Lok Hind News
ShareChat
click to see wallet page
@lokhindnews
lokhindnews
Lok Hind News
@lokhindnews
मुझे ShareChat पर फॉलो करें!
**अंबरनाथ नगरपरिषद कर्मचारी भरतीत मराठी भाषिक उमेदवारांनाच प्राधान्य द्या;* नगरसेवक सुभाष साळुंखे यांची मागणी *प्रतिनिधी ब* तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/s3LcjE #🏛️राजकारण
🏛️राजकारण - ShareChat
*अंबरनाथ नगरपरिषद कर्मचारी भरतीत मराठी भाषिक उमेदवारांनाच प्राधान्य द्या;* नगरसेवक सुभाष साळुंखे यांची मागणी *प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट* अंबरनाथ नगरपरिषदेच्या विविध विभागांतील कर्मचारी भरतीमध्ये केवळ मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या आणि स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक आणि शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष नारायण साळुंके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले आहे. सुभाष साळुंके यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयांचा (जीआर) दाखला दिला आहे. शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 'गट क' आणि 'गट ड' संवर्गातील पदांवर नियुक्तीसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे कायदेशीररीत्या बंधनकारक असल्याचे साळुंखे यांनी नमूद केले आहे. "अंबरनाथ हे मराठी बहुल शहर आहे. नगरपरिषदेत नागरिक तक्रारी, दाखले किंवा कर वसुलीच्या कामासाठी येतात. अशा वेळी तेथील कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होते. यामुळे शासनाच्या मराठी भाषा धोरणाची पायमल्ली होत आहे," असे साळुंखे यांनी निवेदनात म्हटले आहे. * अंबरनाथ नगरपरिषदेतील अनुकंपा, वारस नियुक्ती, सरळसेवा भरती आणि कंत्राटी/हंगामी पदभरतीमध्ये मराठी भाषिकांनाच संधी द्यावी. * केवळ मराठी भाषा उत्तम प्रकारे अवगत असलेल्या उमेदवारांनाच नियुक्ती पत्र देण्यात यावे. * स्थानिक रहिवाशांच्या हिताचे रक्षण करणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य असून त्यानुसार तात्काळ कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी (ठाणे), विभागीय आयुक्त (कोकण विभाग) आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना देखील माहितीसाठी पाठवण्यात आले आहे. आता नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे अंबरनाथकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
**पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि 'निर्भीड जागल्या' पुरस्काराने सन्मानित** *मुंबई:* मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार * तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/L8UaY1 #batmi
batmi - ShareChat
*पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि 'निर्भीड जागल्या' पुरस्काराने सन्मानित** *मुंबई:* मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आणि 'आदर्श वार्ताहर' पाक्षिक व न्यूज पोर्टलचे संपादक पंकजकुमार पाटील यांच्या शिरपेचात मानाचे दोन नवे तुरे रोवले गेले आहेत. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या दोन वेगवेगळ्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये त्यांना 'समाजभूषण' आणि 'निर्भीड जागल्या' हे दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये 'आर्यारवी एंटरटेनमेंट' प्रस्तुत चौथ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील दिग्गजांना कलाभूषण, रंगकर्मी आणि समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पत्रकार पंकजकुमार पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 'समाजभूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मुख्य आयोजक अभिनेते-दिग्दर्शक महेश्वर तेटंबे, ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, गझल नवाझ भीमराव पांचाळे, ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवकुमार, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर (आप्पा) तोडणकर, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, ॲड. सुनील शिर्के आणि अभिनेत्री सिद्धी कामत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या वतीने 'कालप्रवाह' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर येथील मामा काणे हॉटेल सभागृहात संपन्न झाला. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधु शिरोडकर यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री उदय देशपांडे, 'दै. नवशक्ती'चे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याच सोहळ्यात पंकजकुमार पाटील यांना पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते दिलीप दळवी पुरस्कृत **"निर्भीड जागल्या"** पुरस्कार प्रदान करण्यात आला. कांजूरमार्ग (मुंबई) येथील रहिवासी असलेले पंकजकुमार पाटील गेली २० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांतून परखड लेखन केले आहे. 'आदर्श वार्ताहर' या आपल्या पाक्षिकाच्या माध्यमातून ते सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. यापूर्वीही त्यांना अनेक संस्थांकडून उत्कृष्ट पत्रकारितेचे पुरस्कार मिळाले आहेत. २०२६ च्या सुरुवातीलाच 'पत्रकार दिनी' त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर आता पुन्हा दोन पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
अभिनंदन #🏛️राजकारण #👉शरद पवार
🏛️राजकारण - D.Y FOUNDATION बारामती पोटनिवडणूक विज्यबद्षव निवडणुकीतील ऐतिहासिक महाराष्ट्रातील राष्ट्र्वादी  कॉँग्रेसच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रा अजित पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! दयानंद मोतीराम चोरघे अध्यक्षः डी॰ वाय. फाउंडेशन https:| xcom/thaneruraldcc] https:| /www facebookcom/share/1AYuYSKRfBA D.Y FOUNDATION बारामती पोटनिवडणूक विज्यबद्षव निवडणुकीतील ऐतिहासिक महाराष्ट्रातील राष्ट्र्वादी  कॉँग्रेसच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रा अजित पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! दयानंद मोतीराम चोरघे अध्यक्षः डी॰ वाय. फाउंडेशन https:| xcom/thaneruraldcc] https:| /www facebookcom/share/1AYuYSKRfBA - ShareChat
*बदलापूर पालिकेत 'टक्केवारी'चा खेळ, अधिकाऱ्यावर एसीबीचा गुन्हा! तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻* https://shuru.co.in/dl/zVxdY3 #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ - ShareChat
ठाणे:बदलापूर नगर पालिकेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 6 टक्के लाचेची मागणी केली. रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितल्याचं सांगितलं जातंय.या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकाऊंटन्ट विकास चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेतील कंत्राटदारांकडे बिले देण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जात होती, असे आरोप होते. ही माहिती उघडकीस आल्यावर संबंधीत अधिकाऱ्याला कामावरून काढूनही टाकले होते.दरम्यान, तक्रारदार व्यक्ती त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून रस्ते बांधणीचं काम करते. त्यांना बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण 77 विकासकामांचे कंत्राट मिळाले आहे. याद्वारे त्यांची कामेही जोरात सुरु आहेत. परंतु, या कामांपैकी दोन देयकांची 17 लाख 44 हजार रुपये, तसच पूर्वी केलेल्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम (Security Deposite) 4 लाख 99 हजार रुपये,अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती.या रक्कमेच्य मोबदल्यात 6 टक्के प्रमाणे 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी केली होती, अशी माहितीही तक्रारीत होती. त्यानंतर तक्रारदाराने या लाचेच्या मागणी विरोधात 9 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीनं पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून 6 टक्के रक्कमेची मागणी केल्याचे उघडकीस आले,अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
बातमी #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ - subscribe to My Channel लौक हिँद लोक हिंद EDITOR: MAHESH DHANKE subscribe to My Channel लौक हिँद लोक हिंद EDITOR: MAHESH DHANKE - ShareChat
*तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻* https://shuru.co.in/dl/KBh7NN #बातमी
**उल्हासनगरमधील डंपिंग ग्राउंडविरोधात जनआंदोलन तीव्र; साईं हीरालालजी यांच्याकडे समितीचे नेतृत्व** *प्रतिनिधी बाळकृष्ण आल्ह तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻* https://shuru.co.in/dl/zjojpc #न्युज अपडेट
न्युज अपडेट - ShareChat
*उल्हासनगरमधील डंपिंग ग्राउंडविरोधात जनआंदोलन तीव्र; साईं हीरालालजी यांच्याकडे समितीचे नेतृत्व** *प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट* उल्हासनगर कॅम्प ५ मधील बेकायदेशीर डंपिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. सोमवार, ४ मे रोजी संत प्रभाराम मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत, या प्रश्नावर लढा देण्यासाठी एका नवीन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा साईं वसनशाह दरबारचे **साईं हीरालालजी** यांनी सांभाळावी, अशी विनंती सर्व सदस्यांनी केली. २०१७ पासून कॅम्प ५ परिसरात हे डंपिंग ग्राउंड बेकायदेशीरपणे सुरू आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी आणि धुराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या बैठकीत डंपिंग ग्राउंड तातडीने हटवण्याची आग्रही मागणी करण्यात आली. तसेच, मृत प्राण्यांना उघड्यावर न टाकता त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र 'शवदाहिनी' उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही समितीने केली आहे. या बैठकीत उपस्थित सदस्यांनी संताप व्यक्त करत, या प्रदूषणास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळेच सामान्य नागरिकांना या नरकयातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप समितीने केला. या मोहिमेला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत प्रकाश गोविंदराम लुंड (पिकी), मनीष नारा, राजकुमार कुकरेजा, राजेश चांगलानी, विजय वाधवा, मनीष ठाकूर, रॉकी शर्मा, नरेश आहुजा, निल शर्मा, जैकी सुखेजा आणि शशिकांत दायमा यांचा समावेश आहे. आगामी काळात ही समिती लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रदूषणमुक्तीसाठी व्यापक मोहीम राबविणार आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
#माझी पहिली पोस्ट ✌ मय happy family
माझी पहिली पोस्ट ✌ - ಫಳ 8 ಫಳ 8 - ShareChat