❤🚩शिवभक्त🚩❤
ShareChat
click to see wallet page
@mangesh5663
mangesh5663
❤🚩शिवभक्त🚩❤
@mangesh5663
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१४ फेब्रुवारी इ.स.१६५८* *औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र* *'छत्रपती शिवाजीचे मान्यतेसाठीचे विनंती पत्र आपल्या शाहजाद्याला आले, त्यामुळे त्याच्यापासुन आपल्याला संकट नाही',असा विचार करुन असावधानतेने जुन्नरमध्ये बादशाही सैनिक गाढ झोपलेले होते. राजांनी डाव साधला.२३ एप्रिल १६५७ रोजी वरील पत्राचे प्रकरण झाले आणि अवघ्या सात दिवसात ३० एप्रिल १६५७ रोजी राजांनी अचानक जुन्नर वर हल्ला केला. वैशाख कृ. द्वितीयेची ती रात्र मावळ्यांनी जुन्नरच्या परकोटाला दोराच्या शिड्या लावल्या, मावळे आत शिरले. पहारेकऱ्यांना मारुन त्यांनी लुटिस सुरवात केली आणि राजांनी जुन्नर लुटली. ३० एप्रिल १६५७ रोजी जुन्नर लुटून २०० घोडे, ३ लाख होन नगद, कापड, जडजवाहीर घेऊन महाराज स्वराज्यात म्हणजे चाकणला परतले. याच वेळी औरंगजेब बीदर जिंकून कल्याणीस वेढा टाकण्यास निघाला होता. वाटेतच त्याला 'ही' बातमी समजली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कार्तलबखनास जुन्नरच्या बंदोबस्तसाठी व होशेदारखान, रायकरणसिंह, रायसिंह, शाएस्ताखान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना सरहद्दीवर रवाना केले. व त्यांना कडक हुकुम दिले, 'छत्रपती शिवजीच्या मुलुखांतील गावे जमीनदोस्त करा. लोकांच्या कत्तली उडवा! दयामाया दाखवु नका! त्यांचे सर्वस्व लुटून आणा! पुणे व चाकण ही छत्रपती शिवाजीची ठाणी धुळीस मिळवा! आपल्या मुलुखांतील जे कोणी शिवाजीला सामील असतील त्याची सरसहा मुंडकी उडवा!' पण कार्तलबखन जुन्नरकडे पोहचेल तोपर्यंत महाराज लूटिसह निघुन गेले होते. नंतर त्यांनी ४ जुन १६५७ रोजी मुघलांच्या ताब्यातील अहमदनगरवरही हल्ला चढवुन लुटालूट केली व तिथे युद्धही खेळले.* *हे असे होणार हे महाराजांना माहित होतेच. त्यांनी आपला धूर्त व बिलंदर वकील रघुनाथपंत कोरडे याला औरंगजेबाकडे रवाना केले. कश्यासाठी? तर, जुन्नर व अहमदनगर येथील लूटीबाबत पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी! माफी मागण्यासाठी!* *पंत औरंगजेबाकडे गेले. अत्यंत पश्चात्तापी मुद्रेने त्यांनी माफी मागितली. पण चुकुनही, 'आम्ही आपली लूट परत करतो' असे शब्द उच्चारले नाहीत! औरंगजेबाने राजांना माफ केले. त्याला कारणही तसेच होते. त्यावेळी मुघल बादशहा शहाजहान हा आजारी होता. आणि मुघलीया सल्तनतीच्या शाही रीवाजाप्रमाणे बाप आजारी पडला, म्हणजे त्याचे मूलं फार काळजी करत. कश्याची ? तर, आपला बाप मरण्याच्या आतच आपल्याला गादी कशी मिळेल याची! त्यामुळे औरंगजेबाला दख्खनमधून आग्र्यात जायचे वेध लागले होते. म्हणून ही माफी! त्याने राजांना पत्रही लिहीले, 'तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांज बरोबर जी पाविलीत ती आम्हास पावली. मजकूर ध्यानांत आला. तुम्हीं केलेलीं कृत्यें विसरण्याजोगीं नाहीत. तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाहीं हे तुम्ही जाणलेत. आता मनात तुमची सर्व नजर निभ्रांतपणे आमचेच ठायी आहे, हे आम्ही जाणून तुमच्या कृत्यांबद्दल कांहीही मनात किल्मिष ठेवीत नाही. तरी तुम्ही याबद्दल संतोष मानुन असावें. आमचे लोभाची पूर्तता समजावी.'* *या पत्रावर तारीख होती जखर १ हिजरी १०६८ म्हणजेच दि १४ फेब्रुवारी १६५८.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ फेब्रुवारी इ.स.१६६६* *औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ फेब्रुवारी इ.स.१६७१* *( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९२, संवत्सर साधारण, मंगळवार )* *दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली :-* *होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवूनच साजरा करीत असत. या वेळेची शिकार होती मेहेरूफ-ए-जंजिरा! याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिऱ्यातच गुंतले होते. जंजिऱ्याच्या आजूबाजूचा दंडाराजापुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम, सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत यांनीसुद्धा दंडाराजापुरी मराठ्यांकडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्रमार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली. या दिवशी दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ फेब्रुवारी इ.स.१७५५* *रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८)* *नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते. वयाच्या बाराव्या वर्षी कान्होजी भोसले (चुलता) याने त्यास सांभाळण्यासाठी वऱ्हाडात नेले. तेथून तो शाहू छत्रपतींच्या चाकरीत साताऱ्यास आला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ फेब्रुवारी इ.स.१७५७* *इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले* *मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी ५७ चे इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र पहा -* *“आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ फेब्रुवारी इ.स.१७६३* *माधवराव निजामाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा मधल्या काळात पुण्यातही काही घटना घडून गेल्या होत्या. फाल्गुन शु. द्वितीया शके १६८४, चित्रभानुनाम संवत्सरी सोमवारी म्हणजेच दि. १४ फेब्रुवारी सन १७६३ रोजी विश्वासराव पेशव्यांच्या विधवा पत्नी लक्ष्मीबाई शनिवारवाड्यात मृत्यू पावल्या. विश्वासराव गेल्यानंतर त्यादेखील पूर्णपणे खचून गेल्या होत्या व अशातच आजारपण येऊन वारल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस
📜इतिहास शिवरायांचा - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान सवराज्यभुमी आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिवकालीन दिदाविशेीष फेब्रुवारी इस.१६६५ 8 फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून छत्रपती शिवाजी महाराज दिनांक ८ यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले. स्वराज्यभुमी प्रतिष्ठान सवराज्यभुमी आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिवकालीन दिदाविशेीष फेब्रुवारी इस.१६६५ 8 फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून छत्रपती शिवाजी महाराज दिनांक ८ यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले. - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१५६७* *इ.स.१५६७ मध्ये अकबराने चीतोडवर आक्रमण करून चीतोडला मुगली फौजांचा वेढा दिला . मेवाडच्या सर्व सामंतांच्या सल्याने महाराणा उदयसिंह यांना चितोड सोडून अरवली पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात आश्रयास जावे लागले. १३ फेब्रुवारी १५६७ रोजी अकबर व मेवाडी सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले त्यात मेवाडचा पराभव झाला तसेच राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराणा उदयसिंह यांनी कुंभलगडावर आपली राजधानी स्थापन केली परंतु मोगली आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी आपली राजधानी गोगुंदा येथे प्रस्थापित केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१६५८* *(ष.१५८० फाल्गुन शु. २, इ.१६५८ फेब्रु.१३)* *महाराजांचे वाकनीसांना समर्थांना मदत पाठवण्यासाठी पत्र* *भास्कर गोसावी श्री गुरुमवतपरायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी श्री चे उत्साह होन पनास भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावी बरोबर पाठविले छत्रपती शिवाजीर महाराज यांच्याकडे भिक्षेस गेले. त्यांनी विचारले तुम्ही कुठुन व कोठे असतात त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी, श्री समर्थांचे शिष्य आहोत. मग ते बोलले की कोठे राहतात व मुळ गाव कोणते त्यावरून आम्ही सांगितले की गंगातीरी जांबचे राहणे. चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून महोत्साव चालू करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा. सांगितल्यावरुन असे बोलताच महाराजांनी दत्ताजीपंत वाकनीस यास प्रतिवर्षी श्री उत्साहास दोनशे होन देत जाणे म्हणून पत्र पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१६६०* *राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी* *"हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे.. त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो..... "शिवाजी हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१६६०* *छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१६८४* *(फाल्गुन शुद्ध ८ अष्टमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार बुधवार)* *शहजादा आज्जम व बेदारबक्त बहादुरगडाकडे रवाना!* *बहादुरगडावर संघर्ष जारी होता. बहादुरगडावर तळ ठोकून बसलेल्या ख्वाजा याकुब सरबुलखानाच्या मदतीसाठी औरंगजेबाने शहजादा आज्जम व त्याचा पुत्र शहजादा बेदारबक्त यांना आपल्या फर्मानासह मोठी मोगली कुमक व खजाना घेऊन बहादुरगडाच्या दिशेने रवाना केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१७१२* *कान्होजी आणि इंग्रजांत तह* *कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१७२२* *निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले. या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी बागलाण, खानदेश, नाशीक गोंडवन, वऱ्हाड आणि माळवा येथे तीन स्वाऱ्या करून चौथाई व सरदेशमुखी च्या वसूलासाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांची नियुक्ती केली. उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१७४७* *गोव्याच्या विजरईने जुआव द सौज फेर्राज यास लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे जर इंग्रज, डच व आम्ही एकत्र झालो, तर तुळाजी आंग्रे व त्याच्या बंदरात किंवा इतर ठिकाणी हल्ला करू. कारण तो इतका उद्धट (Insolent) झाला आहे की त्याच्यापुढे कन्याकुमारीपर्यंत कोणीच (उभे) राहत नाही ! तुम्ही हा विषय गुप्त रीतीने मुंबई बेटाच्या जनरलच्या कानी घाला. तो ह्या बाबतीत हालचाल करण्यास तयार असला, तर यंदाच्या पावसाळ्यात आम्ही पुढील बेत ठरवू म्हणजे उन्हाळाच्या सुरवातीला सर्व तयारी होईल सर्वत्र आपल्या कर्तुत्वाचा डंका असणाऱ्या आंग्रे घराण्याला शह देण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून या देशावर खरी नामुष्की ओढवली, प्लासीच्या लढाईत हिंदुस्थानचे भवितव्य ठरले असे म्हणतात; परंतु वस्तुतः ते इ. स. १७५६ सालीच - की जेव्हा आंग्र्यांचा दारुण पराभव करण्यात आला; तेव्हाच ठरून गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१७८८* *गोव्याच्या राज्य सचिवाने पुणे दरबारातील आपला वकील नारायण शेणवी यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!* *आमच्या आरमाराची आणि कोल्हापुरच्या आरमाराची रेडी येथे गाठ पडून कोल्हापुरच्या आरमाराचा धुव्वा उडाला. कोल्हापुरचे सैन्य भोसलेंच्या राजधानीवर हल्ला करण्याच्या बेतात होते. त्याने आता कुडाळपर्यंत माघार घेतली आहे. "सावंतांनी आम्हाला पेडणे प्रांताचा उर्वरित भाग देण्याचे कबूल केले आहे. तसेच डिचोली, साखळी आणि हळदोणे ह्या तिन्ही प्रांतावरील हक्क त्यांनी प्रस्तुतच्या करारान्वये सोडून द्यायचे आहे".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१८५६* *१८५४ मध्यें डलहौसीनें लखनौ येथील रेसिडेंटाच्या जागीं जनरल औट्रामची नेमणूक केली. यानें त्या प्रांतांत फिरून तेथील कच्ची हकीकत डलहौसीला कळविली. अयोध्येचें राज्य इंग्रजसरकारनें एकदम आपल्या ताब्यांत घ्यावें अशीहि त्यानें डलहौसीला शिफारस केली. तिजवर कौन्सिलदारांचे अभिप्राय होऊन हें प्रकरण डलहौसीपुढें आलें. त्यावर आपलें मत लिहून डलहौसीनें तें प्रकरण विलायतेस पाठविलें. विलायतेहून राज्य खालसा करण्याचा हुकूम आल्यानंतर औट्राग्गच्या हाताखालीं फौज पाठवून तें राज्य डलहौसीनें खालसा केलें (१३ फेब्रुवारी १८५६) व अयोध्येच्या नबाबास सालीना बारा लाखांची नेमणूक करून कलकत्त्यास ठेविलें. अयोध्याप्रकरणाचा निकाल लावणें हेंच डलहौसीचें हिंदुस्थानांतील शेवटचें कृत्य होय.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ फेब्रुवारी इ.स.१८९६* *वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म - पेण,रायगड* *छत्रपती संभाजी राजांचे साधार, वास्तववादी, ऐतिहासिक चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ रोजी मुंबई येथे झाला. शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड अतिशय गाजला. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तत्कालीन समाजात असणाऱ्या गैरसमजुतीना धक्का देणार्या त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ १९६० मध्ये प्रसिध्द झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज, मालोजीराजे व शहाजीराजे, गोवळकोंड्याची कुतुबशाही, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरीयड हे त्यांचे इतर ग्रंथ. तर तारीख इ इलाही, राजाराम चरितम हे त्यांनी संपादन केलेले ग्रंथ. इतिहास संशोधकाचा पिंड असणार्या बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा कालखंड व जीवन यावरही प्रकाश टाकला. दंतकथांवर आधारित तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा वेगळे चरित्र लेखन करून तुकारामाविषयीच्या अभ्यासाला त्यांनी शास्त्रशुद्ध बैठक दिली आहे. तुकारामांचे संतसांगाती, तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, संत तुकाराम हे त्यांचे विशेष ग्रंथ.* *असे या इतिहाचासे भीष्माचार्य यांचे दि. १६ जुलै १९८६ रोजी निधन झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा
🙏 शिवराय स्टेटस - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान মরতানসা आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिववाालीद्ा दिदाविशीष फेब्रुवारी इ॰स. १६६० 3 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी " हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे. त्याततो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो. "शिवाजी हिंदुसेनाधीपती " म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेतः 4rnmments  स्वराज्यभुमी प्रतिष्ठान মরতানসা आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिववाालीद्ा दिदाविशीष फेब्रुवारी इ॰स. १६६० 3 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी " हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे. त्याततो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो. "शिवाजी हिंदुसेनाधीपती " म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेतः 4rnmments - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स.१५०२* *एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स.१६७४* *छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स. १६८५* *सावंताने संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स.१६८५* *(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार गुरुवार)* *धरण गावाची दुसरी लुट!* *अखबारातून धरणगाव मराठ्यांनी पुन्हा एकदा लुटल्याची माहिती मिळते. आधी ४ वर्षांपूर्वी सुद्धा मराठ्यांनी धरणगावात धुमाकूळ घातला होता. ४ वर्षांत याची परत पुणराव्रृत्ती होऊन मराठ्यांनी या प्रदेशात धुम माजवली. निळो मोरेश्वर व रंगराव हे ६०० ते ७०० स्वारांनिशी धरणगावला पोहोचले. त्यांनी इंग्रजांची वखार जाळली. मराठे खोलवर घुसून दहशत कशी माजवतात याचा प्रत्यय इंग्रजांना व मोगलांना धरणगावच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स. १६८९* *छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !* *अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स.१७४२* *पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स.१७५६* *११ फेब्रुवारी रोजी इंग्रजी आरमार विजयदुर्गवर मोर्चेदाखल झाले. इकडे जमिनीवर रामाजी महादेवांची फौज तयारच होती. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे, हे पाहून आधीच दि. ८ फेब्रुवारी रोजी तुळाजींनी आपल्या मेहुण्यास विजयदुर्गाचा ताबा देऊन ते रामाजीपंतांच्या छावणीत भेटावयास आले. पण पेशवे आणि तुळाजी यांच्यातील इतक्या वर्षांच्या वैमनस्यामुळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी होईना. तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी इंग्रजांचा विजयदुर्गावर भडिमार सुरू झाला. वॉटसनने मुंबईला कळवले, "तुळाजी आंग्र्यांचे व पेशव्यांचे (रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत असल्याचे मला कळले, तेव्हा तुळाजीस याबाबतीत अवकाश द्यायचा नाही, असा निश्चय करून, एकदम किल्ल्या स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या वेळात जबाब न आल्याने व पेशवेही जरा वेळ काढीत आहेत असे पाहून दि. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला." १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा आंग्र्यांच्या एका जहाजाच्या दारूखान्यावर पडून त्या जहाजाने पेट घेतला. या भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटली. आंग्र्यांच्या आरमारातील ७४ तोफांचे एक गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि ६० गलबते उळून खाक झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ फेब्रुवारी इ.स.१७९४* *एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस व महादजी शिंदे यांचा समेट झाला. १ जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. नानाही जाऊन आले. हरीपंत तात्या तर एक दोन दिवसाआड नेहमी जात होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ त महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४). मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी ५ सप्टेंबर १७९५ रोजी १ चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते. महादजीबावांनी आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून नऊ लग्ने केली पण त्यांना पुत्र लाभ झाला नाही. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर त्यानी आपल्या चुलत भावाचा १४ वर्षाचा मुलगा दौलतराव यास दत्तक घेतले. दौलतरावाचा जन्म १७८० चा असून त्याच वर्षी त्याचा समकालीन रणजीतसिंग जन्मला.दौलतरावांचे दत्तविधान यथाविधी झाले नव्हते असे दिसते. बावा मरण पावल्यावर तेरावे दिवशी त्याचे दत्तविधान करून पेशव्यांनी त्यास शिंद्यांचे दौलतीवर स्थापन केले. (१० मे १७९४).* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान எனI आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702 / +91 7385434240 शिववजाल्ीना दिदाविशीष्य फेब्रुवारी इ.स.१६७४ १२ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला. स्वराज्यभुमी प्रतिष्ठान எனI आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702 / +91 7385434240 शिववजाल्ीना दिदाविशीष्य फेब्रुवारी इ.स.१६७४ १२ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला. - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *११ फेब्रुवारी इ.स.१६५८* *छत्रपती शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला.* *मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता, तेथेच १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, सीद्दी, पोर्तुगीज, इग्रज आणि डच यांच्या पासून स्वराज्याच रक्षण करण हे मराठा आरमाराच मुख्य काम, पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर, आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखिन बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती, अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, त्यामुळे संपूर्ण कोकणामधे असणाऱ्या असंख्य खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसा आसारा होता. तर समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ फेब्रुवारी इ.स.१६८७* *संताजी घोरपडे-केसोपंत त्रिंबक कर्नाटकात!* *दख्खन जिंकण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाने मराठ्याविरोधात आपली मात्रा चालत नाही असे पाहून आपली दृष्टी गोवळकोंडा आणि विजापूरकडे वळवली आणि अल्पावधीतच ती राज्ये जिंकूनही घेतली. ही बलाढ्य राज्ये हाती आल्यानंतर तो स्वराज्यातील कर्नाटक प्रांतात पुन्हा हल्ले सुरू करणार हे ओळखून छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटकचा प्रांताचा बंदोबस्त करण्याला विशेष प्राधान्य दिले. तिथे मुघल आणि म्हैसूरकरांच्या हल्ल्याला हरजीराजे महाडिक यांना एकट्याला तोंड द्यावे लागू नये म्हणून छत्रपती संभाजीराजेंनी ऑक्टोबर- नोव्हेंबर इ.स.१६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना कर्नाटकात जायची आज्ञा केली. या आज्ञेनुसार केशव त्रिमल व संताजी घोरपडे आपल्या १२ हजार सैन्यासह कर्नाटकात पोहोचले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ फेब्रुवारी इ.स.१७५६* *तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते. कैदेतच पर्वती, पुणे येथे त्यांचे निधन झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ फेब्रुवारी इ.स.१७६०* *सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला. दिनांक ११ फेब्रुवारी सन १७६० रोजी निजामाशी तह झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ फेब्रुवारी इ.स.१८१८* *छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवर मराठेशाहीतील उत्कर्षाचा परमोच्च बिंदू-फर्मानबाडी.* *छत्रपती शिवाजी महाराजांचा जेधे शकावली प्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला.इथपासून मराठेशाहीचा उदय झाला. ह्या नंतर सुमारे १८७ वर्षांनी म्हणजे १७ नोवेंबर १८१७ ला इंग्रजांनी शनिवारवाड्यावर युनियन ज्याक फडकवला व ११ फेब्रुवारी १८१८ रोजी जाहीरनामा काढून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा ह्या अत्यंत छोट्या राज्यावर बसविले.अशा प्रकारे मराठेशाहीचा अस्त झाला. वर नमूद केलेल्या मराठ्यांच्या उदय आणि अस्ता दरम्यानच्या 187 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मराठेशाहीच्या आयुष्यात अनेक चढ उतार,मान,अपमान,जय,पराजयाच्या घटना घडल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला स्वतःस हिंदू पद्पातशहा म्हणून राज्याभिषेक करून घेतला,दक्षिण दिग्विजय करून दक्षिणेकडे मराठी राज्याचा विस्तार केला.त्यानंतर पुण्यश्लोक शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशव्यांनी मराठ्यांचा जरीपटका अटकेपार नेला,जवळपास निम्म्या भारतावर मराठ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्र होते.मराठेशाहीत सगळ्याच काही गोष्टी सुखद घडल्या नाहीत.शिवरायांचा अकल्पित मृत्यू,त्यातून उद्भवलेले वारसा युद्ध,कट कारस्थाने,शंभू राजांची अत्यंत क्रूर तऱ्हेने हत्त्या,छ.राजाराम ,त्यांच्या नंतर ताराराणी व असंख्य मराठे सरदार,सैनिकांचा अपुऱ्या ताकदीनिशी सतत सव्वीस वर्षे मोगलांशी संघर्ष,व १७६१ मध्ये मराठे आजवर विसरू न शकलेली दुःखद घटना,पानिपत संग्राम ह्या काही प्रमुख सुद्धा घडल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ फेब्रुवारी इ.स.१८१८* *बाजीराव रघुनाथराव पेशवेंना बंडखोर ठरविण्यात आले* *बाजीराव रघुनाथराव यांचा युध्दात पाडाव करता येत नाही हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी अखेर बाजीराव रघुनाथराव यांच्या सैनिकांना बिथरविण्यासाठी ११ फेब्रुवारी सन १८१८ रोजी जाहीरनामा काढला. त्याचाही अपेक्षीत परिणाम न दिसल्याने १० एप्रिल सन १८१८ रोजी छत्रपतींना फर्मान काढावयास लावून बाजीराव रघुनाथराव यांना बंडखोर ठरविण्यात आले व तशी व्दाही फिरविण्यात आली. तरीही बाजीराव रघुनाथराव हातात येत नाहीत हे पाहून इंग्रजांनी अनेक मराठा सरदारांशी हातमिळवणी केली. अखेर ३ जून सन १८१८ रोजी बाजीराव रघुनाथराव यांनी ढोलकोठ येथे इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. इंग्रजांनी ज्या बाजीराव रघुनाथराव यांची प्रतिमा "पळपुटा" अशी केली आहे त्याच बाजीराव रघुनाथराव यांनी दिलेल्या विस्मयकारक लढतीने इंग्रजांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आणि म्हणूनच महाराष्ट्रापासून दूर बिठूर येथे त्यांना हलविण्यात आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
🙏 शिवराय स्टेटस - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान आम्ही शिवपाईक बारा रवराज्यभुमा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिवावाालीना दिनाविशीष्य ११ फेब्रुवारी इ.स.१६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, स्वराज्यभुमी प्रतिष्ठान आम्ही शिवपाईक बारा रवराज्यभुमा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिवावाालीना दिनाविशीष्य ११ फेब्रुवारी इ.स.१६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१० फेब्रुवारी इ.स.१६६५* *छत्रपती शिवाजीराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला सुरूवात केली. सुरुवातीची बरीच वर्षे त्यांच्या ताब्यात जास्त करून आदिलशाहीचेच किल्ले आले. १६५७ साली त्यांचा प्रथमच मुघलांशी थेट संबंध आला कारण त्यांनी मुघलांच्या ताब्यातील सधन शहर जुन्नर लुटले. तसेच, १६३६च्या मुघल-आदिलशहा तहानुसार जे किल्ले मुघलांकडे असायला हवेत त्यातले बरेचसे छत्रपती शिवाजीराजांनी जिंकून घेतले होते. पुढे १६६३ मधे शाहिस्तेखानावर हल्ला, १६६४मधे सुरतेची लुट, जसवंतसिंगाची फजिती या कारणांमुळे औरंगजेब चिडुन गेला व सप्टेंबर १६६४ मधे त्याने मिर्झाराजा जयसिंग या महापराक्रमी, मुत्सद्दी रजपुत मुघल मनसबदाराची स्वराज्यावरच्या मोहिमेवर नियुक्ती केली. भलीमोठी फौज, तोफखाना तसेच, सरकारी व खाजगी खजिना बरोबर घेऊन मिर्झाराजा स्वराज्याकडे निघाला. सोबत दिलेरखान हा पराक्रमी मुघल मनसबदार व इतरही नावाजलेले मनसबदार होते. १० फेब्रुवारी रोजी हे मुघल सैन्य औरंगाबादला पोहोचले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० फेब्रुवारी इ.स.१६७१* *सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती. १६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० फेब्रुवारी इ.स.१६८२* *(फाल्गुन शुद्ध १३ त्रयोदशी शके १६०३ दुर्मती संवत्सर वार शुक्रवार)* *सुरतकर इंग्रजांचे दुटप्पी धोरण!* *इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांना दारूगोळा (तोफेचा) विकल्याची तक्रार सिद्धी करत होता. ही तक्रार खोटी असल्याचे सुरतकर सांगतात. पण छत्रपती संभाजी महाराजांना मदत करताना, ती गुप्तपणे करा. असे ते पत्रातून कळवितात. शिवाय औरंगजेबाच्या मोहिमांची व छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळील अफाट सेनेची कल्पना देतात.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० फेब्रुवारी १७५६* *१० फेब्रुवारी १७५६ रोजी वॉटसनला अशी खबर लागली की तुळाजी आंग्रे घेरिया किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे (म्हणजे नानासाहेबांकडे) देण्याच्या वाटाघाटी करण्यासाठी गेलेले आहेत. हे समजताच वॉटसनने आंग्र्यांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किल्ला स्वाधीन करून शरण यायचा खलिता पाठवून दिला. त्याचे उत्तर न आल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता आरमाराच्या २ डिव्हिजन्स घेऊन वॉटसन घेरियाकडे गेला आणि त्याने हल्ला सुरु केला. किल्ल्यावर तोफगोळे डागणे सुरु झाले. असाच एक गोळा आंग्र्यांच्या ताब्यात असणाऱ्या मूळचे इंग्रजी जहाज 'रिस्टोरेशन' ह्याच्यावर पडला आणि आंग्र्यांचे सर्व आरमार जळून खाक झाले. (आंग्र्यांकडे इंग्रजांची पकडलेली शार्लोट, विलियम, स्वेर्न, रिस्टोरेशन, डार्बी, पायलट, ऑगस्टा इत्यादी जहाजे होती!)* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० फेब्रुवारी इ.स.१७६१* *पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा.. तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे. आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते... अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच.* *सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० फेब्रुवारी इ.स.१७७१* *महादजी शिंदे यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला. मराठ्यांचा तोफखाना दिल्लीच्या किल्ल्यावर धडधडू लागला. असद बुरूजाला खिंडार पडले. कासीमअलीचे धाबे दणाणले. आणि त्यांनी मराठ्यांच्या पुढे मुकाट्याने शरणागती पत्करून किल्ल्याचा ताबा मराठ्यांच्याकडे दिला. ५ हजार स्वारांनी दिल्ली व्यापून टाकली. मराठ्यांच्या जयघोषाने यमुणातीर दणाणला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० फेब्रुवारी इ.स.१८१८* *अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला* *सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस
🙏शिवदिनविशेष📜 - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान * स्वराज्यभुमी  आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोदणी कवाकनान १६०२  111111 :0 शिवकाालीदा दिद्ाविशेष् १०फेब्रुवारी डःस. १६५९ छित्रपती शिवाजीयह्मरजाीच्या वाढन्याप्रभावाच्च पीर्तुगीजांनी धसकधेतला आणियह्ाराजीशीवहकर्न व्यानीमैत्रीचाह्रनप्ुढेकेला. स्वराज्यभुमी प्रतिष्ठान * स्वराज्यभुमी  आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोदणी कवाकनान १६०२  111111 :0 शिवकाालीदा दिद्ाविशेष् १०फेब्रुवारी डःस. १६५९ छित्रपती शिवाजीयह्मरजाीच्या वाढन्याप्रभावाच्च पीर्तुगीजांनी धसकधेतला आणियह्ाराजीशीवहकर्न व्यानीमैत्रीचाह्रनप्ुढेकेला. - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *९ फेब्रुवारी इ.स.१६५८* *तुंग-तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही.. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ. स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग- तिकोना किल्ला जिंकुन परत स्वराज्यात* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ फेब्रुवारी इ.स.१६६५* *छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचे 'बसनुर' छापा घालुन लुटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनुरची स्वारी ही जलमार्गे केली, राजांनी नौकाप्रवास करुन सागर ऊल्लंघु नये ही अंधश्रध्दा उधळुन लावली. शिवराय हिंदु धर्मातील परंपरांचा सन्मानपुर्वक गौरव गाणारे होते पण धर्मातील खुळचट रुढींना आपल्या चरीत्रात त्यांनी मुळीच थारा दिला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ फेब्रुवारी इ.स.१६७०* *(माघ वद्य १४, चतुर्दशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार बुधवार)* *महाराजांचे वाढते आरमार!* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमाराने आरमारी प्रभावाने त्रस्त होऊन नाइलाजाने पोर्तुगिजांनी महाराजांच्या बरोबर तह केला व आपल्या हद्दीतही महाराजांच्या गलबतांना मुक्त संचार करण्यास परवानगी दिली. महाराजांच्या आरमाराला तत्कालीन सत्ताकर्ते किती घाबरत होते हे यावरुन दिसते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ फेब्रुवारी इ.स.१६८९* *(माघ शुद्ध १४, चतुर्दशी शके १६१०, दुर्मती संवत्सर, वार शनिवार)* *राजाराम महाराजांचे पुन्हा मंचकारोहण!* *किल्ले रायगडावर राजाराम महाराजांचे पुन्हा एकदा मंचकारोहण करण्यात आले. शके १६११ फाल्गुन अमावस्या ११ मार्च इ.स.१६८९ रोजीच्या काळ्या दिवशी श्री सखी राज्ञी जयती, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडेमंडीत महाराणी येसुबाईसाहेब यांच्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले. ऐन तारुण्यात वैधव्याचा वज्रप्रहार त्यांना सहन करावा लागला. हे दुःख पचवणे खर तर सामान्य गोष्ट नव्हतीच. मात्र शोक करायला वेळ नव्हताच. महाराजाची ही सुन ऐन आणीबाणीच्या प्रसंगी पदर खोचून स्वराज्यासाठी तडफेने उभी राहिली. स्वतःच्या पुत्राचे हित बाजुला ठेवुन फक्त स्वराज्यासाठी स्वतःच्या दिराचा म्हणजेच राजाराम महाराजांचा मंचकारोहण करण्याचा धाडसी व क्रांतिकारी निर्णय येसुबाईसाहेब यांनी घेतला. किल्ले रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा होताच त्यामुळे गडावर मसलत बसून सर्वानुमते राजाराम महाराजांचे मंचकारोहण पार पडले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ फेब्रुवारी इ.स.१७४३* *गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!* *"रामचंद्र बाबाजी यांची बडदास्त आम्ही चांगली ठेवली होती. तरिही ते आम्हाला न सांगता न सवरता इकडून गुपचूप निघून गेले". "मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, आमच्या शेजारच्या प्रदेशात जर रामचंद्र बाबाजी यांचे वास्तव्य झाले तर ते आम्हाला बिलकूल आवडणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचा आपण पाठपुरावा केला तर त्यालाही आमची हरकत असेल".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ फेब्रुवारी इ.स.१७५७* *प्लासीचा तह* *प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांच्या राज्याचा पाया हिंदूस्थानात रोवला गेला असे म्हणतात. सिराजउदौला अनेक गोष्टींमुळे पेचात सापडलेला होता. याचा फायदा घेऊन क्लाईव्ह ने त्याच्याशी ९ फेब्रुवारी १७५७ रोजी तह करून घेतला.* *या तहानुसार सिराजउदौला ने मागील युद्धातले इंग्रजांचे नुकसान भरून दिले.तसेच तहात यानंतर सर्वांनी तटस्थ रहावे असे ठरले.परंतू इंग्रजांनी प्रामाणिकपणा न दाखविता फ्रेंचांविरोधात आघाडी उघडली व सिराजलाच मदत मागितली. क्लाईव्हने चंद्रनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
🙏 शिवराय स्टेटस - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान स्वराज्यभमी =0 नोदणी कमांक महा १३०२ 491 99758 50702/ 91 7385434240 शिवावज्ञल्न्ा दिद्ाविशीष्ट dসযন্ব / फेब्रुवारी इःस.१६५८ 0 छत्रपती शिवाजी महाराजांनी तुंग- तिकोना जिंकुन पुन्हा स्वराज्यातदाखलकरूनघेतले॰ स्वराज्यभुमी प्रतिष्ठान स्वराज्यभमी =0 नोदणी कमांक महा १३०२ 491 99758 50702/ 91 7385434240 शिवावज्ञल्न्ा दिद्ाविशीष्ट dসযন্ব / फेब्रुवारी इःस.१६५८ 0 छत्रपती शिवाजी महाराजांनी तुंग- तिकोना जिंकुन पुन्हा स्वराज्यातदाखलकरूनघेतले॰ - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *८ फेब्रुवारी इ.स.१६६५* *( फाल्गुन शुद्ध तृतीया, शके १५८६, संवत्सर क्रोधी, शुक्रवार )* *मराठ्यांची पहिली आरमार मोहीम :-* *हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांनी बसरूर उर्फ बसनुरवर पहिली आरमार मोहीम काढली. स्वतःच्या नेतृत्वात ३ मोठ्या नौका व ८५ लहान मोठी गलबते, गुराबे सामील करून बसनुरवर स्वारी केली.* *स्वदेशी आरमार, लाकूड आणि स्वदेशी कारागिरांनी बनविलेली जहाजे वापरून मराठ्यांचे पहिले व एकमेव समुद्री मोहिम करणारे राजे म्हणजे छत्रपती श्री शिवाजीमहाराज....!!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ फेब्रुवारी इ.स.१६८९* *छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान* *महाशिवरात्री अवघ्या चार - पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता.दस्तुरखुद्द छत्रपती शंभाजी महाराजांना कैद करून मुकररबखान पुढे कऱ्हाड ला गपचूप निघाला होता.* *परतूं शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच. खबर एकूण आप्पाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता. आता असेच तडक जावे अन मुकररबखानास मातीत मीळऊन स्वराज्याच्या धन्यास सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहू स्फुरण चढू लागले होते. कारण विचार करावयास जास्त वेळ न्हवता.* *कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर मुकररब इथून पुढे कऱ्हाड ला ओलांडून पूर्वेकडील मोघली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल. म्हणून जास्त विचार न करता आप्पाशास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रीनीं स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकररबखनाच्या गोटावर चालून गेले. मुकररब खान पूर्ण सावध होता. त्याने घेतलेली झेप त्यास एक आकस्मित यश देऊन गेली होती. व हे यश अलगद बादशहाच्या झोळीत टाकण्यास तो कितीही आतुर असला तरीही बेफिकिरी मुळे क्षण भरात होत्याचे नव्हते होऊ शकते हे तो जाणून होता. तसा हल्ला एक रात्र आधीच ज्योत्यजी त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश त्याने मोघली हशमांस दिला होता.* *सुरवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोघल थोडे फार बिथरले.पण ह्या आशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते. ह्याची मानसिक तयारी मुकररबखानाची असल्याने त्याने त्याची संपुर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली. संख्येने जास्त असलेल्या मोगलांनी ह्या मोजक्या शिबंदीस जुमानले नाही. मराठ्यांचे प्रयत्न तोकडे पडले. अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे मिळाले.उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले. त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळवरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षित सह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला. बत्तीस शिराळ्यातील मल्लशाळा, भवानी मंदिर, मारुती मंदिर व स्वामीकार्यास कामी आल्याने अप्पशास्त्रीच्या वंशजांना मौजे कणदूर येथील इनाम रुपी मिळालेली जमीन ह्याची साक्ष देते. खरे जंत्री वरून १६८९ च्या महाशिवरात्रीची तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते. व वरील माहितीतील हल्ला महाशिवरात्रीच्या २-३ दिवस आधी झाल्याने म्हणजेच २ -३ फेब्रुवारी १६८९ ही तारीख शंभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास जुळून येते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ फेब्रुवारी इ.स.१७१४* *समुद्रावरचा शिवाजी राजा* *कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ फेब्रुवारी इ.स.१७६०* *पानिपतच्या संग्रामातील वाघ घराण्यातील असेच एक वीर योद्धा संताजी वाघ ह्यांच्या संदर्भातील एक पत्र* *लढाईत आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर सरकार आमच्या घराण्यास संभाळून घेईल असा भाव पत्रात विदित होतो. स्वराज्याप्रती निष्ठा किती आणि कशी असावी ह्याचे हे पत्र उत्तम उदाहरण आहे.* *कृपया पत्र थोडं मोठ्या आवाजात वाचावे म्हणजे पत्राचा भाव जास्त चांगला लक्षात येईल.* *पत्राची तारीख आहे ८ फेब्रुवारी १७६० पत्र सुरु.* *II श्री II* *श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांच्या सेवेसी,* *श्री सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य आज्ञाधारक संताजी वाघ दंडवत. येथील कुशल तागाईत माघ वाद्य सप्तमी पावेतो साहेबाचे कृपेंकरुन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे.* *विशेष.* *आपण आजच हिंदुस्थानचे स्वारीस ( पानिपतच्या स्वारीस ) सुमुहूर्ते निघून डेरियास आलो. याउपरी मजलदरमजल तीर्थरूप राजश्री मामाजवळ फौजसुद्धा जाऊन दाखल होतो. आम्हास सर्वस्वे आश्रा स्वामींचे पायाचा आहे. पूर्वीपासून एकनिष्ठ सेवकव्रत मात्र जाणत आहो.* *सर्व निर्वाह करणार धनी समर्थ आहेत. वरकड वर्तमान राजश्री हरी वल्लभ यांनी विज्ञापनपत्र लिहिले आहे त्या वरून विदित होईल. कृपाळू होऊन पत्राचे उत्तर आज्ञापत्र पाठवावे.* *बहुत काय लिहिणे कृपा कीजे* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ फेब्रुवारी इ.स.१८९९* *रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
🚩छत्रपति शिवाजी महाराज - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान [ स्वराज्यभुमी  आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702 / +91 7385434240 शिवावजद्द्ा ढिद्ाविशीष्ध फेब्रुवारी इ.स.१६६५ 0 राजे शिवछत्रपतींच्या नेतृत्वात सिंधूसागरातून निघालेली हिंदवी स्वराज्याची पहिली सागरी   मोहीम कारवारच्या दक्षिणेला असणाऱ्या बसनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली. स्वराज्यभुमी प्रतिष्ठान [ स्वराज्यभुमी  आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702 / +91 7385434240 शिवावजद्द्ा ढिद्ाविशीष्ध फेब्रुवारी इ.स.१६६५ 0 राजे शिवछत्रपतींच्या नेतृत्वात सिंधूसागरातून निघालेली हिंदवी स्वराज्याची पहिली सागरी   मोहीम कारवारच्या दक्षिणेला असणाऱ्या बसनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली. - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१६५८* *भोरप किल्ल्यावर मराठा सैन्याने हल्ला करून स्वराज्यात आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडा आधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता.शिवाजीं महाराजांना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला. विजापुरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला. सुधागड म्हणजेच भोरप, भोर संस्थानाचे वैभव सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले. ‍स्वराज्‍याच्‍या राजधानीसाठी रायगडाआधी भोरपगड, म्‍हणजे आताचा सुधागड किल्‍ल्‍याचा विचार करण्‍यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्‍ला सुचवला होता. शिवाजींना राजधानीसाठी रायगड किल्‍ला योग्‍य वाटला. मात्र महाराजांनी सुधागडाच्‍या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्‍ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिक ‍दृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्‍ला म्‍हणून गणला जातो. हा किल्‍ला म्‍हणजे कोकणात उतरणा-या सवाष्‍णीच्‍या घाटाचा पहारेकरीच!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१६८५* *मराठ्यांनी धरणगाव शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या. मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वखारही जाळली. ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरणगावाला पाठवले. दोन्ही सैन्यात ७ फेब्रुवारी १६८५ ला चकमकी उडाल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१६८८* *आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्यास वेढा दिला होता. गोवळकोंड्याच्या किल्यातून सतत तोफांचा मारा चालू होता. त्यामुळे मोगल सैन्याची दरोरोज जीवितहानी होत होती. मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती. गोवळकोंड्याच्या किल्याच्या सभोवती संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक खोदण्यात आले होते त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत नव्हते. तीन महिने वेढा चालवून देखील मोगल सैन्यास अपेक्षित यश मिळत नव्हते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१६९८* *किल्ला जिंजी....* *१२४० मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्ण कोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला १३८३ ते १७८० या कालखंडात जिंजीवर विजयनगर, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या. या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला. या ९ किलो मीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल वेणुगोपाल, वेंकटरमणा, पट्टाभिरामा मंदिरे, सादत-उल्लाह-खान मशीद, प्रचंड मोठे धान्य कोठार, सुंदर तलाव असे बरेच पाहण्या सारखे आहे.* *छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली.. शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली १६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला... धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता पण वेढा काही ढिला पडत नव्हता.. राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली.. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१७३५* *सुभेदार मल्हारराव होळकरांनी खाने दौरान या मुघल सेनापती कडून २२ लाख रुपये वसूल केले आणि बादशाह कडून ५० लाख रुपये मिळवून सरकारात जमा केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१७७१* *दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!* *दिनांक ७ फेब्रुवारी सन १७७१ रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकल्या. महादजी शिंदेनी शहाआलम बादशहा बादशहाची दिल्लीत व्दाही फिरवली व झाबेताखानाकडून दिल्लीचा ताबा मागीतला. त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महादजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या मार्‍याने दिल्ली अक्षरशः दणाणून सोडली. झाबेताखान आणि त्याच्या सैन्याचा या प्रलयापुढे निभाव लागला नाही. मराठी सैन्याच्या उरात पानिपतचे शल्य दशकभर टोचत असल्याने मराठ्याच्या पराक्रमाला पारावार उरला नव्हता. दरम्यानच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेते तेथे भगवे उभारले होतेच. दिल्लीच तेव्हढी बाकी होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ फेब्रुवारी इ.स.१८००* *कोल्हापूरचे सरदार गायकवाडबंधु स्मृतिदिन* *एकाच लढाईत दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे बंधू शत्रूशी लढा देत असताना धारातिर्थी पडले. कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी या निष्ठावंत गायकवाड बंधूंचे स्मारक बांधले. हे स्मारक आजही आपल्याला पन्हाळगडावर पहावयास मिळते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान खवराज्यभुमी आम्ही शिवपाईक बारा Heca नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिववजलीना दिद्ाविशीष्य फेब्रुवारी इ.स.१६५८ ७ तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य असलेला.विजापूरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरपगड छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात परत आणला. स्वराज्यभुमी प्रतिष्ठान खवराज्यभुमी आम्ही शिवपाईक बारा Heca नोंदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702/+91 7385434240 शिववजलीना दिद्ाविशीष्य फेब्रुवारी इ.स.१६५८ ७ तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य असलेला.विजापूरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरपगड छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात परत आणला. - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *६ फेब्रुवारी इ.स.१६७४* *महाराणी काशीबाई पुण्यतिथी* *छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन.. महाराणी काशीबाई सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या.. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते.. छत्रपती शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला... त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये झाला.... महाराणी काशीबाई यांची आज पुण्यतिथी..... कुशावर्त तलावाजवळील समाधी रायगड किल्ला कुशावर्त तलावाजवळ उत्तरेस दोन समाध्या दिसतात या समाध्यांपैकी एक महाराणी काशीबाई आणि दुसरी मोरोपंत पिंगळे यांची आहे असे बोलले जाते..* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ फेब्रुवारी इ.स.१६७५* *विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमधे जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन १६७३ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी फोंड्यास वेढा घातला परंतु विजापूरचे सैन्य पन्हाळ गडावर चाल करून आल्याने राजांना फोंड्याचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच करावे लागले. १६७४ सालच्या सप्टेंबर महिन्यात महाराजांच्या एका सरदाराने पुन्हा वेढा घातला पण तिथल्या शिबंदीचा किल्लेदार महमदखान ह्याने किल्ला बरेच दिवस लढवल्याने महाराजांच्या सरदाराला वेढा उठवावा लागला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख वेंगुर्ला येथील इंग्रजी वखारातील एक अधिकारी अब्राहम ला. फेबर ह्याने Dutch Governor डच गव्हर्नर जनरल John Mastsuiker ह्याला लिहीलेल्या एका पत्रात केले आहे. त्याआधी इ.स १६७२ साली विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मरण पावला त्याच्या पश्चयात विजापूर राज्यामधे जी दुही माजली त्याची संधी साधून छत्रपती शिवाजीराजांनी १६७५ सालच्या एप्रिल महिन्यात परत फोंड्यास वेढा घातला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात आढळतो. पहिला उल्लेख राजापूरच्या इंग्रजांनी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मुंबईला पाठवलेल्या पत्रातील असून दुसरा कारवार येथील इंग्रजांच्या दिनांक १४ एप्रिल १६७५ मधल्या पत्रातील आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ फेब्रुवारी इ.स.१७३८* *'बाजीराव म्हटल की फक्त मस्तानीच काहीजणांना आठवते.' बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा..* *"जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणालाच शक्य होणार नाही आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे. ह्या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल" पोर्तुगीजांचा गोव्याचा व्हाॅइसराॅय कौंट द सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनियु कार्दिम फाॅइश याला पत्र..* *दिनांक - ६ फेब्रुवारी १७३८* **स्थळ - गोवा पोर्तुगीज दप्तर खंड तिसरा पत्र क्रमांक - ८१* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ फेब्रुवारी इ.स.१९३२* *पहिली क्रांतिकारी महिला बिना दास यांनी बंगालचे गर्वनर स्टॅन्ले जॅक्सन यांचे हत्येचा ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रयत्न केला. कोलकाता विद्यापीठाचे दीक्षांत समारंभात त्यांनी स्टॅन्ले जॅक्सन यांचेवर पिस्तुलातून ५ गोळ्या झाडल्या. त्यांना ९ वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पदवीदान समारंभातच त्यांना अटक झाली व त्यांना त्यावेळी पदवी दिली नाही. पतीच्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे अज्ञातवासात गेल्या. तेथेच २६ डिसेम्बर १९८६ रोजी निधन झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ फेब्रुवारी इ.स.१९३९* *महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) स्मृतिदिन* *(जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३)* *हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
🙏शिवदिनविशेष📜 - स्वराज्यभुमी प्रतिष्ठान स्वराज्यभुमा आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702+91 7385434240 शिवावजाल्ना दिदाविशीष्य फेब्रुवारी इ.स.१६७४ 6 छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन.. महाराणी काशीबाई यांची ' पुण्यतिथी. तलावाजवळील समाधी रायगड किल्ला ತalar' स्वराज्यभुमी प्रतिष्ठान स्वराज्यभुमा आम्ही शिवपाईक बारा मावळचे नोदणी क्रमांक महा १३०२ +91 99758 50702+91 7385434240 शिवावजाल्ना दिदाविशीष्य फेब्रुवारी इ.स.१६७४ 6 छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन.. महाराणी काशीबाई यांची ' पुण्यतिथी. तलावाजवळील समाधी रायगड किल्ला ತalar' - ShareChat
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१२९४* *देवगिरीचे यादव साम्राज्य संपुष्टात - महाराष्ट्र पारतंत्र्यात* *यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला. देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्‍हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१६६४* *(माघ वद्य चतुर्थी, शके १५८५, संवत्सर सौम्य, वार शनिवार)* *राजे शहाजीराजे यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली.* *शहाजीराजांच्या समाधीवर छत्री... छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. राजे शहाजीराजांचे कर्नाटक येथील होदीगिरे येथे घोड्यावरून पडून निधन झाले होते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा फार मोठा आधार नियतीने हिरावून घेतला. छत्रपती शिवरायांनी राजे शहाजीराजांच्या समाधीवर छत्री अर्पण केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१६६४* *शके १५८५ च्या माघ वद्य चतुर्थीला म्हणजे ५ फेब्रुवारी १६६४ ला महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडी पोहचले. १८ जानेवारी १६६४ रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीस पोहचला असता त्यास शिवाजी महाराज्यांकडून सुरतेच्या लुटची वार्ता समजली व त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा निश्चय केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१६६४* *नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान.* *६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली. बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले. लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१६७०* *( माघ वद्य दशमी, शके १५९१, संवतस्त सौम्य, शनिवार )* *सूर्याजी काका मालुसरे यांना सिंहगडाची किल्लेदारी :-* *सिंहगडाच्या युद्धात ८० वर्षांचे शेलारमामा ह्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला. त्याचबरोबर तानाजी काकांचे बंधू सूर्याजी काका ह्यांनी खचून न जाता मराठी सेनेला धीर देऊन व मोठी कामगिरी करून सिंहगड जिंकला. हे सगळं पाहून शिवराय खरंच भारावले आणि शेलरमामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी काकांना सिंहगडाची सुभेदारी दिली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१६८३* *(माघ वद्य चतुर्थी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार)* *पोर्तुगीज मुलूखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी!* *पोर्तुगीज मुळखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी! रणमस्तखान व बहादूरखान कल्याण-भिवंडी मोहिमेवर होते. याचवेळी छत्रपती संभाजी महाराज मोगलांची कल्याण भिवंडीतील रसद बंद करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र औरंगजेबाने पोर्तुगिजांना जबर तंबी दिल्याने पोर्तुगीज मुलखातून मोगली सैन्य बिनधास्तपणे ये-जा करत होते. धान्य, रसद, सैन्य, सामग्री आता पोर्तुगीजांच्या मुलखांतून मुक्तपणे येत होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१७६६* *ऑक्टोबर १७६५ मध्ये पेशवे निजामाच्या समाचारासाठी निघाले. राक्षसभुवनाच्या लढाईत निजाम चीतपट झाला असला, तरीही त्याची अंतस्थ कूटकारस्थाने सुरूच होती. म्हणूनच दि. ५ फेब्रुवारी सन १७६६ या दिवशी माधवरावांनी निजामाची भेट घेतली. भेटीप्रीत्यर्थ दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला, भेटीदाखल उंची वस्त्रे आणि नजराणे दिले. वस्तुतः हा निजाम कसा आहे हे माधवरावसाहेब पक्के ओळखून होते. परंतु, यानिमित्ताने त्यांनी केलेले राजकारण एखाद्या मुत्सद्दयाहूनही सरस होते. 'जर निजाम आणि पेशव्यात सख्य झाले तर पुन्हा कोणीही कुरापती काढण्यास धजावणारही नाही' म्हणूनच केवळ दाखवण्यापुरता का होईना, सलोखा ठेवून आपला हेतू साध्य करावा हेच उत्तम!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१७८८* *गोव्याचा गव्हर्नर फ्रांसिश्कू कुज्य द मिनेझिश याने कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांना पाठविलेल्या पत्राचा तर्जुमा! "तुमचे वकील सुलतानराव भोसले हे इकडे मदतीच्या कराराबाबत वाटाघाटी करण्यासाठी आले होते. त्यांना आम्ही तुमच्याकडून वाटाघाटी करण्यास आधिकारपत्रे आणण्यासाठी म्हणून कोल्हापूरला पाठविले होते. परंतु ते इकडे परतले नाहीत. त्या दरम्यान वाडीचे सावंत यांनी आमच्याशी तह करण्याची निकड दर्शविल्याने त्यांच्याशी आम्हाला तह करावा लागला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ फेब्रुवारी इ.स.१८०४* *इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आवाहन केले (५ फेब्रुवारी १८०४). त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat