❤🚩शिवभक्त🚩❤
ShareChat
click to see wallet page
@mangesh5663
mangesh5663
❤🚩शिवभक्त🚩❤
@mangesh5663
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६६१* *(वैशाख शुद्ध ११, एकादशी, श्रीनृपशालिवाहन शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)* *शृंगारपुर स्वराज्यात दाखल!* *शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता. आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे. हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला. चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला. संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला. पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले. महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले. होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना. मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला. घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला. महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६७५* *उत्तर कोकणात पोर्तुगीजांकडून दरवर्षी चौथ वसूली करून आता शिवाजी महाराज पोर्तुगीजांकडे आदिलशाही कोकणचा भाग म्हणून साष्टी, बार्देसचीही मागणी करू होते. फोंडा मोहिमेच्या वेळी स्वत: शिवाजी महाराज २९ एप्रिल १६७५ रोजी दुपारी सैन्य घेऊन साष्टी प्रांतातील काही देसायांच्या आणि आदिलशहा सरदार रणमस्त खानाचा पाठलाग करत चांदर गावात शिरले. पुढे कुंकळी गावातील बाजारात सैन्य घेऊन दाखल झाले. कुंकळीत काही घरांची लुटालूट केल्यानंतर या सैन्याचा तळ कुंकळीतील चांभारभाटात मुक्कामास राहिला. यावेळी कुंकळीतील पोर्तुगीज कॅप्टन मानुएल डी मोता हा होता. या कॅप्टनकडे दारूगोळ्याची मागणी केली. तेव्हा कॅप्टनने गव्हर्नरला कळविले तेव्हा गव्हर्नरने सल्लागारांच्या बैठकीत हा विषय मांडला. तेव्हा सल्लागारांनी मत मांडले की, शिवाजीचे सैन्य कुंकळी गावात हेतूपरस्पर शिरले की वाट चुकून शिरले त्याची अगोदर चौकशी करण्यात यावी व त्याचा पुढचा पावित्रा काय आहे याचा तपास करावा. त्या दरम्यान शिवाजीचा जो वकील या शहरी (ओल्ड गोव्यात) सध्या आहे त्यास स्थानबद्ध करून ठेवावे. म्हणजे पुढे जो काय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्या संबंधाने हा वकील आपल्या हाती असला तर त्याचा उपयोग होईल.’ पुढे लवकरच फोंडा जिंकल्यावर मात्र पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांशी मवाळ धोरण स्वीकारले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६८०* *महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!* *पाँडेचरीचा संस्थापक आणि राजापुरचा मुख्य अधिकारी फ्रेंच मार्टिन लिहीतो की "छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांपूर्वीच वारले. उघड्या मैदानावरील लढाईतील यशापेक्षा आपल्या कुशाग्र बुद्धीने मुत्सद्देगिरीतील क्षमतेमुळे हिंदुस्थानातील उच्चतम व्यक्तींच्या पंक्तीत महाराज विराजमान होते महाराजांचा उत्तराधिकारी ठरविण्यास महाराजांच्या अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराजांचा ज्येष्ठ मुलगा हा महाराजांचा कायदेशीर वारस आहे".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६८२* *छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल सन १६८२ रोजी कळवीले की...* *"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६८५* *फरह बख्श बागेजवळ औरंगजेब बादशहाने मुक्काम केला. दि. २६ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले. फरह बख्श बागेजवळ डेरे देण्यात आले. जमादिलावल महिन्याच्या ५ तारखेसच म्हणजेच, आजच्या दिवशी, २९ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाने त्या ठिकाणी मुक्काम केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१७०५* *१७०५ एप्रिल महिन्यात त्र्यंबक शिवदेव, पंताजी शिवदेव आणि रामजी फाटक यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि तेथील मोगल शिबंदीचा पराभव करून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला. गडाचा मोगल किल्लेदार देवीसिंग यास कैद केले. हे महाराणी ताराबाईंना समजताच त्यांनी २९ एप्रिल १७०५ रोजी रामजी फाटक यांस पत्र लिहिले, “तुमच्या सेवेचा मुजरा जाहला. तुम्ही मर्दानी सेवक आहात या उपरीही आपण स्वामी कार्य करीत जाणे म्हणजे कुलास उर्जीत होईल.”* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१८५८* *बाबुराव सेडमाकेंनी ब्रिटिश फौजांचा एप्रिल १८५८ मधे सगणपूर व बामनपेट येथे पराभव केला. या यशाने अत्याधिक आनंदित झालेल्या बाबुरावने २९ एप्रिल १८५८ रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी जमीनदारीमधील चिंचगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलीग्राफ कॅम्पवर हल्ला केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🙏 शिवराय स्टेटस - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल ا 14 H 10 SENED37` " হিলিলনিহীস Bor-rarಧ {e  ২৪ তসিল ব্ম ং&8ং छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले. महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल ا 14 H 10 SENED37` হিলিলনিহীস Bor-rarಧ {e  ২৪ তসিল ব্ম ং&8ং छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६५७* *औरंगजेब बादशहा बीदर काबीज करून कल्याणीकडे!* *२९ मार्च इ.स.१६५७ रोजी बीदरच्या किल्ल्याला वेढा दिला.२३ एप्रिल इ.स.१६५७ रोजीच्या पुर्वी तो त्याच्या ताब्यातही आला. बीदर काबीज करून औरंगजेब बादशहा २८ एप्रिल इ.स.१६५७ रोजी कल्याणीकडे निघाला. कल्याणीचा किल्ला मीर जुमल्याने वेढला होता. औरंगजेब बादशहा व मीर जुमला पुन्हा एकत्र आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६१* *छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६५* *मोगलांनी रोहिडा ते राजगड भागात ठाण मांडले. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ एकवीस तारखेस, म्हणजेच दि. २७ एप्रिल इ.स.१६६५ रोजी दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झालीत.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६७९* *छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते गड, कोट बांधणारे म्हणून.. पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देसाई, देशमुख यांना तटबंदी असलेले वाडे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. या धोरणाची स्वराज्यात किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र. या आज्ञापत्रात "सांउसीचा कोट देखील पाया पाडून टाकणे" असे फर्माविले आहे. कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोळ परगण्यात मौजे सांउशी हा गाव येत होता. हा गाव केंचणगौडा देसाई यास इनाम होता. महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात देण्याअगोदर सांउसी गावची तटबंदी पायासकट पाडावी अशी आज्ञा केली. सदर पत्राची आताच्या कालगणनेप्रमाणे तारीख २८ एप्रिल सन १६७९ येते. पत्रावर राज्याभिषेक शक ५, सिध्दार्थी नाम संवत्सर, वैशाख बहुल त्रयोदशी, सोमवार अशा तारखेची नोंद करण्यात आली आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध दशमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार बुधवार)* *महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!* *मराठे व पोर्तुगीज यांची युद्धाची तयारी सुरू असताना अकस्मात महाराजांचे निधन झालेले आहे. यासंदर्भात आपला दुखवटा व्यक्त करताना पत्रातून गोव्याचे पोर्तुगीज आधिकारी महाराजांच्या मृत्यूबाबत दुखवटा व्यक्त करून दोन्ही राज्यांत सलोखा व स्नेह संबंध आधी होते तसेच ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७०५* *किल्ले सिंहगड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात!* *किल्ले सिंहगड हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. यावेळी गड घेण्याची कामगिरी शंकराजी नारायण सचिव याने पंताजी शिवदेवांच्या आधिपत्याखाली त्र्यंबक शिवदेव व रामजी फाटक यांजवर सोपविली होती. त्याप्रमाणे त्यांनी मेहनत घेऊन किल्ला तर हस्तगत केलाच पण तीथला मोगली किल्लेदार देवीसिंह यांसही कैद केले. याबद्दल पंताजी शिवदेव यांस पुण्याच्या पश्चिमेस असलेल्या पौंड खोऱ्यातील शिरवली गावांपैकी काही जमीन इनाम मिळाली व इतरांस प्रोत्साहनपर पत्रे आली. ही हकिकत खरी असेल तर गंगाधर प्रल्हाद शकावलीतील, "आषाढ मासी कोंढाणा माला लाऊन मराठीयांनी घेतला ही नोंद चुक ठरते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७३१* *बेलापूरची लढाई* *मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७२८* *रोजी पोर्तुगालच्या राजाने व्हिसेरेईस लिहीलेल्या पत्राची नोंद!* *"तुम्ही फोंड सावंत याला धडा शिकविण्याच्या हेतूने त्याच्याशी युद्ध सुरू केलेत ते चांगले केलेत. परंतु डिचोलीचा किल्ला फोंड सावंतांच्या मुलाच्या ताब्यात देण्याऐवजी तो पाडून टाकलेला बरा. कारण, फोंड सावंतांचा मुलगा आपल्या बापासारखा निघाला तर डिचोलीच्या किल्ल्याचा उपयोग त्याला या राज्याशी लढताना चांगला होऊ शकेल".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७४०* *श्रीमंत बाजीराव पेशवे नर्मदेच्या काठी मिळालेले परगणे ताब्यात घेण्यासाठी ते तिकडे गेले. तारीख १३ मार्च बाजीराव बऱ्हाणपुरास होते. तद्नंतर ते खर्गोण परगण्यात गेले. त्यावेळी पुण्यातील कुटुबियांनी बाजीरावांच्या मनाविरुद्ध त्याची आवडती मस्तानीबाई कैदेत ठेवली होती. हे त्यांस न आवडून त्या मनःस्तापातच ते नासिरजंगावरील स्वारीस गेले होते. नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत ते खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहाण्यास गेले. तेथे त्यांस ज्वर होऊन रावरेखेडी येथे तारीख २८ एप्रिल १७४० सोमवारी पहाटे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी हे जग कायमचे सोडले. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात बेचाळीस लढाया खेळून कायमच अजिंक्य राहिलेले हे 'ईश्वरदत्त सेनानी' शेवटच्या काळात मात्र आयुष्याची लढाई हरले होते. अखिल हिंदुस्थानात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून देऊन दबदबा निर्माण करणारे शिवछत्रपतींच्या स्वप्नातल्या 'स्वराज्याला' 'साम्राज्य' बनवणारे धीरोदात्त पेशवा हे पुन्हा न परतण्याकरता स्वर्गाच्या मोहिमेवर गेले....* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८, एप्रिल इ.स.१७५१* *मराठ्यांचा किल्ले फतहगडास वेढा !* *मराठ्यांची एक चपळ फौज दुआबात आली. २० ते २५ हजार एवढी संख्या त्यात असावी, बंगशाचा सरदार शाहदिलखान त्यांना आडवा आला. कडव्या मराठी फौजेने कादिरजंग जवळ त्याचा धुव्वा उडविला. ते ऐकताच अहमदखान बंगश अलाबादेचा वेढा उठवून गंगाकाठ हसनपुरा जवळ आला. हसनपुरास एक किल्ला होता. त्याचे नाव "फतहगड" जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना घेऊन वजीर पठाणावर चालून गेला. मराठी फौजेने फतहगड वेढला. गंगेवर पुल बांधून त्यांनी पलीकडे जाऊन बंगशाची रसद बंद केली. बंगशाच्या सहायार्थ सादुल्लाखान आणि बहादुरखान हे येत असताना त्यांच्यावर गंगाधर यशवंत आणि जवाहरसिंग जाट हे चालून गेले. या दोन्ही फौजात मोठा संग्राम होऊन बहादरखान आणि १० हजार रोहीले कापले गेले. सादुल्लाखान जीव वाचवून पळून गेला. प्रचंड लूट मराठ्यांना मिळाली, अंतर्वेद रोहिल्यांच्या रक्ताने लाल झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस
🚩छत्रपति शिवाजी महाराज - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल V R R TOR S EA T 411 5oW D शिवदिनविशेष Ranul Borse Potil २८ एप्रिल इःस १६६१ छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रलागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील प्रचीतगड उर्फ उचीतगड নিবধলা महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल V R R TOR S EA T 411 5oW D शिवदिनविशेष Ranul Borse Potil २८ एप्रिल इःस १६६१ छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रलागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील प्रचीतगड उर्फ उचीतगड নিবধলা - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६४५* *२७ एप्रिल हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ज्याला 'स्वराज्य शपथ दिन' म्हणून ओळखले जाते. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली होती.* *दिनांक आणि वर्ष: २७ एप्रिल १६४५ काही ऐतिहासिक स्थळ: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिर.* *पार्श्वभूमी: छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात आपल्या सवंगड्यांसोबत ही शपथ घेतली. त्यांनी आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर केला आणि 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करण्याची शपथ घेतली.* *उद्देश: परकीय सत्तांच्या (आदिलशाही) जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करणे आणि रयतेचे स्वतंत्र राज्य स्थापन करणे हा या शपथेचा मुख्य उद्देश होता.* *प्रमुख उपस्थिती: या ऐतिहासिक प्रसंगी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर यांसारखे निष्ठावान मावळे उपस्थित होते.* *रायरेश्वर मंदिर: हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर आहे.* *शपथेचे महत्त्व:* *ही केवळ एक प्रतिज्ञा नव्हती, तर गुलामगिरी नाकारून स्वातंत्र्यासाठी लढण्याची ती एक ठाम भूमिका होती. या दिवशी रोवलेल्या स्वराज्याच्या बीजातूनच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य मराठा साम्राज्याची उभारणी केली* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६६३* *छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५८ साली उत्तर कोकणवर स्वारी केली. तेव्हा पोर्तुगिजांच्या चौल आणि दमण ठाण्यांना मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१ साली दक्षिण कोकणवर स्वारी केली. त्यावेळी त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीपर्यंत आले. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा पराभव केल्यावर त्याचे अभिनंदन पोर्तुगिजांनी दिनांक २७ एप्रिल १६६३ च्या पत्राने केले. ही वेळपावेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे डिचोली आणि साखळी हे दोन प्रांत जिंकून घेतले, तेव्हा पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६६५* *दाऊदखान किल्ले रोहिडा जवळ पोहचला. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ तारखेस, म्हणजेच दि.२७एप्रिल इ.स.१६६५ दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)* *राजापुरकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद !* *"छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार आपल्या हातात घेऊन राजपदवीही घेतली आहे. सुभेदार, हवालदार इ. आधिकारी लोकांना त्याने आपल्याकडे बोलावले. कित्येकांना कैद केले. कित्येकांना कामावरून दुर केले. छत्रपती संभाजी महाराजांचा नवा सुभेदार येथे आला. तेव्हा त्याला आम्ही जाऊन भेटलो. तेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने व स्नेहाने आमची भेट घेतली"."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)* *छत्रपती संभाजी महाराजांचे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आणि अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे अटकेत!* *स्वराज्याचे वारसदार युवराज शंभुराजे यांना पकडण्यासाठी किल्ले रायगडला झालेल्या कटाचा सुगावा युवराज शंभुराजे यांना लागलेला होता. आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी शंभुराजे यांनी योग्य ती पावले टाकली. राजापुरास माणसे पाठवून धनधान्यांची तजवीज केली. रावजी पंडित यांस बोलावून कारवारच्या सर्व सुभेदारांना आर्थिक आय व्यय देण्यासाठी बोलावले संपूर्ण कारभार आपल्याच हाती घेऊन राजपदवी घेतली. सुभेदार, हवालदार, लष्करी अधिकारी व दस्तुरखुद्द सरलष्कर शंभुराजेंच्या बाजूने असल्याने शंभुराजेंनी बिनघोर पावले उचलली. याच सुमारास अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी जासुदांना पन्हाळ्याच्या आधिकारी यांना देण्यासाठी पत्रे पाठविली त्यांना आजच्या दिवशी अटक करण्यात आली. पुढे मात्र सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडून दस्तुरखुद्द अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना अटक केली गेली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६८३* *गोव्याचा विजरई कोंट द आल्चोर सालसेट प्रांतातील सचोल या ठिकाणी गेला. तेथे त्याचे वास्तव्य २ महिने होते. जुन महिण्यात पाऊस सुरू झाला. पाऊस इतका पडला की, समुद्राप्रमाणे शेते भरून गेली. बाहेरून अन्नपुरवठा बंद पडला. लोक उपाशी मरू लागले. इ.स.१६८१ मध्ये कोंद दी आल्वोर हा गोव्याचे विजरईपदी विराजमान झाला. त्यावेळी गोव्यात पटकीची साथ होती. इ.स.१६८२ ला अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडला. आणि इ.स.१६८३ मध्ये त्याने आपल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण ओढवून घेतले. कोंट द आल्वोर हा अतिशय शूर योद्धा होता. स्पेनमधील अनेक लढ्यांत आघाडीवर होता. त्यास युद्ध मोहिमांचा चांगला अनुभव होता. गोव्यात हजर होण्यापूर्वी तो अंगोल्याचा गव्हर्नर होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१८५८* *वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य क्रिश्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागवून घेतली. नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज २७ एप्रिल १८५८ रोजी बामनपेट येथे बाबुराव सेडमाकेच्या सैन्याशी भिडली. दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली. परंतु ह्या खेपेससुद्धा बाबुरावच्या सैन्याने कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१९०९* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांची जयंती* *अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी श्री. तुकडोजी महाराजांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
🚩छत्रपति शिवाजी महाराज - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत G R EAT 135 R O R SHIVDINVISHESH CREATED BY Ruhul రorsg Futil शिवदिनविशेष २७ एप्रिल झःस. १६६३ शाहिर्तेखानाचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाठविले . महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत G R EAT 135 R O R SHIVDINVISHESH CREATED BY Ruhul రorsg Futil शिवदिनविशेष २७ एप्रिल झःस. १६६३ शाहिर्तेखानाचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाठविले . - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२६ एप्रिल इ.स.१६७५* *मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला. फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. ३ हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ एप्रिल इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)* *संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला.* *छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर अंमल बसवून आपले सुभेदार रावजी पंडितांकरवी हुकूम जारी केला की, सर्वांनी किल्ले पन्हाळ्यास येऊनहिशेब द्यावेत. किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ एप्रिल इ.स.१६८४* *(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार शनिवार)* *छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी. १६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.* *छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;-* *केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले.* *"वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्यता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच, तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे, दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे. कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे. तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत. तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो, अधिक काय लिहणे." यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते.* *वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."* *मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.* *करार / तहातील प्रमुख अटी:* *१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी* *२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.* *३) बालकामगार* *४) आयात व निर्यात यावर जकात.* *५) धर्मांतर बंदी.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ एप्रिल इ.स.१६८५* *अहमदनगरहून प्रयाण!* *औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ एप्रिल इ.स.१७४०* *२० एप्रिल रोजी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची तब्येत अतिशय बिघडली. दि. २३ एप्रिलपासून रावेरखेडी व आसपास अनेक दाने व धर्मकृत्ये करण्यास सुरुवात केली होती. दि. २६ एप्रिल रोजी काशिबाई (बाजीराव पेशव्यांच्या पत्नी) आपले पुत्र जनार्दन आणि महादजीपंत पुरंदांसोबत रावेरखेडीला पोहोचल्या. याच दिवशी पहाटे बाजीराव बेशुद्धावस्थेत गेले. काशिबाईंना तर आपल्या पराक्रमी पतीला असे अंथरूणावर पाहून बळच गेल्यागत झाले. त्यांनी जवळच्याच रामेश्वराच्या मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी बसायला सांगितले. अहोरात्र मृत्युंजयाचा घोष चालू होता. परंतु, त्याने बाजीरावांच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ एप्रिल इ.स.१७५१* *छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी राजसबाइंचे निधन* *राजाराम महाराजांना जानकीबाई,ताराबाई,राजसबाई व अहल्याबाई अशा चार भार्या होत्या.राजसबाई हि कागलकर घाटगे घराण्यातील असून छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर इ.स.१६८७ साली तिचा आपले धाकटे बंधू राजाराम यांजबरोबर विवाह लावून दिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
📜इतिहास शिवरायांचा - किल्त संवर्पन  महारष्टर पदश 12 5 _H RRoR {   {  शिवदिनविशेष २६ एप्रिल घस १६८४ छत्रपती संभाजी महाराज किल्ले बिखाडी येथे मुक्कामास आले. किल्त संवर्पन  महारष्टर पदश 12 5 _H RRoR {   {  शिवदिनविशेष २६ एप्रिल घस १६८४ छत्रपती संभाजी महाराज किल्ले बिखाडी येथे मुक्कामास आले. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२५ एप्रिल इ.स.१६६५* *दाऊदखानाची तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली. मिर्झाराजे जयसिंग यांनी दाऊदखानाच्या नेतृत्त्वाखाली सुमारे ७ हजार स्वार महाराजांचा मुलूख ताराज करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. या तुकडीत दाऊदखानाच्या मदतीला राजा रायसिंह, सर्झाखान, अमरसिंह चंद्रावर, मुहम्मद सालीहर्तखान, सय्यिद झैनुल आबीदीन बुखारी, अचलसिंह कछवाह व स्वतःचे चारशे स्वार मिर्झाराजे जयसिंग यांनी दिले. ही तुकडी रवाना करण्यात मिर्झाराजे जयसिंग यांचा "तिहेरी" उद्देश होता. पहिला , " उद्देश म्हणजे, आदिलशहा महाराजांना दाखवून द्यायचे होते की, मोगली सैन्य केवळ एकाच वेढ्यात गुंतून राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी सुसज्ज आहे". दुसरा" उद्देश म्हणजे, आजवर महाराजांची सैन्ये बादशाही मुलखात घुसून उच्छाद मांडीत असत. आता मोगली सैन्ये त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते. असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्याची जमवाजमव करू शकणार नाहीत हे उघड होते". "आणि तिसरा उद्देश म्हणजे, या निमित्ताने दाऊदखानाला वेगळी कामगिरी देऊन न दुखावता किल्ले पुरंदर वेढ्याबाहेर काढता येत होते". मिर्झाराजे जयसिंग यांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले. दाऊदखानाची ही तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली,* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ एप्रिल इ.स.१६७४* *६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती. आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल. त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.* *२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला ११.७५ ग्रामचा होता) १६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते. १ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते. असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो).* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ एप्रिल इ.स.१६८९* *स्वराज्याचे दूसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करुन ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसूबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणुन बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी पाठविलेले पत्र. (दि.२५ एप्रिल १६८९) खान बहादुर-हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा-* *या वेळी (बादशहाचा) हुकुम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहचला आहे आणि (तेथून) पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरुर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरीत खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होतील. म्हणुन इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू (रामराजाला) अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावे. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहचवावी म्हणजे हल्ला करुन त्याला कैद केले जाईल. जर खबर पोहचविण्यात कुचराई करशील व शत्रु तुमच्या हद्दीतुन निघुन जाईल तर ते चांगले नाही. अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करु नये व सक्त ताकिद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य परायणता जाण. (समासात) दिरंगाई करु नकोस.* *तारीख १४ रजब, (जुलूस) सन ३२ स्वतःच्या वकीलाला त्वरित पाठवा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ एप्रिल इ.स.१६९३* *संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते. २५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि," अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत. अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत आहेत." ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये." अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले. मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ एप्रिल इ.स.१८०९* *कुप्रसिद्ध “अमृतसर संधी” १८०७ मध्ये त्यांनी सतलज पार केले. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना ही महत्वाची शहरे देखील याच काळात जिंकून घेतली. रणजितसिंग यांची ही विजयपताका बाकीच्या लहान शीख संस्थानिकांना पाहवेना. त्यांच्याबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली आणि म्हणूनच सतलज पार करून तेथील गावे जिंकल्यानंतर तिथल्या स्थानिक शीख संस्थानिकांनी रणजितसिंग विरुद्ध इंग्रजांकडे मदत मागितली. त्यानुसार इंग्रजांनी रणजितसिंग यांच्याकडे संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. महाराजाला हा प्रस्ताव अर्थात मान्य नव्हता मात्र इंग्रजांचा दबाव वाढत चालल्याने २५ एप्रिल १८०९ ची कुप्रसिद्ध “ अमृतसर संधी” झाली पण जरी संधी झाली तरी रणजितसिंग यांचा विजय वारू रोखण्यास त्यावेळी कोणीही समर्थ नव्हते. १८०९ साली जेव्हा “कांगडा” प्रांतावर अमरसिंह थापा या शीख संस्थानिकाने हल्ला केला तेव्हा तेथील शासक संसारचंद्र याने रणजितसिंग याची मदत घेतली. परिणामस्वरूप कांगडा शत्रूमुक्त झाला आणि त्यावर रणजितसिंग याचं वर्चस्व देखील प्रस्थापित झालं.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ एप्रिल इ.स.१८१८* *इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला डागले तोफगोळे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा
🚩छत्रपति शिवाजी महाराज - महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल  ARR 0 న $ 1 H  G 43 SHlvDiNvsHEsh CREAIEDತY Konl HoreVatll शिवदिनविशेष २५ एप्रिल इःस. १६७४ छत्रपती शिवाजी महयाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठीचे सुवर्णसिंहासन ; ३२ मण सोन्याचे तयार करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल  ARR 0 న $ 1 H  G 43 SHlvDiNvsHEsh CREAIEDತY Konl HoreVatll शिवदिनविशेष २५ एप्रिल इःस. १६७४ छत्रपती शिवाजी महयाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठीचे सुवर्णसिंहासन ; ३२ मण सोन्याचे तयार करण्यात आले. - ShareChat
#📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२३ एप्रिल इ.स.१६५७* *छत्रपती महाराजांची स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवात* *आदिलशाहाच्या ताब्यातील एकेक प्रदेश अतिशय झापाट्याने काबिज करून घेतला पण महाराजांनी आणखी एक डाव टाकला तो म्हणजे, आदिलशाहीच्या जिंकलेल्या मुलुखाला मान्यता मिळवण्यासाठी आपल्या वकीलाला, सोनोपंत डबीर या शहाजीराजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी वकीलाला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण महाराजांनी मुलुख तर जिंकला होता आदिलशाहाचा, आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची ! बिचार्याच औरंगजेबाला वाटले, छत्रपती शिवाजीराजे आपल्याशी लढण्याआधीच आपल्याला वचकून राहतायेत, त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले, “… सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले, जो मुलुख तुम्हांकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तूमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे…”* *हे पत्र होते दि.२३ एप्रिल १६५७ चे पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे.* *सोनोपंतांनी औरंगजेबाला गोड बोलून झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोंगलांच्या ‘आतल्या’ बातम्या काढून आणल्या आणि बरोबर एका आठवड्यानंतर दि. ३० एप्रिल १६५७ रोजी महाराजांनी आपल्यासोबत पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन मोंगलांचे एक अतिशय महत्त्वाचे ठाणे, पेठ जुन्नर इथे छापा टाकला व लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ एप्रिल इ.स.१६५७* *(वैशाख वद्य षष्ठी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)* *छत्रपती महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफखानास पत्र !* *औरंगजेबाचे छत्रपती शिवाजीराजांना मेहेरबानीचे पत्र शिर्षक वाचुन कदाचित आश्चर्य वाटले असेल परंतु, असे खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल. अगदी लहान वयातच छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याद्रुष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. हळुहळु काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकुन घेतले. इस १६३६ मधे मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर, कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात छत्रपती शिवाजीराजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढुन जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या १६३६ च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व छत्रपती शिवाजीराजांनी ते स्वराज्यात आणले याचे कारण नेमके समजत नाही पण बादशहा शहाजहानचे दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आदिलशहाने तह न पाळणे या दोन गोष्टी संभवतात. इस १६५२-५३ मधे शहाजहानने शाहजादा औरंगजेबाला दुसर्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणुन पाठवले. नोव्हेंबर १६५६ मधे विजापुरचा मोहंमद आदिलशहा वारला त्यावेळी आदिलशाहीत अंतर्गत कलह चालु होता. सत्तेवर कोणाला बसवायचा यावरून मारामारी सुरु होती. औरंगजेबचे लक्ष आदिलशाहीकडे वळाले. त्यानुसार त्याने शहाजहानच्या परवानगीने युद्ध आरंभले व आदिलशहाच्या ताब्यातील बीदरचा किल्ला जिंकला. त्याच सुमारास छत्रपती शिवाजीराजांनी नगरचा मुघल अधिकारी मुल्तफतखान याला पत्र लिहिले की, 'माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मी शाही फौजेत (मुघलांच्या) दाखल होयला तयार आहे' त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यावर शिवाजीराजांनी औरंजेबाकडे आपले वकील सोनोपंत डबीर पाठवले व आपलै म्हणणे मांडले ते असे "विजापुरकरांकडील जो मुलुख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी"* *या वेळेपर्यंत 'शिवाजी' म्हणजे काय पाणी आहे हे औरंगजेबाला बहुदा नीटसे माहीत नव्हते. म्हणुनच त्याने ही वरची महाराजांची 'मागणी' मान्य केली व तसे मान्यतादर्शक व मेहेरबानीचे पत्र २३ एप्रिल १६५७ रोजी महाराजांना पाठवले त्यात तो लिहितो "......सांप्रत जे किल्ले व मुलुख (आदिलशहाचा) तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलुखाचा महसूल तुम्हास दिला असे." म्हणजे बघा, मुलुख कोणाचा तर आदिलशहाच्या ताब्यातील , जिंकला कोणी तर शिवाजीराजांनी आणि त्याची मान्यता घेतली औरंगजेबाकडून म्हणजेच मुघलांकडुन.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ एप्रिल इ.स.१६८३* *(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार सोमवार)* *सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना प पत्राची नोंद!* *"मोगल पातशहा अजून औरंगाबादेतच आहे. सुलतान अकबर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पाठविलेली सेनादले काढून घेतली आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाची फजिती अवघ्या काही वर्षांतच कशाप्रकारे केली होती याचे दर्शन होते. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचेच छावे कसे होते याचे यथार्थ दर्शन या सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून होते. वरील पत्रावरून मराठे सैन्य औरंगजेब बादशहाशी किती निकराने सामना देत होते. आणि औरंगजेब बादशहास निर्विवाद विजय कसा प्राप्त होत नव्हता हे सिद्ध होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ एप्रिल इ.स.१६९४* *छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला इ.१६९४ एप्रिल २३ काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगांव या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देगांवच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ एप्रिल इ.स.१७५२* *मोगल बादशहा आलमगीर याचे मराठ्यांस प्रथम मुखत्यारपत्र मराठे व दिल्लीकर बादशाह यांच्यात कनोज मुक्कामी बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण मराठ्यांनी करण्यासंबंधी अहदनामा ( करार ) झाला.* *या "अहदनामा" नामक तहान्वये -* *१) अब्दालीसारखा परकीय आक्रमक असो किंवा पठाण आणि रजपूत जाट असो, सर्व शत्रूपासून या डळमळीत साम्राज्याचं रक्षण करण्याच पेशव्यांनी मान्य केल आहे पेशवे बादशहाचा गेलेला मुलुख जिंकून त्याला परत करतील.* *२) अब्दालीची हकालपट्टी करण्याकरता तीस लाख आणि इथल्या बंडखोरांच्या बदोबस्ताकरता वीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये पेशव्यांना मिळावेत.* *३) पंजाब आणि सिंधची चौथाई (यात सियालकोट, पसरूर, गुजरात आणि अब्दालीला दिलेलं औरंगाबाद) तसंच हिसार, बदाऊं, संभळ आणि मुरादाबाद हे जिल्हे पेशव्यांना देण्याचं बादशहानं मान्य केलं आहे.* *४) बादशहानं पेशव्यांची अजमेरची सुभेदारी (यात नारनौलची फौजदारी येते) आणिआग्र्याची सुभेदारी (यात मथुरेची फौजदारी येते) बहाल केली आहे. पेशव्यांनी तिथवसुली करून ह्या मुलुखातल्या असलेल्या हक्कांचा उपभोग घेणे आहे.* *५) परंपरागत चालत असलेल्या चालीरीति आणि नियम सांभाळून ह्या मुलुखांचा कारभार पेशव्यांनी बघावा.* *६) मोगल मनसबदारांप्रमाणे पेशव्यांच्या सरदारांनी दरबारात यावं आणि बादशहाच्या मोहिमांत भाग घ्यावा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ एप्रिल इ.स‌.१८१८* *दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
🚩छत्रपति शिवाजी महाराज - महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल " MA RA G R8  1 14 5 0 शिवदिनविशेष 23 0IఖcT 18690 आदिशाहीतील मुलुख काबिज करण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्यात अत्यंत चालाखीने सोनोपंत डबीर यांच्यातर्फे पत्रव्यवहार झाला. महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल " MA RA G R8  1 14 5 0 शिवदिनविशेष 23 0IఖcT 18690 आदिशाहीतील मुलुख काबिज करण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्यात अत्यंत चालाखीने सोनोपंत डबीर यांच्यातर्फे पत्रव्यवहार झाला. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२२ एप्रिल इ.स.१६६७* *छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले* *“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे”* *हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला - “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर” अश्या प्रकारे छत्रपती संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले. औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर छत्रपती संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ एप्रिल इ.स.१६७५* *(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार)* *भागानगरची लुट !* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने गोवळकोंडा हद्दीतील भागानगर जवळील २, दोन संपन्न शहरे लुटून पुष्कळ संपत्ती मिळवली. त्याचबरोबर काही सावकारदेखील पकडून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे करण्यात आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ एप्रिल इ.स.१७३७* *मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला* *पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ एप्रिल इ.स.१८१८* *कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🙏 शिवराय स्टेटस - कित्त सवपन सत महाराष्ट प्रदर GR 3 ] nARWT0 R $ HD 1P shivdinvishESH cneated D| Nohul Burse Paul शिवदिनविशेष २२ एप्रिल झस १६६७ आर्ग्याहून ' सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पत्र पाठवले . कित्त सवपन सत महाराष्ट प्रदर GR 3 ] nARWT0 R $ HD 1P shivdinvishESH cneated D| Nohul Burse Paul शिवदिनविशेष २२ एप्रिल झस १६६७ आर्ग्याहून ' सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पत्र पाठवले . - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२१ एप्रिल इ.स.१६५६* *वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल!* *१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते –मुरारबाजी देशपांडे महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांकडे काम करायचे.शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२१ एप्रिल इ.स.१६७२* *बहामनी राज्याच्या पाच शाह्या झाल्यावर कुत्बशाहीची स्वतंत्र सल्तनत इ. स. १५१२त सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपादनास सुरूवात केली त्यावेळी अब्दुल्ला कुत्बशहा राज्य करीत होता. तो २१ एप्रिल १६७२ रोजी निवर्तला. त्याच्यानंतर अबुल हसन ऊर्फ तानाशहा कुत्बशहा झाला. त्याने इ. स. १६७५ च्या अखेरीस मुसाफरखानास दिवाण पदावरून दूर केले. त्यावेळी राज्याचा सर्व कारभार मादण्णाकडे आला. मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा यांनी कर्नाटकाची व्यवस्था लाविली. छत्रपती बशिवाजी महाराजांची भेट तानाशहाशी घडवून आणिली. हिंदू-मुसलमान धर्म भेदास गौणत्व देऊन जीवनात समरस झालेल्या सर्व दक्षिणियांस संघटित करण्याचे काम शिवाजी महाराज व तानाशहा यांनी घडवून आणिले. आदिलशाहीचा मोगल बळी घेऊ पाहताच छत्रपती संभाजी महाराजांनी शक्य ती मदत देऊन आदिलशाही मोगलांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२१ एप्रिल इ.स.१६८०* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित होते. परंतु, छत्रपती संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच महाराणी सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक केला नाही!). याचवेळी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी यांनी छत्रपती संभाजीराजे पुन्हा बंड करू नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगडाकडे सैन्यासह कूच केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२१ एप्रिल इ.स.१७४३* *सवाई जयसिंगानी आपले वचन बिनचूक पाळले. त्यांच्या सांगण्यावरून बादशहाने माळव्याच्या सुभेदारीच्या सनदा मराठ्यास देण्याचे ठरवून तारीख ७ सप्टेंबर १७४१ रोजी माळव्याचा संपूर्ण कारभार दिवाणी व फौजदारीसुद्धा पेशव्यांचे हवाली केल्याचे फर्मान बादशहाने काढिले. त्या फर्मानात बादशहाने माळव्याची सुभेदारी शहाजादा अहमद ह्याचे नांवे करून पेशव्यास त्याची नायब सुभेदारी देण्यात आली. ह्यासंबंधी बादशहा व पेशव्यांमध्ये जो करार झाला त्या करारास जामीन म्हणून राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव यांजकडून बादशहाने तारीख २१ एप्रिल १७४३ रोजी कबुलायत लिहून घेतली. मराठ्यांना हे फर्मान मिळाल्यावर माळवा, बुंदेलखंड यातील लहान मोठ्या सत्ताधिशांचे पूर्वीचे बादशहाशी असलेले संबंध तुटून त्याची पुनर्घटना पुण्यास होऊ लागली. खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले. उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांची सत्ता स्थिरावण्यास माळव्याचा ताबा मराठ्यास मिळणे आवश्यक होते. ते मराठ्यांनी साधल्यामुळे इथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२१ एप्रिल इ.स.१७५८* *मराठा सरदार हरी रघुनाथ याने लिहीलेल्या पत्राची नोंद!* *"मुक्काम ऐरावती (रावीतीर) नदीतीर, अब्दुस्समदखान सरहिंद होते, त्यांचे पारपत्य श्रीमंतांनी करून सरहिंद व दुआब दोनही तालुके आदिनाबेग मोगलांचे स्वाधीन खंडणी ठरवून केले. तद्नंतर जहानखान व अब्दालीचा पुत्र २० हजार फौजेनिशी लाहोरात होता. त्याजवर चालोन गेले. बिपाशा (व्यास) नदीतून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश रवाना केले. त्यांनी जाऊन गाठ घातली. घाबरा होऊन बुनगे, तोफखाना, फौज मागे टाकून सडा ३ हजार ते ४ हजार फौजेनिशी चिनाब नदी उतरून जीवन रक्षणासाठी पळाला. आपल्या फौजेने नदीपर्यंत पाठलाग करून फौज व तोफखाना लुटून घेतला. चिनाब नदीवर उपाय चालला नाही. म्हणून भगवंते रक्षीला. एरवी श्रीमंतांचा प्रताप विस्तार पावला. या प्रांती आपली सलाबत भारी पडली. दक्षीनी फौज पुर्वी दिल्लीपलीकडे आली नव्हती ते चिनाबपर्यंत पोहोचली.‌चिनाबेस पाणी थोडके असते तरी अटकेपर्यंत जाती. पुढे पुल बांधोन फौजा पाण्यास अडचण भारी पडेल. छावणी इकडे करावी लागेल. इतक्या दूर छावणी करिता नये.‌ त्यात लोकही कष्टी करून लाहोर प्रांताचा बंदोबस्त करून श्रीमंत मागे फिरणार. यादिवशी भगवत्सत्ता प्रमाण".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜
🙏 शिवराय स्टेटस - মনধনি মীল महारष्ट्र प्रदश TH D G R } A " MAR NROR3 50 +B शिवदिनविशेष २९ एप्रिल =सः१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीच्या स्ारीत भेटलेले gaf جamia aiaraaaaaaa মনধনি মীল महारष्ट्र प्रदश TH D G R } A " MAR NROR3 50 +B शिवदिनविशेष २९ एप्रिल =सः१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीच्या स्ारीत भेटलेले gaf جamia aiaraaaaaaa - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१६६५* *रात्रीच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळेस पुरंदर दिलेरखान व मिर्झा राजाविरूध्द झुंजत होता. मुघलांच्या नकळत मराठ्यांची एक नवीन तुकडी केदार दरवाजाने पुरंदरावर पोहचली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१६७५* *माहिती दडवून ठेवण्याचा कौशल्याचा प्रभावी वापर* *हे उदाहरण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून महाराष्ट्राचे महादेव, दस्तुरखुद्द शिवछत्रपतींचे आहे. शिवछत्रपतींनी आपल्या माहिती दडवण्याच्या कौशल्याचा वापर करून आपली मोहीम कशी साध्य केली त्याची ही हकीकत आहे.* *ही माहिती आपल्याला इंग्रजांच्या २० एप्रिल १६७५ रोजी राजापूराहुन मुंबईला पाठवलेल्या एका पत्रा वरून समजते. या लेखाचा विषय वेगळा असल्याकारणाने या संबंधीची माहिती थोडक्यात येथे देतो. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले असताना, त्यांना उत्तरेकडून कोणताही धोका स्वराज्यावर यावयास नको होता. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हे शत्रूला कळू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती. दक्षिणेकडून माहिती उत्तरेकडे जाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे व्यापारी, किंवा माहितीची ने आण करणारे हरकारे. दक्षिणेतून परत येई पर्यंत, शिवाजी महाराजांनी उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आपल्या चौक्या-पहारे बसवून व्यापारी, हरकारे किंवा त्यांच्याकडे असलेल्या पत्रांच्या माध्यमातून दक्षिणेतली कोणतीही माहिती उत्तरेत जाणार नाही याचा बंदोबस्त केला ! या वेळी इंग्रज, शिवाजी महाराजांकडून त्यांना अपेक्षित असलेल्या एका फर्मानाची वाट पाहात होते आणि त्यांनी मोहनदास नावाच्या आपल्या एका माणसाला या पत्राची वाट पाहण्यासाठी नेमले होते. परंतु दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणतीही माहिती पोहोचत नसल्याने या मोहनदासला या पत्राची अनेक दिवस वाट पाहावी लागली. इंग्रज लिहितात :-* *" The same evening the Rajah (Shivaji Maharaj) went hence and wee dispatched Mohondas to Waite upon him and gets the Phiremaund (Farman) sealed. For him wee waited this many dayes, hourely expecting him, but being lately informed that the Rajah (Shivaji Maharaj) hath sett watches suffering none to pass to the northward of the place where he is, but are searched and what papers found about taken away, shall not keep those any longer, but copy of Phiremaund (Farman) shall send hereafter."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१६७५* *शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल !* *सामान्य लोकांप्रमाणेच ज्या राजेरजवाड्यांच्या भेटी हे परदेशी लोक घेत, त्यांना देखील असेच कुतूहल या लोकांबद्दल वाटत असेल पाहिजे. शिवाजी महाराजांना देखील या लोकांबद्दल असेच कुतूहल वाटत होते हे आपल्याला इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या हकीगतींवरून समजते. असाच एक प्रसंग "English Factory Records on Shivaji"* *या पुस्तकात त्या काळी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या इंग्रजांनी नोंदविला आहे. २० एप्रिल १६७५ रोजी केलेल्या नोंदीत या प्रसंगाचे वर्णन आढळते.* *छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आलेले काही इंग्रज अधिकारी, राजापूरजवळ एका झाडाखाली आपले तंबू ठोकून महाराजांची वाट बघत बसले होते. काही वेळाने महाराज तेथे आले आणि या इंग्रजाना पाहून त्यांनी आपली पालखी थांबवली. पुढे हा इंग्रज अधिकारी लिहितो," शिवाजी राजाने आम्हाला जवळ बोलावले; आम्ही पालखी जवळ गेलो आणि पालखी पासून थोड्या अंतरावर थांबलो. हे पाहून शिवाजी राजाने आम्हाला हाताच्या खुणेने आणखी जवळ बोलावले. आम्ही त्याच्या अगदी जवळ जाताच, त्याने माझ्या डोक्यावरील पेरीवीग मधील केसांना हात लावून पाहिला व आम्हाला अनेक प्रश्न विचारले."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार मंगळवार)* *मोगलांकडून सुरतकर इंग्रजांस उपद्रव !* *मोगलांनी सुरत येथील इंग्रज, डच आणि पोर्तुगीज व्यापारी लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. सर्व रयतेप्रमाणे इंग्रजांनीही साडेतीन टक्के कर द्यावा असे मोगली फर्मान आल्याने या सर्वांचे वार्षिक २० हजारचे नुकसान होऊ लागले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१६८४* *औरंगजेबाने शहजादा मुअज्जम व राहुल्लाखान यांच्यासाठी सरंजाम पाठविला. औरंगजेब बादशहाने राहुल्लाखान आणि शहजादा मुअज्जम यांच्यासाठी २०, हजार अश्रफ्या, १०० घोडे, ५०० उंट, २५ खेचरे, व इतर सरदारांसाठी हत्ती, घोडे, जवाहीर आणि खिल्लतीच्या वस्तू पाठविल्या. शहजादा मुअज्जमकडे रवाना झाला. व ताज्या दमाची फौज घेऊन राहुल्लाखान बहादुरखान हासुद्धा औरंगजेब बादशहाच्या हुकुमाप्रमाणे विजापुर जवळील ३५ मैलांवरील (सुमारे ५६, कि. मी. वरील) इंडी या मुक्कामी थांबला. त्याने शहजादा आज्जमला लागणारा सरंजाम दिला. शके १६०६, रक्ताक्षी संवत्सर वैशाख मासी शहाआलम विजापुर जवळ शेक्स म्हणून गाव आहे तेथे बैसला. अशी जेधे शकावलीतील नोंद सापडते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१७४०* *रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१७५८* *तापी, नर्मदेच्या सलीलाने तहान न भागलेल्या आमच्या अभिमानी अश्वांना आता गंगा, यमुना आणि सिंधू माईचे ते तीर्थ आकंठ प्यावयाचे होते. साम्राज्य स्वप्नाची इर्ष्या मनी बाळगणारा तो सूर्य आपल्या मध्यान्ही तळपू लागला होता. दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढणाऱ्या या स्वराज्याला आता नवीन ओळख निर्माण झाली होती आणि त्याला एक नवे नाव मिळाले होते मराठा साम्राज्य !* *शिवाजीराजांचे ‘अहत तंजावर ते तहत पेशावर’ चे स्वप्न आज पूर्ण झाले होते. स्वकर्तुत्ववान अभिमानी मराठी जरीपटका अटकेवर फडकत होता आणि याची जबाबदारी सांभाळत होते अत्यंत हिशेबी आणि चाणाक्ष असणारे बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ थोरले नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांनी शिवाजीराजांच्या धोरणांचा अवलंब करून स्वराज्याला साम्राज्यात रुपांतरीत करण्याची खटपट केली,यामागे छत्रपतींचे विचार होते, बाजीराव व चिमाजीअप्पांची मेहनत होती आणि साथ होती लाल मातीत अंग घुसळणाऱ्या अन् आपल्या माथी तीच माती अभिमानाने लावणाऱ्या शूर मराठमोळ्या सरदारांची.* *नावे तरी किती घ्यावीत नेमाजी शिंदे, मानाजी पायगुडे, राघोबादादा, साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, बळवंतराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव, दामाजी गायकवाड, यशवंतराव पवार, समशेरबहाद्दूर, मल्हारराव होळकर, विसाजी........आणि कित्येक.... हा काळ ठरला सार्थ पराक्रमाचा, मराठा साम्राज्याचे स्वप्न साकारणारा !* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१७७५* *नारो शंकर यांचे पुत्र "रघुपंत नारायण" यांचा पेशव्यांतर्फे 'जहागिरी' देऊन सत्कार करण्यात आला, नारो शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला व त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला 'जहागिरी' दिली गेली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० एप्रिल इ.स.१८०३* *होळकरांनी सातारच्या छत्रपतीकडून १८०२ सालीं पेशवाईचीं वस्त्रें आणून तीं विनायकरावास अर्पण केलीं. परंतु या वस्त्राचा उपभोग अमृतरावाच्या मुलास अवघे दोन महिनेही घेता आला नाहीं. कारण इकडे बाजीरावानें महाडहून इंग्रजांशीं तहाचें बोलणें लावून डिसेंबर १८०२ रोजीं वसई येथे तहनामा ठरवून इंग्रजाच्या साहाय्यानें पेशवाईचीं वस्त्रे पुन्हा मिळविण्याची सिद्धता केली. ता. २० एप्रिल सन १८०३ रोजीं वेलस्ली बाजीरावासह पुण्यास येऊन दाखल झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
🙏शिवदिनविशेष📜 - महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल  -1DOG R D WAUR R பAPAT H RS 50D IDU ಹh Hora rotilಧ शिवदिनविशेष २० एप्रिल इःस. १६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्यावेळी किल्ले पुरंदरावर कुमक पाठवली. महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल  -1DOG R D WAUR R பAPAT H RS 50D IDU ಹh Hora rotilಧ शिवदिनविशेष २० एप्रिल इःस. १६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्यावेळी किल्ले पुरंदरावर कुमक पाठवली. - ShareChat