महेश शिवाजी धानके
ShareChat
click to see wallet page
@mahesh_dhanke
mahesh_dhanke
महेश शिवाजी धानके
@mahesh_dhanke
माजी उपसभापती : अध्यक्ष: शहापुर तालुका काँग्रेस
*NEET गैरप्रकारात लातूरच्या 'RCC' संस्थापकाला अटक, 'पॅटर्न'वर प्रश्नचिन्ह?* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/jwXyTq #shurubreking #news #breaking news
shurubreking - ShareChat
लातूर : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा गैरप्रकार प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे लातूरच्या बहुचर्चित ‘लातूर पॅटर्न’वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट परीक्षा गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून, तपासादरम्यान समोर आलेल्या काही धागेदोरांवरून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र तपास यंत्रणेकडून अधिकृतपणे सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. लातूर हे राज्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीचे मोठे शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. हजारो विद्यार्थी दरवर्षी येथे कोचिंगसाठी दाखल होतात. अशा परिस्थितीत नामांकित कोचिंग संस्थेच्या संचालकावर झालेल्या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणानंतर शहरातील खासगी कोचिंग संस्थांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत, तर काही जण तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, या घडामोडींमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होऊ नये, अशी भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. ‘लातूर पॅटर्न’ने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले असले तरी अशा घटनांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेने जातो आणि आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*महागाईने नागरिक त्रस्त, मोदींनी मागितले 'समर्पण'!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/A0Z14D #breaking news #news #shurubreking
*ठाण्यात नाल्यात विषारी रसायने, कुणाचा जीव घेणार?* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/4KqJZb #shurubreking #news #breaking news
*अकोल्यात रात्री थरार: तरुणावर धारदार हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/gsabLg #breaking news #news #shurubreking
breaking news - ShareChat
अकोला: अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात काल रात्री एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीची भीती आणि खळबळ उडाली आहे. राहुल सारासर असे मृत तरुणाचे नाव मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल सारासर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री साधारण साडेआठ ते पाऊण वाजेच्या सुमारास अलंकार मार्केट परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी राहुलवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात राहुल गंभीररित्या रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पीआय) खंडारे यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या राहुलला तातडीने उपचारासाठी जवळच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. जुन्या वादातून हत्येचा संशय; पोलिसांकडून तपास गतिमान या घटनेची गांभीर्य लक्षात घेता रामदास पेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे पथक तात्काळ तपासात गुंतले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून विविध पुराव्यांची गोळाबेरीज केली जात आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसले, तरी हा खून जुन्या वादातून झाला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. "हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून, त्यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील," अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*मोदींच्या अपीलनंतर केजरीवालांनी मागितले स्वस्त रशियन तेल!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/N9Nv7g #shurubreking #breaking news #news
*ठाण्यात ५० गुणवंतांचा गौरव, हृदयस्पर्शी मदतीने निरगुडकरही भावुक!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/xnpX1J #news #लोक हिंद न्युज #breaking news #shurubreking #लोक हिंद
news - ShareChat
ठाणे: ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ , लोक हिंद चॅनल,जनक्रांती संघटना, साप्ताहिक शिवमार्ग व डी वाय फाउंडेशन यांच्या वतीने शिवप्रतिपाचार्य डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला लोक हिंद गौरव राज्य पुरस्कार सोहळा ठाणे शहरातील ज्ञानराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ आयटी तज्ञ व झी 24,तास ,IBN लोकमत वाहिनीचे माजी संपादक उदय निरगुडकर आणि आवाज महाराष्ट्राचा फेम महेश कंटे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 व्यक्तींचा सन्मान चिन्ह सन्मानपत्र सुवर्णपदक , ज्ञानेश्वरी ग्रंथ,पुरस्कार पट्टा पुष्प गुच्छ सह लोक हिंद गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लोक हिंद चॅनल च्या वतीने किसन बोंद्रे यांनी प्रेक्षकांना भावनिक आवाहन केल्यानंतर कल्याण - मुरबाड रोडवर अपघातात मृत पावलेल्या मुरबाड तालुक्यातील तीन भावंडांच्या एकमेव बहिणीस सुमारे एक लाखापर्यंत रक्कम जमा करून देण्यात आली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर म्हणाले की मी पुरस्काराचे अनेक कार्यक्रम पहिले असून हा पुरस्कार सोहळा भावनिक व अस्सल ग्रामीण उदात्त संस्कृतीचा ओलावा असणारा आहे, आत्तापर्यंत शहापूर मुरबाडची ओळख निसर्गाने नटलेला एवढीच होती मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून या तालुक्यातील माणसे व त्यांचा दिलदारपणा ओळखता आला, पुरस्कार प्राप्त व्यक्ती खरोखरच आदर्श असून यापुढे लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळे अधिक भव्य दिव्य व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा लाडका गायक आवाज महाराष्ट्राचा फेम महेश कंटे याने भावगीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक महेश धानके यांनी केले.तर नगरसेवक राजेश मोरे, मुरबाडचे माजी उपसभापती उल्हास बांगर यांनी कार्यक्रमाचे आयोजक महेश धानके व किसन बोंद्रे यांचे भरभरून कौतुक केले.शिवक्रांती प्रतिष्ठानचे डॉक्टर राजू चौधरी यांनी मराठी माणसाचे स्फूल्लिंग जागवण्यासाठी शिवमंदिर बांधले असून शिव मंदिराला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी किशोर ठाकरे, अजित मराठे,धीरज सांबरे ,स्वप्नजा जाधव, किसनराव तारमळे ,प्रकाश कंटे,भानुदास भोईर,सुरेश बांगर, तुकाराम बांगर,परशुराम पितांबरे अशोक घोलप, प्रथमेश आकरे, पी एन पाटील, एन ए कदम, दशरथ हरड ,विजय जाधव ,गजानन व्यापारी, खंडू शेठ चौधरी, गुरुनाथ निपुर्ते ,लहुजी देसले, जैतू दादा भोईर ,सागर राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सुमारे 50 व्यक्ती व संस्थांना लोक हिंद गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोक हिंदचे कार्यकारी संपादक लक्ष्मण घरत, उपसंपादक संतोष ठाकरे, रायगड जिल्हा निवासी संपादक नवज्योत पिंगळे, पालघर जिल्हा निवासी संपादक मकरंद बात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोक हिंद गौरव पुरस्काराचे हे नववे वर्ष असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी पुरस्कार सोहळा अतिशय भव्य दिव्य व उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*धुळ्यात महागाईचा भडका, शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/hlQ0wF #shurubreking #breaking news #news
*पोलिसांपासून १० फुटांवर गांजाचा अड्डा? बुलढाण्यात अल्पवयीन मुले बळी!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/4ml9UY #लोक हिंद न्युज #लोक हिंद #news #breaking news #shurubreking
लोक हिंद न्युज - ShareChat
खाकीच्या नाकाखाली मृत्यूचा खेळ ! धाड येथील शासकीय विश्रामगृहात गांजाचा उघडानागडा थरार; 'दखल २४ दखल न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावातील शासकीय विश्रामगृहातून (Rest House) एक अत्यंत धक्कादायक, खळबळजनक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. ज्या विश्रामगृहाच्या अवघ्या १० फुटांवर पोलीस स्टेशन आहे, तिथेच पोलिसांच्या नाकाखाली सतरा ते अठरा वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुले सर्रास गांजा ओढताना आणि अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळत आहेत. ​या विस्तीर्ण परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि दाट झाडाझुडपे आता नशेड्यांचे मुख्य नंदनवन बनले आहे. 'दखल २४ न्यूज'चा थेट सवाल आणि थेट आरोप- या कोवळ्या मुलांपर्यंत हा गांजा सप्लाय करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे? अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलीस असतानाही यंत्रणा गप्प का? ​स्थानिक प्रशासन आणि पोलीस या गुन्हेगारी प्रवृत्तीचा तात्काळ बिमोड करणार का? पाहा हा विशेष पोलखोल रिपोर्ट! ​#BuldhanaNews​ #DhadNews​ #CrimeNews​ #BreakingNews​ #Dakhal24News​ #DrugMenace​ #MaharashtraPolice​ #BuldhanaPolice​ #SocialIssue​ #AlertNews
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*भोजशाळा 'हिंदू मंदिरच'! शतकांचा दावा जिंकला, 'काशी-मथुरा बाकी' चा नारा* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/kLsOCT #shurubreking #breaking news #news #लोक हिंद #लोक हिंद न्युज
shurubreking - ShareChat
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक 'भोजशाळा' हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे. हा निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि परकीय इस्लामी आक्रमकांनी अतिक्रमित केलेल्या मंदिरांच्या मुक्ती लढ्याचा भव्य विजय आहे. भोजशाळेच्या मुक्तीचा लढा आज यशस्वी झाला असला, तरी या संघर्षात मोठा सहभाग हा “भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे” प्रमुख श्री. नवलकिशोर शर्मा आणि हिंदु जनजागृती समिती यांचा होता. समिती या ऐतिहासिक निर्णयाचे सहर्ष स्वागत करते आणि '...अब काशी-मथुरा बाकी हैं!' ची संकल्प घोषणा करत आहे. हिंदु जनजागृती समितिचे आंदोलन आणि हिंदु अधिवेशनाची फलश्रुती ! धार येथील भोजशाळेच्या मुक्तीसाठी हिंदु जनजागृती समितीने केवळ रस्त्यावर आंदोलने केली नाहीत, तर राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनजागृती केली. गोवा येथे होणाऱ्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) या राष्ट्रीय व्यासपीठावरून दरवर्षी या संदर्भात कायदेशीर आणि धोरणात्मक ठराव मंजूर करून लढ्याची दिशा ठरवली. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडे याविषयी सातत्याने दाद मागितली होती. आज न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावनांना आणि समितीच्या प्रदीर्घ आंदोलनाला न्याय मिळाला आहे.या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी स्पष्ट केले की, भारतातील हिंदूंची केवळ एक-दोन देवस्थाने आक्रमित झालेली नाहीत. परकीय आक्रमकांनी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या सहिष्णुतेचा फायदा घेऊन हजारो मंदिरांवर अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आणि त्यावर स्वतःचा खोटा अधिकार सांगितला. अयोध्या आणि धार (भोजशाळा) येथील निकालांनी हे सिद्ध केले आहे की, असत्याचा बुरखा फार काळ टिकत नाही. आता वेळ आली आहे की काशीच्या ज्ञानवापीपासून ते मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंतची सर्व आक्रमित क्षेत्रे मुक्त झाली पाहिजेत."
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*कल्याणच्या मातोश्रीनगरमध्ये उजळले रस्ते, नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/YSjFbW #news #breaking news #shurubreking
news - ShareChat
​कल्याण : कल्याण पूर्व विजय नगर प्रभागातील मातोश्रीनगर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण नुकतेच दिमाखात संपन्न झाले. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या हस्ते या दिव्यांचे अनावरण करण्यात आले. या नवीन प्रकाशयोजनेमुळे मातोश्रीनगरचा परिसर आता प्रकाशमान झाला असून स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मातोश्रीनगर भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून शिवसेना उपविभागप्रमुख आणि समाजसेवक सुमेध हुमणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, प्रशासनाकडून या ठिकाणी आधुनिक पथदिवे बसविण्यात आले आहेत. ​ लोकार्पण प्रसंगी बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांना आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. पथदिव्यांमुळे केवळ रस्ते उजळणार नाहीत, तर परिसरातील सुरक्षितता वाढण्यासही मदत होईल. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आगामी काळातही अशी लोकोपयोगी कामे सुरूच राहतील. ​ या कार्यक्रमाला शिवसेनेचे विविध पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मातोश्रीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सुमेध हुमणे यांचे विशेष आभार मानले. अंधारामुळे रात्रीच्या वेळी चोरीच्या घटनांची किंवा अपघाताची भीती वाटायची, मात्र आता पथदिव्यांनी परिसर उजळून निघाल्याने मोठी सोय झाली आहे, अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा