#😊ओरिजिनल शुभेच्छा #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून हळवा कोपरा...
✍️ mangaltanajipatil220@gamil.com
सगळीकडेच मोबाईल संभाषणात शांतपणे पलीकडून विचारले जाते, कशी आहेस?...
प्रश्र्न तसा हलकासा वाटतो पणं उत्तर मात्र नेहमीच एकच असते,ठीक आहे...
मनाची काय स्थिती आहे माहीत नसते.तरीही सारं दडवून हसत उत्तर दिले जाते.मनातील शब्द तोंडातून बाहेर पडायला धडपडत असतात, पणं जगाला सवय असते वरवर ऐकायची...
कधी कधी रात्री मीच विचारते स्वतःला खरंच तूं ठीक आहेस ना? मग हळूच उत्तर येते तूं ठीक नाहीस,ठीक असण्याचे नाटक करतेस...
तरीही खरंच तू मजबूत आहेस, कारणं आता कोणतेही वादळ पेलून मनाला स्थिर कसे करायचे हे तुला समजले आहे म्हणुनच तू सारे सहन करत परतीचा प्रवास करत आहेस...
सारं संपतं चाललेलं असताना दूरवर अंधुक चाहूल लागते, प्रवास हा शेवटचा टप्पा,तिथून सारं कसं शांत कुठेही कोणताही प्रश्न नसणार उद्याची काळजी नाही स्थिर आणि शांत मन देहाच्या कूडीतून अलगद बाजूला होणार जिथे द्वेष, मत्सर, मोहमाया नाही सारं कसं शांत शांत नाही कां?...
कधी कधी हा प्रवास लवकर संपावा वाटत राहतं,कोणावर कोणताही भार नसावा.दुखण्या खुपण्यात सुध्दा कोणी सोबत नसले तरी कोणाचं उपकाराचं ओझं नसावं, कारणं थोडं थोडक केले तरी लोक बोलून दाखवितात.तसं पाहिले तर जगणे सगळ्यांचं सारखंच असतं, कोणी अच्छाद तर जाणार नाही.पणं एक म्हणं आहे,जात्यातले दाणे भरडत असताना,सुपातले मात्र हसतात, कां तर कसा भरडायला लागला असे म्हणून पणं यांच्या नंतर आपला नंबर आहे मात्र विसरतात ..
जीवन क्षणभंगुर आहे आजचा क्षण कदाचित उद्या असेल किंवा नसेल ही त्यामुळे कोणावर दुस्वास न करता जगून घ्या.मरण तर सगळ्यांसाठीच अटळ आहे.एखाद्यासाठी काय करता आले तर कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाने करा.कदाचित ह्याचं कर्माने तुमचा पुढील प्रवास सुलभ होईल...🙏