Chhaya Bharat
ShareChat
click to see wallet page
@chhaya_voice
chhaya_voice
Chhaya Bharat
@chhaya_voice
Motivational Speaker
🕉️ आपल्या जीवनात एक तरी असा मार्गदर्शक असावा की त्याच्या मार्गदर्शनाने चालावे, त्याच्या आचरणाने चालावे - त्याला वंदन करावे - त्याला पूजावे - त्याला भजावे आणि आपले जीवन यशस्वी करावे, असे जर तुमच्या जीवनात कोणी नसेल, तर लक्षात ठेवा तुम्हाला कधीच मार्ग भेटणार नाही, असेच लटकलेलं जीवन राहील, नाहीतर तुमच्या जीवनात एक चांगला उत्तम मार्गदर्शक असलाच पाहिजे, जसे अर्जुनाच्या जीवनात कृष्ण भगवंत होते, चंद्रगुप्त मोर्य याच्या जीवनात आर्य चाणक्य होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात समर्थ रामदास स्वामी होते,जीजा माता होत्या, असे असे अनेक उदाहरण देता येतील, 🕉️ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गीता ज्ञान🛕
🙏गुरु महिमा😇 - Tg'' "सँग॰ किसका कर रहे हो जीवन में ! Tg'' "सँग॰ किसका कर रहे हो जीवन में ! - ShareChat
#🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓ #🙏गुरु महिमा😇
🙏🏻आध्यात्मिकता😇 - 35 आपल्या जीवनात यशस्वी आपण मेहनतीने बनतो , मेहनत करणे सर्वात मोठे यश आहे व ते यशस्वी जीवन बनवण्यासाठी आहे, काहीना वाटते जॅकपॉट निघेल लॉटरी लागेल माझं पटकन चांगलं झाले पाहिजे कोणीतरी भेटेल आज चांगलं होईल उद्या चांगले होईल नक्कीच होईल एवढेच सांगते मेहनत करा दिवस रात्र एक करा जीवनात यशस्वी व्हा हीच गुरुकुल्ली होय. खरी जीवनाचे Quotes Creator 35 आपल्या जीवनात यशस्वी आपण मेहनतीने बनतो , मेहनत करणे सर्वात मोठे यश आहे व ते यशस्वी जीवन बनवण्यासाठी आहे, काहीना वाटते जॅकपॉट निघेल लॉटरी लागेल माझं पटकन चांगलं झाले पाहिजे कोणीतरी भेटेल आज चांगलं होईल उद्या चांगले होईल नक्कीच होईल एवढेच सांगते मेहनत करा दिवस रात्र एक करा जीवनात यशस्वी व्हा हीच गुरुकुल्ली होय. खरी जीवनाचे Quotes Creator - ShareChat
🕉️ ज्यांच्या जीवनात सद्गुरु नसतील त्यांनी सुद्धा कोणत्या ही एकाच देवाला भजा आणि जर सद्गुरु तुमच्या जीवनात असतील तर सद्गुरूंनाच हाक मारा तुमची सुखदुःख सद्गुरूंना सांगा तुम्ही देवाला हाक नका मारू तुम्ही सद्गुरूंना हाक मारा कारण की सद्गुरु हाच देव आहे, तुम्ही जर तुमच्या जीवनात सद्गुरु असतानाही तुम्ही ह्या देवाला आवाज दे त्या देवाला आवाज दे असे करण्यापेक्षा तुम्ही सद्गुरूंनाच आवाज द्या तुम्ही सद्गुरूंना हाक मारा ते तुम्हाला त्याच्यातून सहज बाहेर काढतील, सद्गुरू मध्ये एवढी शक्ती आहे की तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढतील, असेच सद्गुरूंना गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः असे म्हटले जाते, सद्गुरु वह दाता है वो देता ही देता है सद्गुरु ही परमेश्वर परमात्मा है, आप उसे पुकारो तुम्ही सद्गुरु ना आवाज द्या मी हजार वेळा सांगेन तुम्ही सद्गुरूंना आवाज द्या, सद्गुरु कुणी व्यक्ती नाहीये तत्त्व सद्गुरु तो देहाने पण आहे तो निर्गुणाने पण आहे आपले परम भाग्य आहे की सद्गुरु आपल्याजवळ असतात, कुठे शोधतो काशी आणि मथुरा सद्गुरु तेरी काशी और मथुरा हे ज्याला समजले त्याचे भाग्य उदयाला आले असे समजा. 🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇
🙏कर्म क्या है❓ - 9.51 #Gall KBIs Bhakti Ki Batein 2K 127 comments 115 shares Like Comment Share 9.51 #Gall KBIs Bhakti Ki Batein 2K 127 comments 115 shares Like Comment Share - ShareChat
🕉️ तुमच्या जीवनात खरा गुरु तुमचा कोणता आहे तुम्ही त्याच्या स्मरणात रहा तुमचा गुरु असे अनेक गुरु असू शकतील तुमचे जीवनात मार्ग दाखवणारे आध्यात्मिक पण अनेक गुरु असू शकतात, तुमच्या जीवनात पण खरा साक्षात गुरु तुमचा तोच ज्याने तुमचं स्वरूप दाखवलेले आहे, आणि त्या सद्गुरूंच्या स्मरणात रहा आणि त्याचीच चरण पकड़ा त्याचेच स्मरण करा मगच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, आई आपल्याला जन्म देते तुमच्या जन्म देते आईला तुम्ही जर विसरत आहात तर तुमच्या जीवनात प्रगती होणार नाही, तसेच ज्या सद्गुरूंमुळे तुम्हाला आत्मज्ञान झाले आहे तोच तुमचा सद्गुरु दाता आहे आणि त्याचे तुम्हाला स्मरण करून तुम्ही त्यालाच भजले पुजले पाहिजे हे त्रिवार सत्य आहे आता तुम्हला ठरवायचे की तुम्हाला काय करायचे आहे, मी नेहमी एक वाक्य सांगते देव देव भजा सद्गुरु भेटेल सद्गुरु सद्गुरु हजा देव भेटेल, सद्गुरु भेटला म्हणजे पूर्ण ब्रह्मच भेटले संपूर्ण विश्वच भेटले. लोकांना गुरु भेटून ही सद्गुरु भेटून ही देवालाच आवाज देत राहतात, कारण की त्यांना अजून देवच कळालेला नसतो अरे सद्गुरू हाच देव सर्व संतांनी सर्व ग्रंथांनी हेच तर सांगितले देवाने साक्षात सांगितले, संत नामदेवांना साक्षात विठ्ठलानेच सांगितले अरे तुला गुरु करावा लागेल, तेव्हाच तुला माझं खरं स्वरूप कळेल आता हे लोकांना वेगळं काय सांगायला पाहिजे हेच कळत नाही. 🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓
🙏गीता ज्ञान🛕 - 3:29 ( 4clll 25.5 10 KBIs Soieorhe 3:29 ( 4clll 25.5 10 KBIs Soieorhe - ShareChat
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ .........चार अवस्था जागृती स्वप्न सुसुप्ति आणि तुर्या अवस्था आज आपण या अवस्था पाहूया ........या अवस्था आपल्या जीवनात काय कार्य करतात, ........पहिली अवस्था जागृती जागृतीत आपण म्हणजे जागेपणी ह्या अवस्थेत आपण सर्व काही दिवसा काम करतो या अवस्थेत सर्व कामे करतो आपण जागेपणी हिला जागृती अवस्था असे म्हटले जाते, ........दुसरी अवस्था स्वप्न अवस्था या अवस्थेत आपण झोपेत फक्त स्वप्न पाहत असतो म्हणून हिला स्वप्नावस्था असे म्हटले जातात मग ते स्वप्नात नको नको ते पाहतो आणि आपल्याला सर्व खरं वाटते पण जागे झाल्यावर ते स्वप्न सर्व नाहीसे होतात आणि मग आपल्याला काही वाटत नाही हिला स्वप्न अवस्था म्हणतात, ........तिसरी अवस्था सुषुप्ती अवस्था ही रात्रि गाढ झोपेची अवस्था आहे याच्यात ना आपल्याला जागे आणि स्वप्न आहे, आपण रात्रि छान शांत निवांत् झोपलो आहोत, जाग झाल्यावर म्हणतो अरे मला त् खूप छान झोप लागली मग छान झोप लागली असं सांगणारा कोण म्हणणारा कोण जाणणारा कोण हा कधी आपण विचार केला का??? .........मग आपल्याला तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाता आलं पाहिजे, एका ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणतात कहे मच्छिंदर सुनरे गोरख तिनो उपर जाना कृपाभायी जब सद्गुरु जी को आप आपको चिना सो ही सच्चा बे सच्चा वो ही गुरु का बच्चा, .........तीनो उपर जाना म्हणजे काय जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था च्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे असं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगत आहे, ........जेव्हा सद्गुरूंची कृपा होईल तेव्हा आप आप को चिना जेव्हा स्वतःच स्वता ला पाहु, तोच खरा गुरूंचा सच्चा बच्चा असं त्यांनी म्हटले आहे, .........या तीन अवस्थांच्या पलीकडे गेल्यावर चौथीची अवस्था आहे तूर्या तुर्या अवस्थेत प्रवेश होतो आणि तुर्या अवस्थेत आपल्याला तिथे काही काळ राहता आलं पाहिजे, आणि त्या अवस्थेत आपल्याला अलौकिक दिव्य असे निर्गुणाचे अनुभव येतात, आणि त्या तूर्य अवस्थेत आपल्याला भगवंती प्राप्ती होते, आणि भगवंती प्राप्ती झाल्यावर आपल्याला पाचवी अवस्था उन्मनी अवस्था जागृत होते, .........उन्मणीच्या सुखा भेटे पांडुरंग भेटे पांडुरंग, उन्मनी अवस्था ही सदैव आपल्या सोबत राहते आणि ते भगवंताचे गुणगान सदैव आपल्याला सांगत राहते आणि या मुखातून भगवंतच बोलत असतो याच्यासारखा सुख सोहळा नाही जगी नाही, ...........म्हणून सद्गुरूंचे चरण पकडा शरण जा सद्गुरु आपल्याला आकाश मार्गाने नेतात आणि अलगद भगवंत जवळ तुम्हाला नेऊन ठेवतात, तुमचे प्रयत्न आणि सद्गुरूंवर विश्वास सद्गुरुना संपूर्ण शरणागती, हीच तुमची उद्धाराची गती ठरते आणि या तिन्ही अवस्था पार करून तुम्ही त्वरित पोहचता तुर्या तून तुम्ही भगवंतप्राप्ती तुम्हाला होते इथे अहंकार गळून पडतो बुद्धि नतमस्तक होते, ............म्हणून काही श्रम करू नका सद्गुरु जे सांगतात ना ते करा ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी छान सांगतात कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिणसी वाया, ..........येथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तू निवांत हो पहिला मग भगवंत कसा प्रसन्न होत नाही बघ मग यासाठी सद्गुरूंनी सांगितल्या मार्गावर चालावे मग तुम्ही निवांत होणार अन्यथा नाही, ...........तुकाराम महाराज असे सांगतात बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार येऊनि अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलीया, ..........निवांत रहा नामस्मरण कर तुझे चित्त शुद्ध कर असे सांगत आहेत मग तुझे चित्तशुद्धी झाल्यावर बघ कसा गोपाळ तुझ्या अंतरंगात येत नाही, .........आपल्याला नामाचा छंद लागला पाहिजे, आपल्याला सद्गुरू स्मरणाचा छंद लागला पाहिजे, सद्गुरूंनी जे काही सांगितले त्या साधना आपण केल्या पाहिजे, सद्गुरूंचे स्मरण करा सर्वात मोठी साधना सद्गुरूंचे स्मरण करणे होय. सद्गुरु वाचोनी नाम न ये हाता साधने साधिता कोटी जाणा संतांचे शरण गेलीया वाचुनी एका जनार्दनी न कळे नाम ........संतांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला नाम कळणार नाही असे एकनाथ महाराज सांगत आहेत, ........मग आता या तीन अवस्थांच्या पलीकडे जायचं की नाही जायचं हे तुम्हीच ठरवा कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓ #🙏गुरु महिमा😇
🙏🏻आध्यात्मिकता😇 - जागृति, स्वप्न, अवस्था सुषुप्ति Quotes Creator जागृति, स्वप्न, अवस्था सुषुप्ति Quotes Creator - ShareChat
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ .........हे परममेश्वरा हे देवा तू कसा आहेस हे देवा तुम्ही आनंदीत तर आहेत् ना, तुला कधी दुःख वाटतं का, तु कधी आजारी पडतोस का - तुलाही कधी रडायला येतं का, .........कारण लोक फक्त तुझ्याकडे फक्त मागायला येतात म्हणून तुलाही वाईट वाटतं का, ..........थोडेच लोक असतील की निरपेक्ष तुला भेटायला मंदिरात येत असतील, निरपेक्ष प्रेम करत असतील, तुझं नामस्मरण करत असतील, ..........आतापर्यंत तर मी असंच बघितले की काही मागायचं असेल काही संकल्प असतील उपास कशासाठी करायचा पोथी पारायण का वाचायचे काहीतरी मागणी असते तरच लोक करतात, म्हणून तुला पण वाईट वाटतं का रे देवा- ..........हो नक्कीच वाटत असणार मला असे वाटते, तू कोणाला सांगणार, तू सर्व सहन करत असतो, सर्व तुझी लेकर आहेत, म्हणुन माफ कसरत असतो, तू तर विधाता आहेस तुला तर सर्व माहित आहे, .......…देवा सर्वांना असेच सतत माफ करत रहा, कारण की मनुष्यप्राणी हा स्वार्थीच आहे, तो फक्त त्याचा भल्याचे पाहत असतो, तो गरज असेल तरच तो माणसांनाही भेटायला जातो, फोन करतो बोलतो गरज संपली की तू कोण आणि मी कोण मनुष्यप्राणी वेळ नुसार वागतो देवा, ...........त्याला वेळ नाही देवा, असा मनुष्य प्राणी आहे, हे परमेश्वरा त्याला काही घेणं देणं नाही कोणाचं मन दुखू दे कोणाचं काही असू दे देवा दुःख संकट आलं की मग फोन करायचा समोरच्याला भेटायचं आणि आनंदीत असलो की तू आणि मी कोण असेच करतात, ............देवा तुमच्याशी असे वागतात तर मनुष्या शी का नाही वागणार असे, वाईट वाटते देवा असं कसं हा मनुष्य प्राणी बनला इतर प्राणी तरी बरे त्यांना तरी समजते, ............दुःख संकट आले काही प्रॉब्लेम जीवनात निर्माण झाले की सर्व देव आठवतात इतर वेळेला आपण सर्व विसरात जीवन जगत असतो, असे न करता आपण इतर वेळेलाही तितकेच आपण परमेश्वराला प्राधान्य पहिले स्थान दिले पाहिजे तरच आपले जीवन सर्वांग सुंदर होईल, ............नी स्वार्थ देवावर प्रेम करा नामस्मरण करा एवढंच सांगेन सदैव स्वार्थ पाहूनच आपल्या भल्याचा विचार करूनच आपण सर्व गोष्टी करत असतो, कोणतेही कार्य निरपेक्ष करा भगवंत सर्व पाहत आहे त्याला सर्व कळतं, .........तुमची परिस्थिती कशी असू दे मनस्थिती मात्र सारखी सदैव चांगली ठेवा, विचार करा जेव्हा आपले काम असते तेव्हा आपण नको नको ते कसमे वादे करतो देवाला आणि नंतर पुन्हा विसरतो, ..........देवा याच्यापुढे मी असं करणार नाही, असं चांगलाच वागीन मी हेच करणार तेच करणार नाही वाईट याच्यापुढे असं होणार नाही, पण पूर्ण बघा तुम्ही विचार करा जर आपलं चांगलं होतं, सर्व वेल सेटल चालू झालं की, ..........पहा तुम्ही पुन्हा तसेच होता आणि पुन्हा परिस्थिती निर्माण होत असते, असे न करता वारंवार परिस्थिती चांगली येवो की वाईट येऊ देवाला धरून रहा, या जगात तुमचे देवाशिवाय कोणी नाही हे त्रिवार सत्य आहे, .........देवाचे गरजे पोटी आठवण काढू नका, सदैव देवाला स्मरणात ठेवा काम झाले की विसरणे हे सर्वात मोठे चुकीचे आहे, असे न करता सदैव त्याच्या स्मरणात रहा चांगले असू दे किंवा वाईट असो आता हे सर्व करणारे तुम्हीच, म्हणुन तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇
🙏कर्म क्या है❓ - हे परमेश्वरा हे देवा तू॰ कसा आहेस , आनंदित तर आहेस ना. 35 Quotes Greator हे परमेश्वरा हे देवा तू॰ कसा आहेस , आनंदित तर आहेस ना. 35 Quotes Greator - ShareChat
🕉️ ​"दोन फुलांची तुलना कधीच होत नाही, कारण प्रत्येकाचा उमलण्याचा काळ आणि सुगंध वेगळा असतो; तसेच माणसाचे आहे, कुणी लवकर यशस्वी होते, तर कुणाला वेळ लागतो, पण याचा अर्थ असा नाही की कुणी कमी किंवा जास्त श्रेष्ठ आहे." ​ 🕉️ ​आपल्याला समोरच्या व्यक्तीचे सुख दिसते, पण त्या सुखासाठी त्याने दिलेली किंमत आपल्याला माहित नसते. ​प्रारब्ध आणि प्रयत्न प्रत्येकाची शिदोरी वेगळी आहे. आपण आपल्या प्रवासाचे मालक आहोत, दुसऱ्याच्या प्रवासाचे प्रेक्षक नाही. 🕉️ ​अपेक्षांचा त्याग - जेव्हा आपण हे स्वीकारतो की "कोणीच कोणाचे नाही", तेव्हा आपण अपेक्षा करणे सोडतो आणि तिथूनच खऱ्या सुखाची सुरुवात होते. 🕉️ ​"आयुष्याच्या या प्रवासात माणसं भेटत राहतील, काही शिकवून जातील तर काही सावरून घेतील. पण शेवटी आरशात दिसणारी व्यक्तीच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे, म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका." ​ 🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓
🙏गीता ज्ञान🛕 - ShareChat
🕉️ ​क्षणभंगुर नाते आणि शाश्वत सत्य ​प्रवास आहे हा आयुष्याचा, इथे मुक्काम कोणाचाच नाही; नशिबाने मिळतात माणसे, पण सोबत कायमची नसतेच काही. ​आई, वडील, सखा, सोबती, प्रवासातले हे केवळ सहप्रवासी; कुणी मधेच सोडून जाते साथ, कुणी उरते फक्त आठवणींच्या पाशी. ​तुझ्या दुःखाचे मोजमाप, करू नकोस दुसऱ्याच्या सुखाशी; प्रत्येकाची वाट वेगळी आहे, इथे तुलना करणेच आहे अज्ञानाची राशी. 🕉️ ​"नाती म्हणजे प्रवासात लागलेली सावली आहे, मुक्काम नाही." 🕉️ ​"स्वतःची तुलना इतरांशी करणे सोडा, कारण प्रत्येकाच्या संघर्षाचा सूर्य वेगळ्या वेळी उगवतो." 🕉️ ​"माणसं जोडत राहा, पण अपेक्षांचे ओझे टाळून; कारण शेवटी प्रवास प्रत्येकाला एकट्यानेच करायचा आहे." ​ 🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
🙏कर्म क्या है❓ - मैं दिखता 7. पर देखता सब हूँ मैं दिखता 7. पर देखता सब हूँ - ShareChat
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ .....…...तुमची आंतरिक शक्ती ओळखा तुमच्यात एक अशी ऊर्जा आहे पण ती आपल्याला माहित नाही कारण की तुम्ही कधी पाहतच नाही, आपल्या अंतरिक शक्ती जागृत करा, आपण आपल्या शरीराकडे कधीच पाहत नाही ...….…...आपण आपल्या अंतरंगात कधीच डोकावत नाही, आपल्या अंतरंगात एक डॉक्टर लपलेला आहे वैश्विक, आपल्याला बरं करण्याची सामर्थ्य आपल्यात आहे, आपण कधी श्वासाचा अभ्यास करत नाही आपण सतत नामस्मरण करत नाही, ....…....आपण कधी ध्यान करत नाही आपण कधीच जी सत्संगती टिकवून कायम धरून ठेवत नाही, कधी देवाचे गाणे म्हणत नाही व्यायाम करत नाही सकाळी लवकर उठत नाही कधी सूर्याला नमस्कार करत नाही, ... ......उठल्यावर आपण पृथ्वी मातेचा नमस्कार करत नाही, उठताना आपला नाकातला नाकपूड़ितला कुठला श्वास चालू आहे हे पाहत नाही, आपण बेसावध जीवन जगत असतो, ....…….जेव्हा तुम्ही झोपेतून उठता पहिले आपण काय करतो मोबाईल पाहतो तर मोबाईल न पाहता आपल्या तळ हाताचे दर्शन घ्यावे त्या डोळ्यांना लावावे आपली कुठली नाकपुडी चालू आहे, जी नाकपुढी चालू आहे त्या साइट च्या गालावर हात फिरवून पृथ्वीमातेचा नमस्कार करून ज्या नाकपुढीतून श्वास चालू आहे, ....…...तोच पाय आपण जमिनीवर ठेवावा याच्यातून आपल्याला आपण पृथ्वी मातेचे शी ऊर्जे शी कनेक्ट होतो, आपल्याला आंतरिक ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. ..........सर्वांना धन्यवाद द्या उठल्यावर झोपताना सर्वांना धन्यवाद द्या आभार माना सर्वांना माफ करा क्षमा करा जेव्हा तुम्ही असे करता त्यावेळेला भगवंत तुम्हाला माप आणि क्षमा करत असतो, सदैव बोला माझे शरीर निरोगी व आनंदी आहे सशक्त आहे, ....……..माझ्या सर्व पेशी तेजस्वी आहेत मला कधीही आजार पण येत नाही, माझे कधीही डोके दुखत नाही मी सदैव नामस्मरण करते सतत चांगले चांगले बोलत रहा स्वतःला प्रसन्न ठेवा चांगले कपडे घाला सुंदर रहा देवाच्या स्मरणात रहा सद्गुरूंच्या स्मरणात रहा तुम्ही जे फीडिंग कराल, .. ......तेच तुम्हाला रिटर्न मिळेल कारण की तुम्ही जे मागता तुम्ही जे करता तेच तुम्ही होता तुमची मागणी संपूर्ण विश्व पूर्ण करत असतो, मागणी करताना नेमकं काय मागायचं, विचार करताना नेमका कोणता विचार करायचा, ....…....तुम्ही जीवन कसे जगत आहात, तुम्ही जे जगता तेच तुम्ही होता तुम्ही जे पाहता तेच तुमचे जीवन असतं, तुम्ही जे करता तेच तुमचे जीवन असतं, तुमच्या अंतरंगात प्रचंड दिव्यशक्ती आहे आणि ती तुम्हाला सदैव तथास्तु म्हणत असते, जसा तू तसा तसाच तू ....…...तुमच्या अंतरिक्षक्ती ओळखा प्रत्येक सेकंदाला तुमच्या नवीन पेशी शरीरातल्या जन्माला येत असतात आणि मरत असतात म्हणून कोणताही आजार कायमस्वरूपी राहत नाही, ..........सदैव स्वताला म्हणा मी खूप आनंदी आहे प्रसन्न आहे, माझ्या हृदयात ईश्वर आहे, माझ्यासोबत माझे सद्गुरु आहेत, चला मग आपण स्वतःचे अंतरिक्षक्ती जागृत करूया स्वतःला ओळखू या आणि ऊर्जावान बनुया आता हे करायचं की नाही करायचं हे तुम्हीच ठरवा कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓
🙏गुरु महिमा😇 - तुमची आंतरिक शक्ती 3lI. 3' Quotes Creator तुमची आंतरिक शक्ती 3lI. 3' Quotes Creator - ShareChat
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ जीवन अतिशय सुंदर आहे, कोणत्याही एका झाड़ाला पकड़ा त्या झाडाची एकच फांदी पकड़ा व मस्त आनंदाने झोंका घ्या, तसेच तुम्ही जीवनात दोन अवस्था जगु नका, एकच एक पूर्ण अवस्था जगा जसे तुम्ही सत्संगात जाता, सत्संगात गेले की चांगले वाटते, पण दुसऱ्या क्षणाला बाह्य जग चांगले वाटते, ह्याला द्वैत अवस्था म्हणतात, तर असे करू नका मग तुम्हला काहीही भेटणार नाही, बाहेर तर काहीच मिळणार नाही, फक्त जीवन मरेपर्यंत राहील, पुढचे जीवन निश्चितच राहील व पुढचा जन्म तुम्हाला कसा मिळतो हे तुम्ही सांगू शकत नाही, तुम्हाला सर्व काही सुख सुविधा या जन्मात मिळालेले आहे, तेच पुढच्या जन्मात मिळणार असे होणार नाही, तुम्हला विश्वास आहे का??? मला ह्या जन्मात जे सर्व चांगले मिळाले तेच पुढच्या जन्मात मिळेल, अशी गॅरंटी तुमच्याकडे आहे का???? याची कल्पना करून बघा कसे आपले जीवन असेल, मी काय काय कर्म केले आहेत आणि त्या कर्मानुसार माझे जीवन कसे असेल याची कल्पना आपण लावू शकत नाही????? कारण की कोणते कर्म चांगले आणि कोणते वाईट याचं गणित आपण काढू शकत नाही, हा जन्म खूप आपला चांगला गेला पूर्व पुण्याईने पुढचा जन्म असाच चांगला असेल कशा वरुन?????? मग ह्याच जन्मात का नको छान जगून घ्यावं ह्या जन्मात का नको भगवंत प्राप्ती, संत आपल्याला अनमोल असे संदेश देऊन गेले आहेत, विचार करा सर्व संतांनी मुक्त कंठाने गायले आहे की भगवंत पहा भगवंत पहा सदैव भगवंताचे गुणगान केले का केले भगवंताचे गुणगान, का एवढे पुस्तकं ग्रंथ का सर्व संत लिहून गेलेत का भगवंतांनी गीता सांगितली, आजही सर्व संत साधू तेच सांगत आहे की तुमचा जन्म कशासाठी झाला आहे त्या देवाला पहा पाहण्यासाठी झाला आहे, आपल्याला कळत पण वळत नाही, मेल्यावर सर्व स्तुती करतात किती वाईट माणूस असला तरी त्याची स्तुती होते, पण जिवंतपणे त्या परमेश्वराला पाहून समाज सेवा राष्ट्र सेवा विश्व असे जो शुद्ध आचरण करून जीवन जगतो तोच खरा महान, त्याचे जीवण खरं तो जगला असे समजावे, त्याच्या जीवनाचे सोने करून घेतले जीवन धन्य केले. मग आता तुम्हीच विचार करा आपला जन्म कशासाठी व आपल्याला जीवन द्वैत जगायचे की एकाच पाकामध्ये मुरुन मोरांबा बनायचे, कारण तुम्हीच हात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇
🙏🏻आध्यात्मिकता😇 - द्वैत जीवन जगू नका 35 Quotes Creator द्वैत जीवन जगू नका 35 Quotes Creator - ShareChat