात असले तरी त्याचे चटके आता आपल्या देशात जाणवायला सुरुवात झाली आहे.
युद्धाचे परिणाम संपूर्ण देशाला बसत आहेत, प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरात गॅसचा मोठा तुटवडा जाणू लागला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा वापर असणारे व्यवसाय ज्यात प्रामुख्याने औद्योगिक कारखाने, मोठ्या हॉटेल इंडस्ट्रीज यांना याचा फटका बसला आहे. युद्ध जर असेच सुरू राहिले तर मोठी अडचण निर्माण होणार आहे.
दरम्यान केंद्र सरकारने या गॅस तुटी वर पर्याय म्हणून एस्मा (ESMA) म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या कायद्यामुळे देशभरात अत्यावश्यक वस्तूची साठवनुक आणि काळाबाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे.
या एस्मा कायद्याच्या लागू करण्याबरोबरच केंद्र सरकारने देशात तेल शुद्धीकरण आणि पेट्रोल केमिकल च्या रिफायनरी असणाऱ्या कंपन्यांना अधिक प्रमाणात एलपीजी गॅसचे उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत. एस्मा कायदा- (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) भारतीय संसदेने 1968 ला मंजूर केला होता. या कायद्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा आणि त्याची साठवणूक, काळाबाजार होऊ नये यासाठी हा कायदा अस्तित्वात आला.
#ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या . #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स