Aniket Kamble
ShareChat
click to see wallet page
@bhau2502
bhau2502
Aniket Kamble
@bhau2502
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😘Good Night शायरी🌛
😘Good Night शायरी🌛 - शुभ रात्री !! आयुष्यात. अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा..! ज्यांना.... खरोखरच तुमच्या भावनांची कदर आहे..!! allinmarathi co in शुभ रात्री !! आयुष्यात. अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा..! ज्यांना.... खरोखरच तुमच्या भावनांची कदर आहे..!! allinmarathi co in - ShareChat
#😡भयानक! धावत्या बसमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार😱 देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक संतापजनक घटना समोर आली. दिल्लीतील एका खाजगी बसमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तत्परता दाखवत दोन नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला प्रवासासाठी निघाली असताना आरोपींनी तिला राणी बाग परिसरातून बसमध्ये सोबत घेतले. त्यानंतर बस नांगलोई परिसराच्या दिशेने नेण्यात आली. निर्जनस्थळी नेल्यानंतर आरोपींनी चालत्या बसमध्येच महिलेवर अत्याचार केला. या घृणास्पद कृत्य झाल्यानंतर पीडितेने धीर न सोडता तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वेगाने पावले उचलली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या खाजगी बसमध्ये हा गुन्हा घडला, ती बस पोलिसांनी जप्त केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे
😡भयानक! धावत्या बसमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार😱 - Ollel Mnన | Ollel Mnన | - ShareChat
#😔अवकाळी पावसामुळे 96 जणांचा मृत्यू😱 बुधवार 13 मे 2026 रोजी मोठी धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला. या घटनेत 89 लोक ठार झाले तर 53 लोक गंभीर जखमी आहेत. उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने आणि चक्रीवादळाने कहर केला. फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगढ, भदोही, देहाट, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्झापूर, बदाऊन, उन्नाव, कानपूर या जिल्ह्यात पावसाचा थैमान बघायला मिळाले. मोठं मोठी झाडे पडली. घरे पडली. एक थैमान निसर्गाने घातले. ज्यात अनेक लोकांची जीव गेली. या वादळात एकट्या प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्यही तातडीने सुरू करण्यात आले. मात्र, वारे आणि पाऊस इतका जास्त भयंकर होता की, बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी केला. चक्रीवादळात जनावरांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. 114 जनांवरांचा या वादळात जीव गेला. वित्त आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विनिता सिंह यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांमधून माहिती गोळा करत आहे. महसूल विभाग सध्या माहिती संकलित करत आहे. त्यामुळे तात्काळच मृतांचा आकडा सांगणे कठीण आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला. काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. मृतांचा आकडा वाढण्याचेही संकेत आहेत. हवामान विभागाने अलर्ट अगोदरच जारी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि चक्रीवादळ येईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. अचानक चक्रीवादळ सुरू झाले आणि पावसालाही जोरदार सुरूवात झाली. या चक्रीवादळाचे काही धक्कादायक व्हिडीओही पुढे येत आहेत. या व्हायरल व्हिडीओमधून परिस्थिती किती जास्त गंभीर आहे हे कळते. प्रशासनाकडून मदतकार्य राबवले जात आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या चक्रीवादळात झालेले नुकसान भरून देण्याची मागणी लोकांकडून होत आहे. काहींनी थेट सरकारविरोधात निर्देशने सुरू केली आहेत. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे.
😔अवकाळी पावसामुळे 96 जणांचा मृत्यू😱 - ShareChat
#🙏शिर्डी साई बाबा
🙏शिर्डी साई बाबा - ShareChat
00:16
#🙏छत्रपती संभाजी महाराज जयंती🚩 #🙏🚩जय शिवराय जय शंभु राजे🚩🙏
🙏छत्रपती संभाजी महाराज जयंती🚩 - ShareChat
00:10
#🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
00:13
#😯बारामती मध्ये पुन्हा विमान कोसळले✈️ पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून विमान अपघाताची एक चिंताजनक वार्ता समोर आली आहे. तालुक्यातील गोजुबावी गावाच्या शिवारात मंगळवारी एका प्रशिक्षणार्थी विमानाला भीषण अपघात झाला. हे विमान ‘रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी’ या संस्थेचे असून, सराव उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ते जमिनीवर कोसळले. सुदैवाने, या अपघातात शिकाऊ वैमानिक बालंबाल बचावला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. अपघाताचे स्वरूप आणि घटनास्थळाची स्थिती- मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे हे विमान सरावासाठी आकाशात झेपावले होते, मात्र गोजुबावी गावाच्या हद्दीत येत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते थेट शेतात कोसळले. विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी, वैमानिकाने प्रसंगावधान राखल्यामुळे जीवितहानी टळली आहे. विशेष म्हणजे, ज्या गोजुबावी परिसरात हा अपघात झाला, याच भागात काही काळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता. एकाच परिसरात वारंवार होणाऱ्या या विमान अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यवाही- घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विमानाभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार या घटनेचा सखोल पंचनामा केला जाणार आहे. हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले की मानवी त्रुटीमुळे, याचा सविस्तर अहवाल तपासणीनंतरच स्पष्ट होईल.
😯बारामती मध्ये पुन्हा विमान कोसळले✈️ - ShareChat
#😱लक्ष द्या! NEET परीक्षा रद्द➡️ नवी दिल्ली : राज्यातील 10 वी आणि 12 वी परीक्षेचा (Exam) निकाल नुकताच जाहीर झाला असून 10 वी नंतर अनेकांनी नीट (NEET) परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तर, 12 वीच्या (HSC) परीक्षेनंतर कित्ये विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.
😱लक्ष द्या! NEET परीक्षा रद्द➡️ - dbp ப" २०२६ ची NEET NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना { 1 पुन्हा पेपर द्यावा लागणार dbp ப" २०२६ ची NEET NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना { 1 पुन्हा पेपर द्यावा लागणार - ShareChat
#🌺विठुमाऊली
🌺विठुमाऊली - ShareChat
00:16
#🌺अपरा एकादशी🙏
🌺अपरा एकादशी🙏 - ShareChat
00:14